Posts

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी!

Image
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करण्यात आली आहे. #कर्जमुक्तीयोजना #महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती #शेतकरी #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६
Image
  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन   यवतमाळ, दि. 23 (जिमाका) :   भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज   जिल्हाधिकारी   कार्यालयात साजरी करण्यात आली.            जिल्हाधिकारी कार्यालयात   आयोजित जयंती कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी    लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मानव-वन्यजीव संघर्षातील बाधितांना मदत; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची उल्लेखनीय कामगिरी

  यवतमाळ, दि. 23 (जिमाका) :   मानव आणि वन्यजीव संघर्षामुळे बाधित झालेल्या नागरिकांना वेळेत न्याय, आर्थिक नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने ‘मानव-वन्यजीव संघर्षातील बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठीची योजना-२०२५’ देशभरात लागू केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती, वन विभाग, महसूल प्रशासन आणि इतर शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून थेट गावपातळीवर कार्यरत झाली आहे. मानव-वन्यजीव संघर्षामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर गंभीर परिणाम होत असून अशा घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना वैद्यकीय उपचार, प्रशासकीय मदत आणि वन विभागामार्फत नुकसानभरपाई मिळणे आवश्यक ठरते. महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील बाधितांना नुकसान भरपाई व   ३० दिवसांच्या आत कार्यवाहीची तरतूद असल्याने बाधितांना तातडीने दिलासा मिळणे अपेक्षित आहे. मागील दोन महिन्यांत जिल्ह्या...

जागतिक कौशल्य स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची युवकयुवतींना संधी

ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रिया सुरू ; यवतमाळ दि.   23   (जिमाका):   जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या अनुषंगाने भारत कौशल्य स्पर्धा (इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७) साठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील पात्र, कुशल व इच्छुक युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी ऑनलाइन नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु. दि. उचले यांनी केले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून, ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर जगभरातील २३ वर्षांखालील युवक-युवतींना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देते. भारतातील इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन ही देशातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेद्वारे विविध व्यावसायिक व तांत्रिक क्षेत्रांतील प्रतिभावान युवक-युवतींना आपले कौशल्य, गुणवत्ता आणि प्राविण्य स...

कामनदेव येथे मानव-वन्यजीव संघर्षाबाबत कायदेविषयक जनजागृती शिबीर

Image
  यवतमाळ, दि. 23 (जिमाका) : यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, नेर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा कामनदेव येथील कामानादेवी मंदिर येथे मानव-वन्यजीव संघर्षामुळे बाधित झालेल्या व्यक्तींकरीता योजना 2025 या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दिपक एच. दाभाडे होते. नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोतीराम आडे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर प्रमुख वक्ते म्हणून नोडल अधिकारी तथा पॅरा विधी स्वयंसेवक वासुदेव विधाते यांनी उपस्थित होते.  अध्यक्षीय समारोपात सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दिपक एच. दाभाडे यांनी मानव-वन्यजीव संघर्ष रोख्ण्यासाठी व नुकसानग्रस्त नागरिकंना भरपाई मिळावी, यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे सांगित...

अग्निप्रतिबंधक उपाययोजना तात्काळ पूर्ण करा

                                 शासकीय, खाजगी आस्थापनांना जिल्हा प्रशासनाचे निर्देश   यवतमाळ, दि. 23 (जिमाका) :   जिल्ह्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, रुग्णालये, दुकाने, मॉल, औद्यागिक संस्था व   खासगी आस्थापनांना आवश्यक अग्निप्रतिबंधक उपाययोजना तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना अधिनियम, २००६, त्याअंतर्गत नियम २००९ तसेच २०२३ मधील सुधारित तरतुदींनुसार शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कोचिंग संस्था, वसतिगृहे, प्रशिक्षण केंद्रे, रुग्णालये, व्यापारी संकुले, मॉल, दुकाने, औद्योगिक आस्थापने आणि इतर सार्वजनिक वापराच्या इमारतींमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना राबविणे बंधनकारक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्व संबंधित आस्थापनांन...

लेख : नागरिकांना एकाच छताखाली योजनांचा लाभ देणारे महाराजस्व समाधान शिबीर

               स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जनविचारांचा वारसा पुढे चालवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान हा एक अत्यंत स्तुत्य आणि अभिनव उपक्रम सुरु केला आहे.   महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर, विशेषतः ग्रामीण भागात, सर्वसामान्य जनता, बळीराजा, विद्यार्थी आणि महिला वर्गाला त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी अनेकदा शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यांच्या याच समस्यांचे सत्वर निराकरण करणे आणि जनतेच्या तक्रारींची तत्परतेने दखल घेऊन त्या निकाली काढणे या हेतूने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला. हा निर्णय...