Posts

तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ; यवतमाळ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे सुविधा केंद्र सुरू

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ मधील तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून, विद्यार्थ्यांना २० मे ते २२ जून या दरम्यान ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने या प्रवेश प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक, शैक्षणिक अर्हता आणि प्रवेश अर्ज शुल्क इत्यादी बाबींची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेत दहावीनंतर पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल, तसेच बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी वेगळा अर्ज सादर करावा लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना योग्य ती मदत व्हावी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये जाऊन विद्यार्थी प्रत्यक्ष अर्ज भरू शकतात, तसेच त्यांच्या विविध समस्यांचे आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी या केंद्रामधून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज भरण्...

पद्म पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव आमंत्रित

 नामांकनासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल  ३१ जुलैपर्यंत मुदत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार मानले जाणारे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पद्म पुरस्कारांसाठी केंद्र शासनामार्फत नामांकन प्रस्ताव अथवा शिफारस मागविण्यात आले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२७ रोजी हे पुरस्कार जाहीर होणार आहेत. या संदर्भातील अधिनियम व नियम केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या www.padmaawards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २७ मार्च २०२६ च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनांचे अवलोकन करुन नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र व शिफारस करण्यायोग्य व्यक्तींचे प्रस्ताव किंवा शिफारस दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अंतिम मुदतीनंतर कोणतेही नामांकन अथवा शिफारस स्वीकारली जाणार नाही, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिका...

शासकीय रक्तकेंद्रात रक्ताचा तुटवडा; नागरिकांनी स्वैच्छिक रक्तदानासाठी पुढे यावे

उन्हाळी सुट्ट्यांमुळे शाळा व महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान शिबिरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी शासकीय रक्तकेंद्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत शासकीय रक्तपेढीमार्फत जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी रक्तदात्यांना दररोज रक्तकेंद्रात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान ही एक मौल्यवान जीवनरक्षक देणगी आहे. आणि सदर देणगी ही सुरक्षित आणि शाश्वत रक्तपुरवठा आणि युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज तयार करण्यासाठी मुख्य स्रोत आहे. सिकलसेल अनिमिया आणि थैलेसेमिया यांसारख्या परिस्थितीसाठी आणि नियमित रक्तपुरवठा आवश्यक असलेल्या अनेक रुग्णांसह सर्व गरजू रुग्णांसाठी ऐच्छिक-सुरक्षित रक्तपुरवठा करणे आवश्यक आहे. हिमोफिलिया आणि रोगप्रतिकारक कमतरता यांसारख्या दीर्घकालीन परिस्थिती असलेल्या रूग्णांना मदत करण्यासाठी स्वैच्छिक रक्तदान मोहीम देखील महत्त्वाची भूमिका बजावते. रक्तसंक्रमणावर अवलंबून असलेल्या ...

ज्वारी, बाजरी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ

रब्बी हंगाम 2025-26 मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत महागांव, पांढरकवडा, पाटण, पुसद, आर्णी, उमरखेड, घाटंजी, कळंब व राळेगांव या नऊ ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. या खरेदी केंद्रामध्ये तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागांव, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. पाटण,किसान मार्केट यार्ड शेलु(बु). पुसद, शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, (केंद्र दत्तरामपुर), तालुका खरेदी विक्री संघ मर्या. उमरखेड, तालुका खरेदी विकी संघ मर्या. घाटंजी, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. कळंब व तालुका खरेदी विक्री संघ मर्या. राळेगांव या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दिनांक 1 एप्रिल ते 15 मे 2026 पर्यंत करण्यात येणार होती. सद्यस्थितीत नोंदणी विचारात घेवुन शासनाने ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसा...

यवतमाळ येथे २ जून रोजी डाक अदालत

 टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर तक्रारींचे निवारण होणार यवतमाळ विभागाच्या अधीक्षक डाकघर कार्यालयाच्या वतीने दि. २ जून रोजी सकाळी ११ वाजता अधीक्षक डाकघर कार्यालय, पहिला माळा, यवतमाळ येथे यडाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. पोस्टाच्या कार्यपद्धती किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निवारण झालेले नाही अथवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल, बचत बँक तसेच मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारी करताना संबंधितांनी संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. त्यामध्ये तक्रारीची तारीख, मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यास पाठविण्यात आली त्यांचे नाव व पदनाम आदी माहितीचा समावेश असावा.संबंधितांनी आपल्या तक्रारीच्या दोन प्रती अधीक्षक डाकघर, यवतमाळ ४४५००१ यांच्या नावे दि. १ जून २०२६ पर्यंत किंवा तत्पूर्वी पोहोचतील अशा रीतीने पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे. देशामधील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर...

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

 दावे व हरकतींसाठी २९ मेपर्यंत मुदत  ४ जूनला अंतिम मतदार यादी यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदार संघाच्या विधानपरिषद निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केला असून, त्यानुसार दि. १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदार संघाची निवडणूक घोषित केल्यानंतर प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी सर्व नगर परिषद व नगर पंचायत सदस्यांची यादी संबंधित कार्यालयांकडून प्राप्त करून घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रारूप मतदार याद्या ह्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय, नगर पंचायत कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालय येथे दि. २३ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या मतदार याद्यांवर दि. २९ मे २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींवर दि. ३१ मे २०२६ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी दि. ४ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिक...

पाणीटंचाई निवारण : आर्णी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी अरुणावतीचे पाणी!

 जिल्हाधिकाऱ्यांचे पाणी सोडण्याचे आदेश  नागरिकांना दिलासा आर्णी तालुक्यातील अरुणावती नदीकाठावरील तीन ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ ग्रामस्थ व जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याची उपलब्धतेसाठी अरुणावती प्रकल्पातून एक दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. गटविकास अधिकारी, पंचायत समिती आर्णी यांनी सन २०२५-२६ मधील उन्हाळी टंचाई कालावधीसाठी आरक्षित दोन दलघमी पाणीसाठ्यातून एक दलघमी पाणी सोडण्याची विनंती केली होती. या मागणीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शिफारस केली होती. सद्यस्थितीत अरुणावती प्रकल्पाच्या धरणात ७१.०९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी एक दशलक्ष घनमीटर पाणी अरुणावती नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. हे पाणी संबंधित गावांतील नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच, पाणी पट्टी देयकाची रक्कम भरण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यावर राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पातून पिण्याच्या पाणीकरिता विसर्ग होणार...