Posts

खरीप हंगामात ‘कापूस उत्पादकता अभियान, कपास क्रांती’ योजना राबविण्यात येणार

 सघन कापूस लागवड, क्लोज स्पेसिंग, एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिके  शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत “कापूस उत्पादकता अभियान, कपास क्रांती ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये सघन कापूस लागवड प्रात्यक्षिके ४ हजार ५७० हेक्टर, क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिके ७ हजार १३ हेक्टर, तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिके ७७८ हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येणार आहेत. याशिवाय स्थानिक पुढाकारांतर्गत २२ बायोचार युनिट्स आणि २६८ कापूस श्रेडर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व विहित कार्यपद्धतीनुसार राबविण्यात येणार असून, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी उपलब्ध असलेल्या अल्प कालावधीचा विचार करून लाभार्थी निवडीचे नियोजन करण्यात आले आहे. योजनेतील लाभांचे वितरणानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७९ टक्के, अनुसूचित जातींसाठी १२ टक्के आणि अनुसूचित जमातींसाठी ९ टक्के असे निश्चित करण्...

माय भारत केंद्रातर्फे जिल्ह्यात ‘नेशन फर्स्ट चॅलेंज’ मोहीम

Image
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ‘मेरा युवा भारत’ माय भारत केंद्रातर्फे जिल्ह्यात ‘नेशन फर्स्ट चॅलेंज’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी यवतमाळचे जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांनी जिल्हाधिकारी विकास मीना यांची जिल्हाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन मोहिमेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीस ‘माय भारत’चे कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे आणि रवी शेळके उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रशासनाने या देशव्यापी मोहिमेला जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी,जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांचीही भेट घेण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांपर्यंत मोहिमेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा वापर कसा करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनातून प्रेरित झालेल्या या मोहिमेत युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातून राष्ट्रनिर्माणात योगदान देण्यासाठी पाच महत्त्वाच...

मान्सूनपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करा

Image
 जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर व अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज महसूल भवन येथे विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, पूनम अहिरे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने कार्य करून मान्सूनपूर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टी अथवा पूरस्थितीत तात्काळ बचाव व मदतकार्य राबविण्यासाठी आवश्यक वाहने, यंत्रसामग्री व प्रतिसाद पथके (रिस्पॉन्स टीम) सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरी व ग्रामीण भागातील नाले, गटारे, नदीपात्रे आणि रस्त्यांची साफसफाई तातडीने पूर्ण करावी, जलसंधारणाची कामे पूर्ण करावी, धोकादायक पुलांची तपासणी करावी तसेच...

राष्ट्रीय लोकअदालत 12 सप्टेंबरला होणार

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये एकाच दिवशी होणार सुनावण ी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक 12 सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन होत असल्याने प्रलंबित वाद जलदगतीने निकाली काढण्यास मोठी मदत होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आनंद एल यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे या लोकअदालतीचा शुभारंभ होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच इतर न्यायाधिकरणांमध्येही एकाच वेळी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ, यांचा संयुक्त सहभाग असून संपूर्ण न्यायव्यवस्थेचा समन्वय साधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्य...

ज्वारी, बाजरी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी 10 जूनपर्यंत मुदतवाढ

रब्बी हंगाम 2025-26 मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत महागांव, पांढरकवडा, पाटण, पुसद, आर्णी, उमरखेड, घाटंजी, कळंब व राळेगांव या नऊ ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. या खरेदी केंद्रामध्ये तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागांव, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. पाटण,किसान मार्केट यार्ड शेलु(बु). पुसद, शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, (केंद्र दत्तरामपुर), तालुका खरेदी विक्री संघ मर्या. उमरखेड, तालुका खरेदी विकी संघ मर्या. घाटंजी, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. कळंब व तालुका खरेदी विक्री संघ मर्या. राळेगांव या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दिनांक 1 एप्रिल ते 15 मे 2026 पर्यंत करण्यात येणार होती. सद्यस्थितीत नोंदणी विचारात घेवुन शासनाने ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसा...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तंबाखू विरोधी सप्ताह साजरा जनजागृती कार्यक्रमातून तंबाखूमुक्तीचा संदेश

तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथे ३१ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत तंबाखू विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आयोजित या सप्ताहात पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. ई-सिगारेट आणि फ्लेवर तंबाखूच्या वाढत्या वापराबाबत विशेष जनजागृती करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तसेच हृदयविकारांसह अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. भारतातील सर्व प्रकारच्या कर्करोगांपैकी सुमारे २७ टक्के कर्करोग तंबाखू सेवनाशी संबंधित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके आणि जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. उमेश जोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह राबविण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना तंबाखूमुक्त ...

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता

यवतमाळमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता असून ४० खोल्यांची स्वतंत्र इमारत भाडे तत्त्वावर देण्यासाठी इच्छूक असलेल्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. नवीन इमारतीसाठी अपेक्षित सुविधा असाव्यात विद्यार्थ्यांना पुरेल इतक्या ४० खोल्या, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, १५ स्नानगृहे व १५ शौचालयांची सोय, पार्किंगसाठी स्वतंत्र जागा, पुरेशी विद्युत व्यवस्था असणे आवश्यक आहे. तरी इच्छुकांनी संपर्क साधावा असे गृहपाल, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह क्र. १, यवतमाळ यांनी कळविले आहे