Posts

कर्जमुक्ती बाबत शेतकऱ्यांना पडणारे काही प्रश्न आणि उत्तरे

Image
 कर्जमुक्ती बाबत शेतकऱ्यांना पडणारे काही प्रश्न आणि उत्तरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ : #कर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाराष्ट्रशासन

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेतील गावांच्या सरंपच/सचिवांना ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण

Image
    यवतमाळ, दि. 6 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील सन 2018-19 ते 2025-26 मध्ये 41 गावांची निवड करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने आज दि.6 जुलै रोजी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायतमधील सरपंच/सचिव यांची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये उपस्थ‍ित सरंपच/सचिव व कॅम्पुटर ऑपरेटर यांना प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेचे प्रपत्र 1 ते 8 व ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रत्येक गावांचा युजर आयडी व पासवर्ड तयार करण्यात आले असून, त्याची माहिती संबंधित ग्राम विकास अधिकारी यांना अवगत करण्यात आली. तसेच या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रपत्र 1,2,3 अ व 3 ब आणि प्रपत्र 4 भरण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास सहाय्यक आयुक्त  मंगला मून, प्रशांत विष्णू साठे व निवड झालेल्या 41 गावांचे सरपंच/सचिव व संगणक ऑपरेटर उपस्थ‍ित होते. 0000

कृषी संलग्न व्यवसाय वृद्धीसाठी ओबीसी महामंडळाचे बिनव्याजी कर्ज

     >स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी   यवतमाळ, दि. ६ : राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत कृषी संलग्न व्यवसाय वृद्धीसाठी अत्यंत अल्प व्याजदराने तसेच बिनव्याजी दराने कर्ज वितरीत करण्यात येते. महामंडळाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी महाराष्ट‍्रराज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यवतमाळ यांचे कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस वसाहतीच्या मागे, दारव्हा रोड, यवतमाळ तसेच www.msobcfdc.in   येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सुशांत बेजलवार यांनी केला आहे 00000

नेर तालुक्यात मतदार यादी पुनरीक्षण कामाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Image
यवतमाळ : जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काल नेर तालुक्याला भेट देऊन मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO), बीएलओ सुपरवायझर तसेच बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. तसेच मतदार यादी पुनरीक्षणाची कार्यपद्धती, नोंदणी प्रक्रिया आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. मतदार यादी पुनरीक्षणाचे काम निर्धारित वेळेत आणि अचूकपणे पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.  तसेच कामामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार

Image
• राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम ;  • मृद व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय निर्गमित यवतमाळ/ मुंबई, दि.३ : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस, २१ ऑगस्ट हा यापुढे दरवर्षी शासकीय स्तरावर ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय मृद व जलसंधारण विभागाने निर्गमित केला. सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन १० मे हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून २००३ पासून साजरा केला जात होता. मात्र आता त्यात बदल करून त्यांच्या जन्मदिवशी २१ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. नाईक यांचे जलसंधारणातील योगदान १९९१ ते १९९३ या काळात मुख्यमंत्री असताना राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांनी मोठ्या धरणांवर अवलंबून न राहता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र देत पाणलोट विकास आणि भूजल पुनर्भरणावर भर दिला होता. १९९२ साली स्वतंत्र जलसंधारण विभागाची स्थापना करून जलसंधारणाची लोकचळवळ उभी केली. रोजगार हमी योजनेचा वापर जलसंधारणाच्या कामांसाठी करून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसोबतच जलसाठे नि...

लख्खीशाह बंजारा यांचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी: पालकमंत्री संजय राठोड

Image
> उत्साहपूर्ण वातावरणात जयंती सोहळा संपन्न   > सामाजिक एकतेचा दिला संदेश यवतमाळ, दि. ४ : भारतीय इतिहासातील अद्वितीय पराक्रम, अतुलनीय त्याग, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतीक असलेले महान योद्धा लख्खीशाह बंजारा यांचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.  लख्खीशाह बंजारा यांच्या ४४६ व्या जयंतीनिमित्त शनिवारी यवतमाळ येथील कार्यालयातील सभागृहात आयोजित अभिवादन सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. टी. सी. राठोड होते. प्रसिद्ध कीर्तनकार व उद्बोधनकार राजुदास जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.   यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, “लख्खीशाह बंजारा हे केवळ बंजारा समाजाचे नव्हे, तर संपूर्ण भारतीय राष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या शौर्य, दानशूरता, राष्ट्रनिष्ठा आण...

पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ ; प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात

Image
यवतमाळ, दि. ४ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, लाभ वितरणासाठी शासन यंत्रणा सज्ज झाली आहे.   राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी 'महाकर्जमुक्ती योजना' म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. विविध बँकांकडून प्राप्त झालेल्या पात्र कर्जदारांची माहिती, ई-केवायसी, आधार पडताळणी आणि खात्यांची अंतिम छाननी यासह सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वास येत आहेत. संबंधित विभाग, बँका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय साधून लाभ वितरणाची तयारी वेगाने सुरू आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे राष्ट्रीयकृत, खाजगी, प्रादेशिक ग्रामीण तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी...