Posts

'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान' ;

जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींना प्रत्येकी एक कोटींचा निधी  उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी मानले आभार यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या अभियानांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान व नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. या अभियानाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील ‘अ’ वर्गातील यवतमाळ, ‘ब’ दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, ‘क’ वर्गातील घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर, पांढरकवडा या नगरपरिषदा व राळेगांव, कळंब, महागांव, मारेगांव, बाभुळगांव, झरी जामणी आणि ढाणकी या नगरपंचायत क्षेत्रातील मराठी शाळांची दर्जोन्नती, आरोग्य सुविधा, पर...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत विदर्भातील पहिले ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित शेतकरी व वीज ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठ्याची सोय

Image
यवतमाळ, दि. २४ मार्च २०२६ :राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत पुसद तालुक्यातील जाम बाजार येथे विदर्भातील पहिले ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज पुरवठ्याची सोय झाली आहे. यावेळी अधीक्षक अभियंता दीपाली माडेलवार, कार्यकारी अभियंता जनार्धन चव्हाण, शशांक पोंक्षे , उपकार्यकारी अभियंता सुहास मेश्राम,प्रविण गवळी यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांची दिवसा विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत असून, महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्राभोवती विकेंद्रीत स्वरूपात सौर प्रकल्प उभारून वीज निर्मिती केली जात आहे. तसेच काही भागात नवीन ३३ केव्ही उपकेंद्रांची उभारणीही करण्यात येत आहे. मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक अभियंते प्रविण दरोली, दिपक देवहाते व दीपाली माडेलवार यांच्या पुढाकाराने परिमंडळात या योजनेला गती देण्यात आली आहे. परिमंडळातील सुमारे २ लाख ८० हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांना या योजनेद्वार...

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

 यंदाही जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची बाजी ; एकूण 80 विद्यार्थ्यांची निवड यवतमाळ, दि.24 (जिमाका) : घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वीच्या प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत जिल्ह्यातील एकूण 80 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यापैकी यंदाही जिल्हा परिषद शाळेच्या 47 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई तर्फे 13 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. या प्रवेश परीक्षेचा निकाल 17 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असून 2025-26 आणि 2026-27 या शैक्षणिक वर्षांच्या तुलनात्मक निकालानुसार, जिल्हा परिषद शाळांमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 38 वरून 47 वर पोहोचली आहे. तर खाजगी शाळांमधील निवड 38 वरून 24 पर्यंत घटली असून, इतर शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 4 वरून 9 इतकी वाढली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा निकाल तब्बल 93.75 टक्के लागला असून, शहरी भागातील विद्यार्थ्यांचा निकाल केवळ 6.25 टक्के आहे...

मेरा युवा भारत तर्फे शहीद दिवस पदयात्रा व स्वच्छता अभियान संपन्न

Image
यवतमाळ, दि.24 (जिमाका) : ‘मेरा युवा भारत’ युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिवसानिमित्त पदयात्रा व श्रमदान स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 23 मार्च रोजी सकाळी नेहरू स्टेडियम, गोधणी रोड येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. ही पदयात्रा नेहरू स्टेडियम ते अँग्लो हिंदी हायस्कूल, जाजू चौक मार्गे हुतात्मा चौकापर्यंत नेण्यात आली. हुतात्मा चौकात देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना अभिवादन करण्यात आले. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या प्रसंगी अभ्यंकर कन्या शाळेचे उपप्राचार्य अविनाश जोशी यांनी उपस्थित युवकांना शहीद जवानांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर पदयात्रा पुन्हा जाजू चौक मार्गे नेहरू स्टेडियम येथे परतली. या पदयात्रेत ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, अनिल ढेंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सचिन हरणे, क्रीडा अधिकारी हेमंत कटयारमल, प्रा. संजय पंदीरवाल, अविनाश जोशी, यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशनच्या अध्यक्षा मनीषाताई आकरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक-यु...

शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनासाठी विशेष ‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम

 एप्रिलमध्ये आयोजन  पोकरा प्रकल्प व पाणी फाउंडेशनचा उपक्रम यवतमाळ, दि.24 (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात ‘विशेष डिजिटल शेतीशाळा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान’ अभियानाचा मुख्य टप्पा असून, बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये सुधारणा करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीकनिहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन मिळावे हा या 'डिजिटल शेतीशाळा'चा मुख्य हेतू आहे. या उपक्रमात कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, माविम, उमेद आणि आत्मा यांसारख्या विविध संस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे. डिजिटल शेतीशाळा वेळापत्रक आणि विषयानुसार हे प्रशिक्षण यूट्यूब च्या माध्यमांतून पाणी फाउंडेशनच्या https://youtube.com/@paanifoundation?si = oczLOIG|PLw- Ivic किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पच्या https://youtube.com/@pocramaharashtra?si=jAj68X_JYT79zE4 अधिकृत चॅनलवर सायंकाळी ७:३० वाजता थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. त्यामध्ये १ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तं...

दिव्यांगाना आता ₹2500 मासिक अर्थसहाय्य

दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी प्रमाणपत्र सादर करावे तहसिलदार डॉ. योगेश देशमुख यांचे आवाहन यवतमाळ, दि.23 (जिमाका) : तहसिल कार्यालय यवतमाळ अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्यात राज्य शासनाने १ हजार रुपयांची वाढ केली असून फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना आता प्रत्येक महिन्याला एकूण 2500 रुपये मासिक अर्थसहाय्य अथवा अनुदान डिबीटीद्वारे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात नियमित वितरीत केले जात आहे. या योजनांचा लाभ नियमित व सुरळीत सुरु ठेवण्यासाठी वैश्विक दिव्यांग (युडीआयडी) प्रमाणपत्र किंवा वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (युडीआयडी कार्ड ) आधार सोबत लिंक करून वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्राची व आधार कार्डची छायांकित प्रत मोबाईल नंबरसह या कार्यालयात सादर करावी. तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे ऑफलाईन पद्धतीचे दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांनी येत्या आठ दिवसात वैश्विक (युडीआयडी ) दिव्यांग प्रमाणपत्र काढून घ्यावे व ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्याप वैश्विक दिव्या...

आयटीआयमध्ये अल्पमुदतीचे कौशल्य प्रशिक्षण

दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू यवतमाळ, दि.23 (जिमाका) : आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांनी नियमित शिक्षणासोबत तांत्रिक प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकसित करणे अत्यावश्यक आहे. यासाठी शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) अल्पमुदतीचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा मार्च अखेर पूर्ण होत असून, दुसऱ्या टप्यातील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली आहे. यामध्ये तांत्रिक कौशल्यासोबतच व्यक्तिमत्व विकास तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगार तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना इंडस्ट्री मधील रोजगाराच्या संधी तसेच शासकीय कर्ज योजनांचे मार्गदर्शनही केले जाणार आहे. यासाठी प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. https://msbsvet.edu.in/Registration/CandidateRegistration.aspx?P191 या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये ...