Posts

२६ एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक

>वैद्यकीय महाविद्यालयात पाच मतदान केंद्र ; मतदार यादी प्रसिद्ध यवतमाळ, दि. २३ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २०२६ येत्या २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार असून, या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील २०४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे पाच मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्र क्रमांक १ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक १ येथे मतदार क्रमांक १ ते ४००, मतदान केंद्र क्रमांक २ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक ४०१ ते ८००, मतदान केंद्र क्रमांक ३ लायब्ररी कम सेमिनार रूम येथे मतदार क्रमांक ८०१ ते १२००, मतदान केंद्र क्रमांक ४ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक १ येथे मतदार क्रमांक १२०१ ते १६००, तर मतदान केंद्र क्रमांक ५ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक १६०१ ते २०४२ यांची मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांची यादी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांनी आपला मतदान केंद्र क्रमांक आणि इतर तपशील संकेत...

जिल्ह्यात २७ एप्रिलपासून १९ मेपर्यंत विशेष कर्करोग निदान मोहीम

यवतमाळ, दि. २३ : जिल्ह्यात २७ एप्रिल ते १९ मे २०२६ या कालावधीत विशेष कर्करोग निदान मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांसाठी मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत कॅन्सर डायग्नोसिस व्हॅनद्वारे मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाच्या संशयित रुग्णांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत असून उच्च रक्तदाब, मधुमेह, स्ट्रोक, हृदयरोग तसेच विविध प्रकारच्या कर्करोगांचे निदान व उपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करण्यात येतात. यवतमाळ जिल्ह्यात हा कार्यक्रम सन २०१८ पासून प्रभावीपणे सुरू आहे. याच अंतर्गत जिल्ह्यासाठी विशेष कॅन्सर निदान व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञ व दंत शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाची तपासणी केली जाईल. तपासणीदरम्यान संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन व संदर्भ सेवा उपलब्...

डिजिटल जनगणनेत नागरिकांनाही स्व-गणना करता येणार

> १ मे पासून ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा ; > नागरिकांनी स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा ; > जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन यवतमाळ, दि. २३ : भारताच्या १६ व्या जनगणनेचे कामकाज सुरु झाले असून राज्यात १ मे पासून डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. त्याअंतर्गत शासनाने नागरिकांसाठी स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करुन दिली असून नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून स्व-गणना करुन राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ऑनलाईनरित्या स्व-गणना करता येणार असून या स्व-गणनेत नागरिकांना स्वत:सह कुटुंबांची माहिती भरता येणार आहे. त्यासाठी भारत सरकारच्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॅागीन करावे. त्यानंतर जिओ लोकेशन समाविष्ट करुन कुटुंबाबाबत विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर त्याचा ११ अंकी एसई क्रमांक तयार झाल्यानंतर तो जतन करुन ठेवावा. हा...

शेतकरी उत्पादक कंपनी, अशासकीय संस्था व स्वयं-सहाय्यता गटांसाठी ‘संवाद सेतू कार्यशाळा’

Image
जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, अशासकीय संस्था व स्वयं-सहाय्यता गट यांच्यासाठी “संवाद सेतू कार्यशाळा” जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना सभागृह येथे बुधवारी उत्साहात संपन्न झाली. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे २७० सभासदांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा मनोजकुमार ढगे, प्रकल्प उपसंचालक व्यंकट कुंतावर यांनी केले होते. कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट विविध विभागांमधील समन्वय वाढवून शेतकरी गटांना शासकीय योजनांची माहिती व लाभ अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे हे होते. कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण मनोजकुमार ढगे यांनी केले. कृषी संलग्न विविध विभागांतील विभाग प्रमुखांनी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम, कृषी पर्यटन, महाउर्जा, नाबार्ड, जिल्हा अग्रणी बँक, कृषी विज्ञान केंद्र तसेच शेतमाल खरेदी करणारी कंपनी रुपीया फिनोव्हेशन प्रा. लि. यांचा समावेश होता. संबंधित तज्ज्ञांनी विविध योजनांची माहिती, वित्तीय सहा...

जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा सुविधा निर्मितीचा आढाव

Image
जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न जिल्हयात क्रीडा सुविधा निर्मितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा सभा बुधवारी संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी क्रीडा सुविधा निर्मितीचा आढावा घेतला. यात आझाद मैदान येथील जलतरण तलाव दुरुस्ती, फिल्टर प्लांट, सिंथेटिक हॅंन्डबॅाल मैदान, दुकान बांधकाम, ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान इ. कामांबाबत आढावा घेवून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दर्जेदार कामे झाली पाहिजेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा क्रीडा संकुल भेट देवून प्रस्तावित कामांच्या जागेची पाहणी करुन आवश्यक सुधारणात्मक सूचना दिल्या.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळणार

 पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाकडे ३० एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज सादर करा  प्रकल्प अधिकारी रेवैय्या डोंगरे यांचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, कळंब, बाभूळगाव व यवतमाळ या तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शहरातील नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३० एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी रेवैय्या डोंगरे यांनी केले आहे. या योजनेसाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न कमाल १ लाखांपर्यंत असावे. विद्यार्थ्याचे वय ६ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अंगणवाडी/ग्रामसेवक प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. दारिद्र्यरेषेखालील, विधवा, घटस्फोटीत, निराधार किंवा परि...

रेस्टॉरंट व हॉटेल्समध्ये चीज अॅनालॉग वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी लेबलिंग व माहिती स्पष्ट करण्याचे आदेश अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ हा जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, नागरिकांना सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पनीर हा आहारातील महत्त्वाचा घटक असून, तो प्रथिने, कॅल्शियम व जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. मात्र पनीर आणि चीज अॅनालॉग यामध्ये मोठा फरक असून, अॅनालॉग पदार्थ दूधाव्यतिरिक्त तेल, स्टार्च व इतर घटकांपासून तयार केला जातो. तो पनीरसारखा दिसत असला तरी तो प्रत्यक्षात पनीर नसतो, असे अन्न सुरक्षा मानकांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की काही रेस्टॉरंट, हॉटेल, केटरर्स व फास्ट फूड विक्रेते चीज अॅनालॉगचा वापर करून अन्नपदार्थ तयार करत असून, ग्राहकांना याबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काही ठिकाणी तर “पनीर” किंवा “चीज” या नावानेच अॅनालॉग पदार्थ विकले जात असल्याचे आढळून आले आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार अन्न व्यवसायिकांनी ग्राहकांना घटकपदार्थांची योग्य माहिती देणे बंधनकार...