Posts

विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणूक-2026 प्रक्रियेअंतर्गत यवतमाळ मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल घोषित केल्यानंतर जिल्ह्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने 5 जून 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ज्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल घोषित झाले आहेत, त्या मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातही स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात आली असून, निवडणूक निर्बंध हटले आहेत. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र देवून सूचित केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून बेंबळा प्रकल्पाची पाहणी

Image
जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज पाहणी केली. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या विविध बाबींची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रकल्पाच्या देखभाल, व्यवस्थापन, इमारत आणि प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, कार्यकारी अभियंता व्ही. ए. शिरभाते तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बेंबळा प्रकल्प हा जिल्ह्यातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प असून त्याच्या कार्यक्षमतेबाबत आणि व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली

श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दिव्यांग नोंदणी कक्ष

 दिव्यांग लाभार्थ्यांनी ‘युडीआयडी’ कार्ड आधार संलग्न करावे  तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांचे आवाहन येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग नोंदणी कक्ष सुरु करण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे लाभ नियमित व सुरळीतपणे सुरू राहावेत, यासाठी यवतमाळ तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी), दिव्याग प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी केले आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे जुन्या स्वरूपाचे, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा विशेष अपंगत्व मूल्यांकन मंडळाचे प्रमाणपत्र आहे, त्यांनी दिव्यांग नोंदणी कक्ष येथे जावून वैश्विक दिव्यांग ओळखपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्र काढून घ्यावे. तसेच काही लाभार्थ्यांच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि आधार कार्डवरील नाव अथवा जन्मतारखेमध्ये तफावत असलेल्या लाभार्थ्यांनी तसेच ज्या ल...

टीडीआरएफ संस्थेला नियमानुसार जिल्हा युवा पुरस्कार प्रदान -जिल्हा क्रीडा अधिकारी यांची माहित

 दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता वस्तुस्थितीची खातरजमा करण्याचे आवाहन जिल्हा युवा पुरस्कार प्रक्रिया ही शासन निर्णयातील निकष, नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शकपणे राबविण्यात आली असून १ मे २०२६ रोजी प्रदान करण्यात आलेला जिल्हा युवा पुरस्कार हा पूर्णतः नियमसंगत व निर्धारित प्रक्रियेनुसार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुक्सवार यांनी दिली आहे. १ मे महाराष्ट्रदिनी जिल्हा युवा पुरस्कार सन २०२४-२५ संदर्भात काही वर्तमानपत्रे तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या बातम्यांमध्ये वस्तुस्थितीविरुद्ध व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. वस्तूस्थितीनुसार जिल्हा युवा पुरस्कारासाठी लक्ष्य बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ अंतर्गत कार्यरत टी.डी.आर.एफ. अर्थात टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स या संस्थेने नियमानुसार प्रस्ताव सादर केला होता. १२ नोव्हेंबर २०१३ च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार या प्रस्तावाची छाननी व मूल्यांकन प्रक्रिया करण्यात आली. या संस्थेच्या मूळ उद्दिष्टांमध्ये नैसर्गिक आपत्तीग्...

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांगांना मिळणार राष्ट्रीय पुरस्कार

Image
 राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन  31 जुलैपर्यंत मुदत दिव्यांग व्यक्तींच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दिव्यांगजन सक्षमीकरणासाठी वर्ष 2026 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज व नामनिर्देशने मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज व नामनिर्देशन स्वीकारण्याकरिता राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल 15 मे 2026 पासून खुले करण्यात आले असून 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. इच्छुक व्यक्ती, संस्था तसेच संबंधित घटकांनी आपले अर्ज व नामनिर्देशने केवळ ऑनलाइन पद्धतीने www.awards.gov.in या संकेतस्थळावर सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जामध्ये निर्धारित नमुन्यानुसार सर्व आवश्यक माहिती भरून दिव्यांग व्यक्ती किंवा संस्थेच्या उल्लेखनीय, प्रेरणादायी व उत्कृष्ट कार्याचा सविस्तर तपशील नमूद करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कार्याची पुष्टी करणारी कागदपत्रेही पोर्टलवर अपलोड करावीत. या राष्ट्र...

नेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, नेर येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, मोफत शैक्षणिक साहित्य, गणवेश, क्रीडा साहित्य, निर्वाह भत्ता तसेच ई-ग्रंथालय यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८५ टक्के जागा राखीव असून त्यामध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी १ टक्का व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के समांतर आरक्षण आहे. तसेच अनुसूचित जमातींसाठी ३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी ५ टक्के आणि विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hams.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी मागील शैक्षणिक वर्षाची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्...

स्वाधार योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशाचा ऑनलाइन अर्ज बंधनकारक

 अर्ज करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी, १२ वी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रथम समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इयत्ता ११ वी, १२ वी तसेच सर्व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी १५ जुलै पर्यंत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर http://hmas.mahait.org अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावा. सन २०२४-२५ पासून स्वाधार योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. राज्यभरातील महाविद्यालयांची वाढती संख्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशात होत असलेली वाढ लक्षात घेता सर्व पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होत नसल्याचे विभागाने स्पष्ट केले...