Posts

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी

Image
  राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांचे निर्देश > लोकसेवांचा घेतला आढावा   यवतमाळ, दि. 11 (जिमाका): नागरिकांना लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विविध शासकीय सेवा विहित कालमर्यादेत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांचे अर्ज व प्रकरणे प्रलंबित न ठेवता ती तातडीने निकाली काढावीत. तसेच लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश अमरावती विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयुक्त अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय विभागप्रमुखांची सार्वजनिक प्राधिकरणाच्या लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत कामगिरीच्या मूल्यांकनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.   यावेळी आयुक्त अरुण डोंगरे यांनी लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विविध विभागांमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा, प्राप्त अर्जांची संख्या, निकाली काढलेली प्रकरणे, प्रलंबित अर्ज तसेच विभागनिहाय प्रगतीचा ...

यवतमाळ जिल्ह्यात दत्तक विधान नियमावलीअंतर्गत पहिला दत्तक आदेश

Image
  “ दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; दत्तक पालकांचे पालकत्वाचे स्वप्न साकार ” यवतमाळ, दि. 11 (जिमाका): महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान नियमावली, २०२२ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पहिले दोन दत्तक विधान आदेश यशस्वीरीत्या पारित करण्यात आले. या ऐतिहासिक प्रक्रियेमुळे दोन बालकांना प्रेम, सुरक्षितता आणि हक्काचे कुटुंब मिळाले असून, दत्तक पालकांचे अनेक वर्षांचे पालकत्वाचे स्वप्न साकार झाले. दत्तक विधान हि केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून, बालकाला प्रेमळ कुटुंब, सुरक्षितता, प्रेम आणि उज्ज्वल भविष्य देणारी संवेदनशील सामाजिक प्रक्रिया आहे. यवतमाळ जिल्ह्यात पार पडलेल्या या दोन्ही दत्तक प्रकरणांमध्ये बालकांच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक कायदेशीर तरतुदी, कागदपत्रांची पूर्तता आणि विविध स्तरांवरील पडताळणी पूर्ण करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यात आली. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित दत्तक विधान आदेश पारित करून या संवेदनशील प्रक्रियेला अंतिम मान्यता दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बाल न्याय यंत्रण...

अनुसूचित जाती, नवबौद्ध संवर्गातील अर्जदारांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळणार

  महामंडळाची अनुदान व बिजभांडवल कर्ज योजना सुरु अर्जासाठी ‘महादिशा ’ पोर्टल यवतमाळ, दि. १० (जिमाका) :   महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, अमरावती मार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध संवर्गातील पात्र अर्जदारांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. चालु आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजनेअंतर्गत २०, बिजभांडवल कर्ज योजनेअंतर्गत २० असे एकूण ४० लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान वाटप करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचे अर्ज महामंडळाच्या https://mpbcdc.maharashtra किंवा महादिशाच्या   https://mahadisha.mpbcdc या संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध संवर्गातील स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्यांनी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. ए. अवघाते यांनी केले आहे.

सैनिकी मुलींच्या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु ;

  अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत  यवतमाळ, दि. १० (जिमाका) : यवतमाळ शहरातील महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेतलेल्या युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा, आजी-माजी सैनिकांच्या मुलींसाठी वीरमाता रमाबाई पंडित व जनरल पंडित सैनिकी मुलींचे वसतिगृह, यवतमाळ येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या या वसतिगृहाची एकूण क्षमता २१ विद्यार्थिनींची आहे. युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा तसेच माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृहात भोजन व निवासाची सुविधा मोफत व माजी सैनिकांच्या पाल्यांकडून सवलतीच्या दरात शुल्क आकारण्यात येते. वसतिगृहात जागा शिल्लक राहिल्यास इतर नागरिकांच्या पाल्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी ओळखपत्र, डिस्चार्ज पुस्तक आणि प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, टांगा चौक, यवतमाळ येथे संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०७२३२-२४५२७३ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाह...

माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी पंतप्रधान शिष्टवृत्ती योजना

  ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  यवतमाळ, दि. 10 (जिमाका):   केंद्र सरकारने माजी सैनिक किंवा विधवांच्या पाल्यांना इयत्ता बारावी व पदवीनंतरचे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी, पदविका आणि पदवी परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या व पुढे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या जसे बीई, बीटेक, एमबीबीएस, बीडीएस, वेटरनरी, एमबीए, बी फॉर्म, बीबीए, बीएड, एमसीए माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांकरीता शिष्यवृत्ती मिळण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्डाने अर्ज मागविले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी सैनिक कल्याण विभाग पुणे यांचेकडे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. तत्पुर्वी पात्र व इच्छुक माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी ऑनलाईन केंद्रीय सैनिक बोर्डाच्या www.ksb.gov.in   या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची एक प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आह...

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार ; सैनिक कल्याण विभागाचा उपक्रम

  १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन   यवतमाळ, दि. 10 (जिमाका): सैनिक कल्याण विभागामार्फत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक, सामाजिक क्षेत्रात विशिष्ट कार्य, योगदान दिल्याबद्दलचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक, पत्नी किंवा पाल्यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ एक रकमी १० हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी   २५ हजार रुपयांचा पुरस्कार सैनिक कल्याण विभागामार्फत दिला जाणार आहे.    तसेच सन २०२५-२०२६ मध्ये एस. एस. सी. बोर्डाच्या परिक्षेत ९० टक्के व एच.एस.सी. बोर्डाच्या परिक्षेत ८५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक किंवा विधवांच्या ५ पाल्यांना विभागीय पातळीवर १० हजार ...

गर्वाने फडकवा घरोघरी ‘तिरंगा’!

  ‘हर घर तिरंगा ’ अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन  यवतमाळ, दि. 10 (जिमाका): देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातही विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवत अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे , असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  राज्य शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी तसेच शाळा-महाविद्यालयांना ‘हर घर तिरंगा’ अभियान प्रभावीपणे साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंग्यासोबत सेल्फी, रांगोळी ...