Posts

जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 34 वर

Image
v आज तपासणीसाठी पाठविले 163 नमुने यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत पॉझेटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 14 वरून शनिवारी एकदम 34 वर पोहचल्याने चिंतेत भर पडली आहे. दि. 25 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार एकूण 20 रुग्णांचे नमुने पॉझेटिव्ह आले. त्यामुळे आयसोलेशन वॉर्डमध्ये सद्यस्थितीत एकूण 34 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती असून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहे.  नव्याने पॉझेटिव्ह आलेले रुग्ण हे पूर्वी भरती असलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आले होते. तसेच त्यांच्या तीन कुटुंबातील सदस्यांचा यात समावेश आहे. गत काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या या रुग्णांचा रिपोर्ट शनिवारी महाविद्यालयाला प्राप्त झाला. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत एकूण 261 नागरिक भरती असून शनिवारी सकाळी 163 नमुने तपासणीकरीता नागपूरला पाठविले आहे. आज दिवसभरात एकूण 12 रुग्ण भरती झाले आहेत. गत 24 तासात एकूण 38 रिपोर्ट प्राप्त झाल्या असून यापैकी एकूण 20 पॉझेटिव्ह, 14 निगेटिव्ह तर चार जणांचे रिपोर्ट तपासणीकरीता पुन्हा पाठ...

शेतक-यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व खते उपलब्ध करून द्या - पालकमंत्री संजय राठोड

Image
v कृषी निविष्ठांची नमुने तपासणी प्रयोगशाळा यवतमाळ करण्याचे नियोजन v जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक यवतमाळ, दि. 24 : शेतक-याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला आगामी काही दिवसातच सुरूवात होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा आर्थिक डोलारा खरीपावरच अवलंबून असल्यामुळे आगामी हंगामासाठी शेतक-यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व खते उपलब्ध करून द्या, असे निर्देश राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने नियोजन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार बाळू धानोरकर, खासदार हेमंत पाटील, विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग, दुष्यंत चतुर्वेदी, विधानसभा सदस्य डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू असून त्याच्य...

14 पॉझेटिव्ह रुग्णांसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 233 जण भरती

Image
v आज तपासणीसाठी पाठविले 127 नमुने यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात गुरुवारी नव्याने आठ पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 14 झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या नागरिकांना प्रशासनाने ताब्यात घेतले असून त्यांना आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात एकूण 233 जण भरती असून यात 14  पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली. गत 24 तासात 101 जण नव्याने भरती असून असून शुक्रवारी एकूण 127 जणांचे नमुने तपासणीकरीता नागपूरला पाठविण्यात आले आहे. तर शनिवारी सकाळी जवळपास 150 लोकांचे नमुने पाठविण्यात येईल. संस्थात्मक विलगीकरणात 134 जण तर गृह विलगीकरणात एकूण 795 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या 862 आहे. यापैकी आतापर्यंत 711 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. आज पाठविलेले 127 रिपोर्ट अप्राप्त आहेत. पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने समोर येऊन प्रशासनास माहिती द्यावी. लॉकडाऊ...

पाच मद्यविक्री दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द

Image
v दोन बार ॲन्ड रेस्टॉरंटचा समावेश v जिल्हाधिका-यांच्या सुचनेवरून कारवाई यवतमाळ, दि. 24 : साथरोग नियंत्रण कायदा व संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्यविक्री करणा-या दोन बार ॲन्ड रेस्टॉरंटसह एकूण पाच मद्यविक्री दुकानांचे परवाने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी  कायमस्वरुपी रद्द केले आहे. कोरोना विषाणुचा (कोव्हिड - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉक डाउन सुरू आहे. सोबतच  जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मद्यविक्री व त्याची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र तरीसुध्दा या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्य विक्री करणारे दोन देशी दारूचे दुकान, बीअर शॉपी आणि दोन बार ॲन्ड रेस्टॉरंटवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाई केली असून संबंधितांवर गुन्हा नोंद केला आहे. यात नेर येथील ऋतुराज राजेंद्र महाजन याच्या मालकीचे साई रेस्टॉरंट ॲन्ड बार, पाटणबोरी (ता. केळपूर) येथील शंकर महादेव नालमवार याच्या मालकीचे श्री अनुप रेस्टॉरंट ॲन्ड बार, पाटणबोरी येथीलच पद्मा पद्माकर पतकी याच्या मालकीचे देशी दारूचे दुकान, ...

यवतमाळ शहर 24 ते 27 एप्रिल या कालावधीत पूर्णत: राहणार बंद

Image
v दवाखाने, औषधी दुकाने चोवीस तास सुरू यवतमाळ, दि. 23 : गत काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 14 वर पोहचली आहे. जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून हे पॉझेटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने यवतमाळ शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यवतमाळ शहर 24 एप्रिलच्या दुपारी 12 वाजतापासून 27 एप्रिल 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहे. गुरुवारी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वरील बंदच्या काळात यवतमाळ शहरातील दवाखाने, औषधी दुकाने पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांची औषधी दुकाने 24 बाय 7 सुरू राहील. तसेच दुधाची दुकाने सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. पशुखाद्याची दुकाने सकाळी 6 ते 9 या वेळात, पेट्रोलपंप सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेकरीता पेट्रोलपंप 24 बाय 7 सुरू राहतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिका...

हमी भावानुसार खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

Image
v शेतक-यांना मोठा दिलासा यवतमाळ, दि. 23 : कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे 21 मार्च रोजी जिल्ह्यातील शासकीय हमीभावानुसार कापूस, तूर, चना खरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणी आला. या अडचणीतून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हमी भावानुसार खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्यासह सीसीआय, पणन महासंघाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुर करण्याची आवश्यकता असल्याने शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून हमी भावानुसार शेतक-यांकडून धान्य खरेदी करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच पालकमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यात शासकीय हमीभावानुसार व्हीसीएमएफ व जिल्हा मार्केटिंग अधिकारी मार्फत तूर व चना यांची खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. जिल्ह्यात 16 खरेदी केंद्र असून दिग्रस, दारव्हा, नेर व मारेगाव या तालुक्यात निधी व गोडावून अभावी तूर खरेदी अडचणीत आली होती. परंतु...

शेतमाल खरेदीकरीता तात्पुरत्या स्वरुपात खरेदी केंद्र उपलब्ध करून द्या

Image
v पालकमंत्र्यांचे सहकार व पणन मंत्र्यांना पत्र यवतमाळ, दि. 23 : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊन रोज जास्तीत जास्त शेतक-यांचा शेतमाल खरेदी होण्यासाठी तालुका स्तरावर तात्पुरत्या स्वरुपात खरेदी केंद्र (यात प्रामुख्याने बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था) उपलब्ध करून द्या, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सहकार व पणन मंत्री श्यामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांना पत्राद्वारे केली आहे.             संचारबंदी लागु केल्यानंतर सुरुवातीच्या काळात शेतमालाची खरेदीसुद्धा बंद झाली होती. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून बऱ्याच शेतकऱ्यांना घरखर्च भागवणेसुद्धा कठीण जात आहे. सद्यस्थितीत शेतक-यांकडील हरभरा, तूर व कापुस या शेतमालाची नाफेड आणि सीसीआय यांना विक्री करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली. आजमितीस शेतकऱ्यांचा हरभरा, तूर, कापूस या शेतमालाची शासकीय खरेदी केंद्रामार्फत अत्यल्प शेतकऱ्यांकडून खरेदी सुरु झालेली आहे. परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्याकरीता " सोशल...