Posts

विधानपरिषद निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज रहा

Image
- जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अधिकाऱ्यांना निर्देश  जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा  जिल्ह्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा विधानपरिषद निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी अधिकाऱ्यांना दिले. या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून निवडणुकीच्या पूर्वतयारीचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, अपर पोलीस अधीक्षक अशोक खरात, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश झिमटे, उपजिल्हाधिकारी अजित येळे, कार्यकारी अभियंता व्ही.ए.शिरभाते, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, तहसिलदार राहूल मोरे इ. विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, शासनाच्या संकेतस्थळ, समाजमाध्यमांवरुन राजकीय नेत्यांचे छायाचित्...

विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हास्तरिय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

 आदर्श आचारसंहिता, कायदा-सुव्यवस्था  प्रशिक्षण व माध्यम व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी निश्चित महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी जिल्हास्तरिय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेतील विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी तसेच निवडणूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणी व कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनुष्यबळ व्यवस्थापन, संगणकीकरण व मतदान,मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार राहुल मोरे, तर प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी उपजिल्हाधिकारी अजितकुमार येळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्...

आचारसंहितेमुळे यवतमाळ येथील रोजगार मेळावा रद्द

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांच्या वतीने दि. २६ मे रोजी बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्ह रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ यांच्या दि. १८ मे २०२६ रोजीच्या पत्रान्वये जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार दि. २६ मे रोजी आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जाहीर केले आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होणारे उद्योजक, उमेदवार तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य...

जिल्ह्यात जनगणनेला प्रारंभ !

 प्रत्यक्ष घरगणना सुरु  प्रगणकांना सहकार्य करा -जिल्हा प्रशासनाचे आवाहन आगामी जनगणना २०२७ ही देशातील सर्वात व्यापक व महत्त्वपूर्ण प्रशासनिक प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना कार्यास दि. १६ मे पासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. या टप्प्यामध्ये प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचारी दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरभेटी देऊन माहिती संकलित करीत आहेत. घरगणनेदरम्यान प्रगणक घरांवर मार्कर किंवा खडूने क्रमांक चिन्हांकित करीत आहेत. जनगणनेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, बँक खाते तपशील किंवा ओटीपी मागितला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शासनाने निश्चित केलेल्या ३३ प्रश्नांचीच विचारणा करण्यात येणार आहे. जनगणना कार्य हे जनगणना अधिनियम, १९४८ अंतर्गत केले जात असून प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांना घरांमध्ये प्रवेश करून माहिती घेण्याचा तसेच घरांना क्रमांक देण्याचा अधिकार आहे. जनगणनेत नोंदविण्यात येणारी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात ये...

शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार! अनुदानित खतांसोबत विना-अनुदानित उत्पादनांच्या टॅगिंगवर बंदी

 सक्ती करणाऱ्या खत कंपन्यांवर होणार कठोर कारवाई  जिल्ह्यात शासन परिपत्रकाची कडक अंमलबजावणी सुरू  अनुदानित रासायनिक खते सोडून इतर उत्पादनांच्या पुरवठा, विक्रीस मनाई राज्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि डीलर्स असोसिएशनकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाच्या कृषि विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात काही खत उत्पादक आणि मार्केटिंग कंपन्यांकडून अनुदानित रासायनिक खतांच्या विक्रीसोबत विना-अनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैवखते आणि जैवउत्तेजके यांची सक्तीने विक्री (टॅगिंग/लिंकिंग) केली जात असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, शासनाने २० मे २०२६ रोजी विशेष परिपत्रक काढून अशा प्रकारच्या टॅगिंगवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या रसायने व खते मंत्रालयाने खतांसोबत इतर उत्पादनांचे टॅगिंग करणे बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांचे हित आणि खरीप हंगामाची तातडी लक्षात घेता, आता खत कंपन्यांना त्यांच्या परवान्यातील अनुदानित रासायनिक खते सोडून इतर कोणत्याही विना-अनुदानित खतांचा किंवा निविष्ठांचा पुरवठा व विक्...

दहावीत शासकीय निवासी शाळांचा शंभर टक्के निकाल

 विद्यार्थीनींचे घवघवीत यश  मोहिनी पाईकराव अमरावती विभागात प्रथम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत अनुसूचित जाती मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सातही निवासी शाळांचा निकाल जवळपास शंभर टक्के लागला असून शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, महागाव येथील तब्बल ११ विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्यामध्ये आरुषी अनिल जाधव व उपेक्षा गौतम खंदारे यांनी प्रत्येकी ९३.४० टक्के गुण मिळविले. तन्वी देवेंद्र भगत हिने ९२.४० टक्के, दर्शना दिलीप नरवाडे हिने ९१.४० टक्के, कांचन रामचंद्र वानखेडे हिने ९१.४० टक्के, संजीवनी गजानन वानखेडे हिने ९१.२० टक्के, अप्रजिता माधव सोंगाडे ९१ टक्के, श्रुतिका विनोद इंगोले, प्राजली गजानन जाधव व समता दलित कांबळे यांनी प्रत्येकी ९०.६० टक्के तर नियती चिंतामण ख...

वेडशी येथे दशपर्णी अर्क बनविण्याचा सोहळा उत्साहात

कृषी विभाग, उमेद आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या फार्मर कप उपक्रमांतर्गत राज्यभर दशपर्णी अर्क बनविण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून राळेगाव तालुक्यातील वेडशी येथे तेजस्वी शेतकरी गटाच्या वतीने दशपर्णी अर्क बनविण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. रासायनिक शेतीच्या वाढत्या दुष्परिणामांमुळे जमीन नापीक होत असून वायू, मृदा व जलप्रदूषणातही मोठी वाढ होत आहे. फळे, भाजीपाला, धान्य व डाळींमध्ये विषारी अंश आढळून येत असल्याने कर्करोग, हृदयरोग, शुगर, दमा, लकवा यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची या पार्श्वभूमीवर गावोगावी शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत. तेजस्वी शेतकरी गटाच्या निमंत्रक सीमा चंद्रमणी पाटील व सदस्यांनी पाणी फाउंडेशनच्या निवासी प्रशिक्षणामध्ये दशपर्णी अर्काचे महत्त्व जाणून घेतले. कमी खर्चात घरच्या घरी प्रभावी कीड नियंत्रण करता येत असल्याने तसेच रासायनिक फवारणीवरील खर्चात मोठी बचत होत असल्याने सदस्यांनी सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार केला. गटातील सदस्यांनी गोमूत्र, शेण, लसणाचा ठेचा, मिरचीचा ठेचा तसेच जनावरे न खाण...