Posts

जिल्हा वार्षिक योजनांतर्गत 821 कोटींचे नियोजन

Image
  मागील आर्थिक वर्षाचा निधी 100 टक्के खर्च जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा डीपीसीच्या कामांचा दर दोन महिन्यांनी आढावा घेण्याचा निर्णय   यवतमाळ, दि. 24 (जिमाका) :   जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2026-27 साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजना अशा तीन योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकूण रु.821 कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 492.60 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान, सन 2025-26 मध्ये प्राप्त झालेला निधी निर्धारित उद्दिष्टानुसार 100 टक्के खर्च करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.   त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामे, योजनांची अंमलबजावणी, निधी खर्च आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.    बैठकीस आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, खासद...

कीटकनाशक फवारणीच्या सुरक्षिततेबाबत कृषी विभागामार्फत व्यापक जनजागृती; शेतकरी व शेतमजुरांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन

               यवतमाळ, दि. 24 (जिमाका) :   जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याबाबत कृषी विभागाकडून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.    सदर प्रकरणातील संबंधित रुग्णास तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले असून, आवश्यक वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर संबंधित रुग्णास रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सदर बाबतीत आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.             कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी कृषी विभागामार्फत सातत्याने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रशिक्षण, समुपदेशन व प्रसिद्धी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सुरक्षित फवारणी अभियानांतर्गत कृषी विभागाची कार्यवाही             महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाल...

जलसंवर्धनासाठी ‘महा वॉकेथॉन’मध्ये उसळला जनसागर !

Image
  > माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस > जिल्ह्यात जलसंधारण दिन मोठ्या उत्साहात साजरा यवतमाळ, दि. २१ : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त आयेजित आज २१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात “जलसंधारण दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जलसंधारण सप्ताहांतर्गत मृद व जलसंवर्धनाविषयी जनजागृतीसाठी समता मैदान येथे आयोजित ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ स्पर्धेसाठी जिल्ह्यातील २४ हजार २७४ नागरिकांनी नोंदणी करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अभूतपूर्व उपस्थिती नोंदविली. तसेच माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा असा संदेश दिला. समता मैदान येथे या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना योगासनाचे धडे, मृद व जलसंवर्धनाची शपथ देण्यात आली. त्यानंतर सकाळी ७ वाजताच्या सुमारास आमदार किसन वानखेडे व जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महा वॉकेथॉनला हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली. ३ किलोमीटरची महा वॉकेथॉन स्पर्धा संपल्यानंतर या वॉकेथॉन स्पर्धेमधील विजेत्यांची ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली. यात २५ हज...

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सामाजिक न्याय योजनांचा आढावा

    पीक विम्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार                                                                - रामदास आठवले             यवतमाळ, दि. 20 (जिमाका) :   जिल्ह्यातील विविध विषयांसह केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांबाबत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे   सविस्तर आढावा घेतला.             बैठकीस जिल्हाधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी आनंद इंगले, उपमुख्य कार्य...

जलसंधारण दिन विशेष लेख :

Image
  जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड   पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान, एल निनोचे वाढते आव्हान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणात “ मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य ” देण्याची ताकद आहे.   महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत.   महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवत विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि र...

जलसंधारण दिनानिमित्त महा वॉकेथॉन स्पर्धा

Image
   समता मैदान येथे आयोजन  महा वॉकेथॉनमध्ये १० हजार स्पर्धकांची नोंदणी  युवकांसाठी रील स्पर्धा  १० ते २५ हजार रुपयांपर्यंत पारितोषिक             यवतमाळ, दि. 19 (जिमाका) :   जलसंधारणाचे जनक म्हणून ओळख असलेले माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिवस २१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात “ जलसंधारण दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘माती वाचवा, पाणी जपा, भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश देत मृद व जलसंधारणाविषयी जनजागृती करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी शहरातील समता मैदान येथे ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.             ही   ‘महा वॉकेथॉन’ समता मैदान येथून सुरु होणार असून ती कमाल ३ किलोमीटर अंतराची राहणार आहे. सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान नोंदणी व शपथ कार्यक्रम...

केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा दोन दिवसीय जिल्हा दौरा

Image
              यवतमाळ, दि.१ 8 (जिमाका) : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे दि.19 व 20 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.             त्यांचा दौरा कार्यक्रमानुसार दि.19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6   वाजता उमरखेड येथील जी. एस सारडा राजस्थानी भवन येथे सत्कार समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती, रात्री 8.45 वाजता कै. श्री.गोविद मेश्राम, चंद्रामणी बौध्द विहार, नेताजी नगर यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट, त्यांनतर शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे मुक्काम करतील.             दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या योजनांबाबत जिल्हाधिकारी,   पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेसमवेत बैठक, दुपारी 12 श्री. सत्य साई संजिवण नेत्र हॉस्पीटल, वाघापूर   येथील ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन, दुपारी 1 वाजत...