Posts

Showing posts from February, 2026
Image
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी’ यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील #खारघर येथे आयोजित भव्य कार्यक्रमाच्या तयारी व नियोजनाविषयी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची विशेष मुलाखत आज दुपारी ४ वाजता महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होणार आहे. #जयमहाराष्ट्र #हिंददीचादर #गुरुतेगबहादुर

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त 'दिलखुलास' व 'जय महाराष्ट्र' मध्ये कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांत “हिंद-दी-चादर” – श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमाच्या तयारी व नियोजनाविषयी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होईल. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. मुलाखत News On AIR या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका उन्नती जगदाळे यांनी केले आहे. X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR “हिंद दी चादर” हा राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असून विविध...

श्री गुरू तेग बहादुर साहिब जी' यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचे नवी मुंबईत आयोजन शहिदी समागम कार्यक्रमासाठी प्रशासन सोयी-सुविधांसह सज्ज - कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडणार - राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक मुंबई दि. २७ : ‘हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. नवी मुंबई येथे होणाऱ्या हिंद -दी- चादर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरद रावजी ढोले, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपालसिंग सिद्धू, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅपी सिंग उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, या दोन दिवसीय कार्यक्रमात देश विदेशातून १८ ते २० लाख भाविक येणे अपेक्षित आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले असून, मुख्य मंडपात एकावेळी ८० हजार...

गुरु तेगबहादूर जी : सहिष्णुता, करुणा आणि धर्मस्वातंत्र्याचे प्रतीक

Image
-प्रो. डॉ. दीपक मो. शिंदे परीक्षा नियंत्रक, केंद्रीय जन जाती विद्यापीठ, विजयानगरम (विशाखापट्टणम) माजी संचालक – श्री गुरु गोबिंद सिंघ जी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, भारतीय इतिहासात अशी काही महान व्यक्तिमत्त्वे उदयास आली आहेत की, ज्यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरते अशा महान विभूतींचे कार्य एखाद्या धर्माच्या चौकटीत न अडकता संपूर्ण मानवजातीसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठरले आहे. शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर जी, हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य, न्याय, करुणा, धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अर्पण केले. त्यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असताना, त्यांचे सामाजिक सुधारक म्हणून असलेले कार्य आणि विचार आजही तितकेच सुसंगत आणि मार्गदर्शक आहेत. प्रत्यक्षात शीख धर्म असा एक धर्म आहे की या धर्माच्या धर्म गुरुनी दिलेल्या बलिदाना मुळे हिंदू धर्माचे रक्षण झाले आहे. गुरु तेगबहादूर जी : थोडक्यात जीवनपरिचय १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे जन्मलेले गुरु तेगबहादू...

27 फेब्रुवारीपासून नवीन मोटार सायकलची सिरीज

यवतमाळ, दि. 26 :(जिमाका) : परिवहनेत्तर विभागातील नवीन मोटार सायकलची सध्याची एमएच 29 सीएन सिरीज संपुष्टात येत असल्यामुळे एमएच 29 सीक्यु ही नवीन सिरीज 27 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली आहे. ज्या ग्राहकांना नवीन आकर्षक नंबर घ्यायचा असेल त्यांनी कार्यालयात येऊन अर्ज सादर करावे. ही मुभा फक्त एका दिवसासाठी उपलब्ध राहील, त्यानंतर ऑनलाईन सुविधेचा उपयोग करता येईल, यांची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे अवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी केले आहे

गर्भपातास मान्यतेसाठी वैद्यकीय मंडळ Ø श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मंडळ स्थापन

यवतमाळ, दि. 26 :(जिमाका) : श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे वैद्यकीय गर्भपात अधिनियम १९७१ च्या सुधारित २०२१ अधिनियमानुसार २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपाताला मान्यता देण्यासाठी वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे अधिष्ठाता असून समितीत क्ष-किरण तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, अनुवंश, मानसोपचार तज्ञ आणि मेंदुविकार तज्ञ अशा नऊ तज्ज्ञांचा समावेश आहे. गर्भातील बाळाला काही व्यंग असल्यास गर्भवती महिलींना २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपातास मान्यता देण्यासाठी वैद्यकीय मंडळास पाचारण करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी केले आहे.

शासकीय वसतिगृहातील प्रवेश अर्जासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ

यवतमाळ, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय वसतीगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह, आधार व स्वयंम या योजना १२ च्या नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतात. या योजनेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यासाठी वसतीगृह प्रवेश प्रणाली कार्यन्वित करण्यात आलेली होती. राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाळ योजनेतंर्गत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकातील बदलाबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रवेश प्रक्रिया राबवुनही अद्यापही अनेक जिल्ह्यामध्ये रिक्त जागा दिसून येत आहेत. मुलांचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ येथील व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विजाभज प्रव...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

यवतमाळ, दि. 26 (जिमाका) : लोकांच्या तक्रारी निकाली काढण्याच्यादृष्टीने मार्च महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि. 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे असे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्त‍िक स्वरुपाची नसावी. महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये अर्जाचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. तसेच अर्ज दाखल करतेवेळी तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाही, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी केले आहे.

कृषी पुरस्कारांसाठी आता ऑनलाईन संगणक प्रणाली Ø पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करावे Ø जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 26 :(जिमाका) : कृषी विभागामार्फत दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांना विविध पुरस्कार दिले जातात. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी कृषी विभागामार्फत स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. सदर पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रद...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाची संधी ! Ø ४० गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार Ø विद्यार्थ्यांनो ऑनलाइन अर्ज करा Ø प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 26 :(जिमाका) जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत ‘परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती’ योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ४० गुणवंत आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमाती ४० विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भोजन), शैक्षणिक आकस्मिक खर्च, विमान प्रवास खर्च, व्हिसा शुल्क आणि आरोग्य विमा अशी सर्वसमावेशक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शैक्षणिक आकस्मिक खर्चासाठी युएएस व इतर देशांसाठी (यूके वगळून) दरवर्षी १ हजार ५०० यूएस डॉलर, तर यूकेसाठी १ हजार १०० जीबीपी इतकी रक्कम दरवर्षी देण्यात येईल. योजनेसाठी पात्रता या योजनेसाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे, तर पीएचडीसाठी...

येरद येथील शांताई ज्युनियर कॉलेज परीक्षा केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त घेण्याच्या सूचना

Image
यवतमाळ, दि. 25 (जिमाका): इयत्ता बारावी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज मौजा येरद (ता. यवतमाळ) येथील शांताई ज्युनियर कॉलेजला अचानक भेट देत परीक्षा केंद्राची पाहणी केली. यवतमाळ शहरापासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या या केंद्रात आज बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना ही तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष परीक्षा सुरू असलेल्या खोलीत जावून पाहणी केली तसेच नियुक्त पर्यवेक्षक शिक्षकांना कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याबाबत स्पष्ट व कडक सूचना दिल्या. परीक्षा वर्गात नेमण्यात आलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सतर्क राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले. तपासणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक वर्गातील सीसीटीव्ही व्यवस्था कार्यरत आहे का, याची प्रत्यक्ष पडताळणी केली. परीक्षा सुरु असताना कोणतेही कॉपीसारखा गैरप्रकार होत नाही ना, याची त्यांनी बारकाईने पाहणी केली. आज पार पडत असलेल्या जीवशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने सीसीटीव्...

राज्य शासनाकडून जिल्हा वार्षिक योजनेसाठी 570 कोटी मंजूर Ø 98 कोटींची अतिरिक्त वाढ Ø मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी Ø जिल्ह्याच्या विकासाला गती Ø आकांक्षित तालुका कार्यक्रमाला बळ

Image
यवतमाळ, दि. 25 (जिमाका): जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनाने सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 570 कोटी रुपयांची अंतिम तरतूद मंजूर केली आहे. ही मंजुरी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत देण्यात आली. कमाल आर्थिक मर्यादेपेक्षा 98 कोटी 42 लाख रुपयांची अतिरिक्त वाढ मान्य करण्यात आली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये जिल्ह्यास 471 कोटी 58 लाख रुपयांची कमाल आर्थिक मर्यादा प्राप्त झाली होती. त्यानुसार प्रारूप आराखडा तयार करून 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यासाठी 175 कोटींच्या अतिरिक्त निधीची प्रभावी मागणी केली होती. त्यापैकी 98 कोटी 42 लाख रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली. निधीचे क्षेत्रनिहाय वाटप या मंजूर तरतुदीनुसार गाभा क्षेत्रासाठी 373 कोटी 10 लाख रुपये, बिगरगाभा क्षेत्रासाठी 170 कोटी 4 लाख रुपये तर इतर क्षेत्रासाठी 5 टक्के म्हणजे 26 कोट...

