Posts

शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता वितरित

Image
 पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते वितरण  कृषी विज्ञान केंद्रात थेट प्रक्षेपण कार्यक्रम उत्साहात कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ व कृषी विभाग, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी, कृषी अधिकारी व विविध प्रकल्पांतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दीपक कच्छवे, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी कृष्णराव देशट्टीवार (पांढरकवडा), कीटकशास्त्र विषयातील शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, गृहविज्ञान शास्त्रज्ञ स्नेहलता भागवत तसेच कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ राहुल चव्हाण, कृषिविद्या शास्त्रज्ञ डॉ. रुपेश झाडोदे उपस्थित होते. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्यदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगाल मधील ताराकेश्वर, ...

नशामुक्त सप्ताहांतर्गत पथनाट्याद्वारे जनजागृती; योग दिनी व्यसनमुक्तीची शपथ

Image
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत १७ ते २६ जूनदरम्यान देशभर "नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान" या संकल्पनेवर आधारित नशामुक्त सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या अनुषंगाने २० जून रोजी नेहरू स्टेडियम येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने व्यसनमुक्तीविषयक विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी श्री. जोगडेकर यांनी सहकाऱ्यांसह सादर केलेल्या प्रभावी पथनाट्यातून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, तसेच व्यसनामुळे कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या विपरीत परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय योग दिनी व्यसनमुक्तीची शपथ आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने पोलीस कवायत मैदान येथे व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करत शपथ घेतली. या कार्यक्रमास जिल्हा समाज कल्याण अध...

‘योग’ ही शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती

Image
- आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके पोलीस कवायत मैदानात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा योग ही केवळ कसरत नसून शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती असल्याचे मत आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. ‘आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त' पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, माय युवा भारत कार्यालय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पोलीस कवायत मैदान येथे भव्य सामूहिक योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात सहभागी होऊन त्यांनी योगासने केली. तसेच नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, प्रशासकीय अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.

कोळसा प्रदुषणामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण !

Image
> अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची माहिती > वेकोली परिसरातील गावांची केली पाहणी > नागरिकांशी साधला संवाद यवतमाळ, दि. २० : कोळसा प्रदुषणामुळे होणाऱ्या शेतपीक नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून सर्वंकष धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव तथा वेकोली प्रदुषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष विकास खारगे यांनी शुक्रवारी दिली. ते आज वणी तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बेलोरा येथील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड द्वारा संचालित कोळसा खाणीची पाहणी केली. तसेच वेकोली परिसरातील उकणी, पिंपळगाव, ब्राम्हणी या गावांसह वणी येथे भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी विकास मीना, उपविभागीय अधिकारी नितिन हिंगोले, तहसिलदार निखिल धुळधर व वेस्टर्न कोलफिल्डचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. विकास खारगे पुढे म्हणाले की, कोळशा प्रदुषणामुळे होणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात कोणता...

एकल महिला धोरणासाठी 22 जूनला कार्यशाळा

 नागरिक, एकल महिला, तज्ज्ञांना सूचना व अभिप्राय नोंदवता येणार  कार्यशाळेत सहभागी व्हावे-जिल्हाधिकार ी एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर, आरोग्यविषयक तसेच पुनर्वसनासंदर्भातील प्रश्नांचा सर्वंकष विचार करून स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, एकल महिलांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच इच्छुक व्यक्ती यांच्याकडून सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी २२ जून रोजी जिल्हा परिषद परिसरातील महिला व बाल विकास भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एकल महिलांसाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली होती. या अनुषंगाने महिला व बाल विकास मंत्री तथा राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मसुदा समिती गठित करण्यात आली आहे. दिनांक 1 जून 2026 रोजी आयोजित राज्यस्तरीय मसुदा समितीच्या बैठकीत एकल महिला धोरण अधिक व्यापक व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार...

आधुनिक शेळीपालनातून समृद्धीची नवी पहाट मिळता 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना'ची साथ

शेळी व मेंढीपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कमी गुंतवणूक व जास्त परतावा देणारा हा व्यवसाय 'एटीएम' प्रमाणे ओळखला जातो. बाजारपेठेत शेळीच्या मांसाला दिवसेंदिवस वाढणारी मागणी व मिळणारा उत्तम दर लक्षात घेता, तरुणांचा या व्यवसायाकडे कल वाढत आहे. त्यातच आता 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना' अंतर्गत शेळी व मेंढीपालनासाठी भरीव आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्यामुळे तरुणांसाठी स्वयंरोजगाराची ही एक उत्तम संधी ठरणार आहे, अशी माहिती आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा. प्र.से.) यांनी दिली. ग्रामीण तरुणांसाठी शेळी-मेंढीपालन एक उत्तम स्वयंरोजगाराचा पर्याय आहे. सुशिक्षित तरुण आता 'सेमी-स्टॉल फीडिंग' (अर्ध-बंदिस्त) पद्धतीने हा व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाने करत आहेत. घरातील महिला घराचे काम सांभाळून या व्यवसायाचे व्यवस्थापन करू शकतात, ज्यामुळे त्यांना हक्काचे स्वतंत्र उत्पन्न मिळते. शेळी-मेंढी हे प्राणी कोणत्याही हवामानात (अति उष्ण किंवा कोरडे) स्वतःला जुळवून घेतात. निकृष्ट दर्जाचा चारा, झाडपाला व शेतातील उरले-सुरले अवशेष खाऊन हे प्राणी उत्तम प्रथिने (दूध आ...

'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना'; दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून समोर येत असून, राज्याच्या एकूण उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा २.८%, तर कृषी उत्पन्नातील वाटा तब्बल २५.१% इतका मोठा आहे. एकीकडे राज्याची श्रमशक्ती (१५-५९ वयोगट) २०३६ पर्यंत ९.०५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज असताना, दुसरीकडे दुग्धव्यवसायातील वाढत्या संधी ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची नवी दारे उघडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारची 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' ग्रामीण भागातील आर्थिक चित्र बदलण्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. सध्या दुग्ध उत्पादनात महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर असून राज्याचे उत्पादन १६.६२ MMT (६.७%) इतके असून वार्षिक उत्पादन वाढीचा दर ३.६% असला, तरी भारतीय आरोग्य परिषदेच्या मानकांनुसार प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन ३५८ ग्रॅम दुधाची गरज आहे. सद्यस्थितीत ही उपलब्धता केवळ ३०० ग्रॅम असून, ही ५८ ग्रॅमची तूट भरून काढण्यासाठी राज्यात दुग्धोत्पादनाला मोठे पोषक वातावरण उपलब्ध आहे. वाढती लोकसंख्या व दुधाची निकड लक्षात घेता, ग्रामीण भागात पशुपालनाकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता एक 'उद्योजक...