Posts

Showing posts from 2026

भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘जलतारा’ संकल्पनेंतर्गत शेत शोषखड्डा योजना > शेतकऱ्यांनी शेतात शोषखड्डा तयार करावा > प्रथम अर्ज- प्रथम प्राधान्य तत्वावर लाभ मिळणार

यवतमाळ दि. 24 (जिमाका) : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित यंत्राद्वारे शेत शोषखड्डा योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शोषखड्डा तयार करता येणार आहे. “आज पाणी जपले तरच उद्याचे शेती भविष्य सुरक्षित” असा संदेश देत त्यांनी शेतकऱ्यांना शेत शोषखड्डा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शासनामार्फत राबविण्यात येणारी ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित शेत शोषखड्डा योजना ही केवळ योजना नसून शेतकऱ्यांसाठी जीवनदायी उपाय असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेत शोषखड्ड्याची आवश्यकता का? पावसाचे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी वाया जात आहे, विहिरी कोरड्या पडण्याचे प्रमाण वाढत आहे, भूजल पातळी सातत्याने घटत आहे तसेच अतिवृष्टीमुळे मातीची धूप होऊन सुपीकता कमी होत आहे. या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे शेतात पाणी अडवणे व जमिनीत मुरवणे हेच असल्याचे कृषी विभागाने केले आहे. शेत शोषखड्ड्याचे फायदे शोषखड्ड्यामुळे जम...

जिल्ह्यातील १३ तलाव मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येणार > मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी ११ मेपर्यंत प्रस्ताव सादर करावे > मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे आवाहन

यवतमाळ दि.२४ (जिमाका) : पाटबंधारे, जलसंधारण विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे मासेमारी हक्काचे हस्तांतरण झालेले ०-५०० हेक्टर पर्यंतचे तलाव शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीमार्फत पात्र संस्थांना मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येतात. सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्ष कालावधीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील ५०० हेक्टरपर्यंतचे एकूण १३ तलाव मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येणार आहेत. त्यासाठी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. या १३ तलावांमध्ये तरोडा (ता. उमरखेड), खरद (ता. यवतमाळ) , मजरा (ता. राळेगाव), येडशी (ता. राळेगाव), राजूर (ता. कळंब), अर्जुना (ता. यवतमाळ), उमडा (ता. यवतमाळ), कापरा (ता. बाभूळगाव), डिगडोह (ता. राळेगाव), टाकळी (ता. यवतमाळ), करणवाडी (ता. केळापुर), पाचपहूर (ता. झरीजामणी), देवगाव (ता. आर्णी) हे तलाव मासेमारीकरीता ठेक्याने द्यावयाचे आहेत. या तलावांपैकी संबंधित तलावांसाठी नोंदणीनुसार, उपविधीतील कार्यक्षेत्रानुसार पात्र असणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव ठेका मागणी परिपूर्ण प्रस्ताव दि.११ मे २०२६ रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय...

बोगस बियाण्यांपासून सावध रहा > कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन > मार्गदर्शक सूचना जारी

यवतमाळ दि.२४ (जिमाका) : आगामी खरीप हंगाम लक्षात घेला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर बियाणे व खते यांची विक्री सुरु होणार आहे. मात्र काही विकाणी अनधिकृत आणि बोगस (बनावट) कापूस बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनानुसार बियाणे खरेदी करतांना बिल नसलेले, खोटी जाहिरात, जास्त उत्पन्नाचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तीच्या भूलथापांना आणि आमिषांना बळी पडू नका. अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करा. बियाणे नेहमी परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावे. रस्त्यावर किंवा अनधिकृत व्यक्तीकडुन बियाणे घेवू किंवा खरेदी करु नये. बियाणे खरेदीचे पक्के बिल घ्या- अधिकृत परवानाधारक कृषी केंद्रामधून बियाणे खरेदी करतांना त्याचे पक्के बिल घ्या. बिलांवर पिकांचे नाव, वाण, लॉट क्रमांक, बियाण्यांची वैधता मुदत, बियाण्यांचा दर व एकुण मुल्य इत्यादी मजकुर स्पष्ट नमूद असल्याबाबत खात्री करा, अशा मार्गदर्शक सूचना कृषी विभागाने जारी केल्या आहेत. “एचटीबीटी”वर कायद...