'हिंद दी चादर' समूहगानाचा नवी मुंबईत जागतिक विक्रम! 🌏✨

Image
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शाहदत समागमानिमित्त कोकण विभागातील ५१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी प्रेरणादायी गीत गाऊन 'बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. #khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! 🚩

Image
या मंगलप्रसंगी ह.भ.प. संजय महाराज पाचपोर (वारकरी संप्रदाय) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भक्ती आणि शक्तीच्या या अद्भूत संगमात आपण सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. #khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! 🙏✨

Image
नवी मुंबईतील खाघर येथे आयोजित या भव्य आध्यात्मिक सोहळ्याला नक्की उपस्थित रहा. भाई साहिब जसकीरत सिंग जी यांच्या प्रमुख उपस्थितीत नामस्मरण आणि कीर्तनाचा लाभ घ्या. #khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे करणार राष्ट्रीय आरोग्य मेळावा - २०२६ चे उद्घाटन

यवतमाळ दि. 24 : भारत सरकारचे आयुष मं त्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे चार दिवसांचा "राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026" आयोजित करण्यात आला आहे. औषधी वनस्पती लागवड आणि कृषी वनीकरणाद्वारे आयुष औषध प्रणालींबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे , सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करणे आणि शेतकऱ्यांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करणे हे या मेळाव्याचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय आरोग्य मेळावा- 2026 चे उद्घाटन शुक्रवार 25 फेब्रुवारी 2026 रोजी मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभ संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर होणार आहे. उद्घाटन समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार व केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि इतर अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या संपूर्ण मेळाव्यात नागरिकांना आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार...

धामणगाव देव भक्तिमय ! “माऊलींच्या जयघोषात”श्री मुंगसाजी महाराजांना अभिवादन Ø पालकमंत्री ना. संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती

Image
यवतमाळ, दि.24 (जिमाका) : श्री मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी श्री मुंगसाजी महाराज संस्थान, धामणगाव देव या तीर्थक्षेत्रास भेट देऊन श्री मुंगसाजी माऊलींच्या स्मृतीस अभिवादन केले. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी भगवान श्री मुंगसाजी माऊली यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात विधीवत आरती करून त्यांनी माऊलींचे आशीर्वाद घेतले. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. “माऊलींच्या विचारांत समाजाला एकत्र ठेवण्याची आणि संस्कार जपण्याची ताकद आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर आयोजित पालखी सोहळ्यातही ना. राठोड सहभागी झाले. पारंपरिक वेशात सजविण्यात आलेल्या पालखीचा मान स्वीकारत त्यांनी भक्तांसह काही अंतर पायी चालत सहभाग नोंदविला. ढोल-ताशांच्या गजरात आणि “माऊलींच्या जयघोषात”वातावरण भक्तिमय झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्र्यांनी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत सूचना जाणून घेतल्या व शासनस्तरावर आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ...

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता; जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

यवतमाळ, दि. २४ : नागपूरच्या मौसम विज्ञान विभागाने २४ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात दि. २४ व २५ फेब्रुवारी दरम्यान काही भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विज पडुन होणारी जिवित हानी व वादळी वा-यामुळे घरांची भिंत, टिनपत्रे पडुन होणारी जिवितहानी व वित्त हानी टाळण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून "काय करावे, काय करू नये" याबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. त्यानुसार नैसर्गिक वीज पडून मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. अद्ययावत हवामान माहितीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे ‘सचेत’ अॅप तसेच ‘दामिनी’ अॅप डाउनलोड करून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वारा/ विजा चमकत असल्यास घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा, घराच्या दरवाजे खिडक्या, कुंपणापासून दूर राहा. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच रहावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवा-याच...

उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळणार Ø इतर मागास बहुजन कल्याण विभागाने मागवले प्रस्ताव Ø 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे मुदतवाढ

यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यामध्ये नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारांचा समावेश असून, इच्छुकांनी 27 फेब्रुवारी पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे. इच्छुकानी आपले प्रस्ताव 27 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ यांच्या कार्यालयात सादर करावेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे. 0000000

रिझर्व्ह बँकेमार्फत जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रशिक्षण Ø दोनशेहून अधिक उद्योजक तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

