Posts

खरीप हंगाम पीक स्पर्धेत ५ ते ५० हजार रुपयांपर्यंत बक्षीसे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ दि. 29 : अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात येत आहेत. पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगाम मधील एकूण ११ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे. पिकस्पर्धेतील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल ही खरीप पीके आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर भात पिकासाठी किमान २० गुंठे तसेच उर्वरित पिकांसाठ...

"कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ प्रतिबंधक कायदा विषयी" शिबीर संपन्न

Image
यवतमाळ दि. ३० : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दि. २८ जुलै रोजी "कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ" या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे तर प्रमुख वक्ते म्हणुन अभिषेक मेमोरियल फाउंडेशनच्या सचिव प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार आणि पॅनल वकील सोनाली भोयर यावेळी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार, यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारने "कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण अधिनियम, २०१३ लागू केला आहे. या कायद्याचा उद्देश प्रत्येक महिलेला कार्यालयात सुरक्षित, सन्मानजनक आणि समतावादी वातावरण मिळवून देणे तसेच लैंगिक छळाच्या घटनांना प्रतिबंध व निवारण करणे आहे. तसेच पॅाश कायद्यानुसार कुठल्याही प्रकारचे अवांछित शारीरिक स्पर्श, लैंगिक स्वरूपाची मागणी किंवा सूचक विनोद, अश्लील दृश्ये, आक्षेपार्ह वर्तन हे लैंगिक छळ म्हणून गणल...

दत्तापुर येथे आदिवासी संस्कृतीचे जतन, सवर्धन व लाभार्थ्याच्या मेळाव्याचे आयोजन क्रांतीवीर शामादादा कोलाम यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ दि.३० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा क्रांतीवीर शामादादा कोलाम संघटना मर्या. यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीवीर आदिवासी जननायक शामादादा कोलाम यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता दत्तापूर (निरंजन माहूर), ता. कळंब, जि यवतमाळ येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे राहणार असून आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यमंत्री इंद्रनोल नाईक हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमास लोकसभा सदस्य, विधानपरिषद व विधानसभा सदस्य, जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी तसेच विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेच जतन, लोककला, लोकसंगीत. लोकनृत्य. हस्तकला, खाद्यसंस्कृती. व रानभाजी महोत्सव तसेच स...

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अर्जासाठी आजचा शेवटचा दिवस शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिक विमा काढावा

यवतमाळ दि.३० :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२६ मध्ये राष्ट्रीय पिक विमा पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. यावर्षीपासून ज्या कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा काढायचा आहे त्यांनी संबंधित बँकेतून योजनेत सहभागी होणे बाबतचे घोषणापत्र (ऑप्ट इन) फॉर्म भरून बँकेतून विमा काढणे अपेक्षित आहे. परंतु जर शेतकऱ्यांना आपले सरकार सेतू सुविधा केंद्रातून विमा काढायचा असेल, तर त्यांनी बँकेत योजनेत सहभागी न होणेबाबतचे घोषणापत्र (ऑप्ट आउट) फॉर्म भरून तो सीएससी, व्हीएलई केंद्र चालकाकडे देऊन विमा काढता येतो. सध्या पोर्टलवर पिक विमा काढतांना प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा सहकारी बँकेकडून पिक विमा काढावयाच्या पिकासाठी कर्ज घेतलेले नाही व विमा पॉलीसी रद्द करणे किंवा कोणताही लाभ, भरपाई रोखून धरणे योग्य राहील,यास मी सहमती देतो तसेच याबाबत मी कोणताही आक्षेप, तक्रार किंवा दावा करणार नाही, असा संदेश येत आहे. भविष्यात आपला अर्ज कंपनीमार्फत नाकारण्यात येणार नसून अशा वेळी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिक विमा काढावा. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ७० हजार ४४४ शेतकरी अर्ज प्...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : यादीतील शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे.

Image
यवतमाळ दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक, सहकार अधिकारी श्रेणी-१ तालुका ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँका यांचे कार्यालयात, उपलब्ध असुन सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे नाव यादीमध्ये असल्याची खात्री करुन नावासमोरील विशिष्ठ क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न मोबाईल यासह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. अशा शेतकऱ्यांचे कर्जखात्यात कर्जमुक्ती लाभाची रक्कम लवकरच शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र असलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे यादीत नाव पाहुन नाव आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरीत जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे व कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. 000

रानभाजी-फळे विक्रेत्यांना १०० टक्के अनुदानावर मिळणार साहित्य रानभाजी-फळे विक्री प्रदर्शन मेळावा ; 30 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ दि. 28 : स्थानिक आदिवासी फळभाजी विक्रेत्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत "रानभाजी, रानफळे विक्री व प्रदर्शन मेळावा" आयोजित करण्यात येणार आहे. प्रकल्प कार्यक्षेत्रातील पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, दारव्हा, दिग्रस व नेर या तालुक्यातील आदिवासी विक्रेत्यांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांना विक्रीसाठी आवश्यक असणारे स्टॉल, छत्री, वजनकाटा व कॅरेट हे साहित्य शासनाच्या १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रानभाजी महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक आदिवासी राणभाजी विक्रेत्यांनी दि. ३० जुलै २०२६ पर्यंत प्रकल्प कार्यालय, पुसद येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. 000

शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे अनिवार्य

यवतमाळ दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी पांढरकवडा तालुक्यातील ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक कार्यालय व ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँका यांचे कार्यालयात, प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे नाव यादीमध्ये असल्याची खात्री करुन नावा समोरील विशिष्ठ क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न मोबाईल यासह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. अशा शेतकऱ्यांचे कर्जखात्यात कर्जमुक्ती लाभाची रक्कम लवकरच शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र असलेल्या पांढरकवडा तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे यादीत नाव पाहुन नाव आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरीत जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे व कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा. असे आवाहन केळापूरचे तहसिलदार व पांढरकवडा सहकार...