“मिशन लक्ष्यवेध" अंतर्गत 27 एप्रिल रोजी अॅथलेटिक्स निवड चाचणी

यवतमाळ दि.२४ : राज्यातील क्रीडा विकासाला गती देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या "मिशन लक्ष्यवेध" या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्यात येत असून, त्यासाठी अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडूंची निवड करण्यासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी दि. 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे घेण्यात येणार आहे. सदर चाचणीमध्ये खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यांच्या चाचण्या घेऊन गुणवत्ता आधारित निवड केली जाणार आहे. या निवड प्रक्रियेत ज्या खेळाडूंनी पूर्वी अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच, ज्या इच्छुक खेळाडूंनी अद्याप नोंदणी केलेली नाही, परंतु या चाचणीत सहभागी होण्याची इच्छा आहे, अशा खेळाडूंनाही अर्जासह थेट उपस्थित राहून सहभाग नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी सचिन हरणे यांना 9890981728 या क्रमांकावर संपर्क करुन शंकांचे निरसन करावे, जास्तीत जास्त लोकांनी या चाचणीत सहभागी होण्याचे आव्हान जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यां...

मांग, मांतग समाजातील बांधवांसाठी कार्यशाळेचे आयोजन

यवतमाळ दि.24 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या. यवतमाळ मार्फत मांतग समाज व तत्सम १२ पोट जातीतील वंचित असलेल्या नागरिकांसाठी यवतमाळमध्ये 30 एप्रिल रोजी कार्यशाळचे आयोजन करण्यात आले आहे. मांग व मांतग समाजातील लोकांना विविध योजनांची माहिती देणे तसेच समाजातील लोकांचे जीवनमान उंचावावे या कार्यशाळेचे मुख्य उद्देश आहे. ही कार्यशाळा सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड, यवतमाळ येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. मांतग समाज व तत्सम १२ पोटजातील नागरिकांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम.टी. खडसे यांनी केले आहे. ०००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ण करा > समाज कल्याण विभागाने विद्यार्थ्यांना आवाहन

यवतमाळ दि.24 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी तत्काळ पूर्ण कराव्यात, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन त्रुटींची पूर्तता करुन त्याची प्रत कार्यालयात सादर करण्याची मुदत देण्यात येत आहे. स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रासह अर्ज ऑनलाईन अपलोड करुन दि. 30 एप्रिलपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे परंतू त्याची प्रत अद्याप कार्यालयात सादर केलेली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज सादर न केल्यास किंवा योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहणार आहे. तसेच निर्धारित मुदतीत त्रुटी पूर्ततता न केल्यास अर्ज अपात्र ठरणार याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे. ००० --

२६ एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक

>वैद्यकीय महाविद्यालयात पाच मतदान केंद्र ; मतदार यादी प्रसिद्ध यवतमाळ, दि. २३ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २०२६ येत्या २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार असून, या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील २०४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे पाच मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्र क्रमांक १ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक १ येथे मतदार क्रमांक १ ते ४००, मतदान केंद्र क्रमांक २ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक ४०१ ते ८००, मतदान केंद्र क्रमांक ३ लायब्ररी कम सेमिनार रूम येथे मतदार क्रमांक ८०१ ते १२००, मतदान केंद्र क्रमांक ४ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक १ येथे मतदार क्रमांक १२०१ ते १६००, तर मतदान केंद्र क्रमांक ५ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक १६०१ ते २०४२ यांची मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांची यादी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांनी आपला मतदान केंद्र क्रमांक आणि इतर तपशील संकेत...

जिल्ह्यात २७ एप्रिलपासून १९ मेपर्यंत विशेष कर्करोग निदान मोहीम

यवतमाळ, दि. २३ : जिल्ह्यात २७ एप्रिल ते १९ मे २०२६ या कालावधीत विशेष कर्करोग निदान मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांसाठी मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत कॅन्सर डायग्नोसिस व्हॅनद्वारे मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाच्या संशयित रुग्णांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत असून उच्च रक्तदाब, मधुमेह, स्ट्रोक, हृदयरोग तसेच विविध प्रकारच्या कर्करोगांचे निदान व उपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करण्यात येतात. यवतमाळ जिल्ह्यात हा कार्यक्रम सन २०१८ पासून प्रभावीपणे सुरू आहे. याच अंतर्गत जिल्ह्यासाठी विशेष कॅन्सर निदान व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञ व दंत शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाची तपासणी केली जाईल. तपासणीदरम्यान संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन व संदर्भ सेवा उपलब्...

डिजिटल जनगणनेत नागरिकांनाही स्व-गणना करता येणार

> १ मे पासून ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा ; > नागरिकांनी स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा ; > जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन यवतमाळ, दि. २३ : भारताच्या १६ व्या जनगणनेचे कामकाज सुरु झाले असून राज्यात १ मे पासून डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. त्याअंतर्गत शासनाने नागरिकांसाठी स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करुन दिली असून नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून स्व-गणना करुन राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ऑनलाईनरित्या स्व-गणना करता येणार असून या स्व-गणनेत नागरिकांना स्वत:सह कुटुंबांची माहिती भरता येणार आहे. त्यासाठी भारत सरकारच्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॅागीन करावे. त्यानंतर जिओ लोकेशन समाविष्ट करुन कुटुंबाबाबत विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर त्याचा ११ अंकी एसई क्रमांक तयार झाल्यानंतर तो जतन करुन ठेवावा. हा...

शेतकरी उत्पादक कंपनी, अशासकीय संस्था व स्वयं-सहाय्यता गटांसाठी ‘संवाद सेतू कार्यशाळा’

Image
जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, अशासकीय संस्था व स्वयं-सहाय्यता गट यांच्यासाठी “संवाद सेतू कार्यशाळा” जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना सभागृह येथे बुधवारी उत्साहात संपन्न झाली. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे २७० सभासदांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा मनोजकुमार ढगे, प्रकल्प उपसंचालक व्यंकट कुंतावर यांनी केले होते. कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट विविध विभागांमधील समन्वय वाढवून शेतकरी गटांना शासकीय योजनांची माहिती व लाभ अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे हे होते. कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण मनोजकुमार ढगे यांनी केले. कृषी संलग्न विविध विभागांतील विभाग प्रमुखांनी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम, कृषी पर्यटन, महाउर्जा, नाबार्ड, जिल्हा अग्रणी बँक, कृषी विज्ञान केंद्र तसेच शेतमाल खरेदी करणारी कंपनी रुपीया फिनोव्हेशन प्रा. लि. यांचा समावेश होता. संबंधित तज्ज्ञांनी विविध योजनांची माहिती, वित्तीय सहा...

जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा सुविधा निर्मितीचा आढाव

Image
जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न जिल्हयात क्रीडा सुविधा निर्मितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा सभा बुधवारी संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी क्रीडा सुविधा निर्मितीचा आढावा घेतला. यात आझाद मैदान येथील जलतरण तलाव दुरुस्ती, फिल्टर प्लांट, सिंथेटिक हॅंन्डबॅाल मैदान, दुकान बांधकाम, ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान इ. कामांबाबत आढावा घेवून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दर्जेदार कामे झाली पाहिजेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा क्रीडा संकुल भेट देवून प्रस्तावित कामांच्या जागेची पाहणी करुन आवश्यक सुधारणात्मक सूचना दिल्या.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळणार

 पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाकडे ३० एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज सादर करा  प्रकल्प अधिकारी रेवैय्या डोंगरे यांचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, कळंब, बाभूळगाव व यवतमाळ या तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शहरातील नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३० एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी रेवैय्या डोंगरे यांनी केले आहे. या योजनेसाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न कमाल १ लाखांपर्यंत असावे. विद्यार्थ्याचे वय ६ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अंगणवाडी/ग्रामसेवक प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. दारिद्र्यरेषेखालील, विधवा, घटस्फोटीत, निराधार किंवा परि...

रेस्टॉरंट व हॉटेल्समध्ये चीज अॅनालॉग वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी लेबलिंग व माहिती स्पष्ट करण्याचे आदेश अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ हा जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, नागरिकांना सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पनीर हा आहारातील महत्त्वाचा घटक असून, तो प्रथिने, कॅल्शियम व जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. मात्र पनीर आणि चीज अॅनालॉग यामध्ये मोठा फरक असून, अॅनालॉग पदार्थ दूधाव्यतिरिक्त तेल, स्टार्च व इतर घटकांपासून तयार केला जातो. तो पनीरसारखा दिसत असला तरी तो प्रत्यक्षात पनीर नसतो, असे अन्न सुरक्षा मानकांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की काही रेस्टॉरंट, हॉटेल, केटरर्स व फास्ट फूड विक्रेते चीज अॅनालॉगचा वापर करून अन्नपदार्थ तयार करत असून, ग्राहकांना याबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काही ठिकाणी तर “पनीर” किंवा “चीज” या नावानेच अॅनालॉग पदार्थ विकले जात असल्याचे आढळून आले आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार अन्न व्यवसायिकांनी ग्राहकांना घटकपदार्थांची योग्य माहिती देणे बंधनकार...

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल ; लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी मोबाईल ॲप सुरु

 लाभार्थ्यांना थेट आता मोबाईलवर सेवा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी ‘अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप’ सुरू केले आहे. हा ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून, लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवर करता येणार आहे. महामंडळाच्या कार्यान्वित योजनांसाठी संकेतस्थळ कार्यान्वित असून, महामंडळाची संपूर्ण कार्यपध्दती ऑनलाईन स्वरुपात राबविण्यात येत आहे. योजनांच्या प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करावा लागत असल्याने किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास असल्यामुळे लाभार्थ्यांना वेळ, खर्च आणि अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून महामंडळाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्रांशी करार करुन योजनांच्या सेवा प्रति सेवा रु ८५ दराने उपलब्ध करुन दिल्या. लाभार्थ्यांना अधिक स्वयंपूर्ण, सुरक्षित आणि सुलभ सेवा करुन देण्यासाठी महामडळामार्फत वापरकर्ता अनुकुल मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील महामंळ ॲप या नावाने गुगल प्ले स्...

