Posts

पोकरा प्रकल्पांतर्गत विविध घटकांसाठी अनुदान

>अर्ज करण्याचे आवाहन >कृषी संलग्न व्यवसायांसाठी ६० टक्के अनुदान मिळणार यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या ‘नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२’अर्थात पोकरा प्रकल्पांतर्गत  जिल्ह्यातील निवडक ५५९ गावांमध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हवामान बदलामुळे शेती क्षेत्रासमोर निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पांतर्गत विविध घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत निवडक गावांमधील पात्र शेतकऱ्यांना वैयक्तिक घटकांमध्ये सिंचन सुविधा, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, फळबाग, बांबू व वृक्ष लागवड, रेशीम उद्योग, शेडनेट व पॉलीहाउस साहित्य, बीज उत्पादन, विहीर पुनर्भरण, गांडूळ खत व नाडेप कंपोस्ट युनिट, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, पंपसंच व पाईपद्वारे पाणी उपसा, शेळीपालन आदी घटकांसाठी विहित मार्गदर्शक सूचनांनुसार लाभ देण्यात येणार आहे. या घटकांसाठी पाच हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेले अल्प व अत्यल्पभूधा...

सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

  > दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत विविध स्पर्धा, प्रभात फेरी, पालक सभांचे आयोजित यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : आदिवासी विकास विभाग, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद या कार्यक्षेत्रातील कार्यरत असलेल्या सर्व, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह तसेच नामांकित शाळेमध्ये दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत.   या उपक्रमाची सुरुवात दि. 17 सप्टेंबरपासून सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह तसेच नामांकित शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, गावातुन प्रभात फेरी, शाळा व्यवस्थापन समिती व पालक सभांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच प्रकल्प कार्यालयातील विविध योजनांच्या माहितीचा चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे. सदर चित्ररथाव्दारे विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. हा सेवा संकल्प अभियान राज्यभर प्रभावीपणे पार पाडण्याकरीता आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांनी बैठका घेवून निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार प्रकल्पस्तरावर शासकीय योजनांच...

आजपासून सेवा संकल्प अभियान

Image
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन सेवा सेतू अभियान, इनोव्हेशन चॅलेंज, यात्रा, स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, जनसेवक महाकुंभचे आयोजन यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते दि. १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत राज्यात "सेवा संकल्प अभियान" राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने आज गुरुवारपासून जिल्ह्यात हा अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. या अभियानासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी बुधवारी महसूल भवनात पूर्वतयारीची बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, अपर जिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, प्रकल्प संचालक आनंदराव इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा...

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन

Image
  रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र   राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरीइच्छुक उमेदवारांनी भरावयाचा नोंदणी अर्ज (Job Seeker Registration Form)   रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नोकरीइच्छुक युवक-युवतींनी खालील नोंदणी अर्जामध्ये आवश्यक प्राथमिक माहिती अचूकपणे भरावी. https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान

  > माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६ ’ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.   राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव ’ म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.   शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६ ’ चा प्रमुख उद्देश आहे.   या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या स्थानिक तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्या...

राष्ट्रीय लोकअदालतीत ११ हजार १३८ प्रकरणे निकाली;

Image
चार जोडप्यांचा संसार सावरला यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात १२ सप्टेंबर   रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीला वकील, पक्षकार तसेच विविध शासकीय व निमशासकीय संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील २ हजार १२४ प्रलंबित आणि ९ हजार १४ वादपूर्व अशी एकूण ११ हजार १३८ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण २३ कोटी ४८ लाख ९८ हजार ६२५ रुपयांचे तडजोड मूल्य राहिले. विशेष म्हणजे, लोकअदालतीच्या माध्यमातून चार जोडप्यांचा संसार पुन्हा सावरला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत आयोजित करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश-२, व्ही. जी. रघुवंशी यांच्या हस्ते रोपट्यांना पाणी देऊन लोकअदालतीच्या कामकाजाची सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी लोकअदालतीचे महत्त्व विशद करून पक्षकार आणि विधिज्ञांन...

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

  यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी  ३० सप्टेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीमध्ये नवीन नाव नोंदविणे, मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करणे तसेच अपात्र मतदारांचे नाव वगळण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी दि. १९, २०, २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी ७८- यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष शिबिरांमध्ये पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव व इतर तपशीला -मध्ये दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार नाव वगळणीसाठी अर्ज सादर करावा. ७८- यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील पात्र नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, तसेच आपल्या कुटुंबातील...