Posts

१ जुलैपासून विकसित भारत जी राम जी कायदा लागू होणार ; शाश्वत ग्रामीण विकासाला चालना

 १२५ दिवस रोजगाराची हमी  पायाभूत सुविधा, जलसुरक्षा, कृषी उपजिविका व शाश्वत विकासाला नवी दिशा  जनजागृती कार्यक्रमांचेही आयोजन भारत सरकारने ग्रामीण भारताच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत “विकसित भारत गॅरंटी फॅार रोजगार ॲंड आजीविका मिशन (ग्रामीण)अर्थात विकसित भारत-जी राम जी अधिनियम २०२५ हा कायदा देशातील सर्व ग्रामीण भागात १ जुलै २०२६ पासून लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. ग्रामीण विकासाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, ‘विकसित भारत @२०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेवर पूरक अशी आधुनिक, सर्वसमावेशक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि उत्पादकता-केंद्रित ग्रामीण विकास व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. नवीन कायद्यांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षामध्ये १२५ दिवसांच्या अकुशल मजुरी रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. या वाढीव रोजगार हमीमुळे ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढण्यास, उपजीविकेची सुरक्षितता मजबूत होण्यास, गावस्तरावर पायाभूत सुविधा निर्माण होण्यास तसेच शाश्वत ग्रामीण विकासाला चालना मिळण्यास मद...

महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

मारेगाव तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन उत्साहात

Image
राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4 कोटी 5 लाख रुपये निधीच्या तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आज मारेगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मौजा टाकरखेडा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ येथील भूसंपादन क्र. 34, क्षेत्र 2.00 हेक्टर शासकीय जागेवर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मारेगावचे तहसीलदार मा. श्री नीलवडे, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री अनिल पाटील देरकर, नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्के, गटविकास अधिकारी वनखंडे, तालुका क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुस्कार, माजी नगराध्यक्ष इंदुताई किन्हेकर तसेच पुरुषोत्तमजी बुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तालुक्यातील खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रगती करण्यासाठी या संकुलामुळे मोठी संधी उपलब्ध होणार असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी हे संकुल उप...

रुग्णालयातील औषध विक्रेत्याकडून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही

 मेडिकल असोशिएशनला सहायक आयुक्तांच्या सूचना  पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाशी संलग्नित, रुग्णालय इमारतीतील किंवा रुग्णालय परिसरातील विशिष्ट औषध विक्रेता आस्थापनातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करू नये, अशा स्पष्ट सूचना अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. अ.मा माणिकराव यांनी मेडिकल असोशिएशनला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सहायक आयुक्तांनी यवतमाळ जिल्ह्यातील मेडिकल असोशिएशन व इंडियन मेडिकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत आवश्यक सूचना देण्यात आल्या. या सुचनानुसार रुग्णालयाने किंवा वैद्यकीय व्यवसायिकांनी रुग्णांना लिहून दिलेल्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शनची प्रत रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना द्यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रिस्क्रिप्शन देण्यास नकार देवू नये. लिहून दिलेली औषधे कोणत्याही वैध औषध विक्रेत्याकडून घेण्याची मुभा असल्याची माहितीही देणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व संबंधित रुग्णालयांनी मराठी व इंग्रजी भाषेत ठळक अक्षरात सूचन...

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातर्फे मोफत गुडघा व खुब्याच्या सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबीर

 जिल्हा महिला व बाल रुग्णालय यवतमाळ येथे शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, मुंबई तसेच संजीवनी ममता हॉस्पिटल अॅड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे मोफत गुडघा व खुब्याच्या सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 17 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, यवतमाळ येथे होणार आहे. यवतमाळ व परिसरातील गुडघेदुखी, सांधेदुखी, चालताना त्रास, जिने चढताना अडचण तसेच गुडघ्यात सूज अशा समस्यांनी त्रस्त नागरिकांसाठी हे शिबिर लाभदायी ठरणार आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांची निवड करण्यात येणार आहे. वार्षिक उत्पन्न एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत असलेल्या व आवश्यक उत्पन्नाचा दाखला सादर करणाऱ्या पात्र रुग्णांची गुडघा व खुब्याच्या सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे. निवड झालेल्या रुग्णांवर मुंबई येथील संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येईल. शि...

सावळी सदोबा येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, सावळी सदोबा ता. आर्णी, जि. यवतमाळ येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतीगृहाची एकूण क्षमता ७५ विद्यार्थ्यांची असून पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. वसतीगृहात मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शासनाच्या निकषांनुसार डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, सावळी सदोबा यांनी केले आहे.

आर्णी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, आर्णी येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतीगृहाची एकूण क्षमता ७५ विद्यार्थ्यांची असून पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. वसतीगृहात मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शासनाच्या निकषांनुसार डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, आर्णी यांनी केले आहे.