यवतमाळात विशेष नझुल शिबिराचे आयोजन

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त नझुल प्रकरणांचा जलद निपटारा महसूल विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या अंतर्गत यवतमाळ शहरात २२ मे २०२६ रोजी विशेष नझुल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात नझुल जमिनीशी संबंधित प्रकरणांचा जलद व सुलभ निपटारा करण्यात येणार आहे. या शिबिरात नझुल जमिनीवरील शर्तभंग प्रकरणे नियमानुकूल करणे, हस्तांतरणास परवानगी देणे, भाडेपट्टा नूतनीकरण, फ्री होल्ड मंजुरी तसेच प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार आहे. यासोबतच सिंधी समाज बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष अभय योजनेअंतर्गत सिंधी वसाहतीतील जागा फ्री होल्ड करण्याच्या प्रकरणांचाही निपटारा केला जाणार आहे. नझुल पट्टाधारकांनी त्यांच्या ताब्यातील नझुल पट्ट्यांचे नूतनीकरण व शर्तभंग प्रकरणे तात्काळ नियमानुकूल करून घ्यावीत तसेच थकीत भुईभाडे शासनाकडे जमा करावे. अन्यथा संबंधित पट्टे रद्द होऊन जागा शासनजमा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या शिबिरासाठी २७ एप्रिल ते २...

जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेची राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या नूतनीकरणात उल्लेखनीय कामगिरी

Image
 राष्ट्रीय मान्यता २० घटकांपर्यंत करणारी राज्यात पहिली प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अंतर्गत जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेने राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या नूतनीकरण प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. दि. १८ व १९ एप्रिल रोजी प्रयोगशाळेत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार दोन दिवसीय तपासणी यशस्वीरित्या पार पडली. या तपासणीसाठी प्रमुख परीक्षक रजनीकांत शर्मा तसेच तांत्रिक परीक्षक ज्योती पाठक आणि रीतेश कमाल सिंह यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन कामकाजाची सखोल पाहणी केली. यावेळी गुणवत्ता मार्गदर्शिका, मानक कार्यपद्धती, उपकरणांचे अंशांकन नोंदी, नमुना हाताळणी प्रक्रिया तसेच चाचणी पद्धतींची सविस्तर तपासणी करण्यात आली. नमुना तयारी आणि चाचणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. तपासणीदरम्यान गुणवत्ता व्यवस्था, उपकरणांची अचूकता, नोंदींची शिस्तबद्धता तसेच कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता यांचा बारकाईने आढावा घेण्यात आला. या वेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन तट्टे, गुणवत्ता व्यवस्थापक अतुल सुरसे, तांत्रिक व्यवस्थापक स्नेहा खडसे, तसेच रसायनी विशेष राठोड, हर्षदा राऊत आणि इतर कर्मचारी उपस्...

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

‘जिल्हा चारा सुरक्षा आराखडा’ तयार करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २०२६ च्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाचे संरक्षण आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्यात सध्या हिरव्या चाऱ्याची सुमारे ४३.९८ टक्के तर सुक्या चाऱ्याची २५.१२ टक्के तूट आहे. ‘एल-निनो’मुळे पावसाचे प्रमाण घटल्यास ही तूट अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याने ‘जिल्हा नियोजन व विकास समिती’ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना राबवून चारा बियाणे खरेदीसाठी निधीला प्राधान्य द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या चारा बियाण्यांचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला यांना ५ मे २०२६ पूर्वी कार्यारंभ आदेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्यांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, यावरही विशेष भर देण्यात आला आहे. चारा उत्पादन वाढवण्यासाठी वैरण बियाणे वाटप, हा...

१९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा; ३.७८ लाख तक्रारींचे निवारण

४ लाखांहून अधिक कॉल्स; ‘गोल्डन अवर’मध्ये ६४ हजार पशुधनाला जीवदान पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. जनावरांच्या आरोग्यावर परिणाम झाला की शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ‘१९६२’ मोबाईल वेटरनरी क्लिनिकच्या माध्यमातून पशुपालकांना मोठा दिलासा मिळत असून, ही सेवा ग्रामीण भागासाठी ‘लाईफलाईन’ ठरत आहे. गेल्या वर्षभरात ‘१९६२ कॉल सेंटर’कडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. यापैकी तब्बल ३,७८,०३५ पशुधनाच्या आजारविषयक तक्रारींचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील ३४,९७९ पशुपालकांनी या सेवेचा लाभ घेतला असून, या उपक्रमामुळे पशुवैद्यकीय सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कॉल प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दीड तासात पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचत असल्याने एकूण ६४,७५९ पशुधनाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. यामध्ये २९,१३० मोठे आणि ३५,५६९ लहान पशुधनाचा समावेश आहे. पूर्वी किरकोळ आजारासाठीही पशुधनाला दवाखान्यात नेणे वेळखाऊ व खर्चिक होते. मात्र आता तज्ज्...

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सज्ज

उष्णलहरींच्या धोक्यामुळे पशुधन संरक्षणासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर ; पशुपालकांनी दक्षता घ्यावी पशुसंवर्धन आयुक्त डॅा. किरण पाटील यांचे आवाहन राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता आणि ‘एल निनो’मुळे उष्णलहरींचा धोका लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने व्यापक तयारी सुरू केली असून, पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार पशुपालकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॅा. किरण पाटील यांनी केले आहे. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी राज्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उष्णलहरींच्या काळात पशुधनाची काळजी कशी घ्यावी, याबाबत क्षेत्रीय स्तरावर जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सुचनानुसार पशुधनाला स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्त्वांचा समावेश करणे, तसेच दुभत्या जनावरांना संतुलित आहार देणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. शेती व वहनासाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते सायंकाळी ४ य...

ग्रिष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

१० ते १७ वयोगटातील मुलामुलींसाठी निःशुल्क प्रशिक्षण शिबीर क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ग्रिष्मकालीन सॉफ्टबॉल क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून खेळाडुच्या सर्वांगिन विकास साधण्याचा प्रयत्न राहणार आहे. शिबीराच्या माध्यमातून खेळाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल, तसेच प्रतिभावान खेळाडूचा शोध घेवून दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन अमोलकचंद कॉलेज, यवतमाळ व वामनदादा कर्डक मैदान, पाटीपुरा, यवतमाळ येथे सकाळी ६.३० ते ८.३० व सायंकाळी ५ ते ७ या दोन सत्रात दिनांक १ मे ते १० मे २०२६ या या कालावधी आयोजीत करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शिबीर हे १० ते १७ वयोगटातील मुले व मुली करीता आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांमधील खेळाडूंनी या मोफत प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, शिल्पा चाबुकस्वार यांनी केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक ...

डिजिटल जनगणनेत शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्व-गणना अनिवार्य

 जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिपत्रक जारी  १ ते १५ मे दरम्यान ऑनलाईन सुविधा उपलब्ध जिल्ह्यात जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये घरयादी व घरगणना हे कामकाज यंदा डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी शासनामार्फत स्व-गणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही स्व-गणना अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी परिपत्रक जारी केले आहे. स्व-गणनाची सुविधा दि. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत https://se.census.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर रीतीने भरता येणार आहे. हे पोर्टल इंग्रजी, हिंदी तसेच इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय कार्यालयांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनिवार्यपणे स्व-गणना पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अधिनस्त कार्यालये, संस्...
Image

पारधी समाजातील युवक, शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा योजना

30 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद यांच्या वतीने सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, उमरखेड आणि नेर या तालुक्यांचा समावेश असून, या भागातील पारधी समाजातील युवक व शेतकऱ्यांसाठी विविध व्यावसायिक कार्यशाळा व शेती मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसायाचे निवासी कार्यशाळा, इलेक्ट्रीशियन व प्लंबिंग व्यवसायिक निवासी कार्यशाळा, तसेच सोलर पॅनल इन्स्टॉलेशन व मेंटेनन्स संदर्भातील निवासी कार्यशाळांचा समावेश आहे. याशिवाय शेतकऱ्यासाठी आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत. या योजनांसाठी अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद (उपजिल्हा रुग्णालयाजवळ, संत सेवालाल चौक) येथे...

क्रीडा प्रबोधिनी निवड चाचणी प्रक्रिया जाहीर; २८ ते २९ एप्रिलदरम्यान अमरावती विभागात आयोजन

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे अंतर्गत कार्यरत क्रीडा प्रबोधिनींसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता निवड चाचणी प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व गडचिरोली या नऊ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात आल्या आहेत. या प्रबोधिनींमध्ये निवासी स्वरूपात प्रवेश दिला जाणार असून, निवड प्रक्रिया सरळ प्रवेश (५० टक्के) व कौशल्य चाचणी (५० टक्के) या पद्धतीने राबविण्यात येणार आहे. जुदो, जिम्नॅस्टिक, हॉकी, शूटिंग, फुटबॉल, जलतरण, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, हँडबॉल व सायकलिंग अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावर प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना सरळ प्रवेशासह कौशल्य चाचणीद्वारे संधी दिली जाईल, तर राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंची निवड कौशल्य चाचणीच्या माध्...

