Posts

भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘जलतारा’ संकल्पनेंतर्गत शेत शोषखड्डा योजना > शेतकऱ्यांनी शेतात शोषखड्डा तयार करावा > प्रथम अर्ज- प्रथम प्राधान्य तत्वावर लाभ मिळणार

यवतमाळ दि. 24 (जिमाका) : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित यंत्राद्वारे शेत शोषखड्डा योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शोषखड्डा तयार करता येणार आहे. “आज पाणी जपले तरच उद्याचे शेती भविष्य सुरक्षित” असा संदेश देत त्यांनी शेतकऱ्यांना शेत शोषखड्डा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शासनामार्फत राबविण्यात येणारी ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित शेत शोषखड्डा योजना ही केवळ योजना नसून शेतकऱ्यांसाठी जीवनदायी उपाय असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेत शोषखड्ड्याची आवश्यकता का? पावसाचे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी वाया जात आहे, विहिरी कोरड्या पडण्याचे प्रमाण वाढत आहे, भूजल पातळी सातत्याने घटत आहे तसेच अतिवृष्टीमुळे मातीची धूप होऊन सुपीकता कमी होत आहे. या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे शेतात पाणी अडवणे व जमिनीत मुरवणे हेच असल्याचे कृषी विभागाने केले आहे. शेत शोषखड्ड्याचे फायदे शोषखड्ड्यामुळे जम...

जिल्ह्यातील १३ तलाव मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येणार > मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी ११ मेपर्यंत प्रस्ताव सादर करावे > मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे आवाहन

यवतमाळ दि.२४ (जिमाका) : पाटबंधारे, जलसंधारण विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे मासेमारी हक्काचे हस्तांतरण झालेले ०-५०० हेक्टर पर्यंतचे तलाव शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीमार्फत पात्र संस्थांना मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येतात. सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्ष कालावधीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील ५०० हेक्टरपर्यंतचे एकूण १३ तलाव मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येणार आहेत. त्यासाठी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. या १३ तलावांमध्ये तरोडा (ता. उमरखेड), खरद (ता. यवतमाळ) , मजरा (ता. राळेगाव), येडशी (ता. राळेगाव), राजूर (ता. कळंब), अर्जुना (ता. यवतमाळ), उमडा (ता. यवतमाळ), कापरा (ता. बाभूळगाव), डिगडोह (ता. राळेगाव), टाकळी (ता. यवतमाळ), करणवाडी (ता. केळापुर), पाचपहूर (ता. झरीजामणी), देवगाव (ता. आर्णी) हे तलाव मासेमारीकरीता ठेक्याने द्यावयाचे आहेत. या तलावांपैकी संबंधित तलावांसाठी नोंदणीनुसार, उपविधीतील कार्यक्षेत्रानुसार पात्र असणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव ठेका मागणी परिपूर्ण प्रस्ताव दि.११ मे २०२६ रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय...

बोगस बियाण्यांपासून सावध रहा > कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन > मार्गदर्शक सूचना जारी

यवतमाळ दि.२४ (जिमाका) : आगामी खरीप हंगाम लक्षात घेला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर बियाणे व खते यांची विक्री सुरु होणार आहे. मात्र काही विकाणी अनधिकृत आणि बोगस (बनावट) कापूस बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनानुसार बियाणे खरेदी करतांना बिल नसलेले, खोटी जाहिरात, जास्त उत्पन्नाचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तीच्या भूलथापांना आणि आमिषांना बळी पडू नका. अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करा. बियाणे नेहमी परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावे. रस्त्यावर किंवा अनधिकृत व्यक्तीकडुन बियाणे घेवू किंवा खरेदी करु नये. बियाणे खरेदीचे पक्के बिल घ्या- अधिकृत परवानाधारक कृषी केंद्रामधून बियाणे खरेदी करतांना त्याचे पक्के बिल घ्या. बिलांवर पिकांचे नाव, वाण, लॉट क्रमांक, बियाण्यांची वैधता मुदत, बियाण्यांचा दर व एकुण मुल्य इत्यादी मजकुर स्पष्ट नमूद असल्याबाबत खात्री करा, अशा मार्गदर्शक सूचना कृषी विभागाने जारी केल्या आहेत. “एचटीबीटी”वर कायद...

“मिशन लक्ष्यवेध" अंतर्गत 27 एप्रिल रोजी अॅथलेटिक्स निवड चाचणी

यवतमाळ दि.२४ : राज्यातील क्रीडा विकासाला गती देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या "मिशन लक्ष्यवेध" या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्यात येत असून, त्यासाठी अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडूंची निवड करण्यासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी दि. 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे घेण्यात येणार आहे. सदर चाचणीमध्ये खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यांच्या चाचण्या घेऊन गुणवत्ता आधारित निवड केली जाणार आहे. या निवड प्रक्रियेत ज्या खेळाडूंनी पूर्वी अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच, ज्या इच्छुक खेळाडूंनी अद्याप नोंदणी केलेली नाही, परंतु या चाचणीत सहभागी होण्याची इच्छा आहे, अशा खेळाडूंनाही अर्जासह थेट उपस्थित राहून सहभाग नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी सचिन हरणे यांना 9890981728 या क्रमांकावर संपर्क करुन शंकांचे निरसन करावे, जास्तीत जास्त लोकांनी या चाचणीत सहभागी होण्याचे आव्हान जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यां...

मांग, मांतग समाजातील बांधवांसाठी कार्यशाळेचे आयोजन

यवतमाळ दि.24 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या. यवतमाळ मार्फत मांतग समाज व तत्सम १२ पोट जातीतील वंचित असलेल्या नागरिकांसाठी यवतमाळमध्ये 30 एप्रिल रोजी कार्यशाळचे आयोजन करण्यात आले आहे. मांग व मांतग समाजातील लोकांना विविध योजनांची माहिती देणे तसेच समाजातील लोकांचे जीवनमान उंचावावे या कार्यशाळेचे मुख्य उद्देश आहे. ही कार्यशाळा सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड, यवतमाळ येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. मांतग समाज व तत्सम १२ पोटजातील नागरिकांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम.टी. खडसे यांनी केले आहे. ०००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ण करा > समाज कल्याण विभागाने विद्यार्थ्यांना आवाहन

यवतमाळ दि.24 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी तत्काळ पूर्ण कराव्यात, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन त्रुटींची पूर्तता करुन त्याची प्रत कार्यालयात सादर करण्याची मुदत देण्यात येत आहे. स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रासह अर्ज ऑनलाईन अपलोड करुन दि. 30 एप्रिलपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे परंतू त्याची प्रत अद्याप कार्यालयात सादर केलेली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज सादर न केल्यास किंवा योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहणार आहे. तसेच निर्धारित मुदतीत त्रुटी पूर्ततता न केल्यास अर्ज अपात्र ठरणार याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे. ००० --

२६ एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक

>वैद्यकीय महाविद्यालयात पाच मतदान केंद्र ; मतदार यादी प्रसिद्ध यवतमाळ, दि. २३ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २०२६ येत्या २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार असून, या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील २०४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे पाच मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्र क्रमांक १ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक १ येथे मतदार क्रमांक १ ते ४००, मतदान केंद्र क्रमांक २ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक ४०१ ते ८००, मतदान केंद्र क्रमांक ३ लायब्ररी कम सेमिनार रूम येथे मतदार क्रमांक ८०१ ते १२००, मतदान केंद्र क्रमांक ४ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक १ येथे मतदार क्रमांक १२०१ ते १६००, तर मतदान केंद्र क्रमांक ५ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक १६०१ ते २०४२ यांची मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांची यादी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांनी आपला मतदान केंद्र क्रमांक आणि इतर तपशील संकेत...