Posts

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा ; 50 हजारांपर्यंत पारितोषिक

  Ø   गणेश मंडळांनी सहभाग घेण्याचे आवाहन  Ø   7 सप्टेंबरपर्यंत   अंतिम मुदत  Ø   तालुकास्तरावर 25 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक               यवतमाळ, दि. 1 (जिमाका) :   राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, राज्य, जिल्हा आणि तालुका अशा तीनही स्तरांवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.             या स्पर्धेसाठी अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या   ganeshotsav.pldmka.co.in   या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबरपर्यंत आहे. नोंदणीकृत व परव...

शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे ५१० उमेदवारांची निवड

  > शिक्षण विभागाला यादी प्राप्त                          > बुधवारपासून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार शिक्षण विभाग, प्राथमिक, जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून पवित्र पोर्टलद्वारे शासनाने शिफारस केलेल्या शिक्षक पदभरतीतील एकूण ५१० उमेदवारांची निवड यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास प्राप्त झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणित स्वरूपात नोंदविलेल्या माहितीची सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.   ही कागदपत्र पडताळणी वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद, यवतमाळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. संबंधित उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहून कागदपत्र पडताळणीची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी, असे आवाह...

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांचा जिल्हा दौरा

  यवतमाळ, दि.३१ (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) अॅड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवारी, २ सप्टेंबर   रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.   त्यांच्या दौऱ्यानुसार दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली मिशनसंबंधित जिल्हास्तरीय आढावा बैठकीला उपस्थित राहणार असून या बैठकीत विविध विषयांची आढावा घेणार आहेत.

जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीत नवीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती होणार

  इच्छुकांनी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन   यवतमाळ, दि. 31 (जिमाका) :   जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीचसाठी नव्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, यासाठी पात्र व इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.    जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीमध्ये एकूण ११ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये नोंदणीकृत गोशाळा किंवा पांजरापोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष एक सदस्य म्हणून, प्राण्यांच्या कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती तसेच जिल्ह्यात मानवहिताचे कार्य करणारे, प्राण्यांवर प्रेम करणारे अथवा प्राणी कल्याणासाठी कार्य करणारे सहा कार्यकर्ते यांचा सदस्य म्हणून समावेश राहणार आहे. यासंदर्भातील विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, हनुमान आखाडा जवळ, चांदणी चौक, यवतमाळ येथे उपलब्ध असून प्राण्यांविषयी सेवाभावी वृत्ती असलेल्या तसेच गोशाळा किंवा पांजरापोळ संस्थांशी संबंधित कार्य करणाऱ्या इच्छुक व्यक्तीं...

समाधान समारोहअंतर्गत विशेष लोकअदालतमध्ये सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित ४९ प्रकरणांत यशस्वी तडजोड

  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निपटारा यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय येथून २१ व २३ ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान समारोह २०२६ अंतर्गत आयोजित विशेष लोकअदालतीमध्ये थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४९ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करण्यात आली. य विशेष लोकअदालतीसाठी नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीकडून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळकडे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित प्राप्त प्रकरणांची तालुकानिहाय छाननी करुन ती संबंधित तालुका विधी सेवा समित्यांकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर पक्षकार, अधिवक्ते आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींच्या समन्वयाने पूर्व-लोकअदालत बैठका घेण्यात आल्या. या प्रक्रियेदरम्यान पुसद तालुका विधी सेवा समितीमार्फत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,...

‘एसआयआर’ची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ; जिल्ह्यात १९.८८ लाख मतदार

  > दावे व हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत                                           > ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार             यवतमाळ, दि. ३१ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व सात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज, दि. ३१ ऑगस्ट रोजी संबंधित मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.            या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष, महिला व तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघनिहाय तपशील संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच संबंधित सर्व घटक...

7 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन

  यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : जनतेच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन दि. 7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता   बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल प्रकरणे, सेवा, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे असे पत्र स्वीकारण्यात येणार नाही. वैयक्तिक स्वरुपाची तक्रार, निवेदन सादर करुन नये. महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये अर्जाचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. तसेच अर्ज दाखल करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाही, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी केले आहे