Posts

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

   यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : भारत सरकारद्वारे ५ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना त्यांच्या शौर्याकरिता देण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. त्यासाठी https://www.awards.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावे लागणार आहे.    पुरस्काराबाबतच्या पात्रता व अटी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पुरस्कारासाठी प्राप्त ऑनलाईन अर्जाच्या आधारे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली मार्फत चाळणी करून पात्र बालकांची निवड करण्यात येणार आहे व त्या बालकास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देशाचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.   जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र बालकांनी शौर्य पुरस्काराकरिता ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मारोती पवार यांनी केले आहे.

पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळाव्याचे १३ जुलैला आयोजन

  आयटीआय झालेल्या उमेदवारांना संधी   यवतमाळ, दि. 9   (जिमाका) :   पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा जुलै २०२६ अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दि. १३ जुलै    रोजी सकाळी १० वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   या मेळाव्यात रेमंड डेनिम यूको प्रा. लि., यवतमाळ, सारा स्पिनटेक, यवतमाळ तसेच एल. जी. बालकृष्णन जालान, एमआयडीसी, जालना या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.   आयटीआयच्या विविध व्यवसायांमधून प्रशिक्षण घेत असलेल्या तसेच उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी या मेळाव्यात शिकाऊ उमेदवारीच्या विविध जागा उपलब्ध आहेत. याशिवाय अप्रेंटिसशिपचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही संबंधित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.    जिल्ह्यातील सर्व पात्र आयटीआय उमेदवारांनी या शिकाऊ उमेदवारीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्राचार्य के. जे. नागोरे तसेच सहाय्यक शिक्षण सल्लागार आर. पी. कोडापे यांनी केले आहे.

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

     विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी विविध कर्ज योजना सुरु     यवतमाळ, दि.   9   (जिमाका) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत तसेच विशेष मागास प्रवर्ग विकास महामंडळाच्या विविध आर्थिक विकास योजनांचा लाभ घेण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आधार ताजणे यांनी केले आहे.     या योजनांमध्ये राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत.   महामंडळामार्फत वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, २५ टक्के बीजभांडवल कर्ज योजना आणि १ लाख रुपयांची थेट कर्ज योजना संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. ...

माय भारत नोंदणी मोहिमेत युवकांचा सहभाग वाढवा

Image
अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे जिल्हा युवा सल्लागार समिती सभा संपन्न जिल्ह्यात माय भारत नोंदणी मोहीम सुरु ; युवकांनो सहभागी व्हा यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : केंद्र सरकारची माय भारत नोंदणी मोहिमेत जिल्ह्यातील युवकांचा सहभाग वाढवा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी यंत्रणांना दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा सल्लागार समिती सभा गुरुवारी पार पडली. या सभेला जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे, कार्यक्रम अधिकारी अनिल शेंडे, विविध विभागाचे अधिकारी व विद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य उपस्थित होते.   या सभेत माय भारत वार्षिक कृती आराखड्याचे सादरीकरण व अंमलबजावणी विषयी चर्चा करण्यात आली. दि. 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान राबविण्यात येणाऱ्या माय भारत नोंदणी मोहिमेचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणीची माहिती अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी घेतली. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, भारत स्काऊट गाईड, युवा मंडळ यांच्या माध्यमातून 15 वर्ष वरील वयोगटातील युवकांची माय भारत पोर्टलवर नोंदणी वाढविण्याच...

मेरा युवा भारततर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त स्पर्धा

Image
              यवतमाळ, दि. 7 (जिमाका) : मेरा युवा भारत,युवा कार्यालय यवतमाळ यांच्या वतीने डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त ६ जुलै रोजी येथील केमिस्ट भवनातील वानखडे अॅकॅडमीमध्ये वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.             जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाचे नियोजन वानखडे अॅकॅडमीचे संचालक जगदीश वानखडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे उपस्थित होते. त्यांनी युवकांना मार्गदर्शन करून विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.             स्पर्धेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अनेक युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध विषयांवर प्रभावी मते मांडली. विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.             यावेळी उपस्थित युवकांना 'माय भारत' पोर्टलवर नोंदणीचे महत्त्व सांगण्यात आले. पोर्टलव...

पीक विम्यासाठी ‘इफ्को टोकियो’ जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड

              यवतमाळ, दि.7 (जिमाका) : चालु हंगामासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना पीएमएफबीवाय लागू करण्यात आली असून, या वर्षासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांची अधिकृत विमा कंपनी म्हणून निवड करण्यात आली आहे.              नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच कीड-रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.    विमा कुठे भरायचा ?             जिल्ह्यासाठी केवळ इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडेच पीक विम्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शेतकरी आपल्या जवळील सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर), महा-ई-सेवा केंद्र, बँक तसेच प्रधानमंत्री पीक विमा योज...

जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू

     शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 7   (जिमाका) : राज्यात सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या शासन निर्णयामुळे अधिसूचित महसूल मंडळात, अधिसूचित पिकाचे चालू वर्षीचे सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई लागू होणार आहे. भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तुर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा या 14 पिकांसाठी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागेल.कापूस व कांदा या व्यापारी पिकांसाठी हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के राहील. विमा योजनेत भाग घेण्यासाठी दिनांक 31 जुलै पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टलवर ऑनलाईन सहभाग नोंदवता येणार आहे. नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल (एनसीआयपी) यात भाग घेण्यासाठी बँक, कॉमन सर्विस सेंटर किंवा स्वतः शेतकरी ऑनलाइन अर्ज भरून भाग घेऊ शकतात. योजनेत भाग घेण्यासाठी शे...