Posts

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातर्फे मोफत गुडघा व खुब्याच्या सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबीर

 जिल्हा महिला व बाल रुग्णालय यवतमाळ येथे शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, मुंबई तसेच संजीवनी ममता हॉस्पिटल अॅड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे मोफत गुडघा व खुब्याच्या सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 17 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, यवतमाळ येथे होणार आहे. यवतमाळ व परिसरातील गुडघेदुखी, सांधेदुखी, चालताना त्रास, जिने चढताना अडचण तसेच गुडघ्यात सूज अशा समस्यांनी त्रस्त नागरिकांसाठी हे शिबिर लाभदायी ठरणार आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांची निवड करण्यात येणार आहे. वार्षिक उत्पन्न एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत असलेल्या व आवश्यक उत्पन्नाचा दाखला सादर करणाऱ्या पात्र रुग्णांची गुडघा व खुब्याच्या सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे. निवड झालेल्या रुग्णांवर मुंबई येथील संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येईल. शि...

सावळी सदोबा येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, सावळी सदोबा ता. आर्णी, जि. यवतमाळ येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतीगृहाची एकूण क्षमता ७५ विद्यार्थ्यांची असून पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. वसतीगृहात मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शासनाच्या निकषांनुसार डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, सावळी सदोबा यांनी केले आहे.

आर्णी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, आर्णी येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतीगृहाची एकूण क्षमता ७५ विद्यार्थ्यांची असून पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. वसतीगृहात मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शासनाच्या निकषांनुसार डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, आर्णी यांनी केले आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत संचालित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतीगृह नवीन, आनंद नगर, यवतमाळ येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती गृहपाल एस. एल. तेलंगे यांनी दिली. शासकीय वसतीगृहात विद्यार्थिनींना मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता तसेच इतर आवश्यक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी ८० टक्के, अनुसूचित जमातीसाठी ३ टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी ५ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के, दिव्यांग विद्यार्थिनींसाठी ३ टक्के तसेच अनाथ विद्यार्थिनींसाठी २ टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे. सदर प्रवर्गातील इच्छुक विद्यार्थिनींनी शासकीय वसतीगृहा...

नशामुक्त भारत अभियानांतर्गत सामाजिक सप्ताहात सहभागी व्हावे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे आवाहन

 १७ ते २६ जूनदरम्यान आयोजन  आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिन  शाळा, महाविद्यालय, वसतिगृहांनी प्रश्नमंजूषा, निबंध स्पर्धा, लघुपट, पोस्टर व स्लोगन स्पर्धांचे आयोजन करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त १७ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शासकीय व अनुदानित वसतिगृहे, व्यसनमुक्ती केंद्रे, सामाजिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे. या मोहीम कालावधीत ‘नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यामध्ये नशामुक्ती विषयक प्रश्नमंजूषा स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य लेखन, निबंध स्पर्धा, लघुचित्रफित निर्मिती व प्रसारण यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात यावेत. नशामुक्त भारत अभियान प्रश्नमंजूषामध्ये सहभागी हो...

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयारीला वेग!

सूचना व अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन जिल्हयातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करीत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणाम कारक व्हावे यासाठी जिल्हयातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. एकल महिलांच्या केवळ समस्या मांडण्याऐवजी त्या समस्यांवर शासनाने कोणत्या ठोस उपाययोजना कराव्यात, कोणत्या नव्या योजना सुरू कराव्यात, विद्यमान योजनांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत तसेच कायदे किंवा नियमांमध्ये कोणत्या सुधारणा कराव्यात याबाबत सविस्तर सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सूचना पाठविताना केवळ मतप्रदर्शन न करता संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना, संभाव्य लाभार्थी, अंमलबजावणीची पद्धत आणि अपेक्षित परिणाम यांचा समावेश असलेले सविस्तर प्रस्ताव सादर करावेत, समाजातील एकल महिलांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण निर्मिती प्रक्रियेत सर्व संबंधित घटकांचा सक्र...

यशस्विनी लोकसंचालित साधन केंद्राची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न महिला बचत गट हे महिलांच्या सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणाचे व्यासपीठ

Image
शितल संजय राठोड यांचे प्रतिपादन महिलांना २२ कोटींहून अधिक कर्जवाटप; अडीच कोटींचे धनादेश वितरण व उद्योजिकांचा गौरव महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत कार्यरत यशस्विनी लोकसंचालित साधन केंद्राची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गंगा-काशी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन शितलताई संजय राठोड यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा वृक्ष, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या सन २०२५-२६ च्या वार्षिक अहवालाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना शितलताई राठोड यांनी महिला बचत गट हे केवळ आर्थिक माध्यम नसून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. बचत गटांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून स्वावलंबनाची भावना बळकट झाली आहे. कुटुंबाच्या विकासात महिलांचे योगदान अधिक प्रभावी झाले असून आज महिला विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी उद्योग-व्यवसाय उभारून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण क...