शासकीय वसतिगृह न मिळाल्यास स्वाधार योजनेचा लाभ ; विद्यार्थ्याना वसतिगृहासाठी ॲानलाईन अर्ज अनिवार्य


 

यवतमाळ दि.७ :अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ११ वी १२ वी त्यापुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये महत्वपुर्ण बदल करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासुन स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रथम समाज कल्याण विभागातंर्गत येणारे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


तेव्हा सन २०२६-२७ मध्ये व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी दि. ७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य असल्याने यासाठी विभागाच्या संकेस्थळावर  http://hmasnew.mahait.org  अर्ज प्रक्रीया सुरु करण्यात येणार आहे.


तसेच नवीन नियमानुसार शासकीय वसतिगृहासाठी अर्ज न करण्याऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह तसेच स्वाधार योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास संबंधित विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र राहणार आहे.

 

सर्व गरजु विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत कालावधीत शासकीय वसतिगृहा करीता ऑनलाईन अर्ज भरणे अनिवार्य आहे. प्रवेशाबाबतचे अर्ज करण्यासाठी https://hmasnew.mahait.org/  या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान