यशोगाथा : संघर्षातून उभारला ‘अद्विक गृहउद्योग’
हळद, मिरची, मसाले प्रक्रिया उद्योगातून लाखांचे उत्पन्न आर्णीतील बोरगाव येथील उद्योजिका जयश्री पुनवटकर यांची प्रेरणादायी वाटचाल यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील जयश्री जितेंद्र पुनवटकर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अत्यंत कठीण परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधला आहे. बारावी (कला) पर्यंत शिक्षण घेतलेल्या जयश्री पुनवटकर यांनी ‘अद्विक गृहउद्योग’ नावाने ‘हळद प्रक्रिया उद्योग’ उभारून केवळ स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, तर इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. जयश्री पुनवटकर यांचे कुटुंब मजूरदार वर्गातील होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कपडे शिवण्याचे काम सुरू केले होते, परंतु त्यातून महिन्याला केवळ ३ ते ४ हजार रुपये उत्पन्न मिळत होते. हा व्यवसाय स्थिर नव्हता आणि नियमित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होत होते. कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी नवीन आणि दीर्घकाळ टिकणारा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्धार केला. “स्वतःचा उद्योग सुरू करायचा” हे त्यांचे ध्येय होते. या प्रवा...