Posts

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार यवतमाळ जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी दिली आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे तसेच मतदार याद्या अधिक अचूक व पारदर्शक करण हा मुख्य उद्देश आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अर्हता दिनांक १ ऑक्टोबर २०२६ राहणार असून २० जून ते २९ जून या कालावधीत तयारी, प्रशिक्षण व छपाईची कामे पार पडतील. तसेच ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओमार्फत घरोघरी भेटी घेऊन प्रगनणा करण्यात येणार आहे. तसेच २९ जुलैपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येईल. ५ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. दावे व हरकतींचे निवार...

इस्त्राईलमध्ये आरोग्य क्षेत्रात नोकरीची संधी

 होम बेस्ड केअरगिव्हरचे ३५०० पदे रिक्त  १ लाख ९९ हजार रुपये प्रति महिना मिळणार पगार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पामार्फत इस्त्राईल देशात आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील कुशल युवक-युवतींना जागतिक रोजगार बाजारपेठेशी जोडण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत इस्त्राईलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ (घरगुती काळजीवाहू) पदासाठी एकूण ३५०० रिक्त जागा उपलब्ध आहेत. यामध्ये ९० टक्के महिला व १० टक्के पुरुष उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com/jobApply.aspx या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. या पदासाठी उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असावे. किमान १० वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक असून इंग्रजी भाषेचे मध्यम स्तरावरील ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराने केअरगिव्हिंग सेवांमध्ये प्रशिक्षण घेतलेले असावे व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केल्याचे भारतीय मान्यताप्राप्त प्...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर

Image
 मूलभूत कर्तव्ये, वैकल्पिक वाद निवारण व बाल-स्नेही कायदेशीर सेवा योजनांवर मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शेखर सी. मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व श्री वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मे रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. “नागरिकांचे मूलभूत कर्तव्य तसेच वैकल्पिक वाद निवारण पद्धती व त्यांचे फायदे, नालसा मुलांसाठी बाल-स्नेही कायदेशीर सेवा योजना २०२४, पोक्सो कायदा तसेच जागृती न्याय तळागाळातील माहिती आणि पारदर्शकता उपक्रम योजना २०२५” या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळचे सचिव दिपक एच. दाभाडे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता अंजली एम. गहरवाल उपस्थित होत्या. कार्यक्रमात मुख्य लोकअभिरक्षक एस. टी. कुलकर्णी व पॅनल वकील सोनाल...

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे ‘ट्रायबल फेलो’ची भरती

 २५ मे रोजी मुलाखतीचे आयोजन; २० हजार रुपये मिळणार मानधन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत दोन ट्रायबल फेलो पदांच्या निवडीसाठी वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड १० महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक २५ मे रोजी सकाळी १०.३० वाजेपासून वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रायबल फेलो पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान ६० टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संगणक व इंटरनेट हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय २१ ते २६ वर्षांदरम्यान असावे. याशिवाय किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव (इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप किंवा स्वयंसेवी संस्थेमधील अनुभव) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आदिवासी क्षेत्रात आदिवासी समुदायासोबत कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य राहील....

महाराजस्व समाधान शिबिरात लाभार्थ्यांना ३ लाख १६ हजार दाखले, प्रमाणपत्र वितरित

Image
 ७ मार्च ते १५ मे दरम्यान शिबिरांचे आयोजन  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  ६६ हजार डिजिटल सातबारे वितरित राज्य शासनाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १०९ मंडळांमध्ये ७ मार्च ते १५ मे या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत आयोजित शिबिरांना सर्वच मंडळात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या समाधान शिबिराअंर्तगत आतापर्यंत विविध प्रकारचे ३ लाख १६ हजार ७१८ दाखले व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम व पत्रकार बांधव उपस्थित होते. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील शिबिरामध्ये आरोग्य, शिक्षण, पोलीस, पशुसंवर्धन, कृषी आदी २२ विभाग एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना योजनेची माहिती व लाभ देण्यात आला. तसेच आतापर्यंत झालेल्या सर्वच शिबिरामध्ये महसूल...

महिला लोकशाही दिन 18 मे रोजी

महिलांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दि.18 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह तक्रार सादर करावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

हस्तलिखित वारसांच्या जतन, संवर्धनासाठी ‘ज्ञान भारतम् अभियान

हस्तलिखितांची डिजिटल नोंद करता येणार ! ‘ज्ञान भारतम् पोर्टल, ॲपवर हस्तलिखितांची नोंदणी करण्याचे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने देशभरात ‘ज्ञान भारतम्’ प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले असून, भारताच्या समृद्ध हस्तलिखित वारसाचे जतन, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी हा महत्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम आहे. पुराभिलेख संचालनालय, यांनी दिलेल्या ‘ज्ञान भारतम्’ तसेच संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांनी उपलब्ध करून दिलेल्या वापरकर्ता मार्गदर्शकनुसार देवस्थान, न्यास व संस्थांकडे उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांची माहिती ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल अॅपमध्ये नोंदविण्याच्या सूचना संबंधित विश्वस्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच ‘ज्ञान भारतम्’ पोर्टलवर नमूद केल्याप्रमाणे ऐतिहासिक व धार्मिक स्वरूपाचे प्राचीन साहित्य, जसे हस्तलिखिते, पोथ्या, पुराणे आणि तत्सम साहित्याची डिजिटल स्वरूपात नोंद संबंधित देवस्थान, न्यास व संस्थांनी पोर्टलवर करावयाची आहे. धार्मिक स्थळांचे विश्वस्त, संस्था, मठ, मंदिरे तसेच वाचनालय तसेच हस्तलिखितांचे जतन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी उपलब्ध हस्तलिखितांची माहि...