‘अमृत-सक्षम’ उपक्रमातून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजक होण्याची संधी
अमृत संस्थेचा विशेष उद्योजकता विकास उपक्रम सुरु यवतमाळ, दि. 17 : महाराष्ट्रात आता कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेचे काम राहिलेले नाही, तर ते वेगाने वाढणारे 'हरित उद्योग' क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण आणि पर्यावरण नियमांमुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, 'अमृत' आणि 'कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने "अमृत-सक्षम" हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे. रोजच्या कचऱ्यातून नियमित उत्पन्न आणि शाश्वत व्यवसाय उभा राहू शकतो, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती आणि धूप बनवणे. प्लास्टिक, कागद आणि काच रिसायकलिंग करणे. 'रिसोर्स रिकव्हरी सेंटर' सुरू करणे. योग्य तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या क्षेत्रात स्वतःचा यशस्वी ब्रँड निर्माण करता येणे शक्य आहे. 'अमृत-सक्षम' नेमके काय आहे? हे केवळ एक पुस्तकी प्रशिक्षण नाही, तर 'संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंतच...