Posts

यवतमाळमधील कृष्णकुंज नगरात सावकारी पथकाची धाड ७ आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांच्या आदेशान्वये सावकारी पथकाने कृष्णकुंज नगर, आमराई, वडगाव रोड, यवतमाळ येथील वाय. पी. परळीकर यांच्या निवासस्थानी झडती कारवाई केली. या कारवाईदरम्यान ७ आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले. अशोक उत्तमराव दिघाडे यांनी २२ जून रोजी परळीकर हे अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पडताळणी करण्यासाठी सावकारी पथकाने २५ जून रोजी झडती घेतली. कारवाईदरम्यान घरातून जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार पुढील कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निबंधक तथा सदस्य सचिव तालुकास्तरीय समन्वय समिती दिली. कारवाईसाठी सहाय्यक निबंधक तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक रिता बाळकृष्ण निनावे यांच्या नियोजनानुसार विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. पथकात व्ही. के. हिरूळकर सहाय्यक निबंधक, दारव्हा, एस. डब्ल्यू. खरतडे,रोशन गाडे, विद्या भोवते, के. एस. मारसट्टीवार,अनिल मामीडवार...

कर्जमुक्ती योजनेतून मंत्री, खासदार, आमदार, सरकारी अधिकारी कर्मचारी बाद

>पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली असून याबा योजनेचा शासन निर्णय 2 जून रोजी जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार या योजनेअंतर्गत काही विशिष्ट घटकांना लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये विद्यमान अथवा माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा व राज्यसभा सदस्य, विधानसभा व विधान परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नागरी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांचे विद्यमान किंवा माजी लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. केंद्र किंवा राज्य शासनातील मासिक 25 हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारी, तसेच राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि अनुदानित संस्थांमधील 25 हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक वेतन असलेले अधिकारी व कर्मचारी यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतीव्यतिरिक्तच्या उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती, तसेच मासिक 25 हजार रुपयांपेक्षा अधिक निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतनधारक यांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे. मात्र, माजी सैनिकांना या अटीतून सूट देण्यात आली असून त...

शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी ‘कर्जमुक्ती योजना’

लेख : दि. 25 जून 2026 राज्यातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करून त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध व्हावे आणि कृषी क्षेत्र अधिक सक्षम व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026’ जाहीर केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या लोककल्याणकारी आणि दूरदृष्टी असलेल्या शासक म्हणून ओळखल्या जातात. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी मानले जाते. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त या महत्त्वपूर्ण कर्जमुक्ती योजनेस त्यांचे नाव देण्यात आले आहे. राज्य शासनाने यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्...

ढाणकी येथे नव्याने अप्पर तहसिल कार्यालय

Ø कार्यकक्षेत ढाणकी, निगणुर, दराटी व बिटरगाव मंडळांचा समावेश प्रस्तावित Ø हरकती व सूचनांसाठी १५ दिवसांची मुदत यवतमाळ, दि. २५ (जिमाका) : उमरखेड तालुक्याअंतर्गत ढाणकी येथे नव्याने अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या अप्पर तहसिल कार्यालयाच्या कार्यकक्षेत ढाणकी, निंगपूर, दराटी आणि बिटरगाव या महसूल मंडळांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. तहसिल कार्यालय उमरखेड अंतर्गत कार्यरत मंडळांतील नागरिकांना कार्यकक्षेबाबत काही सूचना व हरकती असल्यास जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत उपविभागीय दंडाधिकारी, उमरखेड येथे दस्तावेजासह लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम प्रस्ताव शासनाकडे निर्णयासाठी पाठविण्यात येणार आहे. 000000

28 जूनला टीईटी परीक्षा!

यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 28 जून रोजी दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या निर्देशानुसार परीक्षेच्या सुरळीत व पारदर्शक आयोजनासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली असून परीक्षार्थ्यांनी वेळेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत होणार आहे. पहिल्या पेपरसाठी जिल्ह्यात 19 परीक्षा केंद्रांची तर दुसऱ्या पेपरसाठी 28 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेतील पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक परीक्षा कक्षात लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सर्व परीक्षार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी व फ्रिस्किंग तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षार्थ्यांनी पहिल्या पेपरसाठी सकाळी 8.30 वाजता आणि दुसऱ्या पेपरसाठी दुपारी 12.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. पहिल्या पेपरसाठी सकाळी 10.10 नंतर आणि दुसऱ्या पेपरसाठी दुपारी 2.10 नंतर कोणालाही परीक्...

पुसदला आता नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय!

Ø शासनाची मिळाली मान्यता; कार्यक्षेत्रात दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांचा समावेश Ø सूचना व हरकती नोंदवण्यासाठी १५ दिवसांची मुदत यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मान्यता दिली आहे. या कार्यालयाचे मुख्यालय पुसद येथे प्रस्तावित करण्यात आले असून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यासंदर्भात सार्वजनिक हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. शासन निर्णयातील तरतुदींनुसार या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासकीय सोय आणि लोकहिताच्या दृष्टीने पुसद येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, कार्यक्षेत्र निश्चित करताना तालुका हा मूलभूत घटक मानण्यात आला असून क...

पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला २ जुलैपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला २ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक, शैक्षणिक अर्हता, अर्ज शुल्क व इतर आवश्यक माहिती संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. तसेच बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेशासाठी वेगळा अर्ज सादर करावा लागेल. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी यवतमाळ येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरता येणार असून त्यांच्या शंका व समस्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष पडताळणी तस...