Posts

'हिंद दी चादर' समूहगानाचा नवी मुंबईत जागतिक विक्रम! 🌏✨

Image
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शाहदत समागमानिमित्त कोकण विभागातील ५१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी प्रेरणादायी गीत गाऊन 'बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. #khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! 🚩

Image
या मंगलप्रसंगी ह.भ.प. संजय महाराज पाचपोर (वारकरी संप्रदाय) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भक्ती आणि शक्तीच्या या अद्भूत संगमात आपण सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. #khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! 🙏✨

Image
नवी मुंबईतील खाघर येथे आयोजित या भव्य आध्यात्मिक सोहळ्याला नक्की उपस्थित रहा. भाई साहिब जसकीरत सिंग जी यांच्या प्रमुख उपस्थितीत नामस्मरण आणि कीर्तनाचा लाभ घ्या. #khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे करणार राष्ट्रीय आरोग्य मेळावा - २०२६ चे उद्घाटन

यवतमाळ दि. 24 : भारत सरकारचे आयुष मं त्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे चार दिवसांचा "राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026" आयोजित करण्यात आला आहे. औषधी वनस्पती लागवड आणि कृषी वनीकरणाद्वारे आयुष औषध प्रणालींबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे , सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करणे आणि शेतकऱ्यांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करणे हे या मेळाव्याचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय आरोग्य मेळावा- 2026 चे उद्घाटन शुक्रवार 25 फेब्रुवारी 2026 रोजी मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभ संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर होणार आहे. उद्घाटन समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार व केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि इतर अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या संपूर्ण मेळाव्यात नागरिकांना आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार...

धामणगाव देव भक्तिमय ! “माऊलींच्या जयघोषात”श्री मुंगसाजी महाराजांना अभिवादन Ø पालकमंत्री ना. संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती

Image
यवतमाळ, दि.24 (जिमाका) : श्री मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी श्री मुंगसाजी महाराज संस्थान, धामणगाव देव या तीर्थक्षेत्रास भेट देऊन श्री मुंगसाजी माऊलींच्या स्मृतीस अभिवादन केले. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी भगवान श्री मुंगसाजी माऊली यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात विधीवत आरती करून त्यांनी माऊलींचे आशीर्वाद घेतले. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. “माऊलींच्या विचारांत समाजाला एकत्र ठेवण्याची आणि संस्कार जपण्याची ताकद आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर आयोजित पालखी सोहळ्यातही ना. राठोड सहभागी झाले. पारंपरिक वेशात सजविण्यात आलेल्या पालखीचा मान स्वीकारत त्यांनी भक्तांसह काही अंतर पायी चालत सहभाग नोंदविला. ढोल-ताशांच्या गजरात आणि “माऊलींच्या जयघोषात”वातावरण भक्तिमय झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्र्यांनी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत सूचना जाणून घेतल्या व शासनस्तरावर आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ...

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता; जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

यवतमाळ, दि. २४ : नागपूरच्या मौसम विज्ञान विभागाने २४ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात दि. २४ व २५ फेब्रुवारी दरम्यान काही भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विज पडुन होणारी जिवित हानी व वादळी वा-यामुळे घरांची भिंत, टिनपत्रे पडुन होणारी जिवितहानी व वित्त हानी टाळण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून "काय करावे, काय करू नये" याबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. त्यानुसार नैसर्गिक वीज पडून मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. अद्ययावत हवामान माहितीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे ‘सचेत’ अॅप तसेच ‘दामिनी’ अॅप डाउनलोड करून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वारा/ विजा चमकत असल्यास घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा, घराच्या दरवाजे खिडक्या, कुंपणापासून दूर राहा. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच रहावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवा-याच...

उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळणार Ø इतर मागास बहुजन कल्याण विभागाने मागवले प्रस्ताव Ø 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे मुदतवाढ

यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यामध्ये नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारांचा समावेश असून, इच्छुकांनी 27 फेब्रुवारी पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे. इच्छुकानी आपले प्रस्ताव 27 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ यांच्या कार्यालयात सादर करावेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे. 0000000