Posts

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरा समाज कल्याण विभागाचे महाविद्यालयांना आवाहन महाविद्यालय स्तरावर 2,003 अर्ज प्रलंबित

Image
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. यात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन तसेच व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती या योजनांचा समावेश आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 30 जून 2025 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. मागील 2024-25 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 10 हजार 649 अर्ज नोंदणीकृत झाले होते. त्यापैकी चालू 2025-26 वर्षात आतापर्यंत 9 हजार 322 अर्ज नोंदणीकृत झाले असून हे प्रमाण 8...

दिव्यांग व्यक्तींसाठी आता ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ सेवा व योजनांची माहिती एकाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज व पाठपुराव्याचीही सुविधा दिव्यांग नागरिक, संस्थांनी नोंदणी करावी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

Image
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : दिव्यांग कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध कल्याणकारी सेवा व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी “महाराष्ट्र दिव्यांग सहाय्यक पोर्टल” हे स्वतंत्र नागरिक-केंद्रित डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या विविध शासकीय योजना व सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जाची स्थिती रिअल-टाईममध्ये पाहण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे दिव्यांग नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) व नागरी संस्थांना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 50 अन्वये नोंदणी व नूतनीकरण करणे आवश्यक असून ही सुविधा देखील या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व सुविधा https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग नागरिक तसेच दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, एनजीओ व नागरी संस्थांनी या संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी ...

जिल्हा परिषदेत पोक्सो कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा केंद्रप्रमुखांसाठी विशेष प्रशिक्षण

Image
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी जिल्हा परिषद सभागृहात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अर्थात पोक्सो अधिनियम २०१२ या कायद्यावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या संकल्पनेतून व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महिला व बाल विकास विभाग तसेच शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सभागृहात जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांसाठी या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कायद्याच्या तरतुदी, शिक्षकांची भूमिका तसेच बाल संरक्षण यंत्रणेची माहिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शिका ॲड. ज्योती खांडपासोळे यांनी कायद्यांतर्गत गुन्ह्यांचे स्वरुप, शिक्षेच्या तरतुदी, पोलीस प्रशासन, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाइन आणि इतर शासकीय यंत्रणांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपस्थितांनी बालविवाह प्रतिबंधासाठी शपथही घेतली. या कार्यशाळेस उपमुख्य ...

लाडकी बहिण योजनेतील अपात्र महिलांसाठी ई-केवायसी दुरुस्तीची संधी ३१ मार्चपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार

Image
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना झालेल्या त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या महिलांसाठी शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. अशा महिलांसाठी पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्तीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून ही प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेंतर्गत दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यामध्ये लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी स्वरूपात सरकारी विभाग, शासकीय उपक्रम, महामंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नसणे, तसेच सेवानिवृत्तीनंतर कोणताही सदस्य निवृत्तीवेतन घेत नसणे या अटींबाबत चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले होते. या कारणामुळे अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने अशा अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया चुकीच्या पर्यायामुळे अपूर्ण राहिली किंवा त्या अपात्र ठरल्या आहेत, त्यां...

पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश संभाव्य पाणीटंचाईचा घेतला आढावा

Image
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी प्रशासनाने तयार राहून नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, विविध विभागांचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच नगरपालिकांचे मुख्याधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ग्रामीण व शहरी भागातील सध्याची पाणीपुरवठा स्थिती, उपलब्ध जलसाठे, विहिरी व बोअरवेलची स्थिती, तसेच संभाव्य टंचाईग्रस्त भागांबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोठेही पाणीटंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी. जिल्ह्यातील धरण प्रकल्पांमध्ये पाणीसाठा चांगला आहे. पाणीपुरवठयाबाबत मागणीची नोंद घ्यावी. ज्या भागांमध्ये जलस्रोत कमी होत आहेत किंवा उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या ...

उन्हाळ्याची चाहुल ; आरोग्याची अशी घ्या काळजी Ø डॉ. उमेश जोगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : उन्हाळ्याला सुरुवात झाल्यामुळे कडक उन्हात विविध आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. वाढत्या उष्णतेमुळे घाम येणे, डोकेदुखी, अतिसार, पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात डीहायड्रेशन होणे तसेच बद्धकोष्ठता यांसारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्याच्या दिवसात स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. उमेश एस. जोगे यांनी केले आहे. उन्हाळ्यात चक्कर येणे, डोळ्यांची जळजळ, ऊन लागणे, डीहायड्रेशन तसेच उष्माघात यांसारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे केवळ पंखे किंवा एसीवर अवलंबून न राहता आहार आणि दिनचर्या योग्य ठेवणे गरजेचे आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड आणि चायनीज पदार्थांचे सेवन टाळावे. त्याऐवजी आहारात हिरव्या भाज्या, कोथिंबीर, फळे यांचा समावेश करावा. तसेच घरगुती गोड शरबत, लिंबूपाणी, काकडीचा रस, ताक व मठ्ठा यांसारख्य...

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांच्या मूल्यमापनाचा अंतिम निर्णय बाकी Ø कलावंतांनो आमीषाला बळी पडू नका ; पैशाची मागणी होत असल्यास तक्रार करा Ø फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा

यवतमाळ, दि. ९ (जिमाका) : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत तीन वर्षांसाठी प्रलंबित असलेल्या तपासण्या २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत पंचायत समिती स्तरावर घेण्यात आल्या आहेत. या तपासणीदरम्यान कलावंतांकडून त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करून प्रत्येक कलावंताचे ५० गुणांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. ही मूल्याकंन प्रक्रिया अद्याप सुरू असून अंतिम निर्णय होणे बाकी आहे. दरम्यान, काही तालुक्यांमध्ये चाचणी चमूमधील काही सदस्यांकडून कलावंतांना विविध आमीष दाखवून फसवणूक करण्याचे प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी अशा व्यक्तींविरुद्ध कठोर फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असून, यामध्ये कोणत्याही सदस्य किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व कलावंत व साहित्यिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमीषांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जर कुणीही पैशाची मागणी करत असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा परिषद यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपमु...