Posts

भरडधान्यासाठी खरेदीसाठी नऊ केंद्र सुरु

३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत यवतमाळ, दि. 7 :(जिमाका) रब्बी पणन हंगामांतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा,पाटण, पुसद, आर्णी,उमरखेड, घाटंजी व राळेगांव, या नऊ तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुका खरेदी विक्री समिती पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, उमरखेड तालुक्यात खरेदी विक्री समिती उमरखेड,घाटंजी तालुक्यातील खरेदी विक्री समिती घाटंजी,कळंब तालुक्यात खरेदी विक्री समिती कळंब,राळेगांव तालुक्यात खरेदी विक्री समिती राळेगांव या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ज्वारी, बाजरी, मका व रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी भरडधान्य खरेदीकरिता शेतकरी करीता ऑनलाईन नोंदणीची मुदत 30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आलेली असुन प्रत्यक्षात भरडधान्य खरेदी 30 जुन पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी शे...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

Image
यवतमाळ, दि. 7 (जिमाका) : श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात क्षयरोग (टी.बी.), स्तनाचा कर्करोग, कर्करोग, एड्स, उच्च रक्तदाब (बी.पी.), मधुमेह (शुगर) यांसारख्या आजारांवर चर्चा होऊन शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्यविषयक पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, नुक्कड नाटक आदी उपक्रमांचे उत्स्फूर्त आयोजन करण्यात आले. यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम “आरोग्यासाठी एकत्र या, विज्ञानाच्या बाजूने उभे राहा” अशी आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ताण-तणाव, चुकीच्या आहार पद्धती, जंक फूड व प्रक्रिया केलेल्या अन्नाचे वाढते सेवन, तसेच व्यायामाचा अभाव यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके यांनी सांगितले. संतुलित आहार, नियमित व्यायाम, वैयक्तिक व परिसर स्वच्छता आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या निमित्ताने नागरिकांनी दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करावा, पौष्टिक...

नाफेडचे सहा चना खरेदी केंद्र सुरु

यवतमाळ, दि. 7 :(जिमाका) : खरीप पणन हंगामांतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी नाफेडमार्फत जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, दिग्रस, पाटण, पुसद व आर्णी या सहा ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागांव, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पांढरकवडा, खरेदी विक्री संघ मर्या दिग्रस, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या.पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद व शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चना खरेदी ही 15 एप्रिलपर्यंत करण्यात येणार असून चना खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, 7/12 उतारा, पिकपेरा व बॅकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत ही आवश्यक कागदपत्रे संबंधित खरेदी केंद्रावर स्वत: हजर राहून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी प्र. विजय गाढवे यांनी केले आहे.

शासकीय संगणक टंकलेखन परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती लाभ

 ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन यवतमाळ, दि.7 (जिमाका) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (जीसीसी-टीबीसी) लघुलेखन परीक्षा दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात. जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १० मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृत संस्थेच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा (प्रतिपूर्ती) देण्यात येणार आहे. या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी घटकांचा समावेश आहे. हा लाभ मिळविण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahaamrut.org.in/ ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२६ आहे. ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे : गत आर्थिक वर्ष (सन २०२५...

जिल्ह्यात लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षणास बुधवारपासून प्रारंभ

शासनाच्या ‘अमृत’ संस्थेचा अभियान यवतमाळ, दि.7 (जिमाका) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या लक्षित गटातील कुटुंबांची माहिती संकलित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि त्या आधारे अधिक परिणामकारक योजना तयार करण्याच्या उद्देशाने “लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण” अभियान हाती घेण्यात आले आहे. हे सर्वेक्षण अभियान जिल्ह्यात दि. ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे जास्तीत जास्त पात्र कुटुंबांपर्यंत अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती पोहोचविणे तसेच त्यांच्या अभिप्रायाच्या आधारे भविष्यातील योजनांची आखणी करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, सर्वेक्षणाच्या माध्यमातून भविष्यातील योजना अधिक परिणामकारक व लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), यवतमाळ यांनी दिली आहे.

'गावस्तरावरील कृषी अवजारे बँक' स्थापनेसाठी २५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

यवतमाळ,दि. ६ (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) 'गावस्तरावरील कृषी अवजारे बँक' स्थापन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आता पात्र महिला बचत गट आणि महिला गाव संघ यांना २५ एप्रिल २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ एप्रिल २०२६ पर्यंत होती. मात्र, प्रकल्प गावांतील 'उमेद' आणि 'माविम' पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघांचा सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्ज कोणाला करता येईल? प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील नोंदणीकृत महिला बचत गट आणि महिला गाव संघ या योजनेसाठी पात्र आहेत. निवड प्रक्रिया: एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, लाभार्थी गटाची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाईल. जिल्हास्तरीय मेळावे: १५ एप्रिल २०२६ पर्यंत जिल्हास्तरावर विशेष मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यांमध्ये बँक प्रतिनिधींच्या उपस्थितीत कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. या योजनेचा जास्तीत जास्त महिला शेतकरी गटांना लाभ...

शेतकऱ्यांनी 'अॅग्रीस्टॅक' अंतर्गत 'शेतकरी ओळखपत्र' काढावे

 जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन  आतापर्यंत 4 लाख 39 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण यवतमाळ, दि. 2 (जिमाका) : शासनाच्या ‘अॅग्रीस्टॅक या महत्त्वपूर्ण डिजिटल प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची ‘शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र ’१२ अंकी शेतकरी ओळख क्रमांक दिला जात असून, भविष्यातील सर्व कृषी योजनांसाठी हा आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अॅग्रीस्टॅक म्हणजे काय? ‘अॅग्रीस्टॅक’ हा केंद्र शासनाचा एक डिजिटल उपक्रम असून, शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती (जमीन, पिके, लाभधारक माहिती इ.) एकत्रित करून एक एकात्मिक डेटाबेस तयार केला जात आहे. यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक जलद, अचूक व पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. या ‘शेतकरी ओळखपत्र मुळे शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. तसेच पीएम किसान सन्मान निधी योजना, पीक विमा, कृषी कर्ज तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल. थेट लाभ हस्तांतरण डी बी टी प्रक्रिया अधिक पारदर्शक व परिणामकारक होणार आहे. यावर्षीपासू...