Posts

नेर तालुक्यात मतदार यादी पुनरीक्षण कामाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Image
यवतमाळ : जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काल नेर तालुक्याला भेट देऊन मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO), बीएलओ सुपरवायझर तसेच बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. तसेच मतदार यादी पुनरीक्षणाची कार्यपद्धती, नोंदणी प्रक्रिया आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. मतदार यादी पुनरीक्षणाचे काम निर्धारित वेळेत आणि अचूकपणे पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.  तसेच कामामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार

Image
• राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम ;  • मृद व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय निर्गमित यवतमाळ/ मुंबई, दि.३ : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस, २१ ऑगस्ट हा यापुढे दरवर्षी शासकीय स्तरावर ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय मृद व जलसंधारण विभागाने निर्गमित केला. सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन १० मे हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून २००३ पासून साजरा केला जात होता. मात्र आता त्यात बदल करून त्यांच्या जन्मदिवशी २१ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. नाईक यांचे जलसंधारणातील योगदान १९९१ ते १९९३ या काळात मुख्यमंत्री असताना राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांनी मोठ्या धरणांवर अवलंबून न राहता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र देत पाणलोट विकास आणि भूजल पुनर्भरणावर भर दिला होता. १९९२ साली स्वतंत्र जलसंधारण विभागाची स्थापना करून जलसंधारणाची लोकचळवळ उभी केली. रोजगार हमी योजनेचा वापर जलसंधारणाच्या कामांसाठी करून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसोबतच जलसाठे नि...

लख्खीशाह बंजारा यांचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी: पालकमंत्री संजय राठोड

Image
> उत्साहपूर्ण वातावरणात जयंती सोहळा संपन्न   > सामाजिक एकतेचा दिला संदेश यवतमाळ, दि. ४ : भारतीय इतिहासातील अद्वितीय पराक्रम, अतुलनीय त्याग, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतीक असलेले महान योद्धा लख्खीशाह बंजारा यांचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.  लख्खीशाह बंजारा यांच्या ४४६ व्या जयंतीनिमित्त शनिवारी यवतमाळ येथील कार्यालयातील सभागृहात आयोजित अभिवादन सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. टी. सी. राठोड होते. प्रसिद्ध कीर्तनकार व उद्बोधनकार राजुदास जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.   यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, “लख्खीशाह बंजारा हे केवळ बंजारा समाजाचे नव्हे, तर संपूर्ण भारतीय राष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या शौर्य, दानशूरता, राष्ट्रनिष्ठा आण...

पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ ; प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात

Image
यवतमाळ, दि. ४ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, लाभ वितरणासाठी शासन यंत्रणा सज्ज झाली आहे.   राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी 'महाकर्जमुक्ती योजना' म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. विविध बँकांकडून प्राप्त झालेल्या पात्र कर्जदारांची माहिती, ई-केवायसी, आधार पडताळणी आणि खात्यांची अंतिम छाननी यासह सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वास येत आहेत. संबंधित विभाग, बँका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय साधून लाभ वितरणाची तयारी वेगाने सुरू आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे राष्ट्रीयकृत, खाजगी, प्रादेशिक ग्रामीण तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी...

एमसीईडीतर्फे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोफत कौशल्याधारित उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन

Image
यवतमाळ, दि.3 (जिमाका) : जिल्हा उद्योग केंद्र, यांच्याद्वारे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यवतमाळ यांच्या वतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवकयुवती व पुरुषांकरिता एक महिन्याच्या कालावधीचे विविध कौशल्यांवर आधारित मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.  प्रशिक्षणामध्ये विविध तांत्रिक ज्ञान प्रात्यक्षिकांसह दिले जाणार असून उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, उद्योग-व्यवसायाच्या संधी, उद्योग उभारणीची प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगांसाठी आवश्यक नोंदणी व परवाने तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  पात्रता काय ?    या प्रशिक्षणासाठी अर्जदार यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक असून त्याचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.   कागदपत्रे कोणती लागतात ?   प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), शैक्षणिक गुणपत्रिका, जातीचा...

एनपीएस संचय आउटरीच कार्यक्रम उत्साहात

Image
आर्थिक साक्षरता आणि सेवानिवृत्ती नियोजनाबाबत मार्गदर्शन पीएफआरडीए व जिल्हा अग्रणी बँक कक्षामार्फत आयोजन यवतमाळ, दि.३(जिमाका) : आर्थिक सुरक्षा आणि सक्षम सेवानिवृत्ती नियोजनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण आणि जिल्हा अग्रणी बँक कक्ष, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलै रोजी राधा मंगलम हॉटेल येथे 'एनपीएस संचय आउटरीच कार्यक्रम' उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक सुनील पांडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे अतुल इंगळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीएफआरडीएचे सचिन राठी आणि रघुवीर सिंह चरण उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी एनपीएस संचय योजनेचे महत्त्व, नियमित गुंतवणुकीद्वारे आर्थिक सुरक्षितता आणि सेवानिवृत्ती सन्मानपूर्वक जीवनासाठी या योजनेची उपयुक्तता याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रशांत येकुडे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक माधव पाल...

३४ हजारांहून अधिक एकल महिलांचा बचत गटात समावेश ; उमेद अभियानाच्या विशेष मोहिमेला मोठे यश

Image
यवतमाळ, दि.3 (जिमाका) : जिल्हा परिषदच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद अंतर्गत जिल्ह्यातील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील ३४ हजारांहून अधिक एकल महिलांचा स्वयं-सहाय्यता बचत गटांमध्ये समावेश करण्यात आला असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्गही खुला झाला आहे. आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ ते २५ जूनदरम्यान जिल्हाभरात उपजीविका वृद्धी, वैयक्तिक विकास आणि सामाजिक सक्षमीकरण या विषयांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या संकल्पनेतून आणि प्रकल्प संचालक आनंद पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे यशस्वीपणे पार पडली. या शिबिरांमध्ये उमेद अभियानातील तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, ग्रामसखी तसेच मोठ्या संख्येने एकल महिलांनी सहभाग घेतला. शिबिरांमध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच उद्योग-व्यवसायात यशस्वी झालेल्या एकल महिलांनी आपले अनुभव मांडले...