Posts

जिल्ह्यात 39 “मिलेनियम व्होटर”

Image
राष्ट्रीय मतदार दिवशी होणार सत्कार यवतमाळ, दि. 29 : जन्मतारखेचे प्रत्येकाच्या आयुष्यात विशेष महत्व असते. काही विशिष्ट तारखांना जन्म झाला असेल तर तो दिवस निरंतर लोकांच्या लक्षात राहतो. नवीन वर्षाची पहिली तारीख आणि त्यातही नवीन शतकाची सुरवात म्हटले की मग काही विचारायलाच नको. अशीच तारीख आहे 1 जानेवारी 2000. ही तारीख 18 वर्षांपूर्वी येऊन गेली. मात्र 1 जानेवारी 2018 ला वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे यावेळेस “ मिलेनियम व्होटर ” ठरणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत असे 39 “ मिलेनियम व्होटर ” आढळले आहेत. या लकी मिलेनियम मतदारांचा राष्ट्रीय मतदार दिवशी (25 जानेवारी) सत्कार होणार आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या तरुण-तरुणींना राज्यघटनेनुसार मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. नव मतदारांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय निवडणुक आयोगाने मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्यांचा जन्म 1 जानेवारी 2000 रोजी झालेला असेल त्या मुला-मुलींची मिलेनीयम मतदान म्हणून नोंदणी करून घ्यायची आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अशा मतद...

महिला बचत गटाने शोधली प्रगतीची वाट

Image
Ø जुट प्रक्रियेतून 2 लाखांची विक्री यवतमाळ, दि. 29 : बचत गटाच्या चळवळीमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. उपजिवीकेचे साधन निर्माण करण्यासाठी महिलांना ही चळवळ उपयोगी ठरत आहे. महागाव तालुक्यातील पिंपरी (इजारा) येथील संस्कृती महिला बचत गटानेसुध्दा कृषी समृध्दी विकास प्रकल्पाच्या मार्गदर्शनात प्रगतीची वाट शोधली आहे. जुट बारदाण उद्योगातून या महिला बचत गटाने यावर्षी 2 लक्ष 10 हजार रुपयांची विक्री केली आहे. संस्कृती महिला बचत गटाची स्थापना पिंपरी येथे 2015 मध्ये करण्यात आली. या गटात एकूण 11 महिला कार्यरत आहेत. यातील 10 महिला आदिवासी असून त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. आपले घरगुती तसेच शेतातील काम आटपून या महिला बचत गटाचे काम करीत आहेत. दोन वर्षापूर्वी पुणे येथे ॲग्रो व्हिजनचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पिंपरी येथील महिलांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी ज्युटवर प्रक्रीया करणारे मशिन बघितले. काहीतरी वेगळे करण्याच्या संकल्पनेतून त्यांनी हा व्यवसाय निवडला. ज्युट प्रक्रीया हा प्रकल्प महिलांसाठी नवीनच होता. बचत गटामध्ये एकमेव पदव...

सरकारच्या योजना शेवटच्या उपेक्षित माणसांपर्यंत पोहचवा - पालकमंत्री येरावार

Image
Ø गहूली हेटी येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला धनादेश वाटप यवतमाळ, दि. 28 : सामान्य नागरिकांचा सर्वांगीन विकास करणे हे सरकारचे ध्येय आहे. समाजाच्या उपेक्षित घटकांतील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना शासकीय यंत्रणेने तसेच लोकप्रतिनिधींनी त्यांच्यापर्यंत पोहचवाव्यात. याकडे सरपंचांनी गांभिर्याने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.             यवतमाळ तालुक्यातील गहूली हेटी येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला धनादेश वाटप तसेच लाभार्थ्यांना धडक सिंचन विहिर प्रमाणपत्र वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ, गहूली हेटीचे सरपंच संदेश राठोड, बोदबोडणचे सरपंच दिनेश पवार, बाळासाहेब शिंदे, अमर दिनकर उपस्थित होते.             गावाच्या विकासाकडे सरपंचांनी लक्ष द्यावे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, घरातील गेलेला जीव परत आणता येणार नाही. मात्र अशा कुटुंबाला धीर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सरकारक...

हक्काचे पाणी कमाविण्याची जिल्ह्याला संधी – जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

Image
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा Ø यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक तालुक्यांचा समावेश यवतमाळ, दि. 28 : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी नकारात्मक ओळख आपल्या जिल्ह्याची आहे. ही ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे करण्याचे नियोजन आहे. वैशिष्ट्य म्हणजे राज्यात या स्पर्धेत सर्वाधिक तालुके यवतमाळ जिल्ह्यातील  आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले हक्काचे पाणी कमाविण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेसंदर्भात आयेाजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जयंत देशपांडे, संदीपकुमार अपार, स्वप्नील कापडनीस, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सुभाष मानकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या स...

तीन एकर पडीत ते बारा एकर ओलित

Image
Ø नरेगातील सिंचन विहिरीमुळे शेतकरी सुखावला यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस…..पाण्याची पातळी खालावलेली….बोंडअळीचा प्रादुर्भाव…..किटकनाशक फवारणी ……अशा एक ना अनेक समस्यांचा जिल्ह्यातील शेतक-यांना सामना करावा लागला. ही परिस्थिती जवळपास सगळीकडे सारखीच. मात्र शेतक-याला नरेगातून सिंचन विहिरीचा आधार मिळाला आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे बारा एकर शेती फुलली. स्वत:च्या मालकीची तीन एकर पडीत ते आता बारा एकर ओलिताची शेती असा प्रवास केवळ नरेगाच्या सिंचन विहिरीमुळे झाला, याबद्दल शेतक-यांने कृतज्ञता व्यक्त केली. हा अनुभव आहे यवतमाळ तालुक्यातील कापरा येथील अब्दूल कलीम शेख मेहबुब यांचा. मेहबुब भाई हे सावर येथील रहिवासी असून त्यांची कापरा ग्रामपंचायत हद्दित तीन एकर शेती आहे. ही शेती पडीत जमिनीवर असल्यामुळे सर्व काही वरच्या पावसावरच अवलंबून होते. दरवर्षी हीच परिस्थिती. त्यामुळे मेहबुब भाई यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी अर्ज केला. त्यानुसार त्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला. तीन लक्ष रुपये खर्च करून शासनाच्या अनु...

“गाव तेथे वाचनालय” संकल्पना राबाविणार - पालकमंत्री येरावार

Image
Ø नगर भवनात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन यवतमाळ, दि. 25 : आजकाल वाचन संस्कृती कमी झाली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी वाचन आवश्यक असून त्याला दुसरा कोणताच पर्याय नाही. ग्रंथ आणि पुस्तक हे ज्ञान संपादनाचे सर्वात मोठे साधन आहे. तसेच वाचन हा माहिती देण्याचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. वाचन संस्कृतीकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून तसेच नियोजन समितीच्या निधीतून “ गाव तेथे वाचनालय ” ही संकल्पना राबविण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, जि.प.शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नगर भवन येथे आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्षा कांचन चौधरी, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, ग्रंथालय विभागाचे सहायक संचालक जगदीश पाटील, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी राजे...

आदिवासी बांधवांनो शासकीय योजनांचा लाभ घ्या - पालकमंत्री येरावार

Image
Ø शिबला येथे “ सरकार आपल्या दारी ” अंतर्गत समाधान शिबिर यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या भरपूर आहे. पांढरकवडा, पुसद, झरी जामणी हे आदिवासी बहुल तालुके आहेत. आदिवासींसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा आदिवासी बांधवांनी लाभ घेऊन स्वत:चे जीवनमान उंचवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. झरी जामणी तालुक्यातील शिबला येथे “ सरकार आपल्या दारी ” उपक्रमांतार्गत आयोजित समाधान, मोफत रोगनिदान तसेच उपचार व रक्तदान शिबिरात ते प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, झरीच्या पंचायत समिती सभापती लता आत्राम, शिबलाचे सरपंच पारिकराव टेकाम, जि.प.सदस्य मिनाक्षी बोलेनवार, संगिता मानकर, बंडू चांदेकर, पं.स.सदस्य राजेश गोंडावार, भाऊराव मेश्राम, नितेश जुनघरे, अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, डॉ. महेंद्र लोढा आदी उपस्थित होते. आदिवासी नागरिकांसाठी असलेल्या सर्व योजनांची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल...