Posts

यवतमाळ जिल्ह्यात “आपदा मित्र” ची दुसरी बॅच सुरू

Image
150 प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण यवतमाळ, दि.10 (जिमाका) : जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून “आपदा मित्र” योजनेअंतर्गत दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या बॅचमध्ये एकूण 150 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून त्यांना विविध आपत्ती परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणामध्ये पूर, आग, भूकंप, वादळ, अपघात अशा विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी बचावकार्य कसे करावे, प्रथमोपचार कसे द्यावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत समन्वय कसा साधावा याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष सराव (Mock Drill) द्वारे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा अनुभवही दिला जात आहे. “आपदा मित्र” योजनेचा मुख्य उद्देश स्थानिक स्वयंसेवकांना प्रशिक्षित करून आपत्तीच्या वेळी तत्काळ मदत उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे आपत्तीच्या वेळी जीवित व वित्तहानी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्य...

काढणीपश्चात व्यवस्थापनांतर्गत कमी खर्चाच्या कांदाचाळ लसूण साठवणूक गृह योजना

 महाडीबीटी पोटलवर अर्ज करा  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांचे आवाहन यवतमाळ, दि.10 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२६-२७ अंतर्गत काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रम कमी खर्चाचे कांदाचाळ किंवा लसूण साठवणूक गृह उभारणीचा घटक राबविण्यात येत आहे. राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असताना अनेक शेतकरी कांदा जमिनीवर पसरवून किंवा पारंपरिक चाळीत साठवतात, त्यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढते तसेच गुणवत्तेवर व टिकाऊपणावर विपरीत परिणाम होतो. यासाठी शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारणी केल्यास कांद्याची गुणवत्ता टिकून राहते व शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळू शकतो. एकात्मिक फलोत्पादन विकास या योजनेअंतर्गत ५ ते २५ मेट्रिक टन, २५ ते ५०० मेट्रिक टन व ५०० ते १००० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. प्रकल्प खर्च ३० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास बँक कर्ज (क्रेडिट लिंक्ड बॅक एंडेड सबसिडी) घेणे बंधनकारक राहणार असून अनुदान कर्ज परतफेडीच्या स्वरूपात मिळेल. खर्चाच्या मापदंडानुसार ५ ते २५ मे.टन क्षमतेसाठी ८ हजार रुपये प्रति मे...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे योजना

 75 टक्के अनुदान मिळणार  शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन यवतमाळ, दि.10 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२६-२७ अंतर्गत सामूहिक शेततळे ही योजना ७५ टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. पाण्याचे स्रोत निर्माण करून साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागांचे संरक्षण व्हावे, यासाठी शेततळ्यांना दर्जेदार प्लास्टिक फिल्मचे अस्तरीकरण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. या योजनेअंतर्गत शेततळ्यांसाठी तीन मॉडेल निश्चित करण्यात आले आहेत. मॉडेल एक करीता ३४ x ३४ x ४.७ मी. साठी ५००० घनमीटर क्षमतेवर ४ लाख रुपये खर्चाचे मापदंड असून ३ लाख रुपये अनुदान देय आहे. मॉडेल दोन करीता ३० x ३० x ४.४ मी. साठी ३५०० घनमीटर क्षमतेवर २.८० लाख रुपये खर्चाचे मापदंड असून २.१० लाख रुपये अनुदान मिळणार आहे. मॉडेल तीन करीता २४ x २४ x ४.० मी. साठी २००० घनमीटर क्षमतेवर १.६० लाख रुपये खर्चाचे मापदंड असून १.२० लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानाची रक्कम शेततळ्याची खोदाई, अस्तरीकरण व कुंपण आदी कामे पूर्ण झाल्यानंतर एकाच टप्प्यात दिली जाणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी प...

हत्तीरोग निर्मूलनासाठी टीएएस मोहिमेचे उद्घाटन

Image
हत्तीरोग संक्रमण तपासणी व पडताळणी होणार यवतमाळ, दि.10 (जिमाका) : हत्तीरोग संक्रमण तपासणी व पडताळणी टीएएस २०२६ मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. नागरी आरोग्य केंद्र क्र. २, वंजारी फैल अंतर्गत स्वर्गीय विष्णुपंत उगलमुगले नगरपरिषद शाळा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच हत्तीरोग निर्मूलनाचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तनवीर शेख, जागतिक आरोग्य संघटनेचे डब्ल्यूएचओ डॉ. समाधान देबाजे, ग्रामीण रुग्णालय कळंबचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर मडावी, नगरपरिषद प्रशासन अधिकारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. २ यूपीएचसी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नाझिया काझी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती सेंगर, तसेच डॉ. विनोद डवले आणि केंद्र प्रमुख डॉ. विलास काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान डॉ. नाझिया काझी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष आरोग्य तपासणी...

जनगणनेसाठी फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण

Image
 जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक व गांभीर्याने करा  जिल्हाधिकारी विकास मीना यांची सूचना  अचूक माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन यवतमाळ, दि.१० (जिमाका) : आगामी जनगणना २०२७ ही व्यापक व यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली दि. ६ ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत फिल्ड ट्रेनर यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार विद्या शिंदे, जनगणना संचालनालयाचे मास्टर ट्रेनर सहाय्यक संचालक प्रविण भगत, सांख्यिकी अन्वेषक विशाल दिवेकर, जिल्ह्याचे मास्टर ट्रेनर तहसीलदार राहुल मोरे, एकनाथ बिजवे तसेच जिल्हा समन्वयक जतिन माहेश्वरी उपस्थित होते. याशिवाय चार्ज स्तरावरील अधिकारी व कर्मचारी फिल्ड ट्रेनर म्हणून सहभागी झाले होते. प्रशिक्षणादरम्यान जनगणनेच्या प्रत्येक टप्प्यावर संबंधित अधिकारी व फिल्ड ट्रेनर यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली. घर यादी व घर गणना प्रभावीपणे राबविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईल ॲपचा वापर, नागरिकांकडून माहिती संकलन करताना विचारावयाच्...

महिला बचत गटांसाठी आर्थिक उन्नतीची संधी

Image
विशेष वृत्त कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महिला बचत गटांचे योगदान दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत आहे. केवळ बचत आणि कर्जपुरवठ्यापुरते मर्यादित न राहता हे गट आता उत्पादनक्षम उपक्रमांमध्येही पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोकरा) अंतर्गत राबविण्यात येणारी ‘एक गाव – एक कृषी अवजारे बँक’ ही योजना महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीतील वाढता खर्च, मजुरांची कमतरता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव या समस्यांवर मात करण्यासाठी ही संकल्पना उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः यवतमाळसारख्या शेतीप्रधान आणि आव्हानात्मक जिल्ह्यात ही योजना शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या योजनेचे प्रकल्पाच्या एकूण मूल्याच्या ६० टक्के किंवा कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असल्याने महिला बचत गटांसाठी ही मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. त्यामुळे आधुनिक कृषी अवजारे खरेदी कर...

कृषी अवजारे बँक : महिलांच्या आर्थिक क्रांतीची नवी दिशा

Image
महिला सक्षमीकरण लेख ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महिला बचत गटांचे योगदान आता केवळ बचतीपुरते मर्यादित राहिलेले नाही. कारण, राज्य शासनाच्या 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' म्हणजेच 'पोकरा'च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत जाहीर झालेली 'एक गाव – एक कृषी अवजारे बँक' अंतर्गत गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापनेची संकल्पना ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ५५९ गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे केवळ महिलांचे सक्षमीकरण होणार नाही, तर संपूर्ण गावच्या शेतीचे तंत्रज्ञान बदलण्याची क्षमता यात आहे. शेतीसमोर आज मजुरांची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च ही मोठी आव्हाने आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्याला ट्रॅक्टर, पेरणी यंत्र किंवा काढणीची आधुनिक यंत्रे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशा वेळी गावातीलच महिला बचत गटाने चालविलेली 'कृषी अवजारे बँक' हा एक उत्तम पर्याय ठरणारा आहे. महिलांच्या हाती यंत्रांची सूत्रे ये...