Posts

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 'आपलं कर्ज माफ झालं' जनजागृती गीताचे लोकार्पण

Image
  यवतमाळ, दि. 13 (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘आपलं कर्ज माफ झालं ’ या जनजागृती गीताचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची माहिती सहज आणि प्रभावीपणे मिळावी, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी समजाव्यात आणि पात्र लाभार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे गीत तयार करण्यात आले आहे. गीताच्या माध्यमातून योजनेचा संदेश अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती गीताची निर्मिती करण्यात आली आहे. याची संकल्पना निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांची असून, दिग्दर्शन उपजिल्हाधिकारी राहुल तायडे यांनी केले आहे.   गीत-संगीत आणि गायन मुकुंद नितोणे यांनी केले असून, गायिका कविता वर्घट यांनी सहभाग नोंदविला आहे. ध्वनीमुद्रण व संकलनाची जबाबदारी विश्वास साठे यांनी सांभाळली आ...

२१ ऑगस्टला जलसंधारण दिनानिमित्त आयोजित ‘महा वॉकेथॉन’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा

Image
                        मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड             यवतमाळ, दि. 12 (जिमाका )   येत्या २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात “ जलसंधारण दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, मुंबईतील राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमासह सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाच वेळी ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या दोन्ही उपक्रमांमध्ये राज्यातील युवक-युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.             मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी आणि व्यापक दिशा दे...

२१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

Image
                                 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ·१५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह; युवकांच्या सहभागातून जनजागृतीवर भर ·१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ · राज्यात ‘महा वॉकथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन             यवतमाळ, दि. 12 (जिमाका): माती आणि पाणी ही नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. राज्यातील नागरिक, विशेषतः युवकांमध्ये मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन ’ , तर १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह ’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान ’ राबविण्यात येणार असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय ठेऊन कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.               २१ ऑगस्ट “ जलस...

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

Image
  यवतमाळ, दि. 12 (जिमाका): मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन, १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार असून, राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

शासकीय आश्रमशाळेतील मुलींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळणार

   ६०० विद्यार्थिनींना मार्शल आर्ट, ज्यूडो कराटे किट   ;  १०० विद्यार्थ्यांना संगीतकलेचे प्रशिक्षण  कार्यशाळा आयोजनासाठी शासकीय यंत्रणा व   संस्थांकडून मागविले प्रस्ताव   यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या २०१३ च्या शासन निर्णयानुसार न्युक्लिअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना मानव साधन संपत्ती विकासाच्या तसेच विविध कल्याणात्मक योजनांचा लाभ दिला जात आहे.   या योजनेअंतर्गत दोन उपक्रमांचा समावेश आहे. त्यामध्ये शासकीय आश्रमशाळेतील मुलींना आत्मसंरक्षणासाठी मार्शल आर्ट किंवा ज्‌यूडो कराटेची किट देऊन तीन महिन्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लक्षांक ६०० विद्यार्थिनींचा असून, प्रति लाभार्थी २ हजार रुपये याप्रमाणे एकूण १२ लाख रुपयांची तरतूद आहे. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुगम व शास्त्रीय गायन, तबला वादन आणि संगीतकलेची तीन महिन्यांची कार्यशाळा आयोजित करण्याची योजना आहे. या उपक्रमासाठी १०० विद्यार्थ्यांचा लक्षांक असून, प्रति लाभार्थी ५ हजार रुपये याप्रमाणे एकूण ५ लाख रुपयांची तरतूद ...

स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा

  जिल्हाधिकारी यांचे आवाहन प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापरु नका    यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन राज्यभर साजरा करण्यात येतात. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा हे प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा तसेच प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.   राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळुन आल्यास संबंधित त...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपट्टी देयकाच्या दरात वाढ ;

  नवीन दर लागू             यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपट्टी देयकाच्या दरात वाढ करण्यात आली असून, नवीन दर २९ मे २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत. ग्राहकांचा प्रकार व पाण्याच्या वापरानुसार हे पाणी दर लागु करण्यात आले आहेत.             घरगुती नळजोडणी धारकांसाठी प्रतिमाह १५ हजार लिटरपर्यंत पाणी वापरासाठीचा दर २२.९९ रुपये प्रति एक हजार लिटर, तर १५,००१ ते २५ हजार लिटरपर्यंत पाणी वापरासाठीचा ३५.४५ रुपये प्रति एक हजार लिटर तसेच २५,००१ लिटरपासून अधिक पाणी वापरासाठीचा दर ४८.२८ रुपये प्रति एक हजार लिटर असा दर लागू करण्यात आला आहे.             बिगर घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट प्रतिमाह १०६.३६ रुपये, तर ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर असलेल्या ग्राहकांसाठी प्रति युनिट प्रतिमाह ४४.२९ रुपये असा सुधारित दर लागु करण्यात आला आहे.             या ...