Posts

केंद्रीय विद्यालयातील कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा Ø विद्यालय व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न

Image
यवतमाळ, दि. १३ (जिमाका) : येथील केंद्रीय विद्यालयाच्या प्रशासन आणि विकासकामांसाठी कार्यरत विद्यालय व्यवस्थापन समितीची जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष विकास मीना यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला प्राचार्य किरण मेंढे, डायटचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत, अमोलकचंद विद्यालयाचे प्रा.डॉ. राहुल एकबोटे, अनिल इंगोले, प्रा. साहेबराव कदम, रचना घुगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र रामटेके, जि.पचे कार्यकारी अभियंता एस श्रावगी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्ताचा आढावा घेतला. त्यानंतर विद्यालयातल्या चालू वर्षातील नोंदणीची स्थिती, विद्यार्थ्यांची कामगिरी, देखभाल, संवर्धन आणि सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंगने नियुक्ती, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदांसाठी कंत्राटी शिक्षकांचे पॅनेल तयार करणे, विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी रस्त्याचे बांधकाम, नवीन इमारतीत पाईप लाईन जोडणी आणि गटार व्यवस्था, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसवणे, कचरा व्यवस्थापन करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात आग लागून होणाऱ्या ट्रॅव्हल्स अपघाताच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी जिल्हाधिकारी विकास मीना यांचे ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांना पत्रक

यवतमाळ, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यात आग लागून ट्रॅव्हल्स अपघात होणे यामध्ये जीवितहानी झाल्याच्या घटनांची नोंद यापूर्वी झालेली असून आग लागून अपघात होणे यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पुढील कालावधीत अशा घटनांची नोंद होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्रक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांना पत्रक जारी केले आहे. या मार्गदर्शक सुचनानुसार, प्रत्येक ट्रॅव्हल्स मालक यांनी दर पंधरा दिवसांनी आपल्या वाहनाची वेळोवेळी तांत्रिक व्यक्ती यांच्याकडून तपासणी करण्यात यावी, वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाऊ नये,लांब पल्ल्याच्या प्रवासाला रात्री पाळी द्रुतगती रोडवर गाडी चालवताना दोन चालक ठेवावीत जेणेकरून त्यांच्याकडून आळीपाळीने गाडी चालवता येईल, ट्रॅव्हल्स मालक यांनी आपल्या संस्थेतील सर्व चालक, वाहक, सफाई कामगार यांची महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी करणे बंधनकारक राहील, सर्व ट्रॅव्हल्स मालक यांनी परिवहन विभाग यांनी आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्यास प्रवासी...

जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणीसाठी १०४ हेल्पलाईन क्रमांकावर मिळणार मार्गदर्शन

यवतमाळ, दि. 13 (जिमाका) : जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी ही प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया आहे. या नोंदणीबाबत नागरिकांना अचूक आणि सविस्तर माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य सल्ला केंद्रामार्फत १०४ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी, नोंदणीसाठीची कालमर्यादा, प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी तसेच संबंधित कायदे व नियमांविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच नोंदणी करताना घ्यावयाची खबरदारी याबाबतही सल्ला दिला जाणार आहे. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणी संदर्भातील माहितीसाठी १०४ या हेल्पलाईन क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म-मृत्यू डॉ. सुभाष ढोले यांनी केले आहे.

महिला लोकशाही दिन 16 फेब्रुवारी रोजी

यवतमाळ, दि. 13 (जिमाका) : महिलांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दि.16 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह तक्रार सादर करावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

नेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्हचे २२ फेब्रुवारीला आयोजन

यवतमाळ, दि.13 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अंतर्गत मॉडेल करिअर सेंटर व सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ फेब्रुवारी रोजी क्रीडा संकुल, नेर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मेळाव्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार भरती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कंपनी सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असून देशभरात २२ क्षेत्रीय मुख्यालये तसेच ३० शाखा कार्यालये विविध राज्यांमध्ये स्थापन आहेत. कंपनीअंतर्गत निवड झालेले उमेदवार विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत. या भरती अभियानाअंतर्गत सुरक्षा जवान पदासाठी ३०० जागा असून किमान दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र असतील. उमेदवारांचे वय १९ ते ४० वर्षे दरम्यान असावे. उंची किमान १६८ सेंटीमीटर व वजन ५८ ते ९० किलो असणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी ५० जागा उपलब्ध असून किमान बारावी उत्तीर्ण उमेदवार पात्र असतील. या पदासाठी वयोगट १९ ते ४० वर्षे असून उंची किमान १७० सेंटीमीटर व वजन ५८ ते ...

झरी जामणीत 'संपूर्णता अभियाना'ला प्रारंभ Ø आमदार संजय देरकर यांच्या हस्ते उद्घाटन

Image
यवतमाळ, दि.12 (जिमाका) : निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत झरी जामणीत “संपूर्णता अभियान 2.0” चे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते पंचायत समितीच्या मुख्य सभागृहात नुकताच पार पडले. या कार्यक्रमास तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींचे सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत विकास अधिकारी तसेच विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. 28 जानेवारी ते 14 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत महिला व बालविकास, पशुसंवर्धन, आणि शिक्ष्ण विभागांनी एकत्रितपणे काम करुन दर्शकांची 100 टक्के संपृक्तता साध्य करण्याचे आवाहन आमदार संजय देरकर यावेळी केले. या दर्शकांमध्ये महिला व बालविकास विभागांतर्गत 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील पूरक आहार घेणारी मुले, अंगणवाडी केंद्रातील नोंदणीकृत मुलांची मोजमाप कार्यक्षमता, कार्यरत शौचालय असलेली अंगणवाडी केंद्रे तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेली अंगणवाडी केंद्रे हे दर्शक निश्चित करण्यात आले आहेत. शिक्षण विभागांतर्गत पुरेशा मुलींच्या शौचालय सुविधांसह शाळा हा दर्शक असून, पशुसंवर्धन विभागांतर्गत लसीकरण झालेल्या गोवंशीय जनावरांची टक्क...

बांधकाम कामगारांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप तालुकास्तरावर होणार ! Ø जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश Ø गर्दी, कायदा व सुव्यव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय Ø एका दिवशी 500 बांधकाम कामगारांना वाटप

यवतमाळ,दि.१२ (जिमाका) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत जीवित (सक्रिय) बांधकाम कामगारांना गृहपयोगी व सुरक्षा संच आणि अत्यावश्यक साहित्याचे वाटप तालुकास्तरावर करावे. जेणेकरून इतर तालुक्यातील कामगारांची गैरसोय होणार नाही व गर्दी टळेल. तसेच जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थाअबाधित राहील याची दक्षता घेण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिला आहे. सरकारी कामगारअधिकारी कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पुसद व दारव्हा येथे गृहपयोगी व सुरक्षा संच तसेच अत्यावश्यक साहित्याचे वाटप सुरू होते. मात्र, या वाटपावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हे वाटप तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदीत जिवीत (सक्रीय) बांधकाम कामगारांना गृहपयोगी संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप कंत्राटदारामार्फत मंगळवारी दि.10 फेब्रुवारी रोजी शेलु बुद्रुक, ता. पुसद व शंकर जिनिंग अॅण्ड प्रेसिंग, जुना दिग्रस...