'माझी निवड होणारच' या आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी करा

Image
- आयपीएस रॉबिन बन्सल यांचे स्पर्धा परीक्षार्थींना प्रेरणादायी मार्गदर्शन  ‘युवा संवाद‘ उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ  २७ एप्रिलला तहसीलदार हेमकृष्णा पिसदे यांचे युपीएससी व एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षेची यश मिळविण्यासाठी 'माझी निवड होणारच' या आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी करा, असा प्रेरणादायी मुलमंत्र भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस रॉबिन बन्सल यांनी स्पर्धा परीक्षार्थींना ‘युवा संवाद’ कार्यक्रमात दिला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तरुणांना स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शनासाठी २१ एप्रिलपासून ‘युवा संवाद’ उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे करण्यात आले असून या त्याचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, प्रमुख मार्गदर्शक व पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस रॉबिन बन्सल, उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे, मुख्यमंत्री फेलो कुणाल पाटील, विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी आणि स्पर्धा परीक्षार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासगी कंपनीत नोकरी ते आयपीएस प्रमुख मार्गदर्शक आयपीएस ...

विशेष लेख : जागतिक वसुंधरा दिन पर्यावरणीय संकल्पाचा मुहूर्त

Image
मानवाच्या अस्तित्वाचा पाया म्हणजे वसुंधरा. आपल्या जीवनातील प्रत्येक श्वास, प्रत्येक थेंब पाणी आणि प्रत्येक अन्नकण हा या पृथ्वीच्या उदारतेचा परिणाम आहे. त्यामुळेच दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या वेगवान औद्योगिकीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात वसुंधरेचे संरक्षण ही केवळ जबाबदारी नसून अस्तित्वाची गरज बनली आहे.त्यामुळे जागतिक वसुंधरा दिवस साजरा करणे म्हणजे पर्यावरणीय संरक्षणासाठी आवश्यक संकल्प करणे होय.उद्याच्या पिढीसाठी पृथ्वी वाचवायची असेल,वसुधैव कुटुम्बकम ही संकल्पना राबवायची असेल आणि अस्तित्वातल्या सर्व जीव जंतूंचे रक्षण करायचे असेल, तर जागतिक वसुंधरा दिवसाला पर्यावरण रक्षणाची शपथ घेऊया ! वसुंधरा दिनाची सुरुवात; उद्देश जागतिक वसुंधरा दिनाची सुरुवात १९७० साली अमेरिकेत झाली. गेलॉर्ड नेल्सन या सिनेटरने पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस सुरू करण्याचा पुढाकार घेतला. त्या काळात औद्योगिक प्रदूषण आणि पर्यावरणीय हानी यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण झाली ह...

यवतमाळमध्ये ‘युवा संवाद’ उपक्रमाचा मंगळवारी शुभारंभ

आयएएस, आयपीएस अधिकारी करणार स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शन  आयपीएस रॉबिन बन्सल यांचे मंगळवारी मार्गदर्शन जिल्ह्यातील तरुणांना स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन आणि शासनाच्या विविध संधीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत "युवा संवाद" हा विशेष मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाचा शुभारंभ, मंगळवारी 21 एप्रिल रोजी होणार आहे. हा उपक्रम दर सोमवारी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सकाळी 11 ते 2 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत दर सोमवारी विषय सत्रानुसार आयएएस, आयपीएस अधिकारी तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. या सत्रांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत: 21 एप्रिल आयपीएस रॉबिन बन्सल यांचे युपीएससी व पोलीस सेवा या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर 27 एप्रिल रोजी तहसीलदार हेमकृष्णा पिसदे यांचे युपीएससी व एमपीएससी मार्गदर्शन, 4 मे रोजी आयएफएस एन. भुवनेश्वर यांचे युपीएससी व वनसेवा विषयावर मार्गदर्शन, 11 मे रोजी आयएएस रेवैया डोंगरे स्पर्धा परीक्षा संधी व आव्हाने...

