Posts

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान · वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धेचेही आयोजन

Image
मुंबई, दि. १६ : संतांच्या भूमीत गुरू तेग बहादुर यांच्या गौरवशाली शहादतीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी ओवे मैदान, खारघर (नवी मुंबई) येथे भव्य शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, तसेच आरोग्य, शिक्षण, पोलीस विभागांचे प्रतिनिधी आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सौरभ कटीयार म्हणाले की, संस्कृती रक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी गुरू तेग बहादुर यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या शहादतीचा इतिहास शाळा, महाविद्यालये, संस्था आणि गुरुद्वारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ ल...

जिल्हास्तरीय कौशल्य मेळावा उत्साहात ; 300 उमेदवारांनी केली नोंदणी

Image
यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), सेंट्रल बँक ऑॅफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कौशल्य मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यात एकूण 64 विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी जवळपास 300 उमेदवारांनी अर्ज भरून नोंदणी केली. सेंट्रल सेलिब्रेशन हॉल, यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमाला आरसेटीचे संचालक दीपक तिवारी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक प्रीतम हस्ते, कौशल्य योजनेचे जिल्हा व्यवस्थापक अण्णासाहेब ढाकणे, बाभूळगाव उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक प्रशांत मोदी, दारव्हा तालुका व्यवस्थापक पराग वानखडे, कळंब तालुका व्यवस्थापक उमेश शिंदे, आर्णी तालुका व्यवस्थापक ललित राऊत, घाटंजी तालुका व्यवस्थापक विनोद मस्करे तसेच प्रशिक्षणार्थी उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कौशल्य मेळाव्याच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाली असून प्रशिक्षणार्थींनी कौशल्य आत्मसात ...

केंद्रीय विद्यालयातील कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा Ø विद्यालय व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न

Image
यवतमाळ, दि. १३ (जिमाका) : येथील केंद्रीय विद्यालयाच्या प्रशासन आणि विकासकामांसाठी कार्यरत विद्यालय व्यवस्थापन समितीची जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष विकास मीना यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला प्राचार्य किरण मेंढे, डायटचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत, अमोलकचंद विद्यालयाचे प्रा.डॉ. राहुल एकबोटे, अनिल इंगोले, प्रा. साहेबराव कदम, रचना घुगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र रामटेके, जि.पचे कार्यकारी अभियंता एस श्रावगी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्ताचा आढावा घेतला. त्यानंतर विद्यालयातल्या चालू वर्षातील नोंदणीची स्थिती, विद्यार्थ्यांची कामगिरी, देखभाल, संवर्धन आणि सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंगने नियुक्ती, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदांसाठी कंत्राटी शिक्षकांचे पॅनेल तयार करणे, विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी रस्त्याचे बांधकाम, नवीन इमारतीत पाईप लाईन जोडणी आणि गटार व्यवस्था, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसवणे, कचरा व्यवस्थापन करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात आग लागून होणाऱ्या ट्रॅव्हल्स अपघाताच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी जिल्हाधिकारी विकास मीना यांचे ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांना पत्रक

यवतमाळ, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यात आग लागून ट्रॅव्हल्स अपघात होणे यामध्ये जीवितहानी झाल्याच्या घटनांची नोंद यापूर्वी झालेली असून आग लागून अपघात होणे यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पुढील कालावधीत अशा घटनांची नोंद होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्रक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांना पत्रक जारी केले आहे. या मार्गदर्शक सुचनानुसार, प्रत्येक ट्रॅव्हल्स मालक यांनी दर पंधरा दिवसांनी आपल्या वाहनाची वेळोवेळी तांत्रिक व्यक्ती यांच्याकडून तपासणी करण्यात यावी, वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाऊ नये,लांब पल्ल्याच्या प्रवासाला रात्री पाळी द्रुतगती रोडवर गाडी चालवताना दोन चालक ठेवावीत जेणेकरून त्यांच्याकडून आळीपाळीने गाडी चालवता येईल, ट्रॅव्हल्स मालक यांनी आपल्या संस्थेतील सर्व चालक, वाहक, सफाई कामगार यांची महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी करणे बंधनकारक राहील, सर्व ट्रॅव्हल्स मालक यांनी परिवहन विभाग यांनी आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्यास प्रवासी...

जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणीसाठी १०४ हेल्पलाईन क्रमांकावर मिळणार मार्गदर्शन

यवतमाळ, दि. 13 (जिमाका) : जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी ही प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया आहे. या नोंदणीबाबत नागरिकांना अचूक आणि सविस्तर माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य सल्ला केंद्रामार्फत १०४ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी, नोंदणीसाठीची कालमर्यादा, प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी तसेच संबंधित कायदे व नियमांविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच नोंदणी करताना घ्यावयाची खबरदारी याबाबतही सल्ला दिला जाणार आहे. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणी संदर्भातील माहितीसाठी १०४ या हेल्पलाईन क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म-मृत्यू डॉ. सुभाष ढोले यांनी केले आहे.

महिला लोकशाही दिन 16 फेब्रुवारी रोजी

यवतमाळ, दि. 13 (जिमाका) : महिलांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दि.16 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह तक्रार सादर करावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

नेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्हचे २२ फेब्रुवारीला आयोजन

यवतमाळ, दि.13 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अंतर्गत मॉडेल करिअर सेंटर व सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ फेब्रुवारी रोजी क्रीडा संकुल, नेर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मेळाव्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार भरती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कंपनी सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असून देशभरात २२ क्षेत्रीय मुख्यालये तसेच ३० शाखा कार्यालये विविध राज्यांमध्ये स्थापन आहेत. कंपनीअंतर्गत निवड झालेले उमेदवार विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत. या भरती अभियानाअंतर्गत सुरक्षा जवान पदासाठी ३०० जागा असून किमान दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र असतील. उमेदवारांचे वय १९ ते ४० वर्षे दरम्यान असावे. उंची किमान १६८ सेंटीमीटर व वजन ५८ ते ९० किलो असणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी ५० जागा उपलब्ध असून किमान बारावी उत्तीर्ण उमेदवार पात्र असतील. या पदासाठी वयोगट १९ ते ४० वर्षे असून उंची किमान १७० सेंटीमीटर व वजन ५८ ते ...