Posts

विशेष वृत्त : यवतमाळ जिल्ह्यात ८१६ अन्न प्रक्रिया उद्योगांची उभारणी

Image
 पीएमएफएमई योजनेतून प्रकल्पांना बळ  उद्योगांना शासनाचे ३५ टक्के अनुदान  महिलांच्या सक्षमीकरणाला गती यवतमाळ, दि.१५ : जिल्ह्यात कृषी आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग' (पीएमएफएमई) योजना 'गेम चेंजर' ठरत आहे. सन २०२०-२१ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्याने या योजनेत उल्लेखनिय प्रगती केली असून, आतापर्यंत ८१६ प्रकल्पांची यशस्वी उभारणी झाली आहे. विशेष म्हणजे, या उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यात १९७२ नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला गती दिली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे एकूण मूल्य २७४५ लाख रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये शासनाने खंबीर साथ देत आतापर्यंत १०५२ लाख रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील लघुउद्योजकांना हक्काचे भांडवल उपलब्ध झाले असून त्यांच्या आर्थिक सक्षमतेला शासनाचा आधार मिळाला आहे. गृहउद्योगातून रोजगा...

महिला सक्षमीकरण यशोगाथा: गृहउद्योगातून ‘आत्मनिर्भतेकडे’

Image
 रूपाली गायकी यांचा ‘गृहिणी ते यशस्वी उद्योजिका’ बनण्याचा प्रवास ;  ‘राघवी लाकडी तेल घाणा’शेतीपूरक व्यवसाय ठरतोय आर्थिक सक्षमतेचे साधन  'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग' योजनेचा आधार यवतमाळ, दि.१५ : "शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल, तर संकटांचे डोंगरही पार करता येतात," हे यवतमाळच्या रूपाली आशिष गायकी यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. घरची परिस्थिती बेताची आणि शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण असताना, रूपाली गायकी यांनी उद्योजिका बनण्याचे स्वप्न पाहिले आणि आज त्या 'राघवी लाकडी तेल घाणा' या उद्योगाच्या माध्यमातून वार्षिक ५ लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. यातून गायकी कुटुंबियांसाठी शेतीपूरक व्यवसाय हा आर्थिक सक्षमतेचे साधन ठरत असून या गृहउद्योगातून रूपाली गायकी यांनी ‘आत्मनिर्भतेकडे’प्रवास सुरु केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कापरा मेथड या गावच्या रूपालीताईंचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले. पती शेती करायचे, परंतु मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवणे केवळ शेतीवर शक्य ...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

Image
मुंबई,दि.१३ : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नावीन्य पूर्ण रुग्णस्नेही बदल करण्याचे काम सुरु आहे. त्याचाच एक भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली असणार आहे. रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्य...

यवतमाळ नगरपरिषदेतर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

Image
 १४ ते २० एप्रिलदरम्यान जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम यवतमाळ, दि.13 (जिमाका) : अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग, नगरपरिषद यवतमाळ यांच्या वतीने दि. १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अग्निशमन सेवेत कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा सप्ताह दरवर्षी केंद्रीय गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो. गृह मंत्रालयाने दिलेले घोषवाक्य “सुरक्षित शाळा सुरक्षित रुग्णालय आणि अग्नी सुरक्षिततेसाठी जागरूक समाज आग प्रतिबंधकतेसाठी एकत्रपणे” या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय अग्निशमन दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन विषयक माहितीपर कार्यक्रम व प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. तसेच विविध शासकीय व खाजगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना अग्निशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमांचे आयोजन नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी अशोक उईके, उपा...

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

यवतमाळ, दि.13 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध नामांकित उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्यामध्ये रेयमंड डेनिम, युको प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ, चिद्धरवार कन्स्ट्रक्शन कंपनी यवतमाळ, एनव्हीके माहिती तंत्रज्ञान व सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ तसेच छत्रपती संभाजीनगर येथील बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीज, देवगिरी फोर्जिंग्स, एनआरबी बेअरिंग्ज पुणे आणि पियाजिओ लिमिटेड आदी कंपन्यांचा समावेश आहे. या मेळाव्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध व्यवसायातील उमेदवारांसाठी जागा उपलब्ध आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही संबंधित उद्योगांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे व सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार आर. पी. कोडापे यांनी कळविले आहे.

यवतमाळमध्ये ३.६० लाखांचे प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे जप्त; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

Image
कृषी विभाग व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई यवतमाळ, दि.१3 (जिमाका) : जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री आणि वाहतुकीविरोधात कृषी विभाग व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत एचटीबीटी (प्लॅटिनम 5G) कापूस बियाण्यांची चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत प्रशासनाने सुमारे २० लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीवरून रचला सापळा १२ एप्रिल २०२६ रोजी यवतमाळ शहरात एका 'किया सोनेट' (GJ-09-5486) आणि अन्य एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या सापळा रचून ही वाहने अडवली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल झडती दरम्यान पथकाला मोठ्या प्रमाणात अवैध साठा मिळून आला. यामध्ये 'प्लॅटिनम 5G' नावाच्या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची ४०० पाकिटे (एकूण ८ पोते), जप्त केलेल्या बियाण्यांची बाजारभावानुसार किंमत ३.६० लाख रुपये आहे. २ चारचाकी वाहने आणि ३ मोबाईल फोन (किंमत १६.४० लाख रुपये), एक...

महात्मा ज्योतीबा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव उत्साहात साजरा

Image
पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप यवतमाळ, दि.१3 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांचा द्विशताब्दी जयंती उत्सव मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त प्राजक्ता इंगळे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मून उपस्थित होत्या. पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने सुरु असलेल्या राज्य शासनाच्या उपक्रम व विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत सुधारणा करून २३९९ आजारांवर उपचाराचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा उपस्थितांकडून करून घेत...