Posts

अनुसूचित जाती, नवबौद्ध संवर्गातील अर्जदारांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळणार

  महामंडळाची अनुदान व बिजभांडवल कर्ज योजना सुरु अर्जासाठी ‘महादिशा ’ पोर्टल यवतमाळ, दि. १० (जिमाका) :   महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, अमरावती मार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध संवर्गातील पात्र अर्जदारांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. चालु आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजनेअंतर्गत २०, बिजभांडवल कर्ज योजनेअंतर्गत २० असे एकूण ४० लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान वाटप करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचे अर्ज महामंडळाच्या https://mpbcdc.maharashtra किंवा महादिशाच्या   https://mahadisha.mpbcdc या संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध संवर्गातील स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्यांनी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. ए. अवघाते यांनी केले आहे.

सैनिकी मुलींच्या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु ;

  अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत  यवतमाळ, दि. १० (जिमाका) : यवतमाळ शहरातील महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेतलेल्या युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा, आजी-माजी सैनिकांच्या मुलींसाठी वीरमाता रमाबाई पंडित व जनरल पंडित सैनिकी मुलींचे वसतिगृह, यवतमाळ येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या या वसतिगृहाची एकूण क्षमता २१ विद्यार्थिनींची आहे. युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा तसेच माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृहात भोजन व निवासाची सुविधा मोफत व माजी सैनिकांच्या पाल्यांकडून सवलतीच्या दरात शुल्क आकारण्यात येते. वसतिगृहात जागा शिल्लक राहिल्यास इतर नागरिकांच्या पाल्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी ओळखपत्र, डिस्चार्ज पुस्तक आणि प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, टांगा चौक, यवतमाळ येथे संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०७२३२-२४५२७३ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाह...

माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी पंतप्रधान शिष्टवृत्ती योजना

  ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  यवतमाळ, दि. 10 (जिमाका):   केंद्र सरकारने माजी सैनिक किंवा विधवांच्या पाल्यांना इयत्ता बारावी व पदवीनंतरचे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी, पदविका आणि पदवी परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या व पुढे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या जसे बीई, बीटेक, एमबीबीएस, बीडीएस, वेटरनरी, एमबीए, बी फॉर्म, बीबीए, बीएड, एमसीए माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांकरीता शिष्यवृत्ती मिळण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्डाने अर्ज मागविले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी सैनिक कल्याण विभाग पुणे यांचेकडे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. तत्पुर्वी पात्र व इच्छुक माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी ऑनलाईन केंद्रीय सैनिक बोर्डाच्या www.ksb.gov.in   या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची एक प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आह...

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार ; सैनिक कल्याण विभागाचा उपक्रम

  १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन   यवतमाळ, दि. 10 (जिमाका): सैनिक कल्याण विभागामार्फत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक, सामाजिक क्षेत्रात विशिष्ट कार्य, योगदान दिल्याबद्दलचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक, पत्नी किंवा पाल्यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ एक रकमी १० हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी   २५ हजार रुपयांचा पुरस्कार सैनिक कल्याण विभागामार्फत दिला जाणार आहे.    तसेच सन २०२५-२०२६ मध्ये एस. एस. सी. बोर्डाच्या परिक्षेत ९० टक्के व एच.एस.सी. बोर्डाच्या परिक्षेत ८५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक किंवा विधवांच्या ५ पाल्यांना विभागीय पातळीवर १० हजार ...

गर्वाने फडकवा घरोघरी ‘तिरंगा’!

  ‘हर घर तिरंगा ’ अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन  यवतमाळ, दि. 10 (जिमाका): देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातही विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवत अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे , असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  राज्य शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी तसेच शाळा-महाविद्यालयांना ‘हर घर तिरंगा’ अभियान प्रभावीपणे साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंग्यासोबत सेल्फी, रांगोळी ...

आज पाणी पुरवठा बंद

यवतमाळ दि.५ : जलशुध्दीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्तीचे काम चालु असल्याने शहरातील काही भागात पाणी पुरवठा दि. ६ व ७ ऑगस्ट दोन दिवस पूणपणे बंद राहणार आहे.  यात दर्डा मुख्य संतुलन टाकी,  वाघापुर टेकडी मुख्य संतुलन टाकी व कार्यालयीन मुख्य संतुलन टाकी अंतर्गत येणाऱ्या भागातील होणारा पाणी पुरवठा दि. ६ व ७ ऑगस्ट दोन दिवस पूणपणे बंद राहणार आहे.  यात दर्डा नगर, बेले ले आऊट, वनवासी मारोती, सुयोग नगर-२, शिवाजी नगर, ग्रा.पं. लोहारा, वैभव नगर, वाघापुर टेकडी, प्रिया रेसिडेन्सी, मेडीकल टाकी, विठ्ठलवाडी, बालाजी टाकी, विसावा टाकी, पॉलिटेक्निक टाकी तसेच निखील नगर, युडीआयडी एसएमटी टाकी, राजाराम नगर टाकी, आर.टी.ओ.टाकी, जिंद्रान टाकी, रुख्मीणी टाकी, चापडोह पुनवर्सन टाकी अंतर्गत येणाऱ्या भागातील होणारा पाणी पुरवठा दोन दिवस पुर्णपणे बंद राहणार आहे.  नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा व प्राधिकरणास सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभागाया उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे. 000

पॉलिटेक्निकच्या प्रथम व थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी अतिरिक्त फेरी

    यवतमाळ दि.7 :अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश पुस्तिका 2026-27 नुसार प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्यानंतर संस्थेमध्ये रिक्त राहिलेल्या जागांकरिता समुपदेशनाने प्रवेशाची अतिरिक्त फेरी संस्थास्तरावर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीसाठी तसेच थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकीसाठी दि. 12 ऑगस्ट रोजी  सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत नोंदणी केली जाणार आहे. या प्रवेशप्रक्रियेसाठी या दिवशी www.dtemaharshtra.gov.in   या संकेतस्थळावर कॅप अथवा नॅान कॅप ऑनलाईन नोंदणी केलेली विद्यार्थी या प्रवेश फेरीसाठी पात्र समजण्यात येतील.  प्रवेशासाठी उपरोक्त नमूद दिनांक व वेळत संस्थेत प्रत्यक्ष हजर राहावे. त्यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येऊन त्याच दिवशी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल त्या दिवशी दुपारी १ वाजेनंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. या प्रवेश फेरीत नियमानुसार प...