Posts

भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अॅडव्हायझरी जारी ! हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या मार्गदशक सुचनेनुसार मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या 24X7 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय...

कौशल्य विकास धोरणाबाबत सुचना, हरकती कळविण्याचे आवाहन धोरण

Image
यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : राज्याचे कौशल्य विषयक धोरण तयार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने दि. 13 जुन 2024 च्या शासन निर्णयान्वये मा. आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. कौशल्य विकास धोरणाची एकंदरीत व्याप्ती विचारात घेता या कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात संबंधित विषयाचे विशेषज्ञ म्हणून एम/एस केपीएमजी ॲडव्हिसरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधितानी कौशल्य धोरणाचा सुधारित प्रारूप मसुदा सादर केला आहे. दि. 24 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या नियामक समितीच्या बैठकीत मा. अपर मुख्य सचिव यांनी दिलेल्या सूचना विचारात घेवून धोरणाचा प्रारूप मसुदा महास्वयम पोर्टलवर नोटीस सेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याच्या कौशल्य विषयक धोरणाबाबत आपल्या सूचना, अभिप्राय, हरकती, सुधारणा इ. दि.6 मार्च पर्यंत विहित नमुन्यात लेखी स्वरुपात mhskillpolicy@mssds.in या इमेल आयडीवर कळविण्यात याव्यात. त्याअनुषंगाने कौशल्य धोरणाचा प्रारूप मसुदा महास्वयम पोर्टलवर नोटीस सेक्शनमध्ये उपलब्ध करून द...
Image
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी’ यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील #खारघर येथे आयोजित भव्य कार्यक्रमाच्या तयारी व नियोजनाविषयी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची विशेष मुलाखत आज दुपारी ४ वाजता महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होणार आहे. #जयमहाराष्ट्र #हिंददीचादर #गुरुतेगबहादुर

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त 'दिलखुलास' व 'जय महाराष्ट्र' मध्ये कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांत “हिंद-दी-चादर” – श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमाच्या तयारी व नियोजनाविषयी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होईल. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. मुलाखत News On AIR या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका उन्नती जगदाळे यांनी केले आहे. X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR “हिंद दी चादर” हा राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असून विविध...

श्री गुरू तेग बहादुर साहिब जी' यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचे नवी मुंबईत आयोजन शहिदी समागम कार्यक्रमासाठी प्रशासन सोयी-सुविधांसह सज्ज - कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडणार - राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक मुंबई दि. २७ : ‘हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. नवी मुंबई येथे होणाऱ्या हिंद -दी- चादर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरद रावजी ढोले, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपालसिंग सिद्धू, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅपी सिंग उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, या दोन दिवसीय कार्यक्रमात देश विदेशातून १८ ते २० लाख भाविक येणे अपेक्षित आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले असून, मुख्य मंडपात एकावेळी ८० हजार...

गुरु तेगबहादूर जी : सहिष्णुता, करुणा आणि धर्मस्वातंत्र्याचे प्रतीक

Image
-प्रो. डॉ. दीपक मो. शिंदे परीक्षा नियंत्रक, केंद्रीय जन जाती विद्यापीठ, विजयानगरम (विशाखापट्टणम) माजी संचालक – श्री गुरु गोबिंद सिंघ जी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, भारतीय इतिहासात अशी काही महान व्यक्तिमत्त्वे उदयास आली आहेत की, ज्यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरते अशा महान विभूतींचे कार्य एखाद्या धर्माच्या चौकटीत न अडकता संपूर्ण मानवजातीसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठरले आहे. शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर जी, हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य, न्याय, करुणा, धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अर्पण केले. त्यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असताना, त्यांचे सामाजिक सुधारक म्हणून असलेले कार्य आणि विचार आजही तितकेच सुसंगत आणि मार्गदर्शक आहेत. प्रत्यक्षात शीख धर्म असा एक धर्म आहे की या धर्माच्या धर्म गुरुनी दिलेल्या बलिदाना मुळे हिंदू धर्माचे रक्षण झाले आहे. गुरु तेगबहादूर जी : थोडक्यात जीवनपरिचय १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे जन्मलेले गुरु तेगबहादू...

27 फेब्रुवारीपासून नवीन मोटार सायकलची सिरीज

यवतमाळ, दि. 26 :(जिमाका) : परिवहनेत्तर विभागातील नवीन मोटार सायकलची सध्याची एमएच 29 सीएन सिरीज संपुष्टात येत असल्यामुळे एमएच 29 सीक्यु ही नवीन सिरीज 27 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली आहे. ज्या ग्राहकांना नवीन आकर्षक नंबर घ्यायचा असेल त्यांनी कार्यालयात येऊन अर्ज सादर करावे. ही मुभा फक्त एका दिवसासाठी उपलब्ध राहील, त्यानंतर ऑनलाईन सुविधेचा उपयोग करता येईल, यांची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे अवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी केले आहे