Posts

एकल महिला धोरणासाठी 22 जूनला कार्यशाळा

 नागरिक, एकल महिला, तज्ज्ञांना सूचना व अभिप्राय नोंदवता येणार  कार्यशाळेत सहभागी व्हावे-जिल्हाधिकार ी एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर, आरोग्यविषयक तसेच पुनर्वसनासंदर्भातील प्रश्नांचा सर्वंकष विचार करून स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, एकल महिलांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच इच्छुक व्यक्ती यांच्याकडून सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी २२ जून रोजी जिल्हा परिषद परिसरातील महिला व बाल विकास भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एकल महिलांसाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली होती. या अनुषंगाने महिला व बाल विकास मंत्री तथा राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मसुदा समिती गठित करण्यात आली आहे. दिनांक 1 जून 2026 रोजी आयोजित राज्यस्तरीय मसुदा समितीच्या बैठकीत एकल महिला धोरण अधिक व्यापक व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार...

आधुनिक शेळीपालनातून समृद्धीची नवी पहाट मिळता 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना'ची साथ

शेळी व मेंढीपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कमी गुंतवणूक व जास्त परतावा देणारा हा व्यवसाय 'एटीएम' प्रमाणे ओळखला जातो. बाजारपेठेत शेळीच्या मांसाला दिवसेंदिवस वाढणारी मागणी व मिळणारा उत्तम दर लक्षात घेता, तरुणांचा या व्यवसायाकडे कल वाढत आहे. त्यातच आता 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना' अंतर्गत शेळी व मेंढीपालनासाठी भरीव आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्यामुळे तरुणांसाठी स्वयंरोजगाराची ही एक उत्तम संधी ठरणार आहे, अशी माहिती आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा. प्र.से.) यांनी दिली. ग्रामीण तरुणांसाठी शेळी-मेंढीपालन एक उत्तम स्वयंरोजगाराचा पर्याय आहे. सुशिक्षित तरुण आता 'सेमी-स्टॉल फीडिंग' (अर्ध-बंदिस्त) पद्धतीने हा व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाने करत आहेत. घरातील महिला घराचे काम सांभाळून या व्यवसायाचे व्यवस्थापन करू शकतात, ज्यामुळे त्यांना हक्काचे स्वतंत्र उत्पन्न मिळते. शेळी-मेंढी हे प्राणी कोणत्याही हवामानात (अति उष्ण किंवा कोरडे) स्वतःला जुळवून घेतात. निकृष्ट दर्जाचा चारा, झाडपाला व शेतातील उरले-सुरले अवशेष खाऊन हे प्राणी उत्तम प्रथिने (दूध आ...

'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना'; दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून समोर येत असून, राज्याच्या एकूण उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा २.८%, तर कृषी उत्पन्नातील वाटा तब्बल २५.१% इतका मोठा आहे. एकीकडे राज्याची श्रमशक्ती (१५-५९ वयोगट) २०३६ पर्यंत ९.०५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज असताना, दुसरीकडे दुग्धव्यवसायातील वाढत्या संधी ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची नवी दारे उघडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारची 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' ग्रामीण भागातील आर्थिक चित्र बदलण्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. सध्या दुग्ध उत्पादनात महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर असून राज्याचे उत्पादन १६.६२ MMT (६.७%) इतके असून वार्षिक उत्पादन वाढीचा दर ३.६% असला, तरी भारतीय आरोग्य परिषदेच्या मानकांनुसार प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन ३५८ ग्रॅम दुधाची गरज आहे. सद्यस्थितीत ही उपलब्धता केवळ ३०० ग्रॅम असून, ही ५८ ग्रॅमची तूट भरून काढण्यासाठी राज्यात दुग्धोत्पादनाला मोठे पोषक वातावरण उपलब्ध आहे. वाढती लोकसंख्या व दुधाची निकड लक्षात घेता, ग्रामीण भागात पशुपालनाकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता एक 'उद्योजक...

मुरघास संयंत्र वाटप योजना : पशुपालकांना उद्योजक होण्याची संधी!

पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिकतेची जोड देऊन पशुपालकांना उद्योजक बनवण्यासाठी शासनाकडून 'मुरघास संयंत्र वाटप' ही महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे पशुपालकांना मुरघास हार्वेस्टर व बेलर संयंत्रावर भरघोस अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असून, जास्तीत जास्त पात्र पशुपालक व शेतकरी समुहगटांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकाच वेळी चार ओळी हार्वेस्ट करणारे मुरघास हार्वेस्टर आणि मुरघास बेलर संयंत्र दिले जाणार आहे. या उपकरणाची मर्यादा २६ लाख रुपयांपर्यंत असून, सर्वसाधारण प्रवर्गसाठी ५० टक्के अनुदान (कमाल रु. १३ लाख) तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी ७५ टक्के अनुदान (कमाल रु. १९.५० लाख) मिळणार आहे. कोणाला मिळणार लाभ? योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे खालील बाबी असणे आवश्यक आहे:  किमान १० मोठे पशुधन किंवा १०० शेळ्या / मेंढ्या असणे अनिवार्य.  स्वतःचा किमान ५० HP चा ट्रॅक्टर असणे आवश्यक.  निवडीमध्ये अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, वनहक्क धारक व महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाई...

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरणाला मोहिम स्वरुपात प्रारंभ

लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या पुर्तीसाठी पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. राज्यात 'मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम' आता युद्धपातळीवर व मोहीम स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पशुधनाचे आरोग्य राखणे व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हे आपले मुख्य ध्येय असून, निश्चित केलेल्या लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या शंभर टक्के पूर्तीसाठी विभागाने काटेकोर नियोजन केले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिली. या मोहिमेत सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या घटसर्प व फऱ्या यांसारख्या घातक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीची गुणवत्ता टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की, लसीचा प्रभाव उत्तम राहण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवण्यात आले आहे. राज्यस्तरापासून ते थेट ग्रामीण भागातील उपकेंद्रांपर्यंत लस पोहोचवताना आवश...

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे आवाहन जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या 'एल निनो'च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी केले आहे. पशुपालकांना या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालक व शेतकरी यांना पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाई व म्हशींच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात घट होऊ नये म्हणून पशुपालकांनी पोषक असणाऱ्या चारा पिकांची लागवड करावी. अशी पिके निवडावीत ज्यातून मुख्य शेतमाल (धान्य/उत्पादन) तर मिळेलच, सोबतीला जनावरांच्या पोषणासाठी दर्जेदार चाराही उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर अथवा पडीक जमिनीवर येणारे नैसर्गिक गवत वाया न घालवता त्याचे योग्य जतन करावे. पावसाची ओढ किंवा टंचाईच्या संकट काळात हेच ग...

१५ दिवसात एसटीच्या उत्पन्नात ४३ कोटी ८३ लाखांची वाढ प्रति दिन उत्पन्न ३ कोटी रुपयांनी वाढले

परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीमती प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले असून त्याचा थेट सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर दिसून आला आहे. १ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत एसटी महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न ४९५,कोटी ३४ लाख रुपये इतके झाले असून, मागील वर्षीच्या याच कालावधीतील ४५१, कोटी ५१ लाख रुपयांच्या तुलनेत ४३ कोटी ८३ लाख रुपयांची (९.७१ टक्के) वाढ नोंदविण्यात आली आहे. म्हणजे दररोज चे सरासरी उत्पन्न ३ कोटी रुपयांनी वाढले आहे. या कालावधीत रायगड (२ कोटी १७ लाख), पुणे (५ कोटी ९७ लाख), सातारा (३ कोटी ४६ लाख), छत्रपती संभाजीनगर (२ कोटी ६६ लाख), अमरावती (१ कोटी ६० लाख) नांदेड (२ कोटी २७ लाख) या विभागांनी सर्वाधिक उत्पन्नवाढ नोंदवली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ...