भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘जलतारा’ संकल्पनेंतर्गत शेत शोषखड्डा योजना > शेतकऱ्यांनी शेतात शोषखड्डा तयार करावा > प्रथम अर्ज- प्रथम प्राधान्य तत्वावर लाभ मिळणार
यवतमाळ दि. 24 (जिमाका) : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित यंत्राद्वारे शेत शोषखड्डा योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शोषखड्डा तयार करता येणार आहे. “आज पाणी जपले तरच उद्याचे शेती भविष्य सुरक्षित” असा संदेश देत त्यांनी शेतकऱ्यांना शेत शोषखड्डा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शासनामार्फत राबविण्यात येणारी ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित शेत शोषखड्डा योजना ही केवळ योजना नसून शेतकऱ्यांसाठी जीवनदायी उपाय असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेत शोषखड्ड्याची आवश्यकता का? पावसाचे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी वाया जात आहे, विहिरी कोरड्या पडण्याचे प्रमाण वाढत आहे, भूजल पातळी सातत्याने घटत आहे तसेच अतिवृष्टीमुळे मातीची धूप होऊन सुपीकता कमी होत आहे. या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे शेतात पाणी अडवणे व जमिनीत मुरवणे हेच असल्याचे कृषी विभागाने केले आहे. शेत शोषखड्ड्याचे फायदे शोषखड्ड्यामुळे जम...