विशेष वृत्त : गर्भवती मातांसाठी ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’

Image
५-६ हजार रुपये आर्थिक सहाय्य ; थेट खात्यात रक्कम यवतमाळ, दि. 20: केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून गर्भवती महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्य दिले जात आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डिबीटी) प्रणालीद्वारे अनुदान वितरित केले जात आहे. केंद्र सरकारच्या १४ जुलै २०२२ च्या निर्णयानुसार योजनेत बदल करण्यात आला असून, पूर्वी केवळ पहिल्या गर्भधारणेसाठी मर्यादित असलेला लाभ आता विस्तारण्यात आला आहे. १ एप्रिल २०२२ नंतर दुसऱ्या अपत्यात मुलगी जन्माला आल्यास त्या लाभार्थी महिलांनाही योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. आर्थिक लाभ या योजनेअंतर्गत पात्र महिलेला पहिल्या अपत्यासाठी एकूण रु. ५००० दोन हप्त्यांत तर दुसऱ्या अपत्यात मुलगी जन्मल्यास रु. ६००० एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम आधार-संलग्न बँक किंवा पोस्ट खात्यात थेट जमा केली जाते. पात्र लाभार्थी • पहिल्या अपत्यासाठी गर्भवती महिला • दुसऱ्या वेळेस मुलीला जन्म देणाऱ्या महिला उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश गरोदर मातांना सकस आहारासाठी आर्थिक मदत देणे तसेच त्यांच्या ...

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा डिजिटल प्रशिक्षण उपक्रम

लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर भर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर दिला जात आहे. या अनुषंगाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम तसेच ‘मार्केटिंग टॅब’सारख्या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करून व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ दिले जात आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात उत्पादन तयार करण्याइतकेच ते योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवणेही महत्त्वाचे आहे. अनेक लघुउद्योजकांकडे दर्जेदार उत्पादने असूनही त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी महामंडळाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ‘व्यवसाय वर्धन’ (बिझनेस प्रमोशन) मार्केटिंग टॅब विकसित केला आहे. हा टॅब फ्लिपकार्ट, ॲमेझॅान आणि इंडिया मार्ट यांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, छायाचित्रे, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर २७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. तसेच व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका यानुसार शोध स...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

विजेत्यांना पारितोषिके व स्पर्धकांना मिळणार प्रशस्तीपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांसाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याचा व्यापक प्रभाव लक्षात घेता “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” या विषयावर सदर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मतदानाचा हक्क, वारसा हक्क, प्रसूती रजेचा हक्क आदी विषयांचा समावेश या निबंधात अपेक्षित आहे. स्पर्धेचे स्वरूप : या स्पर्धेत दोन गटांचा समावेश आहे. पहिल्या गटात शासकीय व खाजगी आयटीआय तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या गटासाठी ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दुसरा खुला गट असून सर्व महिला व पुरुष...

मधमाशीपालनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधुमित्र, मधुसखींना पुरस्कार मिळणार

नामांकन अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र”व “मधुसखी” पुरस्कारांसाठी इच्छुकांकडून नामांकने मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी व यशस्वी मधपाळांचा गौरव करण्यासाठी ही योजना अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये एका पुरस्काराचा महिला मधपाळांसाठी (मधुसखी) राखीव समावेश आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय 7 हजार रुपये व तृतीय ५ हजार रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. दि. २० मे २०२६ रोजी जागतिक मधमाशी दिन निमित्त जिल्हा पुणे येथे आयोजित समारंभात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अर्जाची लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mskvib.org वर उपलब्ध असून, संबंधित जिल्ह्यातील खादी मंडळाच्या कार्यालयातही नामांकन अर्ज मिळणार आहेत. जिल्ह्यातील इच्छुकांनी आपली नामांकने दि. ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावीत. तसेच...

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

पशुपालकांसाठी संधी ; योजनेचा लाभ घेण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांचे आवाहन राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन व वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड केसीसी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या संगोपनासाठी तसेच दैनंदिन खर्चासाठी (खेळते भांडवल) आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेनुसार, ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध करून दिले जाते. दूध संस्थेची हमी असल्यास ही मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांकडे आधीपासून किसान क्रेडिट कार्ड आहे, त्यांनाही ३ लाख रुपयांपर्यंत पतमर्यादा वाढवून घेता येणार आहे. कर्जाचा मूळ व्याजदर ९ टक्के असला तरी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून ३ टक्के व राज्य शासनाच्या ११ फेब्रुवारी २०२६ च्या निर्णयानुसार ४ टक्के अशी एकूण ७ टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळते. याशिवाय बँकांकडून ...

