Posts

१३ ते २७ जुलैदरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन

    सुरक्षा जवान, सुरक्षा सुपरवायझर, इलेक्ट्रीशियनसह  ४५० पदांसाठी भरती     यवतमाळ, दि.   10   (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर तसेच केरॉन्स सिक्युरिटी हेल्थ अॅन्ड कंपोझिट सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते २७ जुलै   या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष भरती अभियानांतर्गत केरॅास सिक्युरिटी हेल्थ अॅन्ड कंपोझिट सर्विसेस कंपनीमार्फत   ४५० तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून सुरक्षा जवान, सुरक्षा सुपरवायझर, इलेक्ट्रीशियन आणि हाऊसकीपिंग इं पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी ५ वी, १० वी, १२ वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवार पात्र राहतील.   तालुकानिहाय रोजगार मेळावे होणार    पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन हे तालुकानिहाय करण्यात आले आहे. त्यानुसार १३ जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय, बाभुळगाव, १४ जुलै रोजी पंचायत समिती...

दहावी, बारावी पास भटक्या विमुक्त मुलामुलींसाठी पुण्यात मोफत नर्सिंग कोर्स

 यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : पुणे येथील टिळक विद्यापीठामार्फत भटक्या विमुक्त मुलामुलींसाठी नर्सिंग कोर्स सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १७ वर्ष पूर्ण असलेल्या इच्छुक भटक्या विमुक्त मुलामुलींनी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे. भटक्या विमुक्त मुलामुलींसाठी पुणे येथील टिळक विद्यापीठ गेल्या दोन वर्षांपासून नर्सिंग कोर्स यशस्वीपणे राबवित आहे. निराधार, गरजू आणि पुढील शिक्षण घेण्याची तयारी नसलेल्यांसाठी या विद्यापीठ मान्य प्रमाणपत्र कोर्सद्वारे चांगली नोकरी मिळवून देत आहेत. सध्या देश-विदेशात नर्सिंगची प्रचंड मागणी असून एका वर्षात १०० टक्के नोकरी मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.   या नर्सिंग कोरिससाठी अर्जासोबत आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, १० वी किंवा १२ वीची गुणपत्रिका आदी कागदपत्रे जोडावीत. वय १७ वर्षे पूर्ण असलेल्या व नर्सिंग कोर्ससाठी पात्र व इच्छूक असलेल्या विद्यार्थिनींनी कार्यालयीन वेळेत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ यांच...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

   यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : भारत सरकारद्वारे ५ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना त्यांच्या शौर्याकरिता देण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. त्यासाठी https://www.awards.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावे लागणार आहे.    पुरस्काराबाबतच्या पात्रता व अटी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पुरस्कारासाठी प्राप्त ऑनलाईन अर्जाच्या आधारे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली मार्फत चाळणी करून पात्र बालकांची निवड करण्यात येणार आहे व त्या बालकास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देशाचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.   जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र बालकांनी शौर्य पुरस्काराकरिता ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मारोती पवार यांनी केले आहे.

पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळाव्याचे १३ जुलैला आयोजन

  आयटीआय झालेल्या उमेदवारांना संधी   यवतमाळ, दि. 9   (जिमाका) :   पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा जुलै २०२६ अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दि. १३ जुलै    रोजी सकाळी १० वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   या मेळाव्यात रेमंड डेनिम यूको प्रा. लि., यवतमाळ, सारा स्पिनटेक, यवतमाळ तसेच एल. जी. बालकृष्णन जालान, एमआयडीसी, जालना या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.   आयटीआयच्या विविध व्यवसायांमधून प्रशिक्षण घेत असलेल्या तसेच उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी या मेळाव्यात शिकाऊ उमेदवारीच्या विविध जागा उपलब्ध आहेत. याशिवाय अप्रेंटिसशिपचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही संबंधित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.    जिल्ह्यातील सर्व पात्र आयटीआय उमेदवारांनी या शिकाऊ उमेदवारीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्राचार्य के. जे. नागोरे तसेच सहाय्यक शिक्षण सल्लागार आर. पी. कोडापे यांनी केले आहे.

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

     विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी विविध कर्ज योजना सुरु     यवतमाळ, दि.   9   (जिमाका) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत तसेच विशेष मागास प्रवर्ग विकास महामंडळाच्या विविध आर्थिक विकास योजनांचा लाभ घेण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आधार ताजणे यांनी केले आहे.     या योजनांमध्ये राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत.   महामंडळामार्फत वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, २५ टक्के बीजभांडवल कर्ज योजना आणि १ लाख रुपयांची थेट कर्ज योजना संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. ...

माय भारत नोंदणी मोहिमेत युवकांचा सहभाग वाढवा

Image
अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे जिल्हा युवा सल्लागार समिती सभा संपन्न जिल्ह्यात माय भारत नोंदणी मोहीम सुरु ; युवकांनो सहभागी व्हा यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : केंद्र सरकारची माय भारत नोंदणी मोहिमेत जिल्ह्यातील युवकांचा सहभाग वाढवा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी यंत्रणांना दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा सल्लागार समिती सभा गुरुवारी पार पडली. या सभेला जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे, कार्यक्रम अधिकारी अनिल शेंडे, विविध विभागाचे अधिकारी व विद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य उपस्थित होते.   या सभेत माय भारत वार्षिक कृती आराखड्याचे सादरीकरण व अंमलबजावणी विषयी चर्चा करण्यात आली. दि. 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान राबविण्यात येणाऱ्या माय भारत नोंदणी मोहिमेचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणीची माहिती अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी घेतली. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, भारत स्काऊट गाईड, युवा मंडळ यांच्या माध्यमातून 15 वर्ष वरील वयोगटातील युवकांची माय भारत पोर्टलवर नोंदणी वाढविण्याच...

मेरा युवा भारततर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त स्पर्धा

Image
              यवतमाळ, दि. 7 (जिमाका) : मेरा युवा भारत,युवा कार्यालय यवतमाळ यांच्या वतीने डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त ६ जुलै रोजी येथील केमिस्ट भवनातील वानखडे अॅकॅडमीमध्ये वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.             जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाचे नियोजन वानखडे अॅकॅडमीचे संचालक जगदीश वानखडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे उपस्थित होते. त्यांनी युवकांना मार्गदर्शन करून विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.             स्पर्धेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अनेक युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध विषयांवर प्रभावी मते मांडली. विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.             यावेळी उपस्थित युवकांना 'माय भारत' पोर्टलवर नोंदणीचे महत्त्व सांगण्यात आले. पोर्टलव...