Posts

'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' अंतर्गत महसूल शिबिर उत्साहात संपन्न

Image
          यवतमाळ, दि. 22 (जिमाका) :   राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ तहसील कार्यालय महसूल विभागाअंतर्गत पोस्टल ग्राऊंड, यवतमाळ येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत तालुकास्तरीय महसूल शिबीर उत्साहात पार पडले.              या शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगुळकर उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्षा डॉ.प्रियदर्शनी उईके, उपाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नगरसेवक नितीन गिरी, नगरसेवक बिपिन चौधरी तसेच चिंतामण पायघन, शामभाऊ जयस्‍वाल, शिबीर समन्‍वयक सचिन भेडेकर, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने हजारो नागरिक उपस्थित होते.                           कार्यक्...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

Image
    यवतमाळ, दि. 22 (जिमाका) :   राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फुलपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

सहावीच्या प्रवेशासाठी नवोदयची 28 नोव्हेंबरला निवड चाचणी

                                          अर्ज प्रक्रिया सुरू ; 31 जुलैपर्यंत मुदत             यवतमाळ, दि. 22 (जिमाका) : घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 मध्ये इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै   असून शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता पाचवीत शिकत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.             या प्रवेशासाठीची निवड चाचणी   28 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज https://cbseitms.rcil.gov.in/nvs किंवा www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरावेत. तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्यूआर कोडद्वारेही अर्ज करता येणार आहे. पात्रता:  ...

यशस्वी उद्योजकांना ग्रामोद्योग भरारी पुरस्कार मिळणार

                                       नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 22 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६’ साठी नामांकन अर्ज मागविण्यात येत आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विशेष करुन ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभारणाऱ्या तसेच रोजगारनिर्मितीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.   या पुरस्काराचे चौथे वर्ष असून, पात्र उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संकल्पनेतुन उद्योगाच्या वृध्दीसाठी व उदयोगाला चालना व गती देण्यासाठी सन २०२३ पासून राज्यस्तरीय "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार" सुरु करून माध्यमातून प्रथम, व्दितीय व तृतीय, उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येत आहेत. मंडळामार्फत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून उद्योग उभारून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या यशस्वी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी १३ जुलै   पासून ग्राम...

यवतमाळमध्ये पीएम विश्वकर्मा लोन उत्सव क्रेडिट आउटरीच कॅम्पचे आयोजन

  यवतमाळ, दि. 22 (जिमाका) : केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभाग डीएफएस आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुढाकारातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत 'पीएम विश्वकर्मा लोन उत्सव २०२६ (१ जुलै ते २४ जुलै २०२६) या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, या मोहिमेअंतर्गत  २३ जुलै  रोजी सकाळी १० वाजता यवतमाळ येथे विशेष क्रेडिट आउटरीच कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेचा प्रमुख उद्देश पूर्वी विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या किंवा नाकारण्यात आलेल्या पीएम विश्वकर्मा कर्ज अर्जांचा पुनर्विचार करून पात्र कारागिरांना तातडीने कर्ज मंजुरी मिळवून देणे हा आहे. शिबिरात पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करून त्यांना जागेवरच कर्ज मंजुरीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच योजनेच्या अटी, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेसंदर्भात लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मदत कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुतार, लोहार, कुंभार, नाभिक, शिंपी, गवंडी यांच्यासह पारंपरिक १८ व्यवसायांशी संबंधित कारागिरांना आर्थिक सहाय्य व कर्ज सुविधा उपलब्ध...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर

  कळंब येथे २५ जुलै रोजी   नागरिकांनी लाभ घ्यावा   प्रशासनाचे आवाहन यवतमाळ, दि.   21   (जिमाका) :   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियान राबविण्यात येत आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी विशेष शिबिराचे आयोजन शनिवार, दि. २५ जुलै   रोजी सकाळी १० वाजता रॉयल पॅलेस मंगल कार्यालय, राळेगाव चौफुली, कळंब येथे करण्यात आले आहे. आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या शिबिरात राळेगाव, कळंब, बाभुळगाव व पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, योजनांची माहिती, अर्ज स्वीकारणे तसेच अनेक महसूल व प्रशासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शिबिरामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र वितरण, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, त...

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती उपक्रम

  यवतमाळ, दि. 21 (जिमाका) :   भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वर्धापन दिनानिमित्त   जिल्ह्यात विविध ठिकाणी भूजल संवर्धन, पाणी गुणवत्ता, सुरक्षित पाण्याचा वापर आणि जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय व जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर वेदधारिणी विद्यालय, यवतमाळ येथे पाणी अडवा पाणी जिरवा, भूजल वाढवा भविष्य घडवा या घोषवाक्याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धन आणि पाणी गुणवत्तेबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, यवतमाळ येथे विद्यार्थ्यांना भूजलाचे महत्त्व, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळीचे व्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, संवर्धन तसेच पाण्याच्या अनिर्बंध उपशामुळे होणारे परिणाम याविषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. दारव्हा येथील उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेने जिजामाता कन्या शाळा व महाविद्यालयात पाणी गुणवत्ता तपासणीचे महत्त्व, आवश्यक उपाययोजना आणि पाणी तपासणीचे ...