Posts

Showing posts from 2026

खरीप हंगामात ‘कापूस उत्पादकता अभियान, कपास क्रांती’ योजना राबविण्यात येणार

 सघन कापूस लागवड, क्लोज स्पेसिंग, एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिके  शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत “कापूस उत्पादकता अभियान, कपास क्रांती ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये सघन कापूस लागवड प्रात्यक्षिके ४ हजार ५७० हेक्टर, क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिके ७ हजार १३ हेक्टर, तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिके ७७८ हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येणार आहेत. याशिवाय स्थानिक पुढाकारांतर्गत २२ बायोचार युनिट्स आणि २६८ कापूस श्रेडर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व विहित कार्यपद्धतीनुसार राबविण्यात येणार असून, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी उपलब्ध असलेल्या अल्प कालावधीचा विचार करून लाभार्थी निवडीचे नियोजन करण्यात आले आहे. योजनेतील लाभांचे वितरणानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७९ टक्के, अनुसूचित जातींसाठी १२ टक्के आणि अनुसूचित जमातींसाठी ९ टक्के असे निश्चित करण्...

माय भारत केंद्रातर्फे जिल्ह्यात ‘नेशन फर्स्ट चॅलेंज’ मोहीम

Image
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ‘मेरा युवा भारत’ माय भारत केंद्रातर्फे जिल्ह्यात ‘नेशन फर्स्ट चॅलेंज’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी यवतमाळचे जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांनी जिल्हाधिकारी विकास मीना यांची जिल्हाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन मोहिमेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीस ‘माय भारत’चे कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे आणि रवी शेळके उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रशासनाने या देशव्यापी मोहिमेला जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी,जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांचीही भेट घेण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांपर्यंत मोहिमेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा वापर कसा करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनातून प्रेरित झालेल्या या मोहिमेत युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातून राष्ट्रनिर्माणात योगदान देण्यासाठी पाच महत्त्वाच...

मान्सूनपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करा

Image
 जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर व अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज महसूल भवन येथे विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, पूनम अहिरे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने कार्य करून मान्सूनपूर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टी अथवा पूरस्थितीत तात्काळ बचाव व मदतकार्य राबविण्यासाठी आवश्यक वाहने, यंत्रसामग्री व प्रतिसाद पथके (रिस्पॉन्स टीम) सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरी व ग्रामीण भागातील नाले, गटारे, नदीपात्रे आणि रस्त्यांची साफसफाई तातडीने पूर्ण करावी, जलसंधारणाची कामे पूर्ण करावी, धोकादायक पुलांची तपासणी करावी तसेच...

राष्ट्रीय लोकअदालत 12 सप्टेंबरला होणार

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये एकाच दिवशी होणार सुनावण ी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक 12 सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन होत असल्याने प्रलंबित वाद जलदगतीने निकाली काढण्यास मोठी मदत होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आनंद एल यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे या लोकअदालतीचा शुभारंभ होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच इतर न्यायाधिकरणांमध्येही एकाच वेळी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ, यांचा संयुक्त सहभाग असून संपूर्ण न्यायव्यवस्थेचा समन्वय साधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्य...

ज्वारी, बाजरी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी 10 जूनपर्यंत मुदतवाढ

रब्बी हंगाम 2025-26 मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत महागांव, पांढरकवडा, पाटण, पुसद, आर्णी, उमरखेड, घाटंजी, कळंब व राळेगांव या नऊ ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. या खरेदी केंद्रामध्ये तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागांव, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. पाटण,किसान मार्केट यार्ड शेलु(बु). पुसद, शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, (केंद्र दत्तरामपुर), तालुका खरेदी विक्री संघ मर्या. उमरखेड, तालुका खरेदी विकी संघ मर्या. घाटंजी, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. कळंब व तालुका खरेदी विक्री संघ मर्या. राळेगांव या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दिनांक 1 एप्रिल ते 15 मे 2026 पर्यंत करण्यात येणार होती. सद्यस्थितीत नोंदणी विचारात घेवुन शासनाने ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसा...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तंबाखू विरोधी सप्ताह साजरा जनजागृती कार्यक्रमातून तंबाखूमुक्तीचा संदेश

तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथे ३१ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत तंबाखू विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आयोजित या सप्ताहात पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. ई-सिगारेट आणि फ्लेवर तंबाखूच्या वाढत्या वापराबाबत विशेष जनजागृती करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तसेच हृदयविकारांसह अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. भारतातील सर्व प्रकारच्या कर्करोगांपैकी सुमारे २७ टक्के कर्करोग तंबाखू सेवनाशी संबंधित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके आणि जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. उमेश जोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह राबविण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना तंबाखूमुक्त ...

