जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांचे शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन यवतमाळ दि. 16 (जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2026-27 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांचे उत्पादकता कमी होत असल्याचे दिसून येत असून, त्यामागे योग्य मशागत पद्धती, नांग्या न भरणे, खत व कीडनाशकांचा अपुरा वापर, तसेच झाडांची व्यवस्थित आकार न देणे (दाट व गर्द छत्राकृती रचना) ही प्रमुख कारणे असल्याचे कृषि विभागाने नमूद केले आहे. नवीन लागवडीबरोबरच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे हे जिल्ह्याच्या एकूण फळ उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक मानले जात आहे. याच उद्देशाने हा पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविण्यात येत असून, यात आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पेरू, आवळा आणि लिंबू या प्रमुख फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रति हेक्टर रु. 60 हजार इतका प्रकल्प खर्च ग्राह्य धरला जाईल. त्यावर 40 टक्के प्रमाणे, म्हणजेच जास्तीत जास्त रु. 24 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे. ...