Posts

महिला लोकशाही दिन 18 मे रोजी

महिलांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दि.18 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह तक्रार सादर करावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

हस्तलिखित वारसांच्या जतन, संवर्धनासाठी ‘ज्ञान भारतम् अभियान

हस्तलिखितांची डिजिटल नोंद करता येणार ! ‘ज्ञान भारतम् पोर्टल, ॲपवर हस्तलिखितांची नोंदणी करण्याचे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने देशभरात ‘ज्ञान भारतम्’ प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले असून, भारताच्या समृद्ध हस्तलिखित वारसाचे जतन, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी हा महत्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम आहे. पुराभिलेख संचालनालय, यांनी दिलेल्या ‘ज्ञान भारतम्’ तसेच संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांनी उपलब्ध करून दिलेल्या वापरकर्ता मार्गदर्शकनुसार देवस्थान, न्यास व संस्थांकडे उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांची माहिती ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल अॅपमध्ये नोंदविण्याच्या सूचना संबंधित विश्वस्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच ‘ज्ञान भारतम्’ पोर्टलवर नमूद केल्याप्रमाणे ऐतिहासिक व धार्मिक स्वरूपाचे प्राचीन साहित्य, जसे हस्तलिखिते, पोथ्या, पुराणे आणि तत्सम साहित्याची डिजिटल स्वरूपात नोंद संबंधित देवस्थान, न्यास व संस्थांनी पोर्टलवर करावयाची आहे. धार्मिक स्थळांचे विश्वस्त, संस्था, मठ, मंदिरे तसेच वाचनालय तसेच हस्तलिखितांचे जतन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी उपलब्ध हस्तलिखितांची माहि...

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

Image
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

२६ मे रोजी यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळावा विविध नामांकित कंपन्यांमध्ये ५३० हून अधिक पदांसाठी भरती

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्याधारित मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटरच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २६ मे रोजी बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धामणगाव रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात येणार आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसून कौशल्याधारित प्रशिक्षण व उद्योगसंगत क्षमता विकसित करणे आवश्यक बनले आहे. रोजगार मेळावे हे उमेदवार व नियोक्ता यांच्यात थेट संवाद साधण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरत असून, या माध्यमातून उमेदवारांना तत्काळ मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळते. तसेच उद्योगांना आवश्यक कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळते. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांमार्फत एकूण ५३० पेक्षा अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ट्रेनी क्रेडीट ऑफिसर पदासाठी २५ जा...

२० मे रोजीच्या देशव्यापी औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सज्ज

 नागरिकांना औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी एक दिवसीय बंदची घोषणा करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ देशातील ठोक व किरकोळ औषध विक्रेत्यांनी व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, नागरिकांना आवश्यक औषधे वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी अन्न व औषध प्रशासन, सहाय्यक आयुक्त (औषधे) यवतमाळ डॉ. अ. मा. माणिकराव यांनी याबाबत माहिती दिली. सह आयुक्त (औषधे) तथा नियंत्रण प्राधिकारी, अन्न व औषध प्रशासन, यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी समन्वय साधण्यात येत असून. अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या असून औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधि...

ड्रोन उडवण्याचे दर्जेदार प्रशिक्षण मिळणार; अधिकृत परवाना घेऊन सुरू करा व्यवसाय

 खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी अमृत संस्थेची योजना अमृत म्हणजेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी ही संस्था विविध योजनांसह वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमही राबवते. त्यामध्येच ड्रोन पायलट बनण्यासाठीच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. त्यासाठी अमृत ड्रोन मिशन या नावाने मोहीम राबवली जाते. हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत दर्जेदार असून, एरव्ही ज्यासाठी किमान लाख-दीड लाख रुपये मोजावे लागतात, या प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा लाभ आजपर्यंत शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला असून, त्यातील काही जणांनी यातून प्राप्त केलेल्या कौशल्याच्या आधारे चांगली कमाई करण्यासही सुरुवात केली आहे. राज्यात आठ ठिकाणी संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते. मुख्यत्वेकरुन शेती क्षेत्रातील वापर, जमिनीचे सर्वेक्षण,एरियल फोटोग्राफी, आपत्ती व्यवस्थापन या विषयांमधून प्रशिक्षणाचा विषय या कोर्समध्ये निवडता येतो.नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात ...

शेतमाल खरेदी-विक्रीसाठी परवाना बंधनकारक

 पणन संचालनालयाचे परिपत्रक जारी राज्यामध्ये शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी व्यापारी, संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी वैध परवाना घेणे बंधनकारक असल्याचे पणन संचालनालयाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक पणन संचालक शरद जरे यांनी जारी केले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ हा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यामधील तरतूदीनुसार राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री चे विनियमन करण्यात येते. सद्या राज्यामधील विविध भागामध्ये अनेक व्यापारी, काही संस्था, शेतकरी संस्था या मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी विक्री कोणत्याही परवान्याविना करीत असल्याबाबतच्या तक्रारी पणन संचालनालयास प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने पणन संचालनालयाकडून संबंधितांना वेळोवेळी अशा प्रकारचे प्रकार करणे अनुचित असल्याबाबत कळवून सुध्दा अनेक व्यापारी किंवा संस्था शेतमालाची विनापरवानगी खरेदी विक्री करीत असल्याचे पणन कार्यालयाच्या निदर्शनास आलेले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र. अध्यादेश क्रमांक १५ दि. ०५जुलै २०१६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे...