मरावे परी अवयवरुपी उरावे
यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : अवयवदान हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. अनेकदा तुम्ही अवयवदानाचे आव्हाहन करणाऱ्या जाहीराती सुद्धा पाहील्या असतील की मी मृत्यु नंतर माझे सर्व अवयव दान करणार. त्यावेळी तुमच्याही मनात कित्येक प्रश्न आले असतील की, अवयवदान म्हणजे नेमके काय ? कुणीही व्यक्ती अवयवदान करु शकते का? अवयवदानाची प्रक्रीया काय? मृत्युपश्चात वेगवेगळ्या धर्मात शरीराची विल्हेवाट वेगवेगळ्या प्रकारे लावली जाते. जरी शरीरातुन प्राण गेले असले तरी काही अवयव हे मृत्युनंतर काही काळासाठी सक्रीय असतात त्यांचा जर वेळेत वापर करुन ते अवयव दुसऱ्याच्या शरीरात बसवले तर त्या व्यक्तीला त्या अवयवांचा फायदा होवु शकतो. आज अवयवांची आवश्यकता असलेल्यांची प्रतिक्षा यादी वाढत चालली आहे. यात बदल घडवायचा असेल तर अवयवदानाबाबत जनसामान्यांच्या माणसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. असे मत सामान्य रुग्णालयचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी व्यक्त केले. देशामध्ये अवयवदाना बद्दल जागरुकता पसरवण्यासाठी, अवयवदानाशी संबंधित समज व गैरसमज दुर व्हावे आणि मृत्युनंतर अवयव व उतींचे दान करण्यासाठी नागरिकांत प्रेरणा व अवयवदानाचे मुल...