Posts

ज्वारी, बाजरी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी 10 जूनपर्यंत मुदतवाढ

रब्बी हंगाम 2025-26 मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत महागांव, पांढरकवडा, पाटण, पुसद, आर्णी, उमरखेड, घाटंजी, कळंब व राळेगांव या नऊ ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. या खरेदी केंद्रामध्ये तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागांव, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. पाटण,किसान मार्केट यार्ड शेलु(बु). पुसद, शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, (केंद्र दत्तरामपुर), तालुका खरेदी विक्री संघ मर्या. उमरखेड, तालुका खरेदी विकी संघ मर्या. घाटंजी, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. कळंब व तालुका खरेदी विक्री संघ मर्या. राळेगांव या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दिनांक 1 एप्रिल ते 15 मे 2026 पर्यंत करण्यात येणार होती. सद्यस्थितीत नोंदणी विचारात घेवुन शासनाने ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसा...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तंबाखू विरोधी सप्ताह साजरा जनजागृती कार्यक्रमातून तंबाखूमुक्तीचा संदेश

तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथे ३१ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत तंबाखू विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आयोजित या सप्ताहात पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. ई-सिगारेट आणि फ्लेवर तंबाखूच्या वाढत्या वापराबाबत विशेष जनजागृती करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तसेच हृदयविकारांसह अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. भारतातील सर्व प्रकारच्या कर्करोगांपैकी सुमारे २७ टक्के कर्करोग तंबाखू सेवनाशी संबंधित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके आणि जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. उमेश जोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह राबविण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना तंबाखूमुक्त ...

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता

यवतमाळमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता असून ४० खोल्यांची स्वतंत्र इमारत भाडे तत्त्वावर देण्यासाठी इच्छूक असलेल्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. नवीन इमारतीसाठी अपेक्षित सुविधा असाव्यात विद्यार्थ्यांना पुरेल इतक्या ४० खोल्या, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, १५ स्नानगृहे व १५ शौचालयांची सोय, पार्किंगसाठी स्वतंत्र जागा, पुरेशी विद्युत व्यवस्था असणे आवश्यक आहे. तरी इच्छुकांनी संपर्क साधावा असे गृहपाल, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह क्र. १, यवतमाळ यांनी कळविले आहे

जिल्हा स्त्री रुग्णालय पीसीओडी क्लिनिकची सुविधा दर दुसऱ्या व चौथ्या बुधवारी तपासणी, समुपदेशन व उपचार

जिल्ह्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राखण्याच्या उद्देशाने तसेच विशेषतः अविवाहित तरुणी आणि प्रजननक्षम वयोगटातील महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) या संप्रेरकांशी संबंधित आजाराच्या निदान व उपचारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय, यवतमाळ येथे पीसीओडी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. पीसीओडीमुळे महिलांमध्ये शारीरिक, मानसिक तसेच हार्मोनल बदल घडून येतात. या समस्यांवर योग्य वेळी वैद्यकीय उपचार, तपासणी आणि समुपदेशन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभरात पीसीओडी क्लिनिक सुरू करण्यात आले असून यवतमाळ जिल्ह्यातही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्यांचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे क्लिनिक दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी, म्हणजे दर पंधरा दिवसांनी कार्यरत राहणार आहे. लाभार्थींना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी, आवश्यक वैद्यकीय चाचण्या, एकात्मिक औषधोपचार, आरोग्यविषयक समुपदेशन तसेच आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पीसीओडी क्लिनिक शुभारंभ कार्यक्रमाच्या प्र...

पैनगंगा नदी काठावरील ४४ गावांना ईसापूर धरणाचे पाणी जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश

Image
 पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना  नागरिकांना मोठा दिलासा उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील ४४ गावांमध्ये निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणातून आरक्षित पिण्याच्या पाण्यापैकी ३ दशलक्ष घनमीटर पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. गटविकास अधिकारी, पंचायत समिती उमरखेड यांनी पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये भूजल पातळी घटल्याने गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ग्रामस्थ व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरक्षित पाणीसाठ्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली होती. त्यानुसार उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणात सध्या ४२३.३२४५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, यापूर्वी ९ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. आता अतिरिक्त ३ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास म...

विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणूक-2026 प्रक्रियेअंतर्गत यवतमाळ मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल घोषित केल्यानंतर जिल्ह्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने 5 जून 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ज्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल घोषित झाले आहेत, त्या मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातही स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात आली असून, निवडणूक निर्बंध हटले आहेत. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र देवून सूचित केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून बेंबळा प्रकल्पाची पाहणी

Image
जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज पाहणी केली. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या विविध बाबींची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रकल्पाच्या देखभाल, व्यवस्थापन, इमारत आणि प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, कार्यकारी अभियंता व्ही. ए. शिरभाते तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बेंबळा प्रकल्प हा जिल्ह्यातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प असून त्याच्या कार्यक्षमतेबाबत आणि व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली