Posts

शेतकरी उत्पादक कंपनी, अशासकीय संस्था व स्वयं-सहाय्यता गटांसाठी ‘संवाद सेतू कार्यशाळा’

Image
जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, अशासकीय संस्था व स्वयं-सहाय्यता गट यांच्यासाठी “संवाद सेतू कार्यशाळा” जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना सभागृह येथे बुधवारी उत्साहात संपन्न झाली. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे २७० सभासदांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा मनोजकुमार ढगे, प्रकल्प उपसंचालक व्यंकट कुंतावर यांनी केले होते. कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट विविध विभागांमधील समन्वय वाढवून शेतकरी गटांना शासकीय योजनांची माहिती व लाभ अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे हे होते. कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण मनोजकुमार ढगे यांनी केले. कृषी संलग्न विविध विभागांतील विभाग प्रमुखांनी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम, कृषी पर्यटन, महाउर्जा, नाबार्ड, जिल्हा अग्रणी बँक, कृषी विज्ञान केंद्र तसेच शेतमाल खरेदी करणारी कंपनी रुपीया फिनोव्हेशन प्रा. लि. यांचा समावेश होता. संबंधित तज्ज्ञांनी विविध योजनांची माहिती, वित्तीय सहा...

जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा सुविधा निर्मितीचा आढाव

Image
जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न जिल्हयात क्रीडा सुविधा निर्मितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा सभा बुधवारी संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी क्रीडा सुविधा निर्मितीचा आढावा घेतला. यात आझाद मैदान येथील जलतरण तलाव दुरुस्ती, फिल्टर प्लांट, सिंथेटिक हॅंन्डबॅाल मैदान, दुकान बांधकाम, ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान इ. कामांबाबत आढावा घेवून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दर्जेदार कामे झाली पाहिजेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा क्रीडा संकुल भेट देवून प्रस्तावित कामांच्या जागेची पाहणी करुन आवश्यक सुधारणात्मक सूचना दिल्या.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळणार

 पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाकडे ३० एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज सादर करा  प्रकल्प अधिकारी रेवैय्या डोंगरे यांचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, कळंब, बाभूळगाव व यवतमाळ या तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शहरातील नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३० एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी रेवैय्या डोंगरे यांनी केले आहे. या योजनेसाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न कमाल १ लाखांपर्यंत असावे. विद्यार्थ्याचे वय ६ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अंगणवाडी/ग्रामसेवक प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. दारिद्र्यरेषेखालील, विधवा, घटस्फोटीत, निराधार किंवा परि...

रेस्टॉरंट व हॉटेल्समध्ये चीज अॅनालॉग वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी लेबलिंग व माहिती स्पष्ट करण्याचे आदेश अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ हा जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, नागरिकांना सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पनीर हा आहारातील महत्त्वाचा घटक असून, तो प्रथिने, कॅल्शियम व जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. मात्र पनीर आणि चीज अॅनालॉग यामध्ये मोठा फरक असून, अॅनालॉग पदार्थ दूधाव्यतिरिक्त तेल, स्टार्च व इतर घटकांपासून तयार केला जातो. तो पनीरसारखा दिसत असला तरी तो प्रत्यक्षात पनीर नसतो, असे अन्न सुरक्षा मानकांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की काही रेस्टॉरंट, हॉटेल, केटरर्स व फास्ट फूड विक्रेते चीज अॅनालॉगचा वापर करून अन्नपदार्थ तयार करत असून, ग्राहकांना याबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काही ठिकाणी तर “पनीर” किंवा “चीज” या नावानेच अॅनालॉग पदार्थ विकले जात असल्याचे आढळून आले आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार अन्न व्यवसायिकांनी ग्राहकांना घटकपदार्थांची योग्य माहिती देणे बंधनकार...

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल ; लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी मोबाईल ॲप सुरु

 लाभार्थ्यांना थेट आता मोबाईलवर सेवा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी ‘अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप’ सुरू केले आहे. हा ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून, लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवर करता येणार आहे. महामंडळाच्या कार्यान्वित योजनांसाठी संकेतस्थळ कार्यान्वित असून, महामंडळाची संपूर्ण कार्यपध्दती ऑनलाईन स्वरुपात राबविण्यात येत आहे. योजनांच्या प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करावा लागत असल्याने किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास असल्यामुळे लाभार्थ्यांना वेळ, खर्च आणि अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून महामंडळाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्रांशी करार करुन योजनांच्या सेवा प्रति सेवा रु ८५ दराने उपलब्ध करुन दिल्या. लाभार्थ्यांना अधिक स्वयंपूर्ण, सुरक्षित आणि सुलभ सेवा करुन देण्यासाठी महामडळामार्फत वापरकर्ता अनुकुल मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील महामंळ ॲप या नावाने गुगल प्ले स्...

यवतमाळात विशेष नझुल शिबिराचे आयोजन

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त नझुल प्रकरणांचा जलद निपटारा महसूल विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या अंतर्गत यवतमाळ शहरात २२ मे २०२६ रोजी विशेष नझुल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात नझुल जमिनीशी संबंधित प्रकरणांचा जलद व सुलभ निपटारा करण्यात येणार आहे. या शिबिरात नझुल जमिनीवरील शर्तभंग प्रकरणे नियमानुकूल करणे, हस्तांतरणास परवानगी देणे, भाडेपट्टा नूतनीकरण, फ्री होल्ड मंजुरी तसेच प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार आहे. यासोबतच सिंधी समाज बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष अभय योजनेअंतर्गत सिंधी वसाहतीतील जागा फ्री होल्ड करण्याच्या प्रकरणांचाही निपटारा केला जाणार आहे. नझुल पट्टाधारकांनी त्यांच्या ताब्यातील नझुल पट्ट्यांचे नूतनीकरण व शर्तभंग प्रकरणे तात्काळ नियमानुकूल करून घ्यावीत तसेच थकीत भुईभाडे शासनाकडे जमा करावे. अन्यथा संबंधित पट्टे रद्द होऊन जागा शासनजमा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या शिबिरासाठी २७ एप्रिल ते २...

जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेची राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या नूतनीकरणात उल्लेखनीय कामगिरी

Image
 राष्ट्रीय मान्यता २० घटकांपर्यंत करणारी राज्यात पहिली प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अंतर्गत जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेने राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या नूतनीकरण प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. दि. १८ व १९ एप्रिल रोजी प्रयोगशाळेत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार दोन दिवसीय तपासणी यशस्वीरित्या पार पडली. या तपासणीसाठी प्रमुख परीक्षक रजनीकांत शर्मा तसेच तांत्रिक परीक्षक ज्योती पाठक आणि रीतेश कमाल सिंह यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन कामकाजाची सखोल पाहणी केली. यावेळी गुणवत्ता मार्गदर्शिका, मानक कार्यपद्धती, उपकरणांचे अंशांकन नोंदी, नमुना हाताळणी प्रक्रिया तसेच चाचणी पद्धतींची सविस्तर तपासणी करण्यात आली. नमुना तयारी आणि चाचणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. तपासणीदरम्यान गुणवत्ता व्यवस्था, उपकरणांची अचूकता, नोंदींची शिस्तबद्धता तसेच कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता यांचा बारकाईने आढावा घेण्यात आला. या वेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन तट्टे, गुणवत्ता व्यवस्थापक अतुल सुरसे, तांत्रिक व्यवस्थापक स्नेहा खडसे, तसेच रसायनी विशेष राठोड, हर्षदा राऊत आणि इतर कर्मचारी उपस्...