जिल्ह्यात २८ एप्रिलला ‘सेवा हक्क दिन’

शासकीय कार्यालय, ग्रामपंचायतीत कार्यक्रमांचे आयोजन करा जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सुचनानुसार २८ एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्यात येणार असून या दिवशी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, ग्रामंपचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांना दिले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने २८ एप्रिल सेवा हक्क दिवसानिमित् रोजी शासकीय कार्यालयांमध्ये त जनजागृती कार्यक्रम, सेवा बांधिलकी शपथ, अधिनियम व सेवांची माहिती देणे, आदर्श आपले सरकार केंद्राचे उद्घाटन, सेवांची व शुल्कांची माहिती प्रदर्शित करणे, विद्यार्थी, महिला आणि इतर घटकांसमव्त कायद्याविषयी सुसंवाद साधून जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच, ग्रामपंचायत स्तरावर विशेष सभेचे आयोजन करणे, ग्रामपंचायत सदस्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची माहिती व प्रत देणे, अधिनियमाची माहिती दर्शविणारे फलक लावणे, सेवा व शुल्काची माहिती देणे, तक्र...

यशोगाथा : संघर्षातून उभारला ‘अद्विक गृहउद्योग’

Image
हळद, मिरची, मसाले प्रक्रिया उद्योगातून लाखांचे उत्पन्न आर्णीतील बोरगाव येथील उद्योजिका जयश्री पुनवटकर यांची प्रेरणादायी वाटचाल यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील जयश्री जितेंद्र पुनवटकर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अत्यंत कठीण परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधला आहे. बारावी (कला) पर्यंत शिक्षण घेतलेल्या जयश्री पुनवटकर यांनी ‘अद्विक गृहउद्योग’ नावाने ‘हळद प्रक्रिया उद्योग’ उभारून केवळ स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, तर इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. जयश्री पुनवटकर यांचे कुटुंब मजूरदार वर्गातील होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कपडे शिवण्याचे काम सुरू केले होते, परंतु त्यातून महिन्याला केवळ ३ ते ४ हजार रुपये उत्पन्न मिळत होते. हा व्यवसाय स्थिर नव्हता आणि नियमित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होत होते. कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी नवीन आणि दीर्घकाळ टिकणारा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्धार केला. “स्वतःचा उद्योग सुरू करायचा” हे त्यांचे ध्येय होते. या प्रवा...

विशेष वृत्त : लेक लाडकी योजना: लेकींच्या पंखांना हक्काचे बळ!

Image
महाराष्ट्र शासनाने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी 'लेक लाडकी योजना' सुरू केली आहे. या योजनेद्वारे मुलीच्या जन्मापासून ती १८ वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. बऱ्याचदा आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे किंवा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. हीच दरी सांधण्यासाठी सरकारने पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांसाठी ही योजना आखली आहे. ही योजना राज्यातील प्रत्येक मुलीला सन्मानाने जगण्यासाठी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक भक्कम आधार ठरत आहे. योजनेचे टप्पे या योजनेची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ही रक्कम एकाच वेळी न देता, मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यामध्ये दिली जाते. त्यानुसार मुलीचा जन्म झाल्यावर कुटुंबावर आर्थिक भार पडू नये, म्हणून पहिल्या टप्प्यात ५ हजार रुपये दिले जातात. दुसऱ्या टप्प्यात मुलगी जेव्हा पहिलीत प्रवेश घेते, तेव्हा शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ६ हजार रुपये दिले जातात. तिसऱ्या टप्प्यात मुलगी सहावीत पोहोचल्यावर तिला ७ हजार रुपयांची मदत मिळते. चौथ्या टप्प्यात अकरावीत प्रवेश घ...

विशेष वृत्त : यवतमाळ जिल्ह्यात १८ हजार महिला ‘लखपती दीदी’

Image
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), यवतमाळ मार्फत जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी व्यापक कार्य सुरू असून शासनाच्या ‘लखपती दीदी’ योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत, अशी माहिती यवतमाळच्या माविम कार्यालयाकडून देण्यात आली आहे. माविममार्फत १० तालुक्यांतील ४२१ गावांमध्ये स्वयं सहाय्य बचत गटांद्वारे विविध योजनांची अंमलबजावणी होत असून ‘नवतेजस्विनी’ प्रकल्पांतर्गत ६८७६ बचत गटांमधून ७६,९६४ महिला संघटित झाल्या आहेत. बँकांकडून दरवर्षी सुमारे १२० कोटींचे कर्ज उपलब्ध होत असून परतफेड दर ९९% आहे. कृषी सेवा केंद्र, शेळीपालन, दालमिल, हळद प्रक्रिया, गारमेंट्स आदी विविध व्यवसायांतून ४२,४६१ महिला उद्योजक बनल्या आहेत. १६ ‘ड्रोनसखी’ प्रशिक्षण घेत असून शेतफवारणीसाठी ड्रोन सेवा सुरू आहे. विविध निधीतून ई-रिक्षा, ड्रोन, कृषी अवजारे आदींसाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. 'लखपती दीदी' योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आहे. या योजनेद्वारे महिलांचे वार्षिक उत्पन्न किमान १ ...