Posts

जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती अभियान व सप्ताहाचे आयोजन

 सरकारी कामगार कार्यालयाचा उपक्रम जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त सरकारी कामगार अधिकारी तथा बालकामगार कृतीदलाद्वारे जिल्ह्यात बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान आणि विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस २००२ पासून संपूर्ण जगभर साजरा केला जात असून बालमजुरीच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या अनुषंगाने जिल्ह्यात विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकींमध्ये दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था तसेच इतर आस्थापनांच्या प्रतिनिधींना बालकामगार प्रथेचे दुष्परिणाम, बालमजुरी निर्मूलनाचे महत्त्व आणि संबंधित कायद्यांविषयी माहिती देवून जनजागृती करण्यात येणार आहे. यादरम्यान, व्यापारी वर्गाकडून आमच्याकडे कोणताही बालकामगार कार्यरत नाही आणि भविष्यातही बालकामगार ठेवणार नाही असे हमीपत्र भरून घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही आस्थापनेत १८ वर्षांखालील बालक अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवू नये, अन्यथा संबंधित आस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बालपणी काम करण्यामुळे मुलांच्या त्वचा, श्वसनसंस्था, मेंदू आणि जठरसंस...

मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची संधी !

अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित १५ ते २२ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या संस्थेमार्फत ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी हा कार्यक्रम रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक विकास आणि समाजोपयोगी कार्याची मोठी संधी उपलब्ध करून देणारा ठरणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि जीवनकौशल्य विकासासाठी प्रशिक्षित समुपदेशक तयार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे ही महाराष्ट्र शासनाची मानसिक ...

फार्मर्स ग्रुप लीग स्पर्धेत 503 शेतकरी गटांचा उत्स्फूर्त सहभाग

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तथा प्रकल्प संचालक आत्मा, यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकरी गटांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “फार्मर्स ग्रुप लीग या नाविन्यपूर्ण स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 10 जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांतील शेतकरी गटांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील एकूण 503 शेतकरी गट आणि त्यांचे 5 हजार 957 सक्रिय सभासद यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक सहभाग उमरखेड तालुक्यातून नोंदविण्यात आला असून येथील 91 गावांमधील 91 शेतकरी गटांच्या 1 हजार 5 शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यानंतर कळंब तालुक्यातील 76 शेतकरी गटांच्या 877 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सदर स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून सहभागी शेतकरी गट व सदस्यांना विविध टप्प्यांमध्ये दिले जाणारे टास्क आणि अॅक्टिव्हिटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. पूर्ण केलेल्या कामांचे व्हिडिओ व छायाचित्रे जतन करून निरीक्षकांना करुन दयावयाचे आहे. विविध उपक्रम देण्यात आले...

खरीप हंगामात ‘कापूस उत्पादकता अभियान, कपास क्रांती’ योजना राबविण्यात येणार

 सघन कापूस लागवड, क्लोज स्पेसिंग, एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिके  शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत “कापूस उत्पादकता अभियान, कपास क्रांती ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये सघन कापूस लागवड प्रात्यक्षिके ४ हजार ५७० हेक्टर, क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिके ७ हजार १३ हेक्टर, तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिके ७७८ हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येणार आहेत. याशिवाय स्थानिक पुढाकारांतर्गत २२ बायोचार युनिट्स आणि २६८ कापूस श्रेडर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व विहित कार्यपद्धतीनुसार राबविण्यात येणार असून, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी उपलब्ध असलेल्या अल्प कालावधीचा विचार करून लाभार्थी निवडीचे नियोजन करण्यात आले आहे. योजनेतील लाभांचे वितरणानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७९ टक्के, अनुसूचित जातींसाठी १२ टक्के आणि अनुसूचित जमातींसाठी ९ टक्के असे निश्चित करण्...

माय भारत केंद्रातर्फे जिल्ह्यात ‘नेशन फर्स्ट चॅलेंज’ मोहीम

Image
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ‘मेरा युवा भारत’ माय भारत केंद्रातर्फे जिल्ह्यात ‘नेशन फर्स्ट चॅलेंज’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी यवतमाळचे जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांनी जिल्हाधिकारी विकास मीना यांची जिल्हाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन मोहिमेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीस ‘माय भारत’चे कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे आणि रवी शेळके उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रशासनाने या देशव्यापी मोहिमेला जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी,जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांचीही भेट घेण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांपर्यंत मोहिमेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा वापर कसा करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनातून प्रेरित झालेल्या या मोहिमेत युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातून राष्ट्रनिर्माणात योगदान देण्यासाठी पाच महत्त्वाच...

मान्सूनपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करा

Image
 जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर व अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज महसूल भवन येथे विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, पूनम अहिरे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने कार्य करून मान्सूनपूर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टी अथवा पूरस्थितीत तात्काळ बचाव व मदतकार्य राबविण्यासाठी आवश्यक वाहने, यंत्रसामग्री व प्रतिसाद पथके (रिस्पॉन्स टीम) सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरी व ग्रामीण भागातील नाले, गटारे, नदीपात्रे आणि रस्त्यांची साफसफाई तातडीने पूर्ण करावी, जलसंधारणाची कामे पूर्ण करावी, धोकादायक पुलांची तपासणी करावी तसेच...

राष्ट्रीय लोकअदालत 12 सप्टेंबरला होणार

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये एकाच दिवशी होणार सुनावण ी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक 12 सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन होत असल्याने प्रलंबित वाद जलदगतीने निकाली काढण्यास मोठी मदत होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आनंद एल यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे या लोकअदालतीचा शुभारंभ होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच इतर न्यायाधिकरणांमध्येही एकाच वेळी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ, यांचा संयुक्त सहभाग असून संपूर्ण न्यायव्यवस्थेचा समन्वय साधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्य...