Posts

उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

  यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या दि.१५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित समारंभात पालकमंत्री सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करतील. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा

Image
                          मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यवतमाळ, दि. 14 (जिमाका): मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा,शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असून हा क्यूआर कोड स्कॅन करुन नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन  मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ‘क्यूआर ’ आधारित ऑनलाईन नोंदणी गरजेची आहे. तसेच २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात. १५ ते २१ ऑगस्ट दरम्या...

सार्वजनिक ग्रंथालय, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

  यवतमाळ, दि.14 (जिमाका) : ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार देण्यात येतो. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सदर पुरस्कार दिले जातात. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार, २५ हजार रुपये तसेच सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट...

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये

  यवतमाळ, दि.14 (जिमाका) : स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक व महाराष्ट्र दिन राज्यभर साजरा करण्यात येतात. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा हे प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलुस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळुन आल्यास संबंधित तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावेत. तसेच १५ ऑगस्ट या कार्यक्रमा प्रसंगी जिल्ह्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वाप...

रानभाजी महोत्सव शनिवारी; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

              यवतमाळ, दि. 14 (जिमाका) :   मानवी आरोग्यासाठी सकस व पौष्टिक आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतशिवारात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या, रानफळे, फुलभाज्या आणि कंदवर्गीय भाज्यांचे पौष्टिक व आरोग्यविषयक महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे, तसेच या नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर व्हावा, या उद्देशाने १५ ऑगस्ट २०२६ रोजी येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.             हा महोत्सव कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता पालकमंत्री संजय राठोड, यांच्या हस्ते होणार आहे.             रानभाज्या नैसर्गिकरीत्या उगवत असल्याने त्यांच्यावर रासायनिक कीटकनाशके किंवा बुरशीनाशकांची फवारणी केली जात नाही. त्यामुळे नैसर्गिक व पौष्टिक आहाराच्या दृष्टीने या भाज्यांना विशेष महत्त्व आहे. ग्रामीण भागात सहज उपलब्ध असलेल्या या भाज्या...

१५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह; जनजागृती साठी २१ ऑगस्टला महा वॉकेथॉन

Image
  यवतमाळ, दि.14 (जिमाका) : मृदसंधारण व जलसंधारणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्हा परिषद येथील जि. बी. हॉलमध्ये मार्गदर्शन बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता भूमेश दमाहे यांनी सर्व सरपंचांना विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. माती व पाणी ही भविष्यातील पिढ्यांसाठी महत्त्वाची नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंधारण सप्ताहात युवकांचा सहभाग वाढवून सोशल मीडियावर जलसंधारण विषयक रील्स तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे. तसेच २१ ऑगस्ट रोजी आयोजित ‘महा वॉकेथॉन -वॉक फॉर वॉटर’मध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. वॉकेथॉनसाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले. जल व मृदा संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आले.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 'आपलं कर्ज माफ झालं' जनजागृती गीताचे लोकार्पण

Image
  यवतमाळ, दि. 13 (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘आपलं कर्ज माफ झालं ’ या जनजागृती गीताचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची माहिती सहज आणि प्रभावीपणे मिळावी, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी समजाव्यात आणि पात्र लाभार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे गीत तयार करण्यात आले आहे. गीताच्या माध्यमातून योजनेचा संदेश अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती गीताची निर्मिती करण्यात आली आहे. याची संकल्पना निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांची असून, दिग्दर्शन उपजिल्हाधिकारी राहुल तायडे यांनी केले आहे.   गीत-संगीत आणि गायन मुकुंद नितोणे यांनी केले असून, गायिका कविता वर्घट यांनी सहभाग नोंदविला आहे. ध्वनीमुद्रण व संकलनाची जबाबदारी विश्वास साठे यांनी सांभाळली आ...