Posts

पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला २ जुलैपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला २ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक, शैक्षणिक अर्हता, अर्ज शुल्क व इतर आवश्यक माहिती संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. तसेच बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेशासाठी वेगळा अर्ज सादर करावा लागेल. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी यवतमाळ येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरता येणार असून त्यांच्या शंका व समस्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष पडताळणी तस...

शेतकऱ्यांना पीक कर्ज प्राधान्याने मंजूर करा

Image
- जिल्हाधिकारी विकास मीना यांचे बॅंकांना निर्देश  जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न  शासनाच्या फ्लॅगशिप योजनांच्या प्रगतीचा घेतला आढावा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पेरणीची लगबग सुरु असून शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता गरज भासणार आहे. त्यामुळे पीक कर्जासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज मंजूर करुन त्यांना वेळेत आर्थिक मदत उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बॅंकांच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे मंगळवारी जिल्हा सल्लागार समिती बैठकीत पार पडली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या फ्लॅगशिप योजनांच्या प्रगतीचाही सविस्तर आढावा घेतला. ते पुढे म्हणाले, राज्यात एल निनोचे सावट असून शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागण्याचा शक्यता आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असला तरी बहुतांश शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज पडणार आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांप्रती सकारात्मक भावना ठेवून मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ मंजूर करावा. त्यासाठी सिबिलचीही...

विशेष वृत्त : शबरी महामंडळाच्या सहकार्याने जिजामाता वनधन केंद्राची भरारी; आदिवासी महिलांना मिळाला स्वावलंबनाचा मार्ग

Image
जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात उभारण्यात आलेले जिजामाता वन धन विकास केंद्र आज आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे यशस्वी मॉडेल ठरत आहे. प्रधानमंत्री जनमन उपक्रमांतर्गत स्थापन झालेल्या या केंद्राने अनेक कुटुंबांचे जीवनमान उंचावले असून, स्थलांतरित मजुरांपासून आत्मनिर्भर उद्योजकांपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास घडवून आणला आहे. एकेकाळी रोजगाराच्या अभावामुळे आणि आर्थिक संकटामुळे अनेक आदिवासी कुटुंबांना हंगामी स्थलांतर करावे लागत होते. महिलांची भूमिका स्वयंसहाय्यता गटांमधील बचत आणि कर्ज व्यवहारांपुरती मर्यादित होती. मात्र स्थानिक पातळीवर झालेल्या प्रयत्नांमुळे परिस्थितीत मोठा बदल घडून आला. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट आणि दिशा फेडरेशन यांनी गावागावात जनजागृती मोहीम राबवून स्थलांतराचे दुष्परिणाम समजावून सांगितले. स्थानिक संसाधनांवर आधारित शाश्वत उपजीविकेचा मार्ग शोधण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करण्यात आले. याच प्रक्रियेतून २०२४ मध्ये जिजामाता वन धन विकास केंद्राची स्थापना झाली. केंद्रामार्फत वनउत्पादनांचे संकलन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, साठवण आणि विपणन यावर आधारित उपक्रम ...

१५ दिवसांचे ऑफलाईन प्रशिक्षण, अधिकृत प्रमाणपत्र आणि रोजगारक्षम कौशल्य विकासाची संधी

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने ‘अमृत मानसमित्र’ समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १५ दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, अधिकृत प्रमाणपत्र, क्षेत्रीय कार्याचा अनुभव आणि रोजगारक्षम कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे ही राज्य शासनाची अग्रगण्य संस्था तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, संवाद कौशल्ये, सक्रिय श्रवण, सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, जीवनकौशल्ये आणि मानससामाजिक सहाय्य या विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुणे येथे १५ दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये परस्परसंवादी सत्रे, प्रकरणांचा अभ्यास, प्रात्यक्षिक उपक्रम आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाईल. त्यानंतर एक महिन्याचा क्षेत्रीय अनुभव कालावधी राहणार असून सहभागी उमेदवारांना जिल्हास्तरावर...

युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन इंडो-जर्मन टूल रूम व ‘अमृत’चा संयुक्त उपक्रम

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि इंडो-जर्मन टूल रूम भारत सरकारची संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पात्र उमेदवारांना अत्याधुनिक तांत्रिक प्रशिक्षण, रोजगारासाठी सहाय्य तसेच उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. भारत सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या इंडो-जर्मन टूल रूमची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर येथे असून पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि वाळूंज येथे उपकेंद्रे आहेत. आधुनिक यंत्रसामग्री व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था देशभरात ओळखली जाते. या प्रशिक्षणाचा लाभ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना मिळावा यासाठी ‘अमृत’ आणि आयजीटीआर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून सुमारे ४५ विविध अभ्यासक्रम...

‘सुपर ५०’ साठी गुरुवारी परीक्षा

 २०६२ विद्यार्थी ; १० परीक्षा केंद्र  ऑफलाईन पद्धतीने होणार परीक्षा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना जेईई आणि एनईईटी (नीट) परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सुपर ५०’ उपक्रमांतर्गत २०६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या विद्यार्थ्यांची निवड परीक्षा गुरुवारी दि. २५ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेतच घेतली जाणार आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यात १० परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून त्यानुसार यवतमाळ येथे ४ व पुसद, उमरखेड, दारव्हा, वणी, राळेगाव आणि पांढरकवडा या ठिकाणी प्रत्येकी एक अशा १० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. त्यामध्ये यवतमाळ येथील रमाबाई आंबेडकर विद्यालय, विवेकानंद विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय आणि जि. प. माध्यमिक शाळा गोधणी रोड हे परीक्षा केंद्र आहेत. तर पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालय, उमरखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, दारव्हा येथील न.प शाळा क्र. २, वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय, राळेगाव येथील न्यु इंग्लिश हायस्कूल, पांढरकवडा येथील जि.प माध्यमिक शाळा येथे ही परीक्षा घेतली जाणार आहे. ...

शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचे आवाहन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता शासकीय आदिवासी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पांढरकवडा प्रकल्पांतर्गत मुलींसाठी ९ आणि मुलांसाठी १० अशी एकूण १९ वसतिगृहे कार्यरत असून प्री-मॅट्रिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी नवीन तसेच जुन्या विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता व शासनाच्या नियमांनुसार राबविण्यात येणार असून वसतिगृहातील उपलब्ध रिक्त जागांच्या अधीन राहून प्रवेश देण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, प्रवेश पावती, बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुकची प्रत, दहावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला तसेच लागू असल्यास अनाथ किंवा अपंगत्वाचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंत...