Posts

पाणीटंचाई निवारण : आर्णी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी अरुणावतीचे पाणी!

 जिल्हाधिकाऱ्यांचे पाणी सोडण्याचे आदेश  नागरिकांना दिलासा आर्णी तालुक्यातील अरुणावती नदीकाठावरील तीन ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ ग्रामस्थ व जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याची उपलब्धतेसाठी अरुणावती प्रकल्पातून एक दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. गटविकास अधिकारी, पंचायत समिती आर्णी यांनी सन २०२५-२६ मधील उन्हाळी टंचाई कालावधीसाठी आरक्षित दोन दलघमी पाणीसाठ्यातून एक दलघमी पाणी सोडण्याची विनंती केली होती. या मागणीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शिफारस केली होती. सद्यस्थितीत अरुणावती प्रकल्पाच्या धरणात ७१.०९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी एक दशलक्ष घनमीटर पाणी अरुणावती नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. हे पाणी संबंधित गावांतील नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच, पाणी पट्टी देयकाची रक्कम भरण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यावर राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पातून पिण्याच्या पाणीकरिता विसर्ग होणार...

वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी शेवटची संधी !

 ३० जूनपर्यंत मुदतवाढ जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना त्याच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाने अंतिम मुदतवाढ दिली असून वाहनधारकांना आता ३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची संधी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एचएसआरपी नंबर प्लेटसाठी रोसमेर्टा सेफ्टी सिस्टिम लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींगसाठी mhhsrp.com हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. वाहनधारकांना या पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेता येणार आहे. यापुर्वी यासाठी दि.१५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, त्यास आता अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून ३० जून २०२६ पूर्वी वाहन मालकांनी त्यांच्या वाहनास एचएसआरपी नंबर प्लेट बसवुन घ्यावी, दि.१ जुलै २०२६ नंतर एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता पुरवठादारांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनधारकांनी विहित शुल्काचा भरणा करुन वाहनास ...

राजकीय पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग्ज हटवा

 जिल्हा प्रशासनाचे यंत्रणांना निर्देश  विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुका-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत ही आचारसंहिता राहणार आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत शासकीय इमारतींवर अथवा परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाचे लिखाण, प्रचारात्मक मजकूर, फलक तसेच राजकीय व्यक्तींचे छायाचित्र प्रदर्शित होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मंत्री, राज्यमंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. याबरोबरच “महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम” मधील तरतुदींचे उल्लंघन होऊ नये आणि आदर्श आचारसंहितेच...

विधानपरिषद निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज रहा

Image
- जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अधिकाऱ्यांना निर्देश  जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा  जिल्ह्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा विधानपरिषद निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी अधिकाऱ्यांना दिले. या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून निवडणुकीच्या पूर्वतयारीचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, अपर पोलीस अधीक्षक अशोक खरात, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश झिमटे, उपजिल्हाधिकारी अजित येळे, कार्यकारी अभियंता व्ही.ए.शिरभाते, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, तहसिलदार राहूल मोरे इ. विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, शासनाच्या संकेतस्थळ, समाजमाध्यमांवरुन राजकीय नेत्यांचे छायाचित्...

विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हास्तरिय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

 आदर्श आचारसंहिता, कायदा-सुव्यवस्था  प्रशिक्षण व माध्यम व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी निश्चित महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी जिल्हास्तरिय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेतील विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी तसेच निवडणूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणी व कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनुष्यबळ व्यवस्थापन, संगणकीकरण व मतदान,मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार राहुल मोरे, तर प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी उपजिल्हाधिकारी अजितकुमार येळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्...

आचारसंहितेमुळे यवतमाळ येथील रोजगार मेळावा रद्द

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांच्या वतीने दि. २६ मे रोजी बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्ह रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ यांच्या दि. १८ मे २०२६ रोजीच्या पत्रान्वये जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार दि. २६ मे रोजी आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जाहीर केले आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होणारे उद्योजक, उमेदवार तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य...

जिल्ह्यात जनगणनेला प्रारंभ !

 प्रत्यक्ष घरगणना सुरु  प्रगणकांना सहकार्य करा -जिल्हा प्रशासनाचे आवाहन आगामी जनगणना २०२७ ही देशातील सर्वात व्यापक व महत्त्वपूर्ण प्रशासनिक प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना कार्यास दि. १६ मे पासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. या टप्प्यामध्ये प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचारी दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरभेटी देऊन माहिती संकलित करीत आहेत. घरगणनेदरम्यान प्रगणक घरांवर मार्कर किंवा खडूने क्रमांक चिन्हांकित करीत आहेत. जनगणनेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, बँक खाते तपशील किंवा ओटीपी मागितला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शासनाने निश्चित केलेल्या ३३ प्रश्नांचीच विचारणा करण्यात येणार आहे. जनगणना कार्य हे जनगणना अधिनियम, १९४८ अंतर्गत केले जात असून प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांना घरांमध्ये प्रवेश करून माहिती घेण्याचा तसेच घरांना क्रमांक देण्याचा अधिकार आहे. जनगणनेत नोंदविण्यात येणारी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात ये...