Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : यादीतील शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे.

Image
यवतमाळ दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक, सहकार अधिकारी श्रेणी-१ तालुका ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँका यांचे कार्यालयात, उपलब्ध असुन सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे नाव यादीमध्ये असल्याची खात्री करुन नावासमोरील विशिष्ठ क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न मोबाईल यासह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. अशा शेतकऱ्यांचे कर्जखात्यात कर्जमुक्ती लाभाची रक्कम लवकरच शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र असलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे यादीत नाव पाहुन नाव आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरीत जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे व कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. 000

रानभाजी-फळे विक्रेत्यांना १०० टक्के अनुदानावर मिळणार साहित्य रानभाजी-फळे विक्री प्रदर्शन मेळावा ; 30 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ दि. 28 : स्थानिक आदिवासी फळभाजी विक्रेत्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत "रानभाजी, रानफळे विक्री व प्रदर्शन मेळावा" आयोजित करण्यात येणार आहे. प्रकल्प कार्यक्षेत्रातील पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, दारव्हा, दिग्रस व नेर या तालुक्यातील आदिवासी विक्रेत्यांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांना विक्रीसाठी आवश्यक असणारे स्टॉल, छत्री, वजनकाटा व कॅरेट हे साहित्य शासनाच्या १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रानभाजी महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक आदिवासी राणभाजी विक्रेत्यांनी दि. ३० जुलै २०२६ पर्यंत प्रकल्प कार्यालय, पुसद येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. 000

शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे अनिवार्य

यवतमाळ दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी पांढरकवडा तालुक्यातील ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक कार्यालय व ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँका यांचे कार्यालयात, प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे नाव यादीमध्ये असल्याची खात्री करुन नावा समोरील विशिष्ठ क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न मोबाईल यासह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. अशा शेतकऱ्यांचे कर्जखात्यात कर्जमुक्ती लाभाची रक्कम लवकरच शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र असलेल्या पांढरकवडा तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे यादीत नाव पाहुन नाव आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरीत जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे व कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा. असे आवाहन केळापूरचे तहसिलदार व पांढरकवडा सहकार...

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

यवतमाळ दि. २८ : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे जयंती निमीत्य संपूर्ण महाराष्ट्रात दि. २२ ते दि. २८ जुलैपर्यंत विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार आणि जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. उमेश जोगे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माँ जिजाऊ नगर परिषद उच्चप्राथमीक शाळा व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा येथील सर्व मूलांना त्यांचे पालकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची माहिती देण्यात आली तसेच वैयक्तीक स्वछता, संतुलीत आहार, नियीमत व्यायाम, खेळ, संसर्गजन्य आजार मुलांचे लठ्ठपणा, उंची वजन मोजमाप, दृष्टी तपासणी, दंत तपासणी इत्यादी बाबींचे आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली. तसेच शिबिरा दरम्यान ग्रामीण रुग्णालय कळंब येथेही सर्व्हायकल कॅन्सर, मुख कर्करोग, मधुमेह, हृदयरोग इत्यादी आरोग्य विषयक तपासणी करुन आढळले...

नेर तालुक्यातील 1 हजार 587 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यादी जाहीर

यवतमाळ दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" अंतर्गत नेर तालुक्यातील १ हजार ५८७ पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी संबंधीत ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँक शाखा व कार्यालयामार्फत सार्वजनिक रित्या प्रसिध्द करण्यात आली आहे. याव्दारे लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सेवा सोसायटी किंवा संबंधित बँक शाखेमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रसिध्द झालेली यादी तपासावी आणि आपले आधार प्रमाणीकरण तात्काळ पुर्ण करावे असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात येत आहे. वेळेत प्रमाणीकरण न झाल्यास कर्जमुक्तीच्या पुढील प्रक्रियेत तांत्रीक अडचणी होऊ शकतात. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीसाठी संबंधित सहकारी संस्था, बँकेशी व सहकार अधिकारी श्रेणी-१, सहकारी संस्था, नेर या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच नेर तालुक्यातील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव, संबंधित बँकाचे शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेऊन लाभार्थ्यांशी संपर्क साधावा आणि त्यांचे आधार प्रमाणीकरण विहीत कालावधीत पूर्ण करून घेण्यासाठी ...

मुख्य जलवाहिनी क्षतीग्रस्त झाल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत

यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : पाणी पुरवठा योजनेतंर्गत निळोणा धरणावरुन यवतमाळ शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी निर्माधीन रेल्वे पुलाखाली दि. 24 जुलै रोजी क्षतीग्रस्त झाल्यामुळे ऑफिसझोन अंतर्गत येणाऱ्या 9.00 लाख लिटर्स, 14.00 लाख लिटर्स व नव्याने बांधकाम करण्यात आलेली 14.00 लाख लिटर्स पाण्याचे टाकीमधून पाणी पुरवठा होणाऱ्या सर्व भागांमधील दि. 24 जुलै पासून पाणी पुरवठा पुर्णपणे बंद आहे. तरी या संदर्भात निर्माणधीन रेल्वे विभागांकडे पत्र व्यवहार करण्यात आला असून पाईप गळती दुरुस्ती करण्याचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. पाईपलाईन वरील गळती दुरुस्ती होईपर्यंत संबंधीत भागातील पाणी पुरवठा बंद राहील याची कृपया नोंद घेण्यात यावी. असे उपविभागीय अधिकारी एस. आर. उमाळे यांनी नागरीकांना आवाहन केले आहे. 000

3 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : जनतेच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येते. त्यानुसार या महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे असे स्वीकारण्यात येणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाची नसावी. महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये अर्जाचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. तसेच अर्ज दाखल करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाही, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे यांनी केले आहे. 000000