Posts

शासकीय तंत्रनिकेतन १८१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

  यवतमाळ , दि. १ ९  (जिमाका) :   यवतमाळमधील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध नामांकीत कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये शासकीय तंत्रनिकेतनच्या विविध अभियांत्रिकी शाखेतील १८१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.   बजाज ऑटो लिमिटेड (पुणे) ,  टाटा मोटर्स लि. पुणे ,  डाटा स्टाक प्रा. लि. पुणे, आव्हाडा ग्रुप नोइडा व टाटा गोशनग्रीन एनर्जी पुणे ह्या कंपन्या प्लेसमेंट ड्राईव्ह करीता शासकीय तंत्रनिकेतन ,  यवतमाळ येथे आल्या होत्या. या प्लेसमेंट ड्राईव्हच्या निवड प्रक्रियेत सर्वप्रथम बुद्धीमत्ता चाचणी व मुलाखत घेण्यात आली.   या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये बजाज ऑटो लिमिटेड (पुणे) साठी अणुविद्युत, विद्युत व यंत्र अभियांत्रिकी विभागातील एकूण ४२ विद्यार्थी निवडले गेले. टाटा मोटर्स लि. पुणे या कंपनीत कमवा आणि शिका ह्या योजनेअंतर्गत यंत्र अभियांत्रिकी विभागातील ७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विशेषतः टाटा मोटर्स लि. पुणे मार्फत या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण मोफत देण्यात येणार असू...

स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांचा अभिमान - नगराध्यक्ष ॲड. मोहिनीताई नाईक यांचे गौरवोद्गार

Image
    > माविमद्वारा आयोजित १६ वी सर्वसाधारण वार्षिक सभा व महिला मेळावा उत्साहात > महिला बचत गटांनी पुसद तालुक्यात व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन :   यवतमाळ , दि. १ ९ (जिमाका) : शासकीय योजनांचा लाभ घेवून स्वत:चा व्यवसाय सुरु करणाऱ्या पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार पुसद नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष ॲड. मोहिनीताई नाईक यांनी क ाढले . पुसदमधील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुधाकर नाईक प्रेक्षागृहात महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्रांच्या वतीने १६ वी सर्वसाधारण वार्षिक सभा व महिला मेळावा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष ॲड. मोहिनीताई नाईक बोलत होत्या. या का र्यक्रमा चे उद्घाटक म्हणून पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल , प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर , नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अतुल इंगळे , प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड , माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे , आदिवासी विभागाचे सहा यक प्रकल्प अधिकारी कोटूरवार ...

‘अमृत-सक्षम’ उपक्रमातून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजक होण्याची संधी

  अमृत संस्थेचा विशेष उद्योजकता विकास उपक्रम सुरु   यवतमाळ, दि. 17 : महाराष्ट्रात आता कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेचे काम राहिलेले नाही, तर ते वेगाने वाढणारे 'हरित उद्योग' क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण आणि पर्यावरण नियमांमुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, 'अमृत' आणि 'कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने "अमृत-सक्षम" हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे.     रोजच्या कचऱ्यातून नियमित उत्पन्न आणि शाश्वत व्यवसाय उभा राहू शकतो, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती आणि धूप बनवणे. प्लास्टिक, कागद आणि काच रिसायकलिंग करणे. 'रिसोर्स रिकव्हरी सेंटर' सुरू करणे. योग्य तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या क्षेत्रात स्वतःचा यशस्वी ब्रँड निर्माण करता येणे शक्य आहे.   'अमृत-सक्षम' नेमके काय आहे?    हे केवळ एक पुस्तकी प्रशिक्षण नाही, तर 'संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंतच...

जवाहरलाल दर्डा लॉ कॉलेजमध्ये जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा

Image
  यवतमाळ, दि. 17 (जिमाका) :   महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ आणि स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 17 जुलै जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा करएयात आला असून त्यानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजेश मुनोत होते. उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दिपक एच. दाभाडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. प्रविण जाणी, सदस्य अॅड. आर. के. मनक्षे तसेच प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ. संदीप नगराळे उपस्थित होते.    अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. विजेश मुनोत यांनी विधी सेवा प्राधिकरणामार्फत संविधानातील कलम 39-अ नुसार पात्र नागरिकांना मोफत विधी सेवा उपलब्ध करून दिली जाते, याची माहिती दिली. संविधा...

महिला लोकशाही दिन 20 जुलै रोजी

  यवतमाळ, दि. 17 (जिमाका) :   महिलांच्या तक्रार निवारणासाठी    जिल्हा   महिला   लोकशाही   दिन   दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो. या महिन्याचा   महिला   लोकशाही   दिन   सोमवार दि.20 जुलै रोजी   जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन    येथे आयोजित करण्यात आला आहे.  तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय   महिला   लोकशाही   दिन   आयोजित केला जातो.   महिलांनी प्रथम या   लोकशाही   दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास   जिल्हास्तरीय   महिला   लोकशाही   दिनात तालुकास्तरीय   लोकशाही   दिनात केलेले अर्ज   व   टोकन क्रमांकासह तक्रार सादर करावी. न्यायप्रविष्ठ प्रकरणे,   विहित नमुन्यात नसणारे   व   आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि   वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची   महिलांनी नोंद घेण्य...

ज्वारी, बाजरी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

   यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : रब्बी हंगाम 2025-26 मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत   ज्वारी,   बाजरी,   मका,   रागी   खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत महागांव, पांढरकवडा, पाटण, पुसद, आर्णी, उमरखेड, घाटंजी, कळंब व राळेगांव या नऊ ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे.   या खरेदी केंद्रामध्ये तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागांव, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. पाटण,किसान मार्केट यार्ड शेलु(बु). पुसद, शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, (केंद्र दत्तरामपुर), तालुका खरेदी विक्री संघ मर्या. उमरखेड, तालुका खरेदी विकी संघ मर्या. घाटंजी, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. कळंब व तालुका खरेदी विक्री संघ मर्या. राळेगांव या केंद्रांचा समावेश आहे.   जिल्ह्यात   ज्वारी,   बाजरी,   मका,   रागी   खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी 30 जून 2026 पर्यंत करण्या...

20 जुलैपर्यंत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी विशेष मोहीम

   यवतमाळ, दि. 16   (जिमाका) :   केंद्र शासनाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत   जिल्ह्यात 20 जुलैपर्यंत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच इतर पात्र लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.  आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ऑगस्ट 2020 पासून सुरू असलेल्या या योजनेद्वारे पीक काढणीनंतरच्या कृषी पायाभूत सुविधा तसेच सामुदायिक शेतीसाठी आवश्यक प्रकल्प उभारणीसाठी सवलतीच्या व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे शेतमालाची साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन, वाहतूक आणि विपणनाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. या योजनेअंतर्गत बँकांकडून मंजूर होणाऱ्या दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत तसेच पतहमी क्रेडिट गॅरंटी सुविधा दिली जाते. गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कृषी लॉजि...