Posts

Showing posts from March, 2026

यवतमाळ महोत्सवाचा दिमाखात समारोप

Image
 इंडियन आयडॉल फेम अभिजित सावंत यांच्या गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं  महोत्सवातील विविध प्रदर्शनीतून सुमारे अडीच कोटींची उलाढाल  सांस्कृतिक कार्यक्रमाला भरगच्च गर्दी यवतमाळ, दि.३१ (जिमाका) : राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तरीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'यवतमाळ महोत्सव २०२६' दिमाखात समारोप करण्यात आला. या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध गायक अभिजित सावंत यांच्या गीतगायनाने रंगत आणली. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ॲड प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार आदी मान्यवर उपस्थित होते. या यवतमाळ महोत्सवात भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनी, उमेदच्या समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी आणि माविमच्या नवतेजस्विनी प्रदर्शनीत कालपर्यंत जवळपास अडीच कोटी रुपयांची उ...

यवतमाळ येथे कायदेविषयक व श्रमदान शिबीर संपन्न

Image
यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ, वरिष्ठ भुवैज्ञानिक कार्यालय, यवतमाळ आणि सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक व श्रमदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक एच. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) होते. प्रमुख वक्ते म्हणून विश्वजीत पाउलबुद्धे, कनिष्ठ वैज्ञानिक, भुवैज्ञानिक कार्यालय, यवतमाळ आणि अनिकेत गादेकर, सहाय्यक भुवैज्ञानिक अधिकारी उपस्थित होते. तसेच सीमा शेठे, प्राचार्य, सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कल्पना राऊत यांनी केले. त्यांनी पाणी संवर्धनाचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले.माहिती दिली. विश्वजीत पाउलबुद्धे यांनी पाण्याचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना पाणी संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “पाणी अडवा, पाणी जिरवा” या उपक्रमाची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. त्यांनी नायट्रेट ...

यवतमाळ ग्रंथोत्सव उत्साहात साजरा

Image
यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : ग्रामीण व शहरी भागांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने राज्य शासनामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ग्रंथप्रेमींना विविध प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे तसेच प्रकाशक व ग्रंथ विक्रेत्यांना व्यासपीठ मिळावे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यवतमाळ आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ ग्रंथोत्सव 2026 चे आयोजन कृषी विज्ञान केंद्र मैदान, पिंपळगाव रोड येथे 27 व 28 मार्च रोजी करण्यात आले. ग्रंथोत्सवाची सुरुवात 27 मार्च रोजी ग्रंथदिंडीने झाली. नगराध्यक्षा प्रियदर्शनी अशोक उईके यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी डॉ. राजेश पाटील (सहायक ग्रंथालय संचालक, अमरावती), किशोर पागोरे (शिक्षणाधिकारी, माध्यमिक), बाळासाहेब धांदे (व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था), स्मिता घावडे, कविता महाजन, प्रशांत पंचभाई, मनोज रनखाम, संजय कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील विवि...

अवेळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे व मालमत्तेचे पंचनामे करा

 जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यात मार्च महिन्यात बहुतांश तालुक्यात अवेळी पाऊस] गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे व मालमत्तेचे (घरांचे) टिनपत्रे उडुन नुकसान झाल्याच्या घटनांची नोंद झालेली आहे. या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, नुकसान झालेल्या क्षेत्राचे अ, ब, क, ड या निकषांनुसार निधी मागणी प्रस्ताव तयार करून तात्काळ सादर करावे. घरांसारख्या मालमत्तेच्या नुकसानीसाठीही स्वतंत्र पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसिलदारांना दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार दारव्हा तालुक्यांत अवेळी पावसामुळे शेतीपिके नजर अंदाजे 42 हेक्टर वरील गहु, तिळ, ज्वारी या शेती पिकांचे नुकसान झाले असल्याची व बाभुळगांव तालुक्यात 2 हेक्टर वरील ज्वारी पिकाचे नु...

शासकीय रुग्णालयातील खोकल्याच्या औषधी कालबाह्य नाहीत

 रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट समाजमाध्यमांवरील बातमी दिशाभूल करणारी यवतमाळ,दि.३० (जिमाका) : यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात खोकल्याच्या औषधी कालबाह्य नाहीत, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आले. बॅच नंबर व मुदत कालावधी मिटलेली खोकल्याची औषधी वितरीत केल्याबाबत समाज माध्यमातील चुकीच्या व्हायरल बातमीच्या अनुषंगाने शासकीय रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण केले असून त्यानुसार खोकल्याची औषधी मे. हाफकिन महामंडळ, मुंबई यांचेकडून शासकीय रुग्णालयास एप्रिल २०२५ मध्ये पुरवठा झालेला आहे. पुरवठा घेतांना बॅच नंबर व मुदत कालावधी तपासूनच व पुराव्यादाखल त्याचे छायाचित्र जतन करुन ठेवण्यात आलेले आहेत. तसेच त्याची विभागांतर्गत पार्सल रजिस्टर व जडसंग्रह नोंदवहीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. समाजमाध्यमातील बातमीनुसार वितरीत बाटलीवर नोंदी मिटलेल्या आढळत असल्याचे म्हटले आहे. एप्रिल २०२५ पासून आजतागायत वातावरणाच्या परिणामामुळे सदर नोंदी मिटल्याची दाट शक्यता आहे. परंतु औषध भांडारातील उपलब्ध दस्ताऐवजानुसार खोल्याची औषध कालाबाह्य झालेले नसून त्याचा कालबाह्य दिनांक हा फेब्रुवारी २०२७ ...

कृषी प्रदर्शनीला जिल्हाधिकारी विकास मीना यांची भेट

Image
 सेंद्रिय शेती पद्धतीतून निर्मित वस्तू, बीबियाणे, शेत अवाजारे आणि खाद्यपदार्थांच्या स्टॅाल्सची केली पाहणी यवतमाळ, दि. ३० (जिमाका) : यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्र मैदान पिंपळगाव रोड येथे आयोजित ‘यवतमाळ महोत्सवा’त जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत कृषी प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. या पारदर्शनीला जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काल भेट देवून सेंद्रिय शेती पद्धतीने निर्मित केलेल्या वस्तू, बीबियाणे, शेत अवाजारे व यंत्र आणि सेंद्रिय खाद्यपदार्थांच्या स्टॅाल्सची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, शेतकरी बांधव उपस्थित होते. या प्रदर्शनी दरम्यान शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ट्रॅक्टरची प्रतिकात्मक किल्ली जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आली. या कृषी प्रदर्शनीमध्ये स्थानिक शेतकरी उत्पादक संस्था आणि कंपन्यांकडून सेंद्रिय पद्धतीने निर्माण केलेले गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, मसाले, फळ भाजीपाला इ. प्रदर्शित करण्यात करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाला शेतकरी, महिला आणि नागरिकांनी भेट देवून शेतकऱ्यांना...

महिला स्वयंसहाय्य बचत गटांच्या उत्पादनासाठी माविमची ‘नवतेजस्विनी प्रदर्शनी’

Image
७६ स्टॉल्सच्या माध्यमातून गृहोपयोगी वस्तू, कडधान्य, शोभिवंत वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीस यवतमाळ, दि.३० (जिमाका) : राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तरीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पाच दिवसीय यवतमाळ महोत्सवात महिला स्वयंसहाय्य बचत गटांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मार्फत ‘नवतेजस्विनी प्रदर्शनी’ भरविण्यात आली आहे. या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील ७६ महिला स्वयं सहाय्य बचत गटांनी सहभाग घेतला असून या मध्ये गृह उपयोगी वस्तू, कडधान्य, बांबू उत्पादने, माती ची भांडे, विविध धान्ये, शोभिवंत वस्तू, खाद्यपदार्थ अशी विविध उत्पादने खरेदी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. महिला स्वयं सहाय्य बचत गटांनी निर्मित उत्पादने जास्तीत जास्त खरेदी करावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासोबतच, खाद्यपदार्थांची आवड असलेल्या खाद्यप्रेमींसाठी ‘खाद्य जत्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. या खाद्य जत्रेत अससल मराठी खानावळींचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या ‘खाद्य जत्रा’ला खवय्यांनी आणि यवतमाळ जिल्ह्यातील...

