महिला बचत गटांना गावस्तरावर ‘कृषी अवजारे बँक’ स्थापन करण्याची संधी
२४ लाखांपर्यंत अनुदान ; ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील ५४९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कृषि यांत्रिकीकरणाला चालना देणे आवश्यक असून, सर्व शेतकऱ्यांना यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसल्याने गावस्तरावर नोंदणीकृत महिला बचत गट यांचे मार्फत "गावस्तरावरील कृषि अवजारे बँक" स्थापन करून अनुदानित यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत व अचूक शेतीकाम करून उत्पादकता व नफा वाढविता येणार आहे. त्याकरिता प्रकल्प गावांमध्ये "एक गाव एक कृषी औजारे बँक" या तत्त्वानुसार कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतीकामासाठी लागणारी यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे श्रम आणि खर्च कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी पोकरा अंतर...