Posts

नागरिकांना औषध पुरवठ्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

• औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने बुधवार दि. २० मे रोजी देशव्यापी एक दिवसीय औषध विक्री बंदची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडित व सुरळीत उपलब्ध राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासन सतर्क असून हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून नागरीकांनी संपर्क करण्याचे आवाहन सहायक आयुक्त गजानन घिरके यांनी केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना अखंडित औषध पुरवठा राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाने केमिस्ट संघटनांसोबत समन्वय साधला आहे. सह आयुक्त यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी संपर्क साधण्यात आला असून अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच औषधांचा अनावश्यक साठा करू नये. औषध उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमां...

अनुसूचित जातीच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्के अनुदान

 पात्र बचत गटांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानुसार सन 2026-27 या वर्षामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटाकरिता 90 टक्के शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हातील पात्र अनुसूचित जातीच्या बचत गटांनी आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यवतमाळ येथे दिनांक 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे

-तहसिलदार डॉ. योगेश देशमुख यांचे आवाहन > सत्यापन अ‍ॅपवर मिळतो प्रमाणपत्र यवतमाळ शहरातील सर्व संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, नगर परिषद क्षेत्र, यवतमाळ अंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना स्वतः (मोबाईल उपलब्ध असल्यास) अथवा इतर कोणत्याही नातेवाईकांमार्फत तसेच सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रामार्फत बेनीफीसीअरी सत्यापन अ‍ॅप’द्वारे हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन तहसिलदार डॉ. योगेश देशमुख व नायब तहसिलदार राजेश चिंचोरे यांनी केले आहे. लाभार्थ्यांनी स्वतः करावयाची कार्यपद्धती सर्वप्रथम लाभार्थ्यांनी वापरकर्त्यांनी मोबाईलद्वारे गुगल प्ले स्टोअर आयओएस वरून ‘बीएसए (बेनीफीसीअरी सत्यापन अ‍ॅप)’ तसेच ‘आधार फेस आरडी’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर बेनीफीसीअरी सत्यापन अ‍ॅप मध्ये लाभार्थ्यांनी किंवा वापरकर्त्यांनी भाषा निवडून “प्रोसीड फॉर डिव्हाईस रजिस्ट्रेशन” येथे क्लिक करून आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. लाभार्थ्यांनी वापरकर्त्यांनी नोंदणी पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांचा आधार क्...

भारतीय सशस्त्र सैन्यदलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदावर प्रशिक्षणकरीता युवक-युवतींसाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सी डी एस) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे दिनांक १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सी डी एस कोर्स क्रमांक ६७ आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये निवास, भोजन व प्रशिक्षणाची संपूर्ण मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. युवक-युवतींना सैन्यदलातील अधिकारी पदासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे दिनांक ०५ जून २०२६ रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीपूर्वी उमेदवारांनी mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन डीएसडब्ल्यू पोर्टलवरील ‘पीसीटीसी नाशिक सीडीएस-६७ संदर्भातील माहिती विभाग’विभागातून प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे क...

यवतमाळ विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

 १८ जूनला मतदान तर २२ जूनला मतमोजणी  मतदारसंघात आचारसंहिता लागू राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकरी मतदारसंघांतील विधानपरिषद सदस्यांच्या रिक्त जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामध्ये यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचाही समावेश असून १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या १८ मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार १६ रिक्त जागांसाठी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवडणूक कार्यक्रम झाला आहे. या निवडणुकीसाठी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने २६ डिसेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी केले आहे. बॉक्स असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम: निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख : २५ मे २०२६ (सोमवार) नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख : १ जून २०२६ (सोमवार) नामनिर्देशन पत्रांची छानन...

खरीप हंगामात 'एल-निनो'च्या संकटावर मात करण्यासाठी अष्टसुत्री !

 शेतकऱ्यांनी ‘अष्टसुत्रीचा’ अवलंब करावा  जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन यावर्षी 'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, खरीप हंगाम सुरक्षित करण्यासाठी कृषी विभागाने काही 'लक्ष केंद्रित बाबी' निश्चित केल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामत 'एल-निनो'च्या संकटावर मात करण्यासाठी अष्टसुत्रीचा अवलंब करून आपले उत्पन्न सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले. त्यानुसार पेरणीचे प्रगत तंत्रज्ञान, बीबीएफ तंत्राचा वापर, पाणी व मृदा संधारण, मृदा आर्द्रता, पीक व बियाणे नियोजन, फळबागा संरक्षण, खते व सिंचन व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन ही अष्टसूत्री निश्चित करण्यात आली आहे. या अष्टसुत्रीनुसार जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी उताराला आडवी पेरणी करावी. प्रत्येक गावात किमान ३० टक्के शेतकऱ्यांनी 'रुंद वरंबा सरी' (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करावी. शेततळे तयार करुन पावसाचे पाणी साठवण्यावर भर द्यावा. मल्चिंग, सेंद्रिय खत आणि मूलस्थानी जलसंधारणाचा वापर करून जमिनीचा ओलावा टिकवा. बदलत्या वातावरणात तग धरतील अशा 'हवामान अनुकू...

२२ मेपर्यंत उष्णतेची लाट : नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी !

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना जारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने यवतमाळ जिल्ह्यात २२ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक, कामगार तसेच विविध शासकीय विभागांनी आवश्यक ती खबरदारी घेवून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी, ओआरएस, लिंबूपाणी व फळांचे सेवन करावे. हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत तसेच डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करावा. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. बंद वाहनात मुले किंवा प्राणी ठेवू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे. बांधकाम, शेती, रस्ते कामे व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी थेट उन्हात सलग काम टाळावे. सकाळी लवकर किंवा सायंकाळी कामाचे नियोजन करावे...