नामंजुर कर्ज प्रकरणात अर्जदारांनी पुन्हा कागदपत्रे सादर करावीत*

यवतमाळ, दि १७: जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमांतर्गत बँकेने नामंजुर केलेल्या कर्ज प्रकरणे पुन:श्च विचारात घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांना केलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमांतर्गत सीबीलमुळे (CIBIL) नामंजूर झालेले कर्ज प्रकरण वगळता इतर सर्व अर्जदारांनी बँकेस संपुर्ण कागदपत्रासह भेट द्यावी. यासंबंधी काही अडचण आल्यास जिल्हा उद्योग केंद्र व खादी व ग्रामोद्योग मंडळ, यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित