Posts

विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

Image
१२५ दिवस रोजगाराची हमी यवतमाळ, दि.2 (जिमाका) : केंद्र सरकारने “विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण अधिनियम (व्हीबी जीरामजी), २०२५” हा कायदा देशातील सर्व ग्रामीण भागात दि. १ जुलैपासून लागू करण्यात आला आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ गुरुवारी २ जुलै रोजी ग्रामपंचायत कापरा, पंचायत समिती यवतमाळ येथे करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, जिल्हा परिषद कृषी अधिकारी जयसिंग सोळंके, कार्यक्रम व्यवस्थापक अमोल शंभरकर, तसेच ग्रामपंचायत कापरा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सचिव, गावकरी व कर्मचारी उपस्थित होते. योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करताना ग्रामपंचायत कापरा येथे गुरांचा गोठा, जलतारा व सार्वजनिक वृक्ष लागवड या कामांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांना योजनेतील पारदर्शकता, ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षात १२५ दिवसांच्या अकुशल मजुरी रोजगाराची वैधानिक हमी, ३१८ कामांचा समावेश तसेच नवीन मजुरी दर रुपये ३१७ याबाबत म...

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी जिल्ह्याला ३६.५० कोटींचा निधी

यवतमाळ, दि.२ (जिमाका) : राज्य शासनाने मागच्या डिसेंबर महिन्यापासून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत विधानसभा क्षेत्रनिहाय प्रशासकीय मान्यता देण्यासाठी निधीची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ३६ कोटी ५० लाख रुपयांची निधी मर्यादा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड तसेच मंत्री डॉ. अशोक उईके आणि राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतरस्ते व पाणंद रस्त्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. २३ जून आणि २९ जूनच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय निधी वाटपानुसार राळेगाव, आर्णी आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघांना प्रत्येकी ७ कोटी ५० लाख रुपये, पुसद मतदारसंघाला ५ कोटी रुपये, दिग्रस मतदारसंघाला ४ कोटी रुपये, तर वणी आणि यवतमाळ विधानसभा मतदारसंघांना प्रत्येकी २ कोटी ५० लाख रुपये अशा एकूण ३६ कोटी ५० लाख रुपये निधीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बळी...

आर्णी येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

यवतमाळ, दि. २ (जिमाका) : आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, आर्णी येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतीगृहाची एकूण क्षमता १२५ विद्यार्थीनी असून पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. वसतीगृहात मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शासनाच्या निकषांनुसार डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, आर्णी यांनी केले आहे.

जिल्हा सैनिक कार्यालयात आजी-माजी सैनिक व वीरमाता-वीरपत्नींसाठी कायदेविषयक शिबिर

यवतमाळ, दि. 2 (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे वीर परिवार सहाय्यता योजना-२०२५ अंतर्गत सेवारत सैनिक, माजी सैनिक, सैनिक विधवा, वीरमाता, वीरपत्नी, त्यांची मुले तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी २९ जून रोजी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दिपक एच. दाभाडे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अरविंद धनविजय, कल्याण संघटक भगवान रेडेकर तसेच माजी सैनिक संघटनाचे अध्यक्ष विनोद आरेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रांगणात सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण दिपक एच. दाभाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण संघटक भगवान रेडेकर यांनी केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण...

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा गौरव

Image
यवतमाळ, दि.2 (जिमाका) : निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती झरी जामणीच्या मुख्य सभागृहात शिष्यवृत्ती परीक्षा व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ मध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करावी तसेच सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि जिज्ञासू वृत्तीच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाच्या विविध निर्देशांकांवर प्रभावीपणे काम सुरू असून, झरी जामणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परी...

जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू

फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनो सहभागी व्हा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन यवतमाळ, दि.2 (जिमाका) : नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे होणाऱ्या फळपिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत यवतमाळ जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यातील सर्व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश कमी अथवा अतिवृष्टी, पावसाचा खंड, अवेळी पाऊस, गारपीट, वाढते तापमान यांसारख्या प्रतिकूल हवामानामुळे फळपिकांचे होणारे नुकसान भरून काढून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हा आहे. मार्गदर्शक सूचना जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजनेचे वैशिष्ट आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. त्यानुसार मृग बहारात संत्रा, मोसंबी आणि हळद, तर आंबिया बहारासाठी संत्रा, मोसंबी आणि केळी या पिकांचा यो...

ई-केवायसी न केल्यास पीएम किसानचा हप्ता रखडणार

९७ हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन यवतमाळ, दि.2 (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे शातकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी, विकास मीना व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे एकूण ३ लाख ४ हजार १०६ सक्रिय लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत ९७ हजार २१८ लाभार्थ्यांनी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले असून, २ लाख ६ हजार ८८८ लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी ३० जूनपर्यंत बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करावी. योजनेतील पारदर्शकता वाढविणे, संभाव्य गळती रोखणे आणि केवळ पात्र व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच थेट लाभ पोहोचविणे हा या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. केंद्र व राज्य शा...