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता

यवतमाळमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता असून ४० खोल्यांची स्वतंत्र इमारत भाडे तत्त्वावर देण्यासाठी इच्छूक असलेल्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. नवीन इमारतीसाठी अपेक्षित सुविधा असाव्यात विद्यार्थ्यांना पुरेल इतक्या ४० खोल्या, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, १५ स्नानगृहे व १५ शौचालयांची सोय, पार्किंगसाठी स्वतंत्र जागा, पुरेशी विद्युत व्यवस्था असणे आवश्यक आहे. तरी इच्छुकांनी संपर्क साधावा असे गृहपाल, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह क्र. १, यवतमाळ यांनी कळविले आहे

जिल्हा स्त्री रुग्णालय पीसीओडी क्लिनिकची सुविधा दर दुसऱ्या व चौथ्या बुधवारी तपासणी, समुपदेशन व उपचार

जिल्ह्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राखण्याच्या उद्देशाने तसेच विशेषतः अविवाहित तरुणी आणि प्रजननक्षम वयोगटातील महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) या संप्रेरकांशी संबंधित आजाराच्या निदान व उपचारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय, यवतमाळ येथे पीसीओडी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. पीसीओडीमुळे महिलांमध्ये शारीरिक, मानसिक तसेच हार्मोनल बदल घडून येतात. या समस्यांवर योग्य वेळी वैद्यकीय उपचार, तपासणी आणि समुपदेशन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभरात पीसीओडी क्लिनिक सुरू करण्यात आले असून यवतमाळ जिल्ह्यातही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्यांचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे क्लिनिक दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी, म्हणजे दर पंधरा दिवसांनी कार्यरत राहणार आहे. लाभार्थींना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी, आवश्यक वैद्यकीय चाचण्या, एकात्मिक औषधोपचार, आरोग्यविषयक समुपदेशन तसेच आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पीसीओडी क्लिनिक शुभारंभ कार्यक्रमाच्या प्र...

पैनगंगा नदी काठावरील ४४ गावांना ईसापूर धरणाचे पाणी जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश

Image
 पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना  नागरिकांना मोठा दिलासा उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील ४४ गावांमध्ये निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणातून आरक्षित पिण्याच्या पाण्यापैकी ३ दशलक्ष घनमीटर पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. गटविकास अधिकारी, पंचायत समिती उमरखेड यांनी पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये भूजल पातळी घटल्याने गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ग्रामस्थ व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरक्षित पाणीसाठ्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली होती. त्यानुसार उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणात सध्या ४२३.३२४५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, यापूर्वी ९ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. आता अतिरिक्त ३ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास म...

विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणूक-2026 प्रक्रियेअंतर्गत यवतमाळ मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल घोषित केल्यानंतर जिल्ह्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने 5 जून 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ज्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल घोषित झाले आहेत, त्या मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातही स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात आली असून, निवडणूक निर्बंध हटले आहेत. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र देवून सूचित केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून बेंबळा प्रकल्पाची पाहणी

Image
जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज पाहणी केली. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या विविध बाबींची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रकल्पाच्या देखभाल, व्यवस्थापन, इमारत आणि प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, कार्यकारी अभियंता व्ही. ए. शिरभाते तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बेंबळा प्रकल्प हा जिल्ह्यातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प असून त्याच्या कार्यक्षमतेबाबत आणि व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली

श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दिव्यांग नोंदणी कक्ष

 दिव्यांग लाभार्थ्यांनी ‘युडीआयडी’ कार्ड आधार संलग्न करावे  तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांचे आवाहन येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग नोंदणी कक्ष सुरु करण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे लाभ नियमित व सुरळीतपणे सुरू राहावेत, यासाठी यवतमाळ तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी), दिव्याग प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी केले आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे जुन्या स्वरूपाचे, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा विशेष अपंगत्व मूल्यांकन मंडळाचे प्रमाणपत्र आहे, त्यांनी दिव्यांग नोंदणी कक्ष येथे जावून वैश्विक दिव्यांग ओळखपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्र काढून घ्यावे. तसेच काही लाभार्थ्यांच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि आधार कार्डवरील नाव अथवा जन्मतारखेमध्ये तफावत असलेल्या लाभार्थ्यांनी तसेच ज्या ल...

