आज पाणी पुरवठा बंद
यवतमाळ दि.५ : जलशुध्दीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्तीचे काम चालु असल्याने शहरातील काही भागात पाणी पुरवठा दि. ६ व ७ ऑगस्ट दोन दिवस पूणपणे बंद राहणार आहे. यात दर्डा मुख्य संतुलन टाकी, वाघापुर टेकडी मुख्य संतुलन टाकी व कार्यालयीन मुख्य संतुलन टाकी अंतर्गत येणाऱ्या भागातील होणारा पाणी पुरवठा दि. ६ व ७ ऑगस्ट दोन दिवस पूणपणे बंद राहणार आहे. यात दर्डा नगर, बेले ले आऊट, वनवासी मारोती, सुयोग नगर-२, शिवाजी नगर, ग्रा.पं. लोहारा, वैभव नगर, वाघापुर टेकडी, प्रिया रेसिडेन्सी, मेडीकल टाकी, विठ्ठलवाडी, बालाजी टाकी, विसावा टाकी, पॉलिटेक्निक टाकी तसेच निखील नगर, युडीआयडी एसएमटी टाकी, राजाराम नगर टाकी, आर.टी.ओ.टाकी, जिंद्रान टाकी, रुख्मीणी टाकी, चापडोह पुनवर्सन टाकी अंतर्गत येणाऱ्या भागातील होणारा पाणी पुरवठा दोन दिवस पुर्णपणे बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा व प्राधिकरणास सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभागाया उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे. 000