Posts

वीटभट्ट्या, हॉटेल्सची तपासणी होणार > बालकामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Image
यवतमाळ, दि. ४ : जिल्ह्यात बालकामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वीटभट्ट्या, हॉटेल्स व इतर आस्थापनांची तपासणी करावी, त्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सरकारी कामगार अधिकाऱ्यांना दिले. महसूल भवन येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगार कायद्याची अंमलबजावणी, ई श्रम नोंदणी इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सरकारी कामगार अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी मीना यांनी जिल्ह्यात कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देत कामगारांच्या सामाजिक संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. शहरी व ग्रामीण भागातील वीटभट्ट्या, हॉटेल्स व इतर आस्थापनांधील बालकामगार व बालमजुरी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. याठिकाणी बालकामगार, वेठबिगारी कामगार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. प्रलंबित कामगारांची ई श्रम नोंदणी पूर्ण करावी त्यासाठी इतर विभागांचे सहकार्य घ्...

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त यवतमाळमध्ये ग्रंथ प्रदर्शन

यवतमाळ दि.४ : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यवतमाळ व स्व. मंगलाताई सतर्के सार्वजानिक वाचनालय, लक्ष्मीनगर, उमरसरा, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मंगलाताई सतर्के सार्वजानिक वाचनालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस १ ऑगस्ट हा "लेखण प्रेरणा दिन" म्हणून व लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम व ग्रंथ प्रदर्शन आयोजित करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष मनोज रणखाम व सचिव प्रशांत पंचभाई, विद्यार्थी वाचक वर्ग उपस्थित होते. ००००

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी ! शेती तंत्रज्ञानाची माहिती, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा आणि क्षेत्रीय भेटी होणार

> शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान > शेतकऱ्यांनी १४ ऑगस्टपूर्वी प्रस्ताव सादर करावा > कृषी विभागाचे आवाहन यवतमाळ, दि. ४ (जिमाका) : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशातील शेती विषयक तंत्रज्ञान, त्याचा अवलंब व उत्पन्नातील वाढीबाबत तसेच परदेशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय व संस्थांना भेटीसाठी देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये यापैकी जे कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. शेतकरी निवडीचे निकष: या योजनेंतर्गत शेतकरी निवडीचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्याप्रमाणे अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅकअंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्नचे मुख्य साधन...

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्यांचे ऑनलाईन क्लस्टर; ६ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ दि. ४ : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेसाठी मतदारसंघ निहाय प्राप्त न्युनत्तम दर व कंत्राटदारांच्या सुचीला (पॅनल) जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची मंजुरी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार यवतमाळ विधानसभा मतदार संघातील पाणंद रस्त्याचे ऑनलाईन क्लस्टर तयार करण्यात आलेले आहे. त्यामध्ये बेचखेडा गावातील गावठाण गट १५५ ते १८४ रूई, गट १५४ ते गट २२५ व गांवठाण ते रामनगर रोड हा क्लस्टर तयार करण्यात आला आहे. या कामांसाठी सुमारे २० लाख रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली असून यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील पात्र कंत्राटधारकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बेचखेडा गावातील या पाणंद रस्त्याचे काम करण्यास इच्छुक असणाऱ्या कंत्राटधारकांनी आपले अर्ज दि. ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपविभागीय कार्यालय यवतमाळ येथे सादर करावे, असे उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी केले आहे. ००००

िल्टर प्लॉंटमधील तांत्रिक बिघाडामुळे शहरात पिवळसर पाणी पुरवठा पाणी वापरण्यास योग्य; पाणी उकळुन पिण्याचे आवाहन

फ यवतमाळ दि. ४ : यवतमाळ पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीअंतर्गत येणाऱ्या फिल्टर प्लॉंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने यवतमाळ शहरामध्ये सद्य:स्थितीत होणारा पाणी पुरवठा पिवळसर आहे. हे पाणी वापरण्यासाठी योग्य आहे. मात्र नागरिकांनी पिण्यासाठी पाणी उकळुन प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. या फिल्टर प्लॉंटचे २ ते ४ दिवसांत काम झाल्यावर शुध्द पाणी पुरवठा करण्यात येईल. अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अधिकारी संजय उमाळे यांनी दिली आहे. ००००

जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

यवतमाळ दि.4 :- जवाहर नवोदय विद्यालयात वर्ग सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://cbseitms.rcil.gov.in/nvs व https://navodaya.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ किंवा प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा तालुका घाटंजी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ००

मरावे परी अवयवरुपी उरावे

यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : अवयवदान हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. अनेकदा तुम्ही अवयवदानाचे आव्हाहन करणाऱ्या जाहीराती सुद्धा पाहील्या असतील की मी मृत्यु नंतर माझे सर्व अवयव दान करणार. त्यावेळी तुमच्याही मनात कित्येक प्रश्न आले असतील की, अवयवदान म्हणजे नेमके काय ? कुणीही व्यक्ती अवयवदान करु शकते का? अवयवदानाची प्रक्रीया काय? मृत्युपश्चात वेगवेगळ्या धर्मात शरीराची विल्हेवाट वेगवेगळ्या प्रकारे लावली जाते. जरी शरीरातुन प्राण गेले असले तरी काही अवयव हे मृत्युनंतर काही काळासाठी सक्रीय असतात त्यांचा जर वेळेत वापर करुन ते अवयव दुसऱ्याच्या शरीरात बसवले तर त्या व्यक्तीला त्या अवयवांचा फायदा होवु शकतो. आज अवयवांची आवश्यकता असलेल्यांची प्रतिक्षा यादी वाढत चालली आहे. यात बदल घडवायचा असेल तर अवयवदानाबाबत जनसामान्यांच्या माणसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. असे मत सामान्य रुग्णालयचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी व्यक्त केले. देशामध्ये अवयवदाना बद्दल जागरुकता पसरवण्यासाठी, अवयवदानाशी संबंधित समज व गैरसमज दुर व्हावे आणि मृत्युनंतर अवयव व उतींचे दान करण्यासाठी नागरिकांत प्रेरणा व अवयवदानाचे मुल...