Posts

शेतमाल खरेदी-विक्रीसाठी परवाना बंधनकारक

 पणन संचालनालयाचे परिपत्रक जारी राज्यामध्ये शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी व्यापारी, संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी वैध परवाना घेणे बंधनकारक असल्याचे पणन संचालनालयाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक पणन संचालक शरद जरे यांनी जारी केले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ हा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यामधील तरतूदीनुसार राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री चे विनियमन करण्यात येते. सद्या राज्यामधील विविध भागामध्ये अनेक व्यापारी, काही संस्था, शेतकरी संस्था या मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी विक्री कोणत्याही परवान्याविना करीत असल्याबाबतच्या तक्रारी पणन संचालनालयास प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने पणन संचालनालयाकडून संबंधितांना वेळोवेळी अशा प्रकारचे प्रकार करणे अनुचित असल्याबाबत कळवून सुध्दा अनेक व्यापारी किंवा संस्था शेतमालाची विनापरवानगी खरेदी विक्री करीत असल्याचे पणन कार्यालयाच्या निदर्शनास आलेले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र. अध्यादेश क्रमांक १५ दि. ०५जुलै २०१६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे...

‘फार्मर आयडी’नसेल तर पीएम किसान सन्मान निधीपासून राहाल वंचित

 २० मेपर्यंत मुदत ; २.६२ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी  ३३ हजार प्रलंबित  कृषी योजनांच्या लाभासाठी ‘फार्मर आयडी’ काढावे  जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ‘फार्मर आयडी’फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी २० मे २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विहित मुदतीत फार्मर आयडी न काढल्यास भविष्यात कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. २ लाख ६२ हजार शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी केंद्र शासनाच्या ‘अॅग्रीस्टॅक’मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची डिजिटल नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सद्यस्थितीनुसार पीएम-किसान योजनेअंतर्गत एकूण २ लाख ९५ हजार १८३ लाभार्थी असून, त्यापैकी २ लाख ६२ हजार ११ शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध आहे. मात्र, अद्याप ३३ हजार १७२ लाभार्थ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित आहेत. फार्मर आयडीचे ...

'एकाग्रता आणि लक्ष्य गाठण्याची जिद्द' हीच यशाची गुरुकिल्ली - सहाय्यक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे (भाप्रसे)

Image
'युवा संवाद' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या मोहात न पडता स्पर्धा परीक्षेत यशासाठी अभ्यासातील एकाग्रता आणि लक्ष्य गाठण्याची जिद्द आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रशासकीय सेवेतील सहायक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित 'युवा संवाद' कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, मुख्यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी, कुणाल पाटील आणि मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षार्थी उपस्थित होते. संघर्ष आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास रेवैयाह डोंगरे यांनी अत्यंत साध्या आणि प्रामाणिकपणे आपला जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. तेलंगणाच्या 'सुपर ५०' आश्रम शाळा प्रकल्पातून आयआयटी मद्रासपर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडला. आयआयटीमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात दिला, यातूनच प्रशासनाच्या संवेदनशीलतेची जाणीव झाली आणि नागरी सेवेची ओढ निर्माण झाली...

पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ड्रोन व कृषी यंत्राचे वाटप कृषी यंत्र खरेदीसाठी २२२८ शेतकऱ्यांना १२ कोटी वितरित

Image
राष्ट्रीय कृषी विकास यांत्रिकीकरण योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत १० शेतकऱ्यांना पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते कृषी औजार व यंत्राचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगामपूर्व बैठकीपूर्वी या कृषी औजार व यंत्राचे वाटप गुरुवारी (दि.७) करण्यात आले. यावेळी खा. प्रतिभा धानोरकर, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आ. किसन वानखेडे, आ. संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे व शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाच्या कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत रामेश्वर रामराव तायडे रा.मनपूर ता. यवतमाळ यांना नांगर व ट्रॅक्टर खरेदीसाठी १ लाख ७२ हजार ५०० रुपये, संदीप देवराव जावके, रा.बेलोरा ता. यवतमाळ यांना ट्रेलरसाठी ८० हजार रुपये, विलास शिवरामजी पारधी, रा.किन्हाळा ता. कळंब यांना बहू पीक मळणी संत्र्यासाठी २ लाख २५ हजार रुपये, प्रदीप उत्तमराव मुन, रा. सावरगाव, ता. कळंब यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख २५ हजार रुपये, दत्ता देवबाजी रा. मारनर, खातखेडा ता. कळंब यांना यांन...

जर्मनीमध्ये ‘शिका आणि कमवा’ची सुवर्णसंधी

 युवकांसाठी अप्रेंटिसशिप कार्यक्रम जर्मनीमध्ये ‘शिका आणि कमवा’ची सुवर्णसंधी जिल्ह्यातील युवकांसाठी ‘ऑसबिलडुंग’ कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या ‘महिमा’ महाराष्ट्र फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अडवांसमेंट उपक्रमांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी ‘मॅजीक बिलीयन’ यांच्या संयुक्त सहकार्याने जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी जर्मनीमध्ये शिक्षणासह रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘शिका आणि कमवा’ या संकल्पनेवर आधारित ‘ऑसबिलडुंग’ (अप्रेंटिसशिप) कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना जर्मनीमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि आकर्षक मानधन मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्रातील कुशल व होतकरू युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, रोजगार आणि दीर्घकालीन करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. जर्मनीमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असून भारतीय युवकांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये ऑसबिलडुंग कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना दोन पद्धतींनी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगद्वारे प्रत...

राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद;

Image
 सहा हजार पेक्षा जास्त प्रकरणे निकाली, चार जोडप्यांचा संसार सावरला जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ९ मे रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीस वकील व पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये साडेसहा हजार पेक्षा जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले.तसेच चार जोडप्यांचा संसार सावरण्यात आला. निकाली निघालेल्या प्रकरण्याचे एकूण 9.92 कोटीपैक्षा जास्त मुल्य होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. ९ मे २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शेखर चु. मुनघाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नंदेश शं. देशपांडे,आभासी पद्धतीने उपस्थित होते. त्यांनी लोकअदालतीचे महत्त्व विशद करत पक्षकार व विधिज्ञांना अधिकाधिक प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली...

इसापूर धरणातून पाणी सोडण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

 उमरखेड तालुक्यातील 32 गावांना दिलासा;  पाणी टंचाई निवारणासाठी उपाययोजना  नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन इसापूर धरण प्रकल्पातून यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील पाणी टंचाई ग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी पाणी सोडल्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील 32 पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळणार आहे. या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यासाठी 9 दलघमी आणि नांदेड 3 दलघमी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार इसापूर धरणामधून थेट पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र विमोचक उपलब्ध नसल्यामुळे नियमित कालवा आवर्तनाच्या वेळापत्रकाशी संलग्न अशा विमोचकाद्वारे दि. ५ एप्रिलपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दि. ११ मे अखेर एकूण १२ दलघमी मागणीपैकी ६.८१ दलघमी इतके पाणी नाल्याद्वारे प्रवाहित करण्यात आले असल्याची माहिती उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली. उमरखेड तालुक्यातील टाकळी, राजापूरवाडी, चालगणी, साखरा, खरुस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, ऊंचवडद, सिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, भोजनगर, बिटरगाव, रतननाईकनगर, बोडका, ...