Posts

वन हुतात्म्यांना वनअधिकारी, कर्मचाऱ्यांची मानवंदना

Image
  यवतमाळ, दि. 11 : वनहुतात्मा दिनानिमित्त यवतमाळ वनवृत्तातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज वनभवनाच्या प्रांगणात शहीद स्मारकाजवळ वन हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. 2013 पासून 11 सप्टेंबर हा दिवस वनहुतात्मा दिवस म्हणून भारतभर पाळल्या जाते. या दिवशी वने, वन्यजीव, वनसंपदा यांचे रक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वन अधिकारी व कर्मचारी यांना भारतभर कार्यक्रमाचे आयोजन करून वन शहिदाच्या आठवणींना उजाळा दिला जातो. राजस्थान येथील खेजरली या गावात खेजरी वृक्षाच्या रक्षणार्थ बलिदान देण्याऱ्या अमृता देवी व इतर 350 बिश्नोई समाजाच्या लोकांनी अठराव्या शतकात बलिदान दिले होते. त्यांच्या स्मरणात हुतात्मा दिनाचे पालन केले जाते. या कार्यक्रमाला मुख्यवन संरक्षक यवतमाळ, उपवनसंरक्षक यवतमाळ, उपसंरक्षक व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य वन संरक्षक डॉ. किशोर. एस. मानकर यांनी वन हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. तसेच प्रादेशिक उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग, उपवनसंरक्षक अमलेंदू पाठक, विभागीय वन अधिकारी अनिल निमजे, विभागीय वन अधिकारी परवीन पठाण,...

शासकीय वसतीगृह प्रवेश व पंडित दीनदयाळ स्वयंम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत अनुसूचित जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांसाठी मुलींची 9 व मुलांची 10 अशी एकूण 19 शासकीय वसतीगृहे कार्यरत आहेत. शैक्षणिक सत्र 2026-27 करिता माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित अनुसूचित जमातीच्या नवीन (न्यू) व जुन्या (रिन्यू) विद्यार्थ्यांच्या वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वसतीगृह प्रवेशासाठी तसेच वसतीगृहाची क्षमता पूर्ण असल्यास प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी वसतीगृह प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज करणे सर्व नवीन विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक राहील. नवीन विद्यार्थ्यांनी https://swayam.mahaonline.gov. in   या संकेतस्थळावर अर्ज करतांना आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून ऑनलाईन अर्ज भरतांना न्यू हा पर्याय निवडून भरावा. जुन्या विद्यार्थ्यांनी  रिन्यू पर्याय निवडून विहित मुदतीत आपला अर्ज अपडेट किंवा सादर करावा. अर...

तालुकास्तरीय ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्ध’चे आयोजन

>तालुकास्तरीय समिती गठीत >उत्कृष्ट, पर्यावरणपूरक गणेश मंडळांचा होणार सन्मान   यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : यंदाच्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात तालुकास्तरीय निवड समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. 'महागणेशोत्सव महाराष्ट्राचा' या राज्य उत्सवांतर्गत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' चे आयोजन जिल्हा नियोजन समिती व जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरुवात बुधवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ पासून होणार असून, याच तारखेपासून स्पर्धेच्या परीक्षणविषयक कामकाजालाही सुरुवात केली जाणार आहे.   तालुकास्तरीय समितीची रचना व कामेः   स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन, शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्याची जबाबदारी या समित्यांवर असेल. प्रत्येक तालुक्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची निवड करून त्याची शिफारस जिल्हास्तरीय निवड समितीकडे केली जाईल. तालुका व जिल्हास्तरीय परीक्षणाचे गुणांकन करण्य...

'अमृत'तर्फे 11 ते 26 सप्टेंबरदरम्यान 'विश्वबंधुत्व पंधरवडा'

'शिकागो भाषण कृती कार्यक्रम' ठरणार अभियानाचे प्रमुख आकर्षण; राज्यातील विविध संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन   यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1823 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणातून जगाला दिलेला सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, मानवता, परस्पर सन्मान आणि विश्वबंधुत्वाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीअमृत यांच्या वतीने सन 2026 पासून दरवर्षी 11 ते 26 सप्टेंबरदरम्यान 'विश्वबंधुत्व पंधरवडा' साजरा करण्यात येणार आहे. आजच्या बदलत्या सामाजिक व जागतिक परिस्थितीत विविधता, मतभिन्नता आणि सामाजिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्य, सहिष्णुता, परस्पर सन्मान आणि बंधुभावाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वबंधुत्वाचा विचार केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या उद्देशाने हा पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे.   'शिकागो भाषण कृती कार्यक्रम' विशेष आकर्षण या पंधरवड्याचे प्रमुख आकर्ष...

टॉपक्लासशिक्षणयोजनेतीलअर्जांच्या पडताळणीसाठी१५सप्टेंबरपर्यंतमुदत

    >पात्रविद्यार्थ्यांचेअर्ज पडताळूनफॉरवर्डकरण्याचेशाळांना आवाहन >इयत्ता ९ वी, १० वीच्या विद्यार्थ्यांना ७५ हजार, >तर ११ वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपये आर्थिक मदत   यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या प्रधानमंत्री यशस्वी उपक्रमांअंतर्गत टॉप क्लास योजनेसाठी पात्र असणाऱ्या इयत्ता ९ वी ते १२ वी ततील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळून फॉरवर्ड करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचेसहाय्यक संचालक यांनी शाळांना केले आहे. या योजनेंतर्गतजिल्ह्यातील टॉप क्लास शाळांच्या यादीमध्ये नमूद असलेल्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये इयत्ता९ वी ते १२ या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, तसेच संबंधित विद्यार्थी ओबीसी, ईबीसी किंवा डीएनटी प्रवर्गातील असणे आणि त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असणे या बाबी पडताळणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वर्गनिहाय आर्थिक मदत दिली जाते. त्यानुसार इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्या...

भुदान जमिनींच्या शर्तभंग तपासणीसाठी मोहीम ; १६ सप्टेंबरला सुनावणी ; उपस्थित राहण्याचे आवाहन

    यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : यवतमाळ तालुक्यातील मोहा येथील विविध गट क्रमांकांतील शेतजमीन भूदान यज्ञ मंडळाने वाटप केलेली असल्याचे अभिलेखावरून दिसून येत आहे. या जमिनींच्या अनुषंगाने शासनाच्या वतीने शर्तभंग तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मौजा मोहा येथील सं.न./गट क्र. ११६, ११९, १३८, १४०, १४४, १६०, २९७/१, २९७/पै, ३०४, ३१०, ३४२, ३४३, ३४४ व ३४५ या सं.न./गटांतील शेतजमिनी भूदान यज्ञ मंडळाने वाटप केल्याचे अभिलेखावरून स्पष्ट होत आहे. या जमिनीशी संबंधित व्यक्ती यांनी सदर जमीन त्यांच्या नावे कशी आली, याबाबत सबळ पुराव्यांसह १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी, यवतमाळ यांच्या कार्यालयात सुनावणीस उपस्थित राहावे. निर्धारित तारखेला संबंधित व्यक्ती सुनावणीस गैरहजर राहिल्यास, त्यांचे या प्रकरणाबाबत कोणतेही म्हणणे नाही, असे गृहीत धरून संबंधित शेतजमिनीचा शर्तभंग झालेला आहे, असे समजून जमीन शासन जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी कळविले आहे. 000000 000000

नवोदय विद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अंतिम मुदत ३०सप्टेंबर ;१० एप्रिलला प्रवेश परीक्षा   यवतमाळ, दि. 11 (जिमाका) :घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या इयत्ता अकरावीतील रिक्त जागांसाठी शैक्षणिक वर्ष २०२७-२८ करिता ऑनलाइन प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अकरावीच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा शनिवार, १० एप्रिल २०२७ रोजी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये विद्यार्थी जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता दहावीत शिकत असणे आवश्यक आहे.संबंधित शाळा सीबीएसई किंवा राज्य शिक्षण मंडळ अथवा इतर कोणत्याही शासनमान्य शिक्षण मंडळाशी संलग्न असणे आवश्यक आहे.मागील वर्षी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र राहणार नाहीत. विद्यार्थ्याचा जन्म १ जून २०१० ते ३१ जुलै २०१२ या कालावधीत झा...