Posts

जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांचे शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन यवतमाळ दि. 16 (जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2026-27 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांचे उत्पादकता कमी होत असल्याचे दिसून येत असून, त्यामागे योग्य मशागत पद्धती, नांग्या न भरणे, खत व कीडनाशकांचा अपुरा वापर, तसेच झाडांची व्यवस्थित आकार न देणे (दाट व गर्द छत्राकृती रचना) ही प्रमुख कारणे असल्याचे कृषि विभागाने नमूद केले आहे. नवीन लागवडीबरोबरच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे हे जिल्ह्याच्या एकूण फळ उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक मानले जात आहे. याच उद्देशाने हा पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविण्यात येत असून, यात आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पेरू, आवळा आणि लिंबू या प्रमुख फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रति हेक्टर रु. 60 हजार इतका प्रकल्प खर्च ग्राह्य धरला जाईल. त्यावर 40 टक्के प्रमाणे, म्हणजेच जास्तीत जास्त रु. 24 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे. ...

जवाहर नवोदय विद्यालय बेलोराचा १० वीचा निकाल १०० टक्के

पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथील शैक्षणिक सत्र २०२५-२६ चा सीबीएसई १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. दिनांक १५ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या या निकालात विद्यालयातील एकूण ७६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून, त्यापैकी ७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ६५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. विद्यालयातून सात्विक गजानन गुंडेवार याने ९७.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. राज मंगेश गादेवार याने ९७.३३ टक्के गुणांसह द्वितीय, तर शिवम मनोहर काळे याने ९६.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक विषयातही उत्तम कामगिरी केली आहे. एकूण ७६ पैकी ५४ विद्यार्थ्यांनी मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विक्रम प्रस्थापित केला. तसेच कौशल विकास अंतर्गत 'फिजिकल ॲक्टिव्हिटी ट्रेनर' या विषयात ३७ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य कमलाकर दे. घोपटे, उपप्राचार्य सुनील उराडे तसेच सर्व शि...

उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या काळात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी “काय करावे” आणि “काय करू नये” याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काय करावे : जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी तीव्र उन्हात, विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शक्यतो हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत तसेच बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे आणि शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे. शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत उष्ण वातावरणात कष्टाची कामे करू नयेत. चक्कर येणे किंवा आजारी वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी यांसारख्या घरगुती शीतपेय...

अक्षय तृतीयेला बालविवाह कराल तर होणार कडक कारवाई

Image
जिल्हा बाल संरक्षण कक्ष व्दारे आवाहन येत्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाकडून कडक पावले उचलली आहेत. बालविवाह लावल्यास थेट कारावासाची कारवाई करण्यात येणार आहे, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. १९ एप्रिल रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मारोती पवार यांनी केले आहे. कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे किमान वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह करणे हे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत बेकायदेशीर आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी सतर्क राहून विवाहापूर्वी वधू-वरांचे वय तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविवाह हा दखलपात्र गुन्हा असून, यात केवळ पालकच नव्हे तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्...

यवतमाळ वनवृत्तातील ३२ वनरक्षकांना वनपाल पदोन्नती

यवतमाळ दि. १६ (जिमाका): यवतमाळ वनवृत्तातील विविध विभागांतील एकूण ३२ वनरक्षकांना वनपाल पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदोन्नती समिती बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यवतमाळ, पांढरकवडा, पुसद, वाशिम हे प्रादेशिक वनविभाग तसेच सामाजिक वनिकरण यवतमाळ व वाशिम आणि वन्यजीव पांढरकवडा हे विभाग मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यवतमाळ यांच्या अखत्यारीत येतात. सप्टेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीतील पदोन्नती प्रक्रियेसाठी १३ एप्रिल रोजी बैठक पार पडली. या बैठकीस मानकर मुख्य वनसंरक्षक अध्यक्ष डॉ. किशोर एस, उपवनसंरक्षक, सामाजिक वनिकरण अमरावती सुमित कुमार, उपवनसंरक्षक वाशिम अभिजित वायकोस, विभागीय वनाधिकारी पांढरकवडा उत्तम फड तसेच प्रशासकीय अधिकारी, सदस्य सचिव प्रविण जाट उपस्थित होते. पदोन्नतीसाठी एकूण ४८ वनरक्षकांसह इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदी, शैक्षणिक पात्रता, विभागीय परीक्षा, गोपनीय अहवाल, प्रलंबित चौकशी व इतर बाबींची सखोल छाननी करण्यात आली. त्याअनुषंगाने सध्या रिक्त असलेल्या २१ वनपाल पदांवर वनरक्षकां...

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

Image
 पाणी टंचाई निवारनार्थ उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा  नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये यवतमाळ दि. 16 (जिमाका): जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारनार्थ उपाययोजनांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड आणि आदिवासी विकासमंत्री ना. डॉ. अशोक ऊईके यांनी गुरुवारी आढावा घेतला. जिल्ह्यातील कोणत्याही भागात पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये. त्यासाठी प्रशासनाने सज्ज राहून टिम वर्क करावे, असे निर्देश पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात झालेल्या या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीला आमदार किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचेसह उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी या बैठकीत जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान, धरण व बंधाऱ्यातील पाणीसाठा, पाणी टंचाई निवारनार्थ कृती आराखडा, जनावरांसाठी चारापाणी, विहीर अधिग्रहण, जलसंधारणाचे काम, भूजल पाणी पातळी, राष्ट्रीय पेयजल योजना, टॅंकरने पाणी पुरवठा, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, नळ पाणी पुरवठा...

जिल्हाधिकारी कार्यालयात आता ‘वॉर रूम’

Image
पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन  जिल्ह्यातील प्रकल्प, योजनांना मिळणार गती यवतमाळ दि. 16 (जिमाका): जिल्ह्यात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय गतिमानता आणि सुशासनाच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या जिल्हा ‘वॉर रुम’ चे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते आणि आदिवासी विकासमंत्री ना.डॉ. अशोक ऊईके यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या जिल्हा ‘वॉर रुम’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व विभागांचे कामकाज, प्रकल्पाची प्रगतीची देखरेख अर्थात मॅानिटरिंग केली जाणार आहे. तसेच सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तथ्यांवर आधारित निर्णय घेवून प्रशासन अधिक पारदर्शक व प्रभावी बनविणे, योजनांच्या अंमलबजावणीत एकसूत्रता आणणे, नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी ही वॅार रुम कार्यरत राहणार आहे. यासह आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण,आरोग्य, महसूल, कृषी या विभा...