पिककर्ज वाटपामधील दलालांबद्दल तक्रारी द्याव्यात *किशोर तिवारी यांचे आवाहन *दलाल असलेल्या बँकांवर कारवाई यवतमाळ, दि. 29 : शेतीचा हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. ही बाब हेरून बँकांमध्ये दलाल सक्रिय झाले आहेत. पिककर्ज वाटपामध्ये हे दलाल मध्यस्थांची भूमिका निभावत असून त्यापोटी शेतकऱ्यांकडून काही टक्के रक्कम घेत आहेत, हे प्रकार थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन मिशनकडे याबाबत तक्रार द्यावी, असे आवाहन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोत तिवारी यांनी केले आहे. पिककर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी प्रत्येक जिल्हात आढावा बैठका व मेळावे एप्रिलपासुन सुरू केल्यानंतरही २७ जुनपर्यंत मराठवाडा व विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात केवळ ४० टक्केच पिककर्ज वाटप केले आहे. यापूर्वी मे महिन्यातच सरकारने खरीप हंगाम २०१४ -१५ व २०१५-१६ चे संपुर्ण पिककर्जाचे पुनर्वसन करून पाच वार्षिक हप्ते करून व्याज सवलत दिली होती. या सर्व पात्र शेतकऱ्यांना नवीन पिककर्ज देण्याचे आदेश सर्व बँकांना नाबार्डमार्फत रिझर्व्ह बँकेने २२ मे दिले होते. मात्र राष्ट...