लेख : कर्जमुक्ती योजना : शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीकडे पाऊल
शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' ही केवळ कर्जमुक्तीची योजना नसून, शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीचा आणि आत्मविश्वास वाढविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणारी आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा व्यापक आवाका. या योजनेत राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या स्वतःच्या निधीतून वितरित करण्यात आलेल्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्जांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे केवळ एका विशिष्ट बँकेपुरती मर्यादित न राहता विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना समान लाभ मिळणार आहे. यासोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा स्तुत्य निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी अनेक कर्जमाफी योजनांमध्ये काही बँका किंवा वित्तीय सं...