टीडीआरएफ संस्थेला नियमानुसार जिल्हा युवा पुरस्कार प्रदान -जिल्हा क्रीडा अधिकारी यांची माहित

 दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता वस्तुस्थितीची खातरजमा करण्याचे आवाहन जिल्हा युवा पुरस्कार प्रक्रिया ही शासन निर्णयातील निकष, नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शकपणे राबविण्यात आली असून १ मे २०२६ रोजी प्रदान करण्यात आलेला जिल्हा युवा पुरस्कार हा पूर्णतः नियमसंगत व निर्धारित प्रक्रियेनुसार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुक्सवार यांनी दिली आहे. १ मे महाराष्ट्रदिनी जिल्हा युवा पुरस्कार सन २०२४-२५ संदर्भात काही वर्तमानपत्रे तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या बातम्यांमध्ये वस्तुस्थितीविरुद्ध व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. वस्तूस्थितीनुसार जिल्हा युवा पुरस्कारासाठी लक्ष्य बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ अंतर्गत कार्यरत टी.डी.आर.एफ. अर्थात टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स या संस्थेने नियमानुसार प्रस्ताव सादर केला होता. १२ नोव्हेंबर २०१३ च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार या प्रस्तावाची छाननी व मूल्यांकन प्रक्रिया करण्यात आली. या संस्थेच्या मूळ उद्दिष्टांमध्ये नैसर्गिक आपत्तीग्...

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांगांना मिळणार राष्ट्रीय पुरस्कार

Image
 राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन  31 जुलैपर्यंत मुदत दिव्यांग व्यक्तींच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दिव्यांगजन सक्षमीकरणासाठी वर्ष 2026 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज व नामनिर्देशने मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज व नामनिर्देशन स्वीकारण्याकरिता राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल 15 मे 2026 पासून खुले करण्यात आले असून 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. इच्छुक व्यक्ती, संस्था तसेच संबंधित घटकांनी आपले अर्ज व नामनिर्देशने केवळ ऑनलाइन पद्धतीने www.awards.gov.in या संकेतस्थळावर सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जामध्ये निर्धारित नमुन्यानुसार सर्व आवश्यक माहिती भरून दिव्यांग व्यक्ती किंवा संस्थेच्या उल्लेखनीय, प्रेरणादायी व उत्कृष्ट कार्याचा सविस्तर तपशील नमूद करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कार्याची पुष्टी करणारी कागदपत्रेही पोर्टलवर अपलोड करावीत. या राष्ट्र...

नेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, नेर येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, मोफत शैक्षणिक साहित्य, गणवेश, क्रीडा साहित्य, निर्वाह भत्ता तसेच ई-ग्रंथालय यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८५ टक्के जागा राखीव असून त्यामध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी १ टक्का व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के समांतर आरक्षण आहे. तसेच अनुसूचित जमातींसाठी ३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी ५ टक्के आणि विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hams.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी मागील शैक्षणिक वर्षाची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्...

स्वाधार योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशाचा ऑनलाइन अर्ज बंधनकारक

 अर्ज करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी, १२ वी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रथम समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इयत्ता ११ वी, १२ वी तसेच सर्व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी १५ जुलै पर्यंत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर http://hmas.mahait.org अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावा. सन २०२४-२५ पासून स्वाधार योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. राज्यभरातील महाविद्यालयांची वाढती संख्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशात होत असलेली वाढ लक्षात घेता सर्व पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होत नसल्याचे विभागाने स्पष्ट केले...

महिलांच्या उद्योगवाढीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा - राजलक्ष्मी शाह

Image
 वार्षिक क्रेडिट प्लॅन सेमिनारचे आयोजन  गतवर्षी २,२२३ स्वयं सहाय्यता गटांना १०० कोटींचे कर्ज महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), यवतमाळ यांच्या वतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत वार्षिक क्रेडिट प्लॅन सेमिनार २०२६-२७ चे आयोजन महिला व बाल विकास भवन, जिल्हा परिषद, यवतमाळ येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अतुल इंगळे, विभागीय सल्लागार केशव पवार, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पवन देशमुख तसेच माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे यांच्या हस्ते झाले. सेमिनारमध्ये राज्यस्तरीय नवतेजस्विनी प्रकल्पाचे सादरीकरण केशव पवार यांनी केले, तर आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा जिल्हास्तरीय क्रेडिट प्लॅन सुनील सोसे यांनी सादर केला. यवतमाळ जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २,२२३ स्वयं-सहाय्यता गटांना १००.४७ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. सन २०२६-२७ साठी २,३९५ स्वयं-सहाय्यता गटांचे कर्जलिंकेज, एक हजार सूक्ष्म उद्यम कर्ज प्रकरणे तसेच ११८.९३ ...

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

 मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु" ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा शाश्वत विकास साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सामुदायिक घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे स्वयंमूल्यांकन व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट्स यांच्या कार्यस्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची ओळख पटवून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान घनकचरा व्यवस्थापन नियम २०...

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प

 22 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने शनिवार, दि. 6 जून रोजी जिल्ह्यात भव्य ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कॅम्प केवळ एका ठिकाणी न होता जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व 22 शाखांमध्ये एकाच वेळी आयोजित केला जाणार आहे. शेती आणि पूरक व्यवसायांना चालना देणाऱ्या विविध शासकीय व बँक योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात येणार आहे. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी), कृषी पायाभूत सुविधा निधी, ग्रामीण गोदाम भंडारण, कोल्ड स्टोरेज (शीतगृह) तसेच महिला बचत यांसारख्या शासकीय व बँक योजनांचा समावेश आहे. पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून जागेवरच मंजुरीपत्र देण्यात येणार असून थेट कर्जवाटपाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी मेळावा जिल्ह्यातील शेतकरी, कृषी उद्योजक आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांसाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी व कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांन...

जनगणनेच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

Image
घरांना भेटी देवून केली पडताळणी ; खरी व अचूक माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्ह्यात जनगणनेचे काम सुरू असून यात प्रगणक, पर्यवेक्षक घरोघरी जावून कुटुंब व नागरिकांची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवित आहेत. या जनगणनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व फिल्डवरील अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यवतमाळमधील चौसाळा परिसरात भेट देऊन कामाची प्रगती जाणून घेतली. सन 2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी जनगणना करण्यात येत आहे. यात 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना करण्याची सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रत्यक्ष घरी भेट देऊन जनगणनेचे काम करण्यात येत आहे. या राष्ट्रीय कामाची प्रगती तसेच फिल्डवर येत असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चौसाळा परिसरातील घरांना भेटी दिल्या. प्रगणक यांच्यामार्फत सुरू असलेली जनगणना अचूक होत आहे का, याची त्यांनी स्वतः पडताळणी केली. जनगणनेच्या कामासाठी घरी येणारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना, नागरिकांनी खरी व अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना य...

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत

महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, वणी, केळापूर, राळेगाव, यवतमाळ, दारव्हा, पुसद आणि उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी, दुरदर्शन प्रतिनिधी आनंद कसंबे, आकाशवाणी प्रतिनिधी मंगला माळवे हे या समितीचे सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत.

अनुसूचित जातीच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत यवतमाळ जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये निवासी राहून सर्व सोयी-सुविधांसह मोफत शिक्षण दिले जाते.या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरण, भव्य व सुसज्ज शासकीय इमारत, तज्ज्ञ शिक्षकवृंद, सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, राहण्याची उत्तम व्यवस्था, मोफत शैक्षणिक साहित्य व गणवेश, खेळाचे साहित्य, नाश्ता व भोजनाची व्यवस्था तसेच अद्ययावत डिजिटल रुमद्वारे उत्कृष्ट अध्यापनाची सोय शासनातर्फे करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सध्या मुलांसाठी नबाबपूर ता. नेर, ईसापूर ता. दिग्रस, नाथनगर भंडारी ता. आर्णि व परसोडा ता. वणी येथे, तर मुलींसाठी पी.एम. श्री. शाळा आसारपेंड ता. पुसद, मरसुळ ता. उमरखेड, महागाव ता. महागाव व घाटंजी ता. घाटंजी या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. अधिक माहिती करिता तसेच प्रवेश अर्जाकरीता संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी थेट संपर्क...

जेंडर बजेटिंग व जेंडर सेन्सिटायझेशन विषयावरील प्रशिक्षणातून संवेदनशील प्रशासनाची जडणघडण

Image
 विविध विभागांच्या उत्स्फूर्त सहभाग महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शासकीय अधिकाऱ्यांसाठी “जेंडर बजेटिंग व जेंडर सेन्सिटायझेशन” या विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर प्रेरणागीत सादर करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मारोती पवार, कार्यकारी संचालक सम्यक पुणे आनंद पवार विभागीय सल्लागार माविम अमरावती विभाग केशव पवार, प्रशिक्षण तज्ज्ञ माविम मुंबई सुमेध हराळकर, तसेच जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात सुनील सोसे यांनी प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत स्त्री-पुरुष समानता, जेंडर बजेटिंग आणि संवेदनशील प्रशासन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. विविध विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीत महिलांचा सहभाग, त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या सेवांची परिणामकारकता आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा समावेश य...

युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांसाठी ठरला दिशादर्शक !

Image
 समारोपीय सत्रात फेलोशिप संधींबाबत मुख्यमंत्री फेलोंचे मार्गदर्शन  स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 21 एप्रिल ते 1 जून या कालावधीत राबविण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा सोमवारी दि.1 जून रोजी विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्राने समारोप करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित या समारोपीय मार्गदर्शन सत्राला जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे, मुख्यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी आणि कुणाल पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून आयेाजित या संपूर्ण उपक्रमात प्रत्येक सोमवारी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय वन सेवेतील अधिकारी रॉबीन बंसल, रेवैयाह डोंगरे, एन. भुवनेश्वर आणि उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे, गंगाधर होवाळे, तहसीलदार हेमकृष्ण पिसदे यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोज...