Posts

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्ततेसाठी १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

  यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जांपैकी सेंड बॅक करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जांतील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.  तसेच, निर्धारित मुदतीत त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही आणि ते स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहील, असे समाज कल्याण आयुक्तांनी कळविले आहे.  स्वाधार योजनेकरिता सेंड बॅक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पूर्तता करून आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आणि अर्ज विहित मुदतीत समाज कल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरला आहे; मात्र त्याची हार्डकॉपी अद्याप कार्यालयात सादर केलेली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज व कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ते स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांच...

९ सप्टेंबरला डाक जीवन विमा महाअभियान

  डाक सेवक घरोघरी भेट देणार यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेला अधिकाधिक बळ देण्यासाठी डाक विभागच्या वतीने   जिल्ह्यात ९ सप्टेंबर रोजी डाक जीवन विमा महाअभियान राबविण्यात येणार आहे.   या विशेष अभियानांतर्गत डाक विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामीण डाक सेवक घरोघरी भेट देऊन नागरिकांना डाक जीवन विमा   आणि ग्रामीण डाक जीवन विमा   योजनांचे महत्त्व समजावून सांगणार आहेत. जीवन विम्याचे महत्त्व, आर्थिक सुरक्षितता, विमा योजनेचे फायदे आणि पुरविण्यात येणाऱ्या सुविधा याची माहिती त्या भेटीच्या माध्यमातून जनतेला देण्यात येणार आहे. ग्रामीण भागामध्ये आजही जीवन विमा योजनेविषयी जागरुकता नसल्यामुळे जनतेमध्ये विमा साक्षरतेचा प्रसार करून आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. ग्रामीण भागासोबतच आता शहरी जनतेला सुद्धा ग्रामीण डाक जीवन विम्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे डाक जीवन विम्यापासून वंचित असणाऱ्या जनतेला ग्रामीण डाक विम्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.   आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीचा विमा असणे ही काळाची गरज ...

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला

              यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी निश्चित करण्यात आलेले आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणात सुधारणा करण्याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. त्यानुसार सरपंच पदाच्या सुधारित आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून ही आरक्षण सोडत प्रक्रिया ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित तहसील कार्यालयाच्या सभागृहात संबंधित तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. याबाबतची अधिसूचना व आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जारी केले आहे. या सुधारित आरक्षण सोडत प्रक्रियेत दि. १३ जून २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. केवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) तसेच खुला (सर्वसाधारण) प्रवर्ग, महिलांसह, यांच्या आरक्षणामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येणार आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शुद्धीपत्रकान्वये नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांचे ...

यवतमाळ एसटी आगाराच्या ताफ्यात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल

Image
   पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते बसचे लोकार्पण यवतमाळ दि.   4   (जिमाका):   यवतमाळ एसटी महामंडळ आगाराच्या ताफ्यात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या असून पालकमंत्री संजय राठोड आणि आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते फित कापून या बसचे लोकार्पण आज शुक्रवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी या नवीन बसेसची पाहणी करुन सुविधांची माहिती घेतली.   या लोकार्पण कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे यंत्र अभियंता जयेश पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी दादाराव दराडे, आगार व्यवस्थापक पराग भोपळे, सुरक्षा व दक्षता अधिकारी महेंद्र वानखेडे, वाहतूक निरीक्षक उत्कर्ष मोहाडे, हरिश थोरात यांच्यासह एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

नवाबपूर येथील महावितरणचे ३३ केव्हीचे उपकेंद्र सुरु

Image
      पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन > पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून पाच कोटींचा निधी > ६०० कृषी ग्राहकांना मिळणार योग्य दाबाचा वीजपुरवठा             यवतमाळ, दि.   4   (जिमाका) : नेर तालुक्यातील नवाबपूर येथील महावितरणचे ३३/११ केव्हीचे उपकेंद्र कार्यान्वित झाले असून गुरुवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या पाच कोटींच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या उपकेंद्रामुळे परिसरातील सुमारे ६०० कृषी वीज ग्राहकांना लाभ मिळणार आहे.             यापूर्वी बानगाव, चिचगाव, फत्तेपूर व उदापूर या गावांमधील कृषी पंपांची संख्या आणि विद्युत भार वाढल्यामुळे शिरजगाव उपकेंद्रावर मोठ्या प्रमाणात भार निर्माण झाला होता. परिणामी या गावांमधील कृषी ग्राहकांना अपेक्षित व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या.     ...

शेती करतांना अपघाती मृत्यू, अपंगत्व झाल्यास दोन लाखांपर्यंत आर्थिक मदत

Image
  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ; शेतकरी, वारसांनी लाभ घेण्याचे आवाहन यवतमाळ, दि.3 (जिमाका) : शेती व्यवसाय करताना शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. पात्र शेतकरी व वारसदारांनी विहित मुदतीत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. राज्य व जिल्ह्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला एक सदस्यदेखील योजनेचा लाभ घेऊ शकतो. कुटुंबातील पात्र सदस्यामध्ये आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी किंवा पती, मुलगा अथवा अविवाहित मुलगी यांचा समावेश होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित पात्र व्यक्तीचे वय १० ते ७५ वर्षे असणे आवश्यक आहे.   दोन लाखांपर्यंत‍ मिळते अनुदान : योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख...

उद्योग सुरू करायचाय? सीएमईजीपी योजनेतून मिळवा लाखोंचे अनुदान !

Image
  > स्वतःचा उद्योग उभारण्याची सुवर्णसंधी ; > उत्पादन, सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी अर्ज करण्याचे आवाहन यवतमाळ, दि.3 (जिमाका) :   स्वतःचा व्यवसाय सुरू करून उद्योजक बनण्याची इच्छा असणाऱ्या युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) योजनेतून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रकल्प उभारणीसाठी बँकेमार्फत कर्जासोबत शासनाकडून लाखो रुपयांच्या अनुदानाचाही लाभ दिला जात आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग, माजी सैनिक, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती व अल्पसंख्याक आदी विशेष प्रवर्गातील लाभार्थ्यांना ग्रामीण भागातील उत्पादन प्रकल्पांसाठी प्रकल्प खर्चाच्या 35 टक्क्यांपर्यंत, कमाल 17.50 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. तर उर्वरित प्रवर्गातील लाभार्थ्यांना ग्रामीण भागातील उत्पादन प्रकल्पांसाठी प्रकल्प खर्चाच्या 25 टक्क्यांपर्यंत, कमाल 12.50 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. उत्पादन प्रकल्प मर्यादा एक कोटी रुपयांपर्यंत : या योज...