Posts

‘चला खेळू या’ उपक्रमांतर्गत 15 दिवसीय क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या “चला खेळू या” या नाविन्यपूर्ण क्रीडा उपक्रमांतर्गत निवड झालेल्या खेळाडूंसाठी 15 दिवसीय प्रशिक्षण शिबिरास 16 मार्चपासून प्रारंभ करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर 16 ते 30 मार्च 2026 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, नेहरू स्टेडियम, गोधनी रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून निवड झालेल्या 17 वर्षे वयोगटातील मुले व मुली सहभागी झाले आहेत. या शिबिरामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, वेट लिफ्टिंग, मैदानी खेळ व बुद्धीबळ या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण अनुभवी प्रशिक्षकांकडून देण्यात येणार आहे. विविध क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ञांकडून 15 दिवस नियमित कार्यशाळा होणार आहे. तसेच आर्चरी या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण तालुका क्रीडा संकुल, दिग्रस येथे आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामीण व शालेय स्तरावरील खेळाडूंमध्ये असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना वाव देणे, त्यांच्या कौशल्याचा विकास...

वणी येथे आदिवासी मुलांच्या वसतीगृहासाठी इमारतीची आवश्यकता

यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह वणी येथील विद्यार्थ्यांच्या निवासासाठी 50 खोल्यांची स्वतंत्र इमारत भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. नवीन इमारतीसाठी अपेक्षित सुविधा असाव्यात. त्यामध्ये 250 विद्यार्थ्यांना पुरेल इतक्या 50 खोल्यांचे 10X10 बांधकाम असावे, एक कार्यालय असावे, स्वयंपाक गृह, भोजन कक्ष, कोटीगृह, 25 स्नानगृहे, 25 शौचालय, विद्युत व्यवस्था, पाण्याची मुबलक व्यवस्था, इमारत सुस्थितीत असणे आवश्यक आहे. भाडे व कर सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरविल्याप्रमाणे राहील. इच्छुकांनी 23 मार्च 2026 पर्यंत कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन वणीचे शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

2 लाख 90 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी वितरित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 व्या हप्त्याचे वितरण यवतमाळ, दि.17 (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22 वा हप्ता यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 3 लाख 7 हजार 175 नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी पात्र 2 लाख 90 हजार 926 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 13 मार्च रोजी वितरित करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात विविध कारणांमुळे किंवा अनवधानाने पोर्टलवर अपात्र करण्यात आलेल्या 56 हजार 357 लाभार्थ्यांपैकी 7 हजार 691 लाभार्थ्यांना पुन्हा पात्र करण्यात आले आहे. तसेच स्वयंनोंदणीकृत 8 हजार 482 लाभार्थ्यांना राज्य स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक असून ई-केवायसी पूर्ण न केल्यास 23 व्या हप्त्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या सेवा सरकार केंद्र किंवा सेतु केंद्रावर जाऊन अथवा सहाय्यक कृषी अधिकारी यांचे मार्फत ई-केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांचे आधार सिडींग झालेले नाही, त्यांनी आपल्...

जागतिक ग्राहक हक्क दिन’ उत्साहात साजरा

निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे १६ मार्च रोजी “जागतिक ग्राहक हक्क दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. यु. मराठे, सदस्या जिल्हा ग्राहक आयोग वनमोरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदीया, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अनंत भिसे तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापक अक्षय जयस्वाल उपस्थित होते. पुरवठा निरीक्षक सीमा दोंदल यांनी प्रस्ताविक केले. संजय जोशी यांनी ग्राहकगीत सादर केले. उपस्थित मान्यवरांनी ग्राहक हक्कांविषयी मार्गदर्शन करत जनजागृती केली. पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी प्रणय ईतकर यांनी सायबर गुन्ह्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच आरोग्य विभागातील डॉ. विशाल टावरी यांनी आयुष्यमान भारत कार्डाबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्वाती सोनूले आणि विद्या जाधव यांना प्रथम क्रमां...

कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार

कृषी पुरस्कारासाठी २० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांचे आवाहन जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, युवा शेतकरी तसेच शेतकरी गट व संस्थांना कृषी विभागामार्फत पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी शेतकऱ्यांनी २० मार्चपर्यंत ॲानलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, युवा शेतकरी तसेच शेतकरी गट व संस्थांचा गौरव करण्यासाठी कृषि विभागामार्फत विविध राज्यस्तरीय, विभागस्तर व जिल्हास्तरावर विविध कृषी पुरस्कार दिले जातात. सन 2025-26 या वर्षासाठी कृषी क्षेत्रात उत्पादन वाढ, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेती, महिला सहभाग, शेतीमधील नवकल्पना इत्यादी बाबीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा या पुरस्काराद्वारे सन्मान करण्यात येतो. या पुरस्कारांसाठी पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. कृषी पुरस्कार व बक्षीस : डॉ पंजाब...

हर घर बचत, हर घर आरडी खाते

टपाल विभागाची विशेष जनजागृती मोहीम यवतमाळ, दि. १6 (जिमाका) : भारतीय टपाल विभागातर्फे विविध बचत योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘हर घर बचत, हर घर आरडी खाते’ हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ही मोहीम १६ ते १८ मार्च या कालावधीत संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येणार आहे. भारतीय टपाल विभागामार्फत नागरिकांसाठी सेव्हिंग बँक खाते, आवर्ती ठेव (आरडी) खाते, सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), जेष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र तसेच जीवन विमा योजना अशा विविध बचत योजना उपलब्ध करून देण्यात येतात. आकर्षक व्याजदर, पूर्ण सुरक्षितता आणि गाव-खेड्यांपर्यंत उपलब्ध सेवा यामुळे नागरिकांचा टपाल विभागावर मोठा विश्वास असल्याचे दिसून येते. या विशेष मोहिमेअंतर्गत डाक विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना आवर्ती ठेव (आरडी) खात्याबाबत माहिती देणार आहेत. तसेच खाते उघडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्यही केले जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ४६ हजार ३५० खातेदारांनी आवर्ती ठेव योजनेचा लाभ घेतला आहे. ही योजना पाच वर्षांची असून दरमह...

पारधी विकास योजनेंतर्गत वैद्यकीय, इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी अर्थसहाय्य

१७ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्यामार्फत पारधी समाजातील वैद्यकीय, इंजिनीअरींग व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी १७ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पारधी विकास योजनेतंर्गत विविध योजनेसाठी पारधी जमातीच्या लाभार्थ्यांकडून दि. 10 जून 2025 रोजी 5 व पुनश्च 31 ऑगस्ट 2025 रोजी 5 वाजेपर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले होते. परंतु लक्षांकाचे अपरोक्ष पर्याप्त अर्ज प्राप्त न झाल्याने पारधी समाजातील वैद्यकीय, इंजिनीअरींग व इतर व्यावसाईक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी अर्थसहाय्य करणे ही योजना राबविण्यात येत असून लाभार्थी संख्या 5 आहे. या योजनेचे अर्ज पुनश्च प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. अर्ज प्रस्ताव स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 17 मार्च 2026 रोजी 5 वाजेपर्यंत असून, या योजनाचे अर्ज प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा या ठिकाणी स्विकारले जातील. ...