Posts

Showing posts from June, 2026

शेतकरी गटांसाठी ‘फार्मर ग्रुप लीग' स्पर्धा

 10 जूनपासून स्पर्धेला सुरुवात  15 ऑगस्ट रोजी विजेत्यांचा गौरव जिल्हा प्रशासन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी जिल्ह्यात आगळीवेगळी ‘फार्मर ग्रुप लीग' स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी गटांच्या सदस्यांना करावयाच्या कामांचे चार स्तर निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक स्तरामध्ये चार ते पाच लघु कृती अथवा अ‍ॅक्टिव्हिटी देण्यात येणार असून त्या यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना गुणांकन दिले जाईल. स्पर्धेदरम्यान करण्यात आलेल्या सर्व कृतींचे व्हिडिओ चित्रण, छायाचित्रे तसेच नोंदवही ठेवणे सहभागी सदस्यांसाठी आवश्यक राहणार आहे. चारही स्तर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांचा 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना आंतरराज्य, राज्य व जिल्हास्तरीय अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे. विजयाचे चार स्तर या फार्मर ग्रुप लिग...

आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण अमृत-आयजीटीआरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि इंडो जर्मन टूल रूम आयजीटीआर, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दहावी उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पदविका (डिप्लोमा) तसेच पदवीधर युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये संगणक नियंत्रित त्रसंचालन तंत्रज्ञान, संगणक सहाय्यित रचना व उत्पादन आराखडा, सॉलिड वर्क्स डिझाईन, कॅटिया डिझाईन, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर प्रोग्रामिंग, यंत्रमानव व स्वयंचलन तंत्रज्ञान तसेच यांत्रिक-विद्युत एकात्मिक तंत्रज्ञान (मेकॅट्रॉनिक्स) या विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणासोबतच प्रशिक्षणार्थींना मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार तयार करण्यात आलेले अभ्यासक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी हे या प्रशिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे. प्रशिक...

युवा भारततर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी विविध उपक्रमांचे आयोजन

Image
मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, यवतमाळ, स्वा. सावरकर स्मारक समिती, स्वा. सावरकर विचार मंच आणि साई इंग्लिश लर्नर अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात साई इंग्लिश लर्नर अॅकॅडमी, राणा प्रताप नगर, वडगाव येथे भाषण स्पर्धेने झाली. अमित ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत यवतमाळमधील अभियांत्रिकी शिक्षण घेणारे तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्पर्धकांनी मराठी व इंग्रजी भाषेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. स्पर्धेत निवेदिता इंगोले हिने प्रथम क्रमांक, रुपेश झाले यांनी द्वितीय क्रमांक तर केतकी इंगोले हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे यांनी युवकांना ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमाची माहिती दिली. युवकांमधील कला, कौशल्य व नेतृत्वगुणांना वाव देण्यासाठी वि...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय विभाग व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांच्या अंतर्गत संचालित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, जुने पोलीस कवायत मैदानाजवळील सामाजिक न्याय भवन परिसर, येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. वसतिगृहात विद्यार्थीनींना मोफत निवारा, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता तसेच इतर आवश्यक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. प्रवेश प्रक्रियेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८० टक्के, अनुसूचित जमातीसाठी ३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी ५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी ३ टक्के, अनाथ विद्यार्थिनींसाठी २ टक्के तसेच दिव्यांग विद्यार्थिनींसाठी ३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थीनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, अस...

यवतमाळ येथील शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश मिळणार

>प्रक्रिया सुरू सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, आकाशवाणी जवळ, यवतमाळ येथे रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश देण्यात येत आहेत. सदर वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास, भोजनाची व्यवस्था, ग्रंथालय, संगणक लॅब, मोफत शैक्षणिक साहित्य, गणवेश, खेळाचे साहित्य तसेच निर्वाह भत्ता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८५ टक्के जागा राखीव असून त्यामध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी १ टक्का व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के समांतर आरक्षण देण्यात आले आहे. याशिवाय अनुसूचित जमातीसाठी ३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी ५ टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी ५ टक्के तसेच विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के जागा राखीव आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक असून त्यासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहे. प्रवेशासाठी मागील शैक...

नवजवान शेतकरी गटाद्वारे बीज उगवण क्षमता चाचणी

Image
पाणी फाउंडेशन, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ स्पर्धेमुळे राज्यभरातील शेतकरी गटांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गटशेतीच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळविण्यासाठी शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. यंदा अल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाऊस, पावसातील खंड, कोरड्या दुष्काळाची शक्यता, दुबार पेरणी, सिंचनाची कमतरता आणि उष्णतेच्या लाटेचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील चिंचोली येथील नवजवान शेतकरी गटाने शास्त्रीय शेतीचा मार्ग स्वीकारला आहे. गटाचे निमंत्रक अमोल प्रभाकरराव ठाकरे यांच्यासह ११ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवजवान शेतकरी गटाची स्थापना केली आहे. सोयाबीन पिकाचे घटते उत्पादन आणि वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता, उत्पादनात वाढ करून शेती अधिक फायदेशीर करण्याचा निर्धार गटाने केला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन...

झाशीची राणी अंतरगाव गटाची विषमुक्त शेतीकडे वाटचाल

Image
पाणी फाउंडेशन, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात विविध गटांमध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथील झाशीची राणी तुर उत्पादक शेतकरी गटाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. गटाच्या निमंत्रक कोमलताई राजेंद्र बेलखेडे यांनी १७ महिलांना एकत्र आणून गटाची स्थापना केली असून सर्व महिलांनी मिळून कमी खर्चात, शास्त्रीय व एकात्मिक पद्धतीने शेती करण्याचा निर्धार केला आहे. गटामार्फत बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया तसेच सरी-वरंबा पद्धतीने पेरणी यांसारख्या उपक्रमांची संयुक्तपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गटातील महिलांनी एकत्र येऊन २०० लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे. सेंद्रिय शेतीमध्ये अत्यंत प्रभावी मानला जाणारा हा नैसर्गिक कीटकनाशक तयार करण्यासाठी करंज, कडुलिंब, निरगुडी, घाणेरी, रुई, कन्हेरी, एरंड, सीताफळ, पपई, धोत्रा व गुळवेल यांसारख्या कडू वनस्पतींची पाने वापरण्यात आली. त्यामध्ये शेण, गोमूत्र, हिरव्या मिरचीचा ...

विधानपरिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे नामांकन दाखल

Image
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी यवतमाळ मतदारसंघातून पाच उमेदवारांनी एकूण दहा नामांकन अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी आतापर्यंत ५५ अर्जांची उचल करण्यात आली आहे. ही नामांकन दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये साहेबराव दत्तराव कांबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), दुष्यंत सतीश चतुर्वेदी (शिवसेना), नितीन सुरेशचंद्र भुतडा (भारतीय जनता पक्ष), सय्यद फारुक सय्यद करीम (अपक्ष) आणि साजिद बेग हाफिज बेग मिर्झा (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत १ जून रोजी संपुष्टात आली असून, अर्जांची छाननी २ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी २२ जून २०२६ रोजी केली जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे...