Posts

जलसंधारण दिनानिमित्त महा वॉकेथॉन स्पर्धा

Image
   समता मैदान येथे आयोजन  महा वॉकेथॉनमध्ये १० हजार स्पर्धकांची नोंदणी  युवकांसाठी रील स्पर्धा  १० ते २५ हजार रुपयांपर्यंत पारितोषिक             यवतमाळ, दि. 19 (जिमाका) :   जलसंधारणाचे जनक म्हणून ओळख असलेले माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिवस २१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात “ जलसंधारण दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘माती वाचवा, पाणी जपा, भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश देत मृद व जलसंधारणाविषयी जनजागृती करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी शहरातील समता मैदान येथे ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.             ही   ‘महा वॉकेथॉन’ समता मैदान येथून सुरु होणार असून ती कमाल ३ किलोमीटर अंतराची राहणार आहे. सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान नोंदणी व शपथ कार्यक्रम...

केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा दोन दिवसीय जिल्हा दौरा

Image
              यवतमाळ, दि.१ 8 (जिमाका) : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे दि.19 व 20 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.             त्यांचा दौरा कार्यक्रमानुसार दि.19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6   वाजता उमरखेड येथील जी. एस सारडा राजस्थानी भवन येथे सत्कार समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती, रात्री 8.45 वाजता कै. श्री.गोविद मेश्राम, चंद्रामणी बौध्द विहार, नेताजी नगर यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट, त्यांनतर शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे मुक्काम करतील.             दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या योजनांबाबत जिल्हाधिकारी,   पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेसमवेत बैठक, दुपारी 12 श्री. सत्य साई संजिवण नेत्र हॉस्पीटल, वाघापूर   येथील ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन, दुपारी 1 वाजत...

शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवून हरित क्रांती घडविण्याचे वसंतराव नाईक यांचे कार्य विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे प्रतिपादन

Image
                                                        कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्याचे आवाहन  हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा ४७ वा स्मृतिदिन सोहळा दिमाखात साजरा  विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार वितरित  राज्यभरातील प्रगतीशिल शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ व संस्थांचा सत्कार यवतमाळ, दि.18 (जिमाका) : शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवून राज्यात हरित क्रांती घडविण्याचे कार्य माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केले, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या ४७ व्या स्मृतिदिनानिमित्त पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुधाकर नाईक प्रेक्षागृहात वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ॲड. राहुल नार्वेकर यांच्या...

महा वॉकेथॉन’ मध्ये अभिनेते संजय दत्त यांचा सहभाग

Image
               यवतमाळ, दि.१ 8 (जिमाका) : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राज्यव्यापी उपक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेते संजय दत्त यांना मृद व जलसंधारण मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी निमंत्रित केले असून, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.             जलसंधारणाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचावा आणि हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप धारण करावा, या उद्देशाने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना ‘महा वॉकेथॉन’मध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.             राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमाल ३ किलोमीटर अंतराची महा वॉकेथॉन आयोजित केल...

विशेष लेख

Image
  जलसंधारणातून घडवूया बारमाही हिरवा महाराष्ट्र             पाऊस पडतो तेव्हा आपण आनंदतो; पण तोच पाऊस वाहून जातो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर थांबविणे, तो जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हीच आजच्या महाराष्ट्राची सर्वात मोठी गरज आहे. म्हणूनच यंदा २१ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जलसंधारण दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता लोकसहभागाची नवी सुरुवात ठरली पाहिजे.             महाराष्ट्र शासनाने माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी, म्हणजेच २१ ऑगस्टला दरवर्षी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.   या निर्णयामागे जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचे स्मरण आणि जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. या दिवशी जलपूजन, विविध जलसंधारण कामांचे भूमिपूजन व लोकार्पण, श्रमदान, जनजागृती, उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव आदी उपक्रम राबविण्याचे निर...

रॅगिंग, वाहतूक नियम व अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत कायदेविषयक शिबीर

              यवतमाळ, दि.17  (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व दाते महाविद्यालय, यवतमाळ आणि जिल्हा वाहतुक शाखा, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दि १२ ऑगस्ट रोजी "रॅगिंग, वाहतुकीचे नियम व अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम" या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.             या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन दाते कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू हे तर प्रमुख उपस्थीती म्हणुन उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे हे उपस्थीत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मुख्य लोकअभिरक्षक स्वप्नील कुलकर्णी आणि जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले.             कार्यक्रमाचे वक्ते मुख्य लोकअभिरक्षक स्वप्नील कुलकर्णी यांनी रॅगिंचे प्रकार अगदी सोप्या भाषेत चित्रपटांमधील उदाहरणे देत विद्यार्थ्यांना समजाविले. रॅगिंग म्हणजे मोठ्या विद्यार्थ्यां...

युवक-युवतींनी ‘इंडिया स्कील कॉम्पीटीशन’मध्ये सहभागी व्हावे

   जिल्हा कौशल्य विकास विभागाचे आवाहन             यवतमाळ, दि.१ 7 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (एनएसडीसी) यांच्या माध्यमातून देशातील सर्वात प्रतिष्ठित इंडिया स्कील कॉम्पीटीशन २०२६-२७ कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आयटीआय, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, पदवी महाविद्यालये तसेच विविध कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी व कुशल युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे.             इंडिया स्कील कॉम्पीटीशन २०२६-२७ ही देशातील उत्कृष्ट कौशल्यधारक युवक-युवतींना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तसेच पुढे व...