Posts

मेरा युवा भारततर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त स्पर्धा

Image
              यवतमाळ, दि. 7 (जिमाका) : मेरा युवा भारत,युवा कार्यालय यवतमाळ यांच्या वतीने डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त ६ जुलै रोजी येथील केमिस्ट भवनातील वानखडे अॅकॅडमीमध्ये वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.             जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाचे नियोजन वानखडे अॅकॅडमीचे संचालक जगदीश वानखडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे उपस्थित होते. त्यांनी युवकांना मार्गदर्शन करून विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.             स्पर्धेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अनेक युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध विषयांवर प्रभावी मते मांडली. विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.             यावेळी उपस्थित युवकांना 'माय भारत' पोर्टलवर नोंदणीचे महत्त्व सांगण्यात आले. पोर्टलव...

पीक विम्यासाठी ‘इफ्को टोकियो’ जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड

              यवतमाळ, दि.7 (जिमाका) : चालु हंगामासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना पीएमएफबीवाय लागू करण्यात आली असून, या वर्षासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांची अधिकृत विमा कंपनी म्हणून निवड करण्यात आली आहे.              नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच कीड-रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.    विमा कुठे भरायचा ?             जिल्ह्यासाठी केवळ इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडेच पीक विम्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शेतकरी आपल्या जवळील सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर), महा-ई-सेवा केंद्र, बँक तसेच प्रधानमंत्री पीक विमा योज...

जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू

     शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 7   (जिमाका) : राज्यात सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या शासन निर्णयामुळे अधिसूचित महसूल मंडळात, अधिसूचित पिकाचे चालू वर्षीचे सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई लागू होणार आहे. भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तुर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा या 14 पिकांसाठी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागेल.कापूस व कांदा या व्यापारी पिकांसाठी हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के राहील. विमा योजनेत भाग घेण्यासाठी दिनांक 31 जुलै पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टलवर ऑनलाईन सहभाग नोंदवता येणार आहे. नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल (एनसीआयपी) यात भाग घेण्यासाठी बँक, कॉमन सर्विस सेंटर किंवा स्वतः शेतकरी ऑनलाइन अर्ज भरून भाग घेऊ शकतात. योजनेत भाग घेण्यासाठी शे...

सदोष बियाण्यांबाबत तक्रारी तात्काळ नोंदवा;

  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन              यवतमाळ, दि. 7   (जिमाका) : चालू हंगामात पिकांची पेरणी किंवा लागवड केल्यानंतर बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याची अथवा बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या तालुका तक्रार निवारण समितीकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे.              तक्रार दाखल करताना शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करतांना दुकानदाराकडून घेतलेले मूळ व पक्के बिल जोडावे. खरेदीच्या बिलावर शेतकऱ्याचे नाव, बियाण्याचा वाण, लॉट क्रमांक आणि किंमत स्पष्ट नमूद असावी.   ज्या शेतात   वियांण्यांची पेरणी किंवा लागवड करण्यात आली त्या शेतीचा अद्ययावत ७/१२ उतारा जोडणे अनिवार्य आहे.   तसेच शेतात कोणत्या पिकाची आणि कोण्त्या वाणाची लागवड केली आहे व   पेरणी किंवा लागवडीची अचूक तारीख आदी माहिती अर्ज...

कर्जमुक्ती बाबत शेतकऱ्यांना पडणारे काही प्रश्न आणि उत्तरे

Image
 कर्जमुक्ती बाबत शेतकऱ्यांना पडणारे काही प्रश्न आणि उत्तरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ : #कर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाराष्ट्रशासन

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेतील गावांच्या सरंपच/सचिवांना ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण

Image
    यवतमाळ, दि. 6 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील सन 2018-19 ते 2025-26 मध्ये 41 गावांची निवड करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने आज दि.6 जुलै रोजी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायतमधील सरपंच/सचिव यांची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये उपस्थ‍ित सरंपच/सचिव व कॅम्पुटर ऑपरेटर यांना प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेचे प्रपत्र 1 ते 8 व ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रत्येक गावांचा युजर आयडी व पासवर्ड तयार करण्यात आले असून, त्याची माहिती संबंधित ग्राम विकास अधिकारी यांना अवगत करण्यात आली. तसेच या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रपत्र 1,2,3 अ व 3 ब आणि प्रपत्र 4 भरण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास सहाय्यक आयुक्त  मंगला मून, प्रशांत विष्णू साठे व निवड झालेल्या 41 गावांचे सरपंच/सचिव व संगणक ऑपरेटर उपस्थ‍ित होते. 0000

कृषी संलग्न व्यवसाय वृद्धीसाठी ओबीसी महामंडळाचे बिनव्याजी कर्ज

     >स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी   यवतमाळ, दि. ६ : राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत कृषी संलग्न व्यवसाय वृद्धीसाठी अत्यंत अल्प व्याजदराने तसेच बिनव्याजी दराने कर्ज वितरीत करण्यात येते. महामंडळाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी महाराष्ट‍्रराज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यवतमाळ यांचे कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस वसाहतीच्या मागे, दारव्हा रोड, यवतमाळ तसेच www.msobcfdc.in   येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सुशांत बेजलवार यांनी केला आहे 00000