Posts

कर्जमुक्तीची प्रक्रिया होणार ऑनलाईन Ø >‘आधार प्रमाणिकरण’ अनिवार्य

Image
यवतमाळ, दि. 30 (जिमाका) : राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणी मध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून 'महाआयटी'च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित राबविली जात आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेले व ॲग्रिस्टॅक मध्ये नोंदणी केलेलल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून, संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी आपल्या आधार न...

शेतकरी व ग्रामीण उद्योजकांसाठी २ जुलैला राष्ट्रीय पेन्शन प्रणाली संचय जनजागृती कार्यक्रम

Image
ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांना दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लीड जिल्हा बँक कक्ष (सेंट्रल बँक ऑफ इंडिया), यवतमाळ यांच्या वतीने विशेष राष्ट्रीय पेन्शन प्रणाली संचय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने शेती, संलग्न क्षेत्रे तसेच ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योग घटकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. दि. २ जुलै रोजी सकाळी १० वाजता राधा मंगल हॉल, यवतमाळ येथे पार पडणार आहे. पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या विशेष मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशातील असंघटित व वंचित घटक, विशेषतः शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्थांचे सदस्य, ग्रामीण कारागीर, शेतमजूर आणि लघु उद्योजक यांच्यापर्यंत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली संचय योजनेचा लाभ पोहोचविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच ग्रामीण भागात नियमित बचतीची सवय निर्माण करून नागरिकांना भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेही या उपक्रमाचे ध्येय आहे. या जनजागृती कार्यक्रमाचा मुख्य हेतू राष्ट्रीय पेन्शन प्रणालीबाबत व्यापक जनजागृत...

चिचबर्डी येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा

Image
जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देवून ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा केला. दरम्यान यवतमाळ तालुक्यातील चिचबर्डी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांच्या उपस्थितीत ‘शाळा प्रवेशोत्सव’ समारंभ पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका संगीता चनेकर, लिपीक विजय राठोड यांच्यासह शिक्षकवृंद, पालक उपस्थित होते.

‘स्कुल चले हम’…..! जिल्ह्यात ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात

Image
जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांकडून नवागत चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या ‘शाळा प्रवेशोत्सव’ समारंभनिमित्त जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यवतमाळमधील गोधणी रोड येथील जिल्हा परिषद (मा.शा) माध्यमिक विद्यालय येथे भेट देवून विद्यार्थ्यांना फुलपुष्प देवून स्वागत केले. तसेच त्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आले. या शाळेतील 1975 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून बारावीच्या कॉमर्स सायन्स तसेच उर्दू मधील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रुपये रोख तसेच दहावीच्या उर्दू मराठी विभागातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांसाठीच्या योजना, सुविधा, जिल्हा प्रशासनाच्या उपक्र...

लेख : कर्जमुक्ती योजना : शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीकडे पाऊल

शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' ही केवळ कर्जमुक्तीची योजना नसून, शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीचा आणि आत्मविश्वास वाढविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणारी आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा व्यापक आवाका. या योजनेत राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या स्वतःच्या निधीतून वितरित करण्यात आलेल्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्जांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे केवळ एका विशिष्ट बँकेपुरती मर्यादित न राहता विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना समान लाभ मिळणार आहे. यासोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा स्तुत्य निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी अनेक कर्जमाफी योजनांमध्ये काही बँका किंवा वित्तीय सं...

विशेष वृत्त : राष्ट्रीयकृत बँकांसह खाजगी, प्रादेशिक व जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ

राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' सुरू केली असून, ही योजना शेतकऱ्यांनी विविध बँका व सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जांस लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या निकषानुसार शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या पात्र खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विविध बँकिंग व सहकारी संस्थांमधून कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेचा लाभ मिळण्यासाठी निकष निश्चित केले आहेत. या निकषांनुसार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार असून, शेतकऱ्यांनी संबंधित बँक किंवा सहकारी संस्थेशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण...

भूमिहीन आदिवासींसाठी स्वाभिमानाची नवी दिशा !

 आदिवासी कुटुंबांना २ ते ४ एकर जमीन मिळणार  पूर्णतः अनुदानित झालेल्या सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भुमिहीन आणि दारिद्रय रेषेखालील आदिवासी कुटुंबांना आर्थिकदृष्टया सबळ करण्यासाठी आणि त्यांच्या स्वाभिमानाला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत भुमिहीन दारिद्रय रेषेखालील आदिवासींच सबळीकरण व स्थाभिमान योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी आदिवासी कुटुंबांना ४ एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा २ एकर बागायती (ओलिताखालील) जमीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेमुळे भुमिहीन आदिवासींना स्वाभिमानाची नवी दिशा मिळणार आहे. भूमिहीन दारिद्रय रेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत मागील पाच वर्षांच्या खरेदी- विक्री व्यवहार आणि प्रचलित रेडीरेकनर दर विचारात घेऊन जमीन खरेदीसाठी पूर्वी ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज आणि ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून दिले जात होते. मात्र, ही योजना आता पुर्णतः अनुदानित करण्यात आली आहे. जमीन खरेदी आणि लाभार्थी निवडीसाठी प्रत्येक जिल्हयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये अपर आय...