साहित्याचे मातीशी नाते जोडणारा कवी गमावला : मुख्यमंत्री
मुंबई, दि.1 : ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर ऊर्फ काका बडे यांच्या निधनाने साहित्याचे मातीशी नाते जोडणारा आणि वऱ्हाडी भाषेचा आग्रहाने पुरस्कार करणारा कवी मराठी साहित्य विश्वाने गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बडे यांनी आपल्या कवितांतून शेतकऱ्यांचे भावविश्व मांडले. मातीशी नाळजोडणाऱ्या त्यांच्या कविता थेट काळजाला भिडणाऱ्या असल्याने लोकांच्या ओठी रूळल्या. त्यांच्या लघुकथाही जगण्याचे मर्मसांगणाऱ्या आहेत. लेखनासोबतच एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी वऱ्हाडी लोकजीवनाचे प्रभावीपणे सादरीकरण केले.त्यांच्या निधनाने  वऱ्हाडी भाषेला साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून देणारा एक भाषाप्रेमी गमावला आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती