Posts

जलतरण तलाव व विकासकामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी वेळेत काम पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई करू जिल्हाधिकारी विकास मीना यांचा इशारा

Image
यवतमाळ, दि.31 (जिमाका) : जिल्हा क्रीडा संकुल समितीअंतर्गत आझाद मैदान येथे सुरू असलेल्या जलतरण तलाव व संबंधित विकास कामांची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली. कामे विहित वेळेत पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुसकवार, क्रीडा अधिकारी महेश पडोळे, शमहेश पडोळे, सचिन हरणे, मनीष डोळसकर, संकुलातील कर्मचारी तसेच जलतरण तलाव व कॅपिटेरिया बांधकामाचे कंत्राटदार उपस्थित होते. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कॅपिटेरिया बांधकामाच्या संथ गतीबाबत नाराजी व्यक्त केली. निर्धारित वेळेत काम पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले. तसेच कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवत आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सदर विकास कामांची सविस्तर माहिती जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुसकवार व क्रीडा अधिकारी महेश पडो...

जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती व कुष्ठरोग निवारण अभियान सुरक्षित महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा -जिल्हाधिकारी विकास मीना

Image
यवतमाळ, दि.30 (जिमाका) : कुष्ठरोग निवारण दिनानिमीत्त जिल्ह्यात आजपासून ते १२ फेबुवारीपर्यंत " स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत विविध कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम विविध उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे कुष्ठरोगाबाबत समाजात असलेला भेदभाव गैरसमज समाप्त करण्यासाठी आणि कुष्ठरोगाने नविन रुग्ण शोधणे व त्यांना वेळेत पुर्ण औषधोपचार मिळण्याकरीता सदर अभियानातुन वंचित घटकांची कुष्ठरोगाबाबत तपासणी व कुष्ठरोगाची जनजागृती प्रभाविपणे करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आरोग्य विभागाला दिले. सदर अभियानाबाबत दि. २९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात " स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुष्ठरोग सुरक्षित नहाराष्ट्र (कुसुम) मोहिमेबाबत जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अध्यक्षतेत घेण्यात आली सदर सभेकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. मंदार पत्की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष केले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुखदेव राठोड, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. गोपाळ पाटी...

बौद्ध समाजातील संस्थांसाठी अनुदान योजना: अर्ज आमंत्रित

यवतमाळ दि.29 (जिमाका) : जिल्ह्यातील बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना उपलब्ध आहे. 10 लाखांपर्यंत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असणे आवश्यक व नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे. संस्थेच्या विश्वस्त,सदस्यामध्ये 51 टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त,सदस्य आवश्यक आहे, संबंधित संस्थांना केवळ 5 वेळाच अनुदान अनुज्ञेय राहील. त्यानुसार इच्छुक संस्थांना योजनेचा लाभ घेण्यासाठी नमुद केलेल्या इतर अटी व शर्तीस अनुसरुन विहित नमुन्यातील परिपुर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावे. असे जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी कळविले आहे. 000

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर कायदेविषयक शिबीराचे आयोजन

यवतमाळ दि.30 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष शेखर सी. मुनघाटे यांचे मार्गदर्शनाखाली दि. २३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता बालिका दिन निमित्य "बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२" याविषयावर कायदेविषयक शिबीराचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व स्कुल ऑफ स्कॉलर्स, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुल ऑफ स्कॉलर्सच्या प्राचार्य रिना काळे तर प्रमुख उपस्थिती उप-प्राचार्य जागृती गंडेजा ह्या होत्या. प्रमुख वक्ते म्हणुन सहाय्यक लोकअभिरक्षक तृप्ती आसावा, आणि जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार यावेळी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जिल्हा ग्रामिण समस्या मुक्ती ट्रस्टच्या जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार यांनी बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थीत मुलींना त्यांच्या अधिकारा विषयी समजावून सांगितले. अन्यायावर आवाज उठवण्याकरीता कोणाची मदत घ्यावी आणि प्रत्येक मुल कसे सुरक्षित राहील या बाबतीत व...

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन

उपस्थित मान्यवर, तसेच बंधु भगिनींनो, भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आपल्या भारत देशाला असंख्य शूरवीरांच्या त्यागातून स्वातंत्र्य मिळाले. जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशासाठी घटनाकारांच्या दुरदृष्टीतून राज्यघटना निर्माण झाली आणि ती दि.26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. या संविधानामुळे देश एक सुदृढ गणराज्य बनला आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वात भारत देश प्रगतीच्या प्रत्येक क्षेत्रात झेप घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गतिमान विकासाची कास धरून महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकावरचे स्थान अधिक दृढ केले आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात सर्वात आघाडीवर आहे. आता स्वित्झर्लंड देशातील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 37 लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यातून महाराष्ट्रात 43 लक्ष इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. त्यामु...

हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी” ’बोले सो निहाल सत श्री अकाल' च्या जयघोषात लाखो भाविकांनी घेतले दर्शन

Image
नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले. आज दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माच्या भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी भाविकांसाठी लोकसहभागातून चहा, अल्पोपहार, ज्यूस, विविध स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाच...

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

Image
नांदेड, दि. २५ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी प्रत्यक्ष लंगर वाढून भाविकांची सेवा केली. जिल्हाधिकारी यांनी रांगेत बसलेल्या भाविकांना लंगर सेवा केल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. सेवा, समता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या लंगर परंपरेचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले. जिल्हाधिकारी यांनी लंगर सेवेत सहभागी होत शीख परंपरेतील सेवाभाव, मानवता व समतेच्या मूल्यांना अभिवादन केले.ही लंगर सेवा २४ तास भाविकांच्या सेवेसाठी खुली आहे. शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड येथे देश-विदेशातून भाविक उपस्थित असून, संपूर्ण परिसर भक्तिमय व सेवाभावी वातावरणाने भारावून गेला आहे. या कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचा जागर करण्यात येत आहे.