Posts

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

Image
उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चा अंमलबजावणीला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवारी आयोजित ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार किसन वानखेडे, नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके, सहायक जिल्हाधिकारी रेवैय्या डोंगरे, उपजिल्हाधिकारी देशपांडे, पुनम अहिरे, उपजिल्हाधिकारी अविनाश शिमटे, तहसिलदार राहुल मोरे, प्र.पोलीस उपअधिक्षक सुनील हुड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आमदार किसन वानखेडे म्हणाले की, आपण सामान्य व्यक्तींच्या सेवेसाठी कार्यतत्परत आहोत. काम करत असतांना शेतकरी, महिला, युवक, सामान्य नागरिकांची वेळेवर कामे तात्काळ केली पाहिजे. सामान्य लोकांची कामे वेळेत केल्या तर अडचणी येणार नाही. प्रशासनाने पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालमर्यादा आणि कार्यक्षमता या चार स्तंभावर काम केले पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विहित काल कालमर्याद...

शासकीय कामे वेळेत करा ..!

Image
- राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक  पुसद तालुक्यातील विकासकामांचा घेतला आढावा पुसद तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी पुसद येथे सोमवारी सविस्तर आढावा घेतला. वन विभागाच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस नगराध्यक्ष मोहिनी इंद्रनील नाईक, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, उपवनसंरक्षक श्री स्वामी, तहसीलदार रेखा वाणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पुसद तालुक्यातील आठ जिल्हा परिषद सर्कलचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत शासकीय कामे वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करणे आवश्यक असून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी पुसद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा महत्वाचा ठरला. रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करावीत तसेच दुरुस्तीची प्रलंबित कामे विलंब न लावता पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्य...

'युवा संवाद' करिअर मार्गदर्शन सत्र उत्साहात ; विद्यार्थ्यांना मिळाली अभ्यासाची दिशा

Image
जिल्हा प्रशासनामार्फत तरुणांसाठी आयोजित युवा संवाद उपक्रमांतर्गत तहसीलदार हेमकृष्ण पिसदे यांचे मार्गदर्शन सत्र उत्साहपूर्ण वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या सहभागात यशस्वीरित्या पार पडले. यावेळी उपजिल्हाधिकारी पूनम अहेरी, मुख्यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे आणि स्पर्धा परीक्षार्थी उपस्थित होते. तहसीलदारहेमकृष्ण पिसदे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेली माहिती दिली. त्यांनी तयारीदरम्यान येणाऱ्या अडचणी, सातत्याचे महत्त्व तसेच योग्य नियोजन आणि अभ्यासाची परिणामकारक रणनीती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना शालेय पातळीवरील पाठ्यपुस्तकांपासून भक्कम पाया तयार करण्याचे महत्त्व, विषयांचा समन्वय साधत अभ्यास करण्याची पद्धत, सातत्य आणि पुनरावृत्तीची गरज, तसेच आळशीपानाची सवय कशी टाळावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच युपीएससी/एमपीएससी या परीक्षेत दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळणार असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. या सत्रातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्पष्ट दि...

राष्ट्रीय लोकअदालत ९ मे रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये एकाच दिवशी सुनावणी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन होत असल्याने प्रलंबित वाद जलदगतीने निकाली काढण्यास मोठी मदत होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शेखर बु. मुनपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे या लोकअदालतीचा शुभारंभ होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच इतर न्यायाधिकरणांमध्येही एकाच वेळी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ, यांचा संयुक्त सहभाग असून संपूर्ण न्यायव्यवस्थेचा समन्वय साधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रक...

कारेगाव पारधी बेडा येथे टॅंकरद्वारे दररोज ३० हजार लिटर पाणीपुरवठा सुरु

उपविभागीय अधिकारी यांची माहिती आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेडा येथे १५ एप्रिल पासून नियमितपणे दररोज एक वेळा शासकीय टँकरद्वारे तीस हजार लिटर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी दिली आहे. ही वस्ती ग्रामपंचायत अंजी अंतर्गत येत असून ती वनविभागाच्या जमिनीवर वसलेली आहे. वनहक्क कायद्यानुसार पट्टा मंजुरीचे प्रकरण सध्या जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित आहे, उपविभागीय अधिकारी, यवतमाळ यांनी १० एप्रिल रोजी या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळभेट देऊन पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. त्यापार्श्वभूमीवर १५ एप्रिल पासून नियमितपणे दररोज एक वेळा शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कारेगाव पारधी बेडा या भागातील पाणीटंचाईबाबत प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन यवतमाळचे उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे यांनी केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 287 रुग्णांना सुमारे 2.38 कोटींची मदत

• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात आर्थिक वर्षात 287 रुग्णांना सुमारे 2 कोटी 38 लाख 52 हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे. 20 गंभीर आजारासाठी मदत : कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष 2 ते 6), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे...

जिल्हाधिकारी विकास मीना यांचा राज्यस्तरीय सन्मान होणार

सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “अभिप्राय कक्ष” हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी विकास मीना यांचा राज्यस्तरीय सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. “द्वितीय सेवा हक्क दिन” निमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला असून मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. “अभिप्राय कक्ष” या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे नागरिकांना अधिक संवेदनशील, पारदर्शक व तत्पर सेवा देणे शक्य झाले असून, त्यास व्यापक प्रतिसाद व यश मिळाले आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण झाला असून, त्यातून प्रशासनातील सेवा वितरण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्यास मदत झाली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात मुख्य सचिव यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विकास मीना यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास वरिष्ठ ...