Posts

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी मानधन सन्मान योजना !

 दर महिना 5 हजार रुपये ; मानधनासाठी आपले सरकार पोर्टलवर अर्ज करावा  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचा.) यांचे आवाहन राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना" अंतर्गत दर महिना 5 हजार रुपये मानधनासाठी पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचा.) यांनी केले आहे. या योजनेंतर्गत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन देण्यात येते. या योजनेसाठी 1 ते 31 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार http://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. पात्रता निकष या योजनेसाठी अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली असून त्यांच्यासाठी किमान वय 40 वर्षे आहे. कला किंवा साहित्य क्षेत्रातील योगदान किमान १५ वर्षांचे असणे आवश्यक आहे. तसेच सा...

यवतमाळ पोलिसांची अद्वितीय कामगिरी!

Image
प्रतिकूल परिस्थितीत शोधमोहीम : ९० फूट खोल विहिरीतून मृतदेह काढण्यात यश महागाव तालुक्यातील मौजा घाना येथील भगवान भाकरे (वय ३५) हे बेपत्ता असल्याचे कळताच जिल्हा शोध व बचाव पथकाने महागाव येथे धाव घेतली. रात्री सुमारे ९.१५ वाजता अंधार आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही पोलिस कर्मचाऱ्यांनी धाडस व तत्परता दाखवत विहिरीत उतरून शोधकार्य सुरू केले. अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत आवश्यक सुरक्षा उपायांचा अवलंब करून पोलिस पथकाने सुमारे ९० फूट खोल विहिरीत उतरून मृतदेह यशस्वीरित्या बाहेर काढला. या कार्यवाहीमुळे पुढील पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे शक्य झाले. भगवान भाकरे हे बेपत्ता असल्याची माहिती तहसीलदार महागाव यांनी जिल्हाधिकारी विकास मीना यांना दिल्यानंतर त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला पोलीस विभागाच्या मदतीने तातडीने शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कारवाई जलदगतीने करण्यात आली. यवतमाळ पोलिसांच्या या धाडसी व कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल नागरिकांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. संकटाच्या प्रसंगी पोलिस दलाने दाखविलेली तत्परता, धैर्य आणि सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी ...

अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी जिल्हा संसाधन व्यक्तीची निवड होणार शिफारशींकरिता निकष जारी

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सन 2026-27 करीता जिल्हा संसाधन व्यक्तीची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदाच्या शिफारशींकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने निकष जारी केले आहे. शैक्षणिक पात्रता अर्जदारांकडे विद्यापीठ यांचेकडील अन्न तंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर/ पदवी किंवा कृषी व कृषीसंबंधित पदव्युत्तर/पदवी किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर/पदवी ई. पात्रता असणे आवश्यक आहे. ‘यांना’ प्राधान्यक्रम निवड प्रक्रियेत सेवानिवृत्त बँक/शासकीय अधिकारी, सनदी लेखापाल, सल्लागार संस्था, बँक मित्र, वैयक्तिक व्यावसायिक व्यक्ती, विमा प्रतिनिधी, अन्न तंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर/ पदवी व इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर/पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अनुभव आवश्यक अन्न प्रक्रिया किंवा कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकांकडे कर्ज प्रस्ताव सादर करणे अथवा तत्सम क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले ...

शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता वितरित

Image
 पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते वितरण  कृषी विज्ञान केंद्रात थेट प्रक्षेपण कार्यक्रम उत्साहात कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ व कृषी विभाग, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी, कृषी अधिकारी व विविध प्रकल्पांतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दीपक कच्छवे, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी कृष्णराव देशट्टीवार (पांढरकवडा), कीटकशास्त्र विषयातील शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, गृहविज्ञान शास्त्रज्ञ स्नेहलता भागवत तसेच कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ राहुल चव्हाण, कृषिविद्या शास्त्रज्ञ डॉ. रुपेश झाडोदे उपस्थित होते. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्यदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगाल मधील ताराकेश्वर, ...

नशामुक्त सप्ताहांतर्गत पथनाट्याद्वारे जनजागृती; योग दिनी व्यसनमुक्तीची शपथ

Image
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत १७ ते २६ जूनदरम्यान देशभर "नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान" या संकल्पनेवर आधारित नशामुक्त सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या अनुषंगाने २० जून रोजी नेहरू स्टेडियम येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने व्यसनमुक्तीविषयक विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी श्री. जोगडेकर यांनी सहकाऱ्यांसह सादर केलेल्या प्रभावी पथनाट्यातून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, तसेच व्यसनामुळे कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या विपरीत परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय योग दिनी व्यसनमुक्तीची शपथ आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने पोलीस कवायत मैदान येथे व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करत शपथ घेतली. या कार्यक्रमास जिल्हा समाज कल्याण अध...

‘योग’ ही शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती

Image
- आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके पोलीस कवायत मैदानात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा योग ही केवळ कसरत नसून शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती असल्याचे मत आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. ‘आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त' पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, माय युवा भारत कार्यालय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पोलीस कवायत मैदान येथे भव्य सामूहिक योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात सहभागी होऊन त्यांनी योगासने केली. तसेच नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, प्रशासकीय अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.

कोळसा प्रदुषणामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण !

Image
> अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची माहिती > वेकोली परिसरातील गावांची केली पाहणी > नागरिकांशी साधला संवाद यवतमाळ, दि. २० : कोळसा प्रदुषणामुळे होणाऱ्या शेतपीक नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून सर्वंकष धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव तथा वेकोली प्रदुषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष विकास खारगे यांनी शुक्रवारी दिली. ते आज वणी तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बेलोरा येथील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड द्वारा संचालित कोळसा खाणीची पाहणी केली. तसेच वेकोली परिसरातील उकणी, पिंपळगाव, ब्राम्हणी या गावांसह वणी येथे भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी विकास मीना, उपविभागीय अधिकारी नितिन हिंगोले, तहसिलदार निखिल धुळधर व वेस्टर्न कोलफिल्डचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. विकास खारगे पुढे म्हणाले की, कोळशा प्रदुषणामुळे होणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात कोणता...