Posts

यशोगाथा : संघर्षातून उभारला ‘अद्विक गृहउद्योग’

Image
हळद, मिरची, मसाले प्रक्रिया उद्योगातून लाखांचे उत्पन्न आर्णीतील बोरगाव येथील उद्योजिका जयश्री पुनवटकर यांची प्रेरणादायी वाटचाल यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील जयश्री जितेंद्र पुनवटकर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अत्यंत कठीण परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधला आहे. बारावी (कला) पर्यंत शिक्षण घेतलेल्या जयश्री पुनवटकर यांनी ‘अद्विक गृहउद्योग’ नावाने ‘हळद प्रक्रिया उद्योग’ उभारून केवळ स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, तर इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. जयश्री पुनवटकर यांचे कुटुंब मजूरदार वर्गातील होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कपडे शिवण्याचे काम सुरू केले होते, परंतु त्यातून महिन्याला केवळ ३ ते ४ हजार रुपये उत्पन्न मिळत होते. हा व्यवसाय स्थिर नव्हता आणि नियमित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होत होते. कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी नवीन आणि दीर्घकाळ टिकणारा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्धार केला. “स्वतःचा उद्योग सुरू करायचा” हे त्यांचे ध्येय होते. या प्रवा...

विशेष वृत्त : लेक लाडकी योजना: लेकींच्या पंखांना हक्काचे बळ!

Image
महाराष्ट्र शासनाने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी 'लेक लाडकी योजना' सुरू केली आहे. या योजनेद्वारे मुलीच्या जन्मापासून ती १८ वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. बऱ्याचदा आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे किंवा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. हीच दरी सांधण्यासाठी सरकारने पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांसाठी ही योजना आखली आहे. ही योजना राज्यातील प्रत्येक मुलीला सन्मानाने जगण्यासाठी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक भक्कम आधार ठरत आहे. योजनेचे टप्पे या योजनेची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ही रक्कम एकाच वेळी न देता, मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यामध्ये दिली जाते. त्यानुसार मुलीचा जन्म झाल्यावर कुटुंबावर आर्थिक भार पडू नये, म्हणून पहिल्या टप्प्यात ५ हजार रुपये दिले जातात. दुसऱ्या टप्प्यात मुलगी जेव्हा पहिलीत प्रवेश घेते, तेव्हा शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ६ हजार रुपये दिले जातात. तिसऱ्या टप्प्यात मुलगी सहावीत पोहोचल्यावर तिला ७ हजार रुपयांची मदत मिळते. चौथ्या टप्प्यात अकरावीत प्रवेश घ...

विशेष वृत्त : यवतमाळ जिल्ह्यात १८ हजार महिला ‘लखपती दीदी’

Image
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), यवतमाळ मार्फत जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी व्यापक कार्य सुरू असून शासनाच्या ‘लखपती दीदी’ योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत, अशी माहिती यवतमाळच्या माविम कार्यालयाकडून देण्यात आली आहे. माविममार्फत १० तालुक्यांतील ४२१ गावांमध्ये स्वयं सहाय्य बचत गटांद्वारे विविध योजनांची अंमलबजावणी होत असून ‘नवतेजस्विनी’ प्रकल्पांतर्गत ६८७६ बचत गटांमधून ७६,९६४ महिला संघटित झाल्या आहेत. बँकांकडून दरवर्षी सुमारे १२० कोटींचे कर्ज उपलब्ध होत असून परतफेड दर ९९% आहे. कृषी सेवा केंद्र, शेळीपालन, दालमिल, हळद प्रक्रिया, गारमेंट्स आदी विविध व्यवसायांतून ४२,४६१ महिला उद्योजक बनल्या आहेत. १६ ‘ड्रोनसखी’ प्रशिक्षण घेत असून शेतफवारणीसाठी ड्रोन सेवा सुरू आहे. विविध निधीतून ई-रिक्षा, ड्रोन, कृषी अवजारे आदींसाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. 'लखपती दीदी' योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आहे. या योजनेद्वारे महिलांचे वार्षिक उत्पन्न किमान १ ...

माविम : महिला सक्षमीकरणाची शाश्वत चळवळ

Image
लेख : यवतमाळ जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी चळवळ उभी राहताना दिसत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांनी महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला जात आहे. आर्थिक स्वावलंबन, संघटनशक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे महिलांनी विकासाच्या नव्या उंची गाठण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ४२१ गावांमध्ये स्वयं सहाय्य महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध विकासात्मक उपक्रम राबवले जात असून ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण विकास महिला उद्यम विकास प्रकल्प’ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून तब्बल ६,८७६ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांमध्ये ७६,९६४ महिला एकत्र येऊन संघटित शक्ती निर्माण करत आहेत. या माध्यमातून महिलांमध्ये बचतीची सवय, आर्थिक नियोजन आणि निर्णयक्षमता विकसित होत आहे. १८ हजार महिला ‘लखपती दीदी’ महिलांच्या आर्थिक प्रगतीत बँकिंग क्षेत्राचीही महत्...

आला उन्हाळा तब्येत सांभाळा !

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. मार्च महिन्यापासूनच राज्यातील अनेक भागात तापमान वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरीकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सुभाष ढोले यांनी केले आहे. सर्व साधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान तीन डिग्री सेल्सिअसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे म्हटले जाते. सलग दोन दिवस तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. एप्रिल, मे व जुन या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव अधिक असतो. तसेच त्यामुळे मृत्युही होण्याची शक्यता असते. अशा वेळी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृध्दलोक व लहान मुले, गरोदर महिला, स्थुललोक, पुरेशी झोप न झालेली लोक, मधुमेह, हृदयविकार, दारुचे व्यसन असणारे लोक, घट्ट कपडे घातलेले लोक, निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक, कारखान्यात बॉयलर जवळ काम करणारे लोक अशा प्रत्यक्ष उष्णतेशी संबंध येणाऱ्यांना उष्माघात होतो. वरील अत...

महिला लोकशाही दिन 20 एप्रिल रोजी

महिलांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दि.20 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह तक्रार सादर करावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

यंत्रणांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश येत्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही बालविवाह होऊ नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे. तसेच बालविवाह करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहे. कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे किमान वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह करणे हे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत बेकायदेशीर आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी सतर्क राहून विवाहापूर्वी वधू-वरांचे वय तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविवाह हा दखलपात्र गुन्हा असून, यात केवळ पालकच नव्हे तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक तसेच बिछायत केंद्र चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना २ वर्ष...