यवतमाळ महोत्सवात उमेदची ‘समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी; महिला स्वयं-सहाय्यता गटांचे १२० स्टॉल्स

Image
जिल्हाधिकारी विकास मीना यांची भेट व पाहणी यवतमाळ, दि. 30 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदमार्फत या वर्षीची 'समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी' ही यवतमाळ महोत्सवात भरविण्यात आली आहे. या प्रदर्शनीमध्ये महिला स्वयं-सहाय्यता गट, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, तसेच स्वेप आणि आरसेटीअंतर्गत घडलेल्या उद्योजकांचे तब्बल १२० स्टॉल्स उभारण्यात आले असून या स्टॉल्सना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच काही गृहोपयोगी वस्तूंची खरेदी आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. उमेदची ही 'समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी' अधिक व्यापक, भव्य आणि समन्वयात्मक स्वरूपात उभी राहिली आहे. उमेद अभियानाच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाअंतर्गत घडलेले उद्योजक हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. मागील वर्षी याच मिनी सरस प्रदर्शनीत महिला गटांनी तब्बल 54 लाख रुपयांची उलाढाल केली होती. यंदा त्याहून अधिक विक्री व नवीन बाजारपेठ निर्माण करण्याचे उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास या प्रदर्शनातील महिलांनी व्यक्त केला आहे. उमेदच्या माध्यमातून 'बचत गट ते उद्...

शिवशंभो गर्जना’तून संत-महापुरुषांचा जयघोष; यवतमाळ महोत्सवात भक्ती-देशभक्तीचा संगम

Image
यवतमाळ, दि. 30 : यवतमाळ महोत्सवातर्गत सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार अभिजित आणि अमू जाधव यांचा 'शिवशंभो गर्जना' हा गीतगायनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमातून संत, महापुरुष आणि राष्ट्रपुरुषांचा जयघोष घुमला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र मैदान, वाघापूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात शिव-गणेश आराधना, देशभक्तीपर गीते तसेच ‘दैवत छत्रपती’, ‘स्वराज्याचं धनी, माझं शिवबा राजा’ या गीतांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी इतिहासाला उजाळा देण्यात आला. यावेळी शिवशंकर डमरू वादन, शिव आराधना, श्री विठ्ठल भक्तीगीत तसेच श्री स्वामी समर्थ आणि संत श्री गजानन महाराज यांच्या भक्तीगीतांनी वातावरण भक्तिमय झाले. संभळ आणि दिमडी या पारंपरिक वाद्यांच्या सादरीकरण केले. या कार्यक्रमाला यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, माविमचे जिल्हा समन्...

यवतमाळ महोत्सवात जिल्हास्तरीय पशुप्रदर्शन उत्साहात; पशुपालकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Image
यवतमाळ,दि.30 (जिमाका) : यवतमाळ महोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषद यवतमाळ व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित सन २०२५-२६ साठीच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचा समारोप उत्साहात पार पडला. २७ व २८ मार्च रोजी आयोजित या प्रदर्शनात जिल्ह्यातील १६ तालुक्यातील पशुपालकांनी आपल्या उत्कृष्ट जनावरांसह लक्षणीय सहभाग नोंदवला. दिग्गजांच्या हस्ते झाले उद्घाटन* या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हस्ते व जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, आणि जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. मंगेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. २७५ पशुपक्ष्यांचा सहभाग आणि आठ गट प्रदर्शनात जिल्ह्यातील १६ तालुक्यातून एकूण २७५ पशुपक्ष्यांची नोंदणी झाली होती. हे प्रदर्शन एकूण आठ गटांमध्ये विभागले गेले होते. त्यामध्ये संकरित वासरे (नर गट), संकरित वासरे (मादी गट), संकरित गाय वर्ग, देशी व गावठी गाय वर्ग, म्हैस वर्ग, बैल जोडी, शेळी वर्ग, कुक्कुट (पक्षी) वर्ग करण्यात आले ह...

गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेल पुरवठ्याचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

Image
यवतमाळ, दि. २७ (जिमाका) : मध्यपूर्व आणि आखाती देशातील युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेल पुरवठ्याचा पालकमंत्री ना. संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री ना .प्रा अशोक उईके यांनी शुक्रवारी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या या बैठकीत आ. राजू तोडसाम, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. किसन वानखेडे, आ. संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, मुख्य वनसंरक्षक अभिजीत वायकोस, प्रकल्प अधिकारी अमित रंजन, जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्री ना. संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री ना .प्रा अशोक उईके यांनी जिल्ह्यातील गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलच्या उपलब्ध साठ्याची माहिती घेतली. तसेच साठेबाजी, काळाबाजार रोखण्यासाठी पथकांनी कारवाई करावी. अफवांमुळे नागरिकांची संभ्रम निर्माण होत असल्याने तो तातडीने दूर करण्यासाठी जनजागृती करावी. तसेच युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाने सतराक राहून तयारी करावी, ...

शिव महापुराणनिमित्त ३० मार्च रोजी आर्णी येथील आठवडी बाजार बंद

यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : बहिरमदेव शिव महापुराण सेवा ट्रस्ट, आर्णी यांच्या वतीने दि. ३० मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत पंडित प्रदीप मिश्रा (सिहोर वाले) यांची शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आर्णी येथे दि. ३० मार्च २०२६ रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मार्केट अॅड फेअर अॅक्ट, १८६२ अंतर्गत कलम ५ (अ) नुसार हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार नगरपरिषद आर्णी येथे सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार बंद राहील.

जिल्ह्यात मुबलक इंधनसाठा उपलब्ध ; अफवांवर विश्वास ठेऊ नये

जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : मध्यपूर्व आशिया, अमेरिका आणि युरोपियन खंडातील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या अफवा पसरत असताना, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तीनही कंपन्यांकडून इंधन साठा पुरेसा असल्याची खात्री देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि ऑईल कंपन्या समन्वयाने काम करत असून पेट्रोल-डिझेलचा साठा अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सांगण्यात आले. २७ मार्च रोजीच्या अहवालानुसार, जिल्ह्यात एकूण ६७५ किलोलीटर पेट्रोल आणि ८०९ किलोलीटर डिझेल साठा उपलब्ध आहे. तसेच ४७५ किलोलीटर पेट्रोल आणि ११०० किलोलीटर डिझेलचा साठा वाहतुकीत (इन ट्रान्झिट) आहे. कंपनीनिहाय साठा चौकट हिंदुस्थान पेट्रोलीयम १८८ किलो लिटर, डिझेल २५१ किलो लिटर, (इन ट्...

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत १० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन

Image
 पालकमंत्री ना. संजय राठोड व आदिवासी विकास मंत्री ना. प्रा अशोक उईके यांनी घेतला आढावा यवतमाळ, दि. २७ (जिमाका) : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यात १० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन करण्यात आले असून त्याअनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री ना.प्रा. अशोक उईके यांनी या योजनेचा सविस्तर आढावा शुक्रवारी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजित बैठकीस आमदार राजू तोडसाम, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार किसन वानखेडे, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, मुख्य वनसंरक्षक अभिजीत वायकोस, प्रकल्प अधिकारी अमित रंजन तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री ना. संजय राठोड म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी शेत पाणंद रस्ता हा अत्यंत जीव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्या दैनंदिन शेतीकामांसाठी तसेच उत्पादन बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी या रस्त्यांची गरज आहे. या योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे...

‘यवतमाळ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन शेतकरी, महिला, युवा आणि सर्वसामान्य नागरिक ‘यवतमाळ महोत्सवा’चा केंद्रबिंदू

Image
 पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे प्रतिपादन यवतमाळ,दि.२७ (जिमाका) : राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तरीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यामाने कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्र येथे आयोजित दि. 27 मार्च ते 31 मार्च या पाच दिवसीय भव्य ‘यवतमाळ महोत्सव 2026’ चे उद्घाटन पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. अशोक उईके, आ. राजू तोडसाम, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. किसन वानखेडे, आ. सजय देरकर, यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, विभागीय आरबीडीसी पवन देशमुख, सहयोगी संशोधन संचालक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिपक कच्छवे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री ना. संजय राठोड म्हणाले की, यवतमाळ महोत्सव हे केवळ प्रदर्शनी नाही, तर हा शेतकरी केंद्रीत आणि त्यांच्या प्रगतीचा उत्सव आहे. यात कृषी महोत्सव व पशु प्रदर्शन होत आहे जिथे आधुनिक शेती आणि नव्या पशू जातींची माहिती दिली जात आहे. उमेदमार्फत स...