मुख्‍यालयी न राहणा-या कर्मचा-यांवर कारवाई करा
* ग्रामस्‍तरीय समितीला तक्रार करण्‍याचे आवाहन
यवतमाळ, दि. २९ः शेतक-यांसाठी खरीप हंगाम हा महत्‍वाचा काळ असून यावेळी शेतक-यांना आलेल्‍या अडचणी सोडविण्‍यासाठी गावातील कर्मचारी मुख्‍यालयी राहणे गरजेचे आहे. मात्र, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कृषिसहायक, ग्रामसेवक, पोलीस पाटील हे मुख्‍यालयी राहत नाही. अशा कर्मचा-यांवर संबंधीत अधिका-यांनी सक्‍त कार्यवाही करण्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी दिले आहे. तसेच मुख्‍यालयी न राहणा-या अशा कर्मचा-यांची तक्रार संबंधीत विभागकडे व जिल्‍हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षात ग्रामस्‍तरीय समितीने व शेतक-यांनी करावी असे आवाहनही करण्‍यात आले आहे.
            जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने शेतक-यांना धीर देण्‍यासाठी, त्‍यांच्‍यात आत्‍मविश्‍वास  निर्माण करण्‍यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्‍यात येत आहे. यातून शेतक-यांना येणा-या अडचणी सोडविण्‍यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्‍यात आल्‍या. सद्या शेतक-यांच्‍या पेरणीचा, लागवडीचा हंगाम सुरू आहे. तसेच शेतक-यांना कर्ज वाटपही करण्‍यात येत आहे. या काळात गावात शेतकरी व नागरिकांच्‍या अडचणी सोडविण्‍यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामसेवक, कृषिसहायक, पोलीस पाटील या शासकिय कर्मचा-यांची मोलाची भूमिका असते. मात्र, हेच कर्मचारी मुख्‍यालयी राहत नसल्‍याच्‍या तक्रारी जिल्‍हा प्रशासनाकडे आल्‍या आहे. त्‍यामुळे शासकिय कर्मचारी मुख्‍यालयी राहत नसल्‍या कारणारे शासन योजनांचा लाभ शेतक-यांना मिळू शकत नाही.
परीणामी असे मुख्‍यालयी न राहणा-या,  शेतक-यांची कामे तुंबून ठेवणा-या, शेतक-यांना सहकार्य न करणा-या कर्मचार-यांविरूध्‍द कार्यवाही करणाचे निर्देश संबंधीत विभागाला देण्‍यात आले आहे. तसेच गावस्‍तरावर ग्रामस्‍तरीय समित्‍यांचे गठन करण्‍यात आले आहे. ज्‍या गावचे कर्मचारी त्‍या गावी राहत नसतील, गावी येत नसतील, शेतक-यांना उचित सेवा देत नसतील अशा कर्मचा-यांच्‍या तक्रारी ग्रामस्‍तरीय समितीने संबंधीत विभागांच्‍या अधिका-यांकडे करावी  व त्‍यांची एक प्रत जिल्‍हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षात सादर करावी. असे आवाहन जिल्‍हाधिकारी जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती