Posts

उद्यापासून भव्य ‘यवतमाळ महोत्सव’ला प्रारंभ !

Image
 कृषी महोत्सव, पशु प्रदर्शन, समृद्धी सरस प्रदर्शन, सांस्कृतिक महोत्सव, नव तेजस्विनी प्रदर्शन, शासकीय योजनांचे प्रदर्शन, ग्रंथोत्सवाचे आयोजन  विविध कार्यक्रमांची रेलचेल  27 ते 31 मार्च या कालावधीत आयोजन  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाह यवतमाळ दि.25 (जिमाका) : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या जिल्हास्तरीय कार्यलयांच्या संयुक्त विद्यामाने शुक्रवारी दि. 27 मार्च ते 31 मार्च या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्र (वाघापूर) येथे भव्य ‘यवतमाळ महोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत केले. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अकोला, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय आणि नगर परिषद, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घ...

ग्रंथालय हे समाज, संस्कृती आणि ज्ञानाच्या प्रसाराचे केंद्र

Image
पालकमंत्री ना.संजय राठोड यांचे प्रतिपादन यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : आजच्या डिजिटल युगात ग्रंथालयाचे महत्व अबाधित आहे. ग्रंथालये ही एक चळवळ असून ते समाज, संस्कृती आणि ज्ञानाच्या प्रसाराचे केंद्र आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी केले. ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय व अशोक सार्वजनिक वाचनालय वाघापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय संघ यवतमाळच्या एक दिवसीय वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन पालकमंत्री ना. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार, बाळासाहेब धांदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन, प्रभाकर भोगे, जिल्हाध्यक्ष राजेश चव्हाण, सचिव प्रशांत पंचभाई, संजय कोल्हे, विनोद देशपांडे, मनोज रणखांब, अशोक फुटाणे यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रंथप्रेमी उपस्थित होते. पालकमंत्री ना. संजय राठोड पुढे म्हणाले, ग्रंथालये ही काळाची गरज आहे. ग्रंथालयांच्या माध्यमातून समाज उभारणीचे काम होत आहे. ग्रंथालये आणि त्यातील पायाभूत सुविधा व कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्या सोडविण्याचे काम शासनाने ह...

'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान' ;

जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींना प्रत्येकी एक कोटींचा निधी  उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी मानले आभार यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या अभियानांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान व नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. या अभियानाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील ‘अ’ वर्गातील यवतमाळ, ‘ब’ दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, ‘क’ वर्गातील घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर, पांढरकवडा या नगरपरिषदा व राळेगांव, कळंब, महागांव, मारेगांव, बाभुळगांव, झरी जामणी आणि ढाणकी या नगरपंचायत क्षेत्रातील मराठी शाळांची दर्जोन्नती, आरोग्य सुविधा, पर...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत विदर्भातील पहिले ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित शेतकरी व वीज ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठ्याची सोय

Image
यवतमाळ, दि. २४ मार्च २०२६ :राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत पुसद तालुक्यातील जाम बाजार येथे विदर्भातील पहिले ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज पुरवठ्याची सोय झाली आहे. यावेळी अधीक्षक अभियंता दीपाली माडेलवार, कार्यकारी अभियंता जनार्धन चव्हाण, शशांक पोंक्षे , उपकार्यकारी अभियंता सुहास मेश्राम,प्रविण गवळी यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांची दिवसा विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत असून, महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्राभोवती विकेंद्रीत स्वरूपात सौर प्रकल्प उभारून वीज निर्मिती केली जात आहे. तसेच काही भागात नवीन ३३ केव्ही उपकेंद्रांची उभारणीही करण्यात येत आहे. मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक अभियंते प्रविण दरोली, दिपक देवहाते व दीपाली माडेलवार यांच्या पुढाकाराने परिमंडळात या योजनेला गती देण्यात आली आहे. परिमंडळातील सुमारे २ लाख ८० हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांना या योजनेद्वार...

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

 यंदाही जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची बाजी ; एकूण 80 विद्यार्थ्यांची निवड यवतमाळ, दि.24 (जिमाका) : घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वीच्या प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत जिल्ह्यातील एकूण 80 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यापैकी यंदाही जिल्हा परिषद शाळेच्या 47 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई तर्फे 13 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. या प्रवेश परीक्षेचा निकाल 17 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असून 2025-26 आणि 2026-27 या शैक्षणिक वर्षांच्या तुलनात्मक निकालानुसार, जिल्हा परिषद शाळांमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 38 वरून 47 वर पोहोचली आहे. तर खाजगी शाळांमधील निवड 38 वरून 24 पर्यंत घटली असून, इतर शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 4 वरून 9 इतकी वाढली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा निकाल तब्बल 93.75 टक्के लागला असून, शहरी भागातील विद्यार्थ्यांचा निकाल केवळ 6.25 टक्के आहे...

मेरा युवा भारत तर्फे शहीद दिवस पदयात्रा व स्वच्छता अभियान संपन्न

Image
यवतमाळ, दि.24 (जिमाका) : ‘मेरा युवा भारत’ युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिवसानिमित्त पदयात्रा व श्रमदान स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 23 मार्च रोजी सकाळी नेहरू स्टेडियम, गोधणी रोड येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. ही पदयात्रा नेहरू स्टेडियम ते अँग्लो हिंदी हायस्कूल, जाजू चौक मार्गे हुतात्मा चौकापर्यंत नेण्यात आली. हुतात्मा चौकात देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना अभिवादन करण्यात आले. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या प्रसंगी अभ्यंकर कन्या शाळेचे उपप्राचार्य अविनाश जोशी यांनी उपस्थित युवकांना शहीद जवानांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर पदयात्रा पुन्हा जाजू चौक मार्गे नेहरू स्टेडियम येथे परतली. या पदयात्रेत ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, अनिल ढेंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सचिन हरणे, क्रीडा अधिकारी हेमंत कटयारमल, प्रा. संजय पंदीरवाल, अविनाश जोशी, यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशनच्या अध्यक्षा मनीषाताई आकरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक-यु...

शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनासाठी विशेष ‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम

 एप्रिलमध्ये आयोजन  पोकरा प्रकल्प व पाणी फाउंडेशनचा उपक्रम यवतमाळ, दि.24 (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात ‘विशेष डिजिटल शेतीशाळा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान’ अभियानाचा मुख्य टप्पा असून, बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये सुधारणा करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीकनिहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन मिळावे हा या 'डिजिटल शेतीशाळा'चा मुख्य हेतू आहे. या उपक्रमात कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, माविम, उमेद आणि आत्मा यांसारख्या विविध संस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे. डिजिटल शेतीशाळा वेळापत्रक आणि विषयानुसार हे प्रशिक्षण यूट्यूब च्या माध्यमांतून पाणी फाउंडेशनच्या https://youtube.com/@paanifoundation?si = oczLOIG|PLw- Ivic किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पच्या https://youtube.com/@pocramaharashtra?si=jAj68X_JYT79zE4 अधिकृत चॅनलवर सायंकाळी ७:३० वाजता थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. त्यामध्ये १ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तं...