Posts

एमसीईडीतर्फे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोफत कौशल्याधारित उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन

Image
यवतमाळ, दि.3 (जिमाका) : जिल्हा उद्योग केंद्र, यांच्याद्वारे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यवतमाळ यांच्या वतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवकयुवती व पुरुषांकरिता एक महिन्याच्या कालावधीचे विविध कौशल्यांवर आधारित मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये विविध तांत्रिक ज्ञान प्रात्यक्षिकांसह दिले जाणार असून उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, उद्योग-व्यवसायाच्या संधी, उद्योग उभारणीची प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगांसाठी आवश्यक नोंदणी व परवाने तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पात्रता काय ? या प्रशिक्षणासाठी अर्जदार यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक असून त्याचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. कागदपत्रे कोणती लागतात ? प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), शैक्षणिक गुणपत्रिका, जातीचा दाखला, पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट आ...

एनपीएस संचय आउटरीच कार्यक्रम उत्साहात

Image
आर्थिक साक्षरता आणि सेवानिवृत्ती नियोजनाबाबत मार्गदर्शन पीएफआरडीए व जिल्हा अग्रणी बँक कक्षामार्फत आयोजन यवतमाळ, दि.३(जिमाका) : आर्थिक सुरक्षा आणि सक्षम सेवानिवृत्ती नियोजनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण आणि जिल्हा अग्रणी बँक कक्ष, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलै रोजी राधा मंगलम हॉटेल येथे 'एनपीएस संचय आउटरीच कार्यक्रम' उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक सुनील पांडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे अतुल इंगळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीएफआरडीएचे सचिन राठी आणि रघुवीर सिंह चरण उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी एनपीएस संचय योजनेचे महत्त्व, नियमित गुंतवणुकीद्वारे आर्थिक सुरक्षितता आणि सेवानिवृत्ती सन्मानपूर्वक जीवनासाठी या योजनेची उपयुक्तता याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रशांत येकुडे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक माधव पाल...

३४ हजारांहून अधिक एकल महिलांचा बचत गटात समावेश ; उमेद अभियानाच्या विशेष मोहिमेला मोठे यश

Image
यवतमाळ, दि.3 (जिमाका) : जिल्हा परिषदच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद अंतर्गत जिल्ह्यातील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील ३४ हजारांहून अधिक एकल महिलांचा स्वयं-सहाय्यता बचत गटांमध्ये समावेश करण्यात आला असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्गही खुला झाला आहे. आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ ते २५ जूनदरम्यान जिल्हाभरात उपजीविका वृद्धी, वैयक्तिक विकास आणि सामाजिक सक्षमीकरण या विषयांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या संकल्पनेतून आणि प्रकल्प संचालक आनंद पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे यशस्वीपणे पार पडली. या शिबिरांमध्ये उमेद अभियानातील तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, ग्रामसखी तसेच मोठ्या संख्येने एकल महिलांनी सहभाग घेतला. शिबिरांमध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच उद्योग-व्यवसायात यशस्वी झालेल्या एकल महिलांनी आपले अनुभव मांडले...

वरुड जहागीर येथील तलाव मासेमारी ठेक्यासाठी जाहीर लिलाव; १५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि.3 (जिमाका) : राळेगाव तालुक्यातील वरुड जहागीर येथील सरासरी ११३ हेक्टर जलक्षेत्राचा लघु पाटबंधारे तलाव सन २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीसाठी जाहीर लिलावाद्वारे मासेमारीसाठी ठेक्याने देण्याची कार्यवाही नव्याने सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत, पात्र व मत्स्यव्यवसाय संस्थांकडून तलाव ठेका मागणी प्रस्ताव मागविण्यात आले आहे. सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीसाठी अवधूत महाराज मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. झरगड ता. राळेगाव यांना ठेक्याने देण्यात आला होता. मात्र संबंधित संस्थेचा मासेमारी ठेका मुदतपूर्व रद्द करण्यात आला असून संस्थेला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात संस्थेने पुनर्विचार अर्ज दाखल केला असून प्रकरणाची सुनावणी सुरू असून अंतिम आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने ३ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार वरुड जहागीर तलावासाठी नव्याने जाहीर लिलावाची प्रक्रिया नव्याने करण्यात येत आहे. ही कार्यवाही न्यायालयीन प्रकरणातील अंतिम आदेशाच्या अधीन राहून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नोंदण...

यवतमाळमध्ये ७ जुलै रोजी ‘मोगरा फुलला’ संगीतमय कार्यक्रम

Image
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मवर्षानिमित्त सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन यवतमाळ, दि.3 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ॲड. आशीष शेलार यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत ‘मोगरा फुलला’ या संत साहित्यावर आधारित संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे करण्यात आले आहे. सामाजिक स्वास्थ्य, नैतिक मूल्ये आणि मानवतेची जपणूक करण्यासाठी संत साहित्याची आजही तितकीच आवश्यकता आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांसह महाराष्ट्रातील संतांनी आपल्या अभंग, ओव्या आणि विचारांमधून समाजाला समता, बंधुता, करुणा आणि अध्यात्माचा संदेश दिला. हा अमूल्य विचारवारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि नव्या पिढीला संतांच्या जीवनकार्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने राज्यभर ‘मोगरा फुलला’ कार्यक्रम सादर केला जात आहे. या कार्यक्रम...

विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

Image
१२५ दिवस रोजगाराची हमी यवतमाळ, दि.2 (जिमाका) : केंद्र सरकारने “विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण अधिनियम (व्हीबी जीरामजी), २०२५” हा कायदा देशातील सर्व ग्रामीण भागात दि. १ जुलैपासून लागू करण्यात आला आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ गुरुवारी २ जुलै रोजी ग्रामपंचायत कापरा, पंचायत समिती यवतमाळ येथे करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, जिल्हा परिषद कृषी अधिकारी जयसिंग सोळंके, कार्यक्रम व्यवस्थापक अमोल शंभरकर, तसेच ग्रामपंचायत कापरा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सचिव, गावकरी व कर्मचारी उपस्थित होते. योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करताना ग्रामपंचायत कापरा येथे गुरांचा गोठा, जलतारा व सार्वजनिक वृक्ष लागवड या कामांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांना योजनेतील पारदर्शकता, ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षात १२५ दिवसांच्या अकुशल मजुरी रोजगाराची वैधानिक हमी, ३१८ कामांचा समावेश तसेच नवीन मजुरी दर रुपये ३१७ याबाबत म...

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी जिल्ह्याला ३६.५० कोटींचा निधी

यवतमाळ, दि.२ (जिमाका) : राज्य शासनाने मागच्या डिसेंबर महिन्यापासून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत विधानसभा क्षेत्रनिहाय प्रशासकीय मान्यता देण्यासाठी निधीची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ३६ कोटी ५० लाख रुपयांची निधी मर्यादा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड तसेच मंत्री डॉ. अशोक उईके आणि राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतरस्ते व पाणंद रस्त्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. २३ जून आणि २९ जूनच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय निधी वाटपानुसार राळेगाव, आर्णी आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघांना प्रत्येकी ७ कोटी ५० लाख रुपये, पुसद मतदारसंघाला ५ कोटी रुपये, दिग्रस मतदारसंघाला ४ कोटी रुपये, तर वणी आणि यवतमाळ विधानसभा मतदारसंघांना प्रत्येकी २ कोटी ५० लाख रुपये अशा एकूण ३६ कोटी ५० लाख रुपये निधीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बळी...