Posts

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

Image
यवतमाळ, दि.१२ (जिमाका): महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त मा. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज महसूल भवन येथे यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी फुलपुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 000000

मॉडेल व्हिलेज उपक्रमातून गावाचा सर्वांगीण विकास शक्य

Image
कुलगुरू डॉ. शरद गडाख यवतमाळ, दि. १२ (जिमाका) : मॉडेल व्हिलेज संकल्पनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवून गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात एक गाव ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून विकसित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ अंतर्गत मॉडेल व्हिलेज उपक्रमात दत्तक घेतलेल्या महमदपूर(ता. बाभूळगाव) येथे ८ मार्च रोजी मान्यवरांनी भेट देऊन विविध कृषी उपक्रमांची पाहणी केली. यावेळी संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक (संशोधन) डॉ. श्यामसुंदर माने, विभाग प्रमुख डॉ. नितीन कोष्टी, सहयोगी संशोधन संचालक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दीपक कच्छवे, तालुका कृषी अधिकारी ऋतिका डेरे, सरपंच जिजाबाई गाडेकर, पोलीस पाटील रसिका मेश्राम, कृष्णाभाऊ ठाकरे आदी उपस्थित होते. या भेटीदरम्यान कृषी विज्ञान केंद्राने दत्तक घेतलेल्या महमदपूर या आदर्श गावामध्ये मागील तीन वर्षांत राबविण्यात आलेल्या कृषी तंत्रज्ञानामुळे गाव...

भूमिहीन आदिवासींसाठी स्वाभिमानाची नवी दिशा

पूर्णतः अनुदानित झालेल्या सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यवतमाळ, दि. १२ (जिमाका) : भुमिहीन आणि दारिद्रय रेषेखालील आदिवासी कुटुंबांना आर्थिकदृष्टया सबळ करण्यासाठी आणि त्यांच्या स्वाभिमानाला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत भुमिहीन दारिद्रय रेषेखालील आदिवासींच सबळीकरण व स्थाभिमान योजनाराबविली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी आदिवासी कुटुंबांना ४ एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा २ एकर बागायती (ओलिताखालील) जमीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेमुळे भुमिहीन आदिवासींना स्वाभिमानाची नवी दिशा मिळणार आहे. भूमिहीन दारिद्रय रेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत मागील पाच वर्षांच्या खरेदी- विक्री व्यवहार आणि प्रचलित रेडीरेकनर दर विचारात घेऊन जमीन खरेदीसाठी पूर्वी ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज आणि ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून दिले जात होते. मात्र, ही योजना आता पुर्णतः अनुदानित करण्यात आली आहे. जमीन खरेदी आणि लाभार्थी निवडीसाठी प्रत्येक जिल्हयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये अपर आयुक्त, आदिवासी विकास, मु...

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

आदेशजारी यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : सन २०२६ या वर्षासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यवतमाळ जिल्ह्यात तीन स्थानिक सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. राजनैतिक सेवा विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून या सुट्ट्यांबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. घोषित करण्यात आलेल्या आदेशानुसार शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन, शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी जेष्ठागौरी पूजन आणि सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी लक्ष्मीपूजन (दुसरा दिवस) या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्ट्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना लागू राहतील. मात्र जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच अधिकोष यांना हा आदेश लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आहे. 000000

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान ;

पहिल्या टप्प्यात लोणबेहळ, शिरजगाव, गणेशपूर मंडळ ठरले उत्कृष्ट यवतमाळ, दि. १2 (जिमाका) : “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या 7 मार्चच्या पहिल्या टप्प्यातील शिबिरांचे गुणांकन पूर्ण झाले असून त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोणबेहळ, शिरजगाव, गणेशपूर या तीन मंडळांची निवड करण्यात आली आहे. प्राप्त गुणांनुसार आर्णी तालुक्यातील लोणबेहळ मंडळाने ५९ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. नेर तालुक्यातील शिरजगाव मंडळाने ५४ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला असून वणी तालुक्यातील गणेशपूर मंडळाने ५३.५ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या मंडळांचे मंडळ अधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अभिनंदन केले असून पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान, इतर मंडळांनी पुढील टप्प्यांमध्ये अधिक चांगली कामगिरी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 14 मार्चला दुसरा टप्पा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत पहिला टप्पा 7 मार्च रोजी पार पडला असून दुसरा टप...

एचपीव्ही लसीकरणाविषयी जनजागृती करा

Image
जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा घेतला आढावा यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरणाबाबत महिला व मुलींमध्ये अधिक जनजागृती करण्यासाठी थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रबोधन करावे, तसेच शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थीनींना समुपदेशनाद्वारे एचपीव्ही लसीकरणाची माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे झालेल्या जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या सभेत एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समन्वयक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागातील इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सविस्तर माहिती घेण्यात आली. रुग्णालयांमध्ये एचपीव्ही लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सुनियोजित आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील मंडळस्तरावर सुरू असलेल्या ‘छ...

आयुष्मान कार्डचे मिशनमोडवर वितरण पूर्ण करा

Image
जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश 12 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड वितरित महाराजस्व समाधान शिबिरांत कॅम्प सुरू करा यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डचे वितरण मिशनमोडवर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेची आढावा बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समन्वयक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागातील इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील आयुष्मान भारत गोल्डन कार्ड व वंदना कार्ड वितरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यात आतापर्यंत 12 लाखांहून अधिक आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंतही ही योजना पोहोचवून सर्वांचे ईकेवायसी करुन कार्ड तयार करण्याचे...