Image
यवतमाळ, दि. २४ (जिमाका) : जिल्ह्यात आर्थिक समावेशन आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक, नागपूर कार्यालयातर्फे २३ फेब्रुवारी रोजी ‘विदर्भ स्पेसिफिक ट्रेनिंग फॉर एम्पॉवरिंग एमएसएमई’ आणि विशेष टाऊनहॉल बैठकीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील २०० हून अधिक एमएसएमई उद्योजक आणि तरुण इच्छुकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला बँक ऑफ इंडियाचे उप महाव्यवस्थापक कुश गहोत्रा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील पांडे, यवतमाळ जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुशील गरूड तसेच सिडबी, नाबार्ड आणि इतर प्रमुख बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आरबीआय नागपूरचे प्रादेशिक संचालक सचिन वाय. शेंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना उद्योजकांचे कौशल्य विकास, वित्तीय साक्षरता आणि उद्योगांना औपचारिक क्षेत्राशी जोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उपमहाव्यवस्थापक अंजना श्यामनाथ यांनी उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना विदर्भातील स्थानिक संधी आणि आव्हानांना थेट प्रतिसाद देण्यासाठी हा वि...

चाईल्ड हेल्पलाईनमुळे चार बालविवाह रोखण्यात यश Ø १०९८ क्रमांकाची हेल्पलाईन २४ तास कार्यरत

यवतमाळ, दि. २४ (जिमाका) : नववर्षाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात चार अल्पवयीन बालिकांचे नियोजित बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईन १०९८ व जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. या प्रकरणांमध्ये यवतमाळ तालुक्यातील वाघाडी, नेर तालुक्यातील रत्नापूर बेडा, बाभूळगाव तालुक्यातील गणोरी, आणि महागाव तालुक्यातील पिंपळगाव इजारा, येथील बालविवाहांचा समावेश आहे. मागील वर्षात जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ६० पेक्षा अधिक बालविवाह संदर्भातील चाईल्ड हेल्पलाईन १०९८ क्रमांकावर कॉल प्राप्त झाले होते. प्राप्त माहितीनुसार तात्काळ घटनास्थळी भेट देऊन स्थानिक प्रशासनाच्या मदतीने संबंधित कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आले. विवाहासाठी मुलाचे किमान वय २१ वर्षे तर मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलीच्या विवाहाबाबत माहिती मिळताच पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ विषयी सविस्तर माहिती देऊन बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत बालविवाह लावणाऱ्या, त्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या किंवा सोहळा पार पाडणाऱ्या व्यक्तीस दोन...

अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ जिल्हा अव्वल Ø विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते बक्षिस वितरित

Image
यवतमाळ,दि.२३ (जिमाका) : यंदाच्या तीन दिवसीय अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ येथे उत्साहात पार पडल्या. या दोन्ही स्पर्धेत विभागातील पाचही जिल्ह्यांमधून यवतमाळ जिल्ह्याने अव्वल स्थान गाठत पहिल्या क्रमांकाचे बक्षिस पटकावले. तर सर्वसाधारण क्रीडा स्पर्धेत अमरावती जिल्ह्याने व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळवले. या बक्षिसांचे वितरण विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. या बक्षिस वितरण सोहळ्याला जिल्हाधिकारी विकास मीना, विभागीय अपर आयुक्त संजय जाधव, विरेंद्र हजारे, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, महसूल कर्माचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप कोलेवाड आदी मान्यवर उपस्थित होते. “अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात व आनंदी वातावरणात झाल्याचा आनंद आहे. या स्पर्धांमध्ये अधिकारी- कर्मचारी ज्या उत्साह व आनंदाने सहभागी झाले, तोच उत्साह व आनंदी वातावरण नेहमी कायम ठेवावे आणि खिलाडूवृत्तीन...

कोकण विभागातील 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला “ हिंद-दी-चादर” अन् “बोले सो निssहाल” चा जयघोष

Image
'बेस्ट ऑफ इंडिया' रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद नवी मुंबई, दि.23( विमाका) :- हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने आज कोकण विभागात एक अभूतपूर्व इतिहास रचला गेला. कोकण विभागातील 20 हजार शाळांमधील तब्बल 51 लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले ‘हिंद-दी-चादर’ हे गीत सादर केले. या ऐतिहासिक उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डने घेतली असून, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आगामी 28 फेब्रुवारी आणि 01 मार्च रोजी खारघर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यास सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन केले आहे. नेरुळ येथील गुरु गोविंदसिंग एज्युकेशन अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील यांच्यासह उपमहापौर दशरथ भगत, विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, प्रशासन सहआयुक्त विजय म्हासाळ, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक मनोज सानप, सहायक आयुक्त ...

शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे वसतिगृह सुरक्षा समितीची बैठक संपन्न

Image
यवतमाळ,दि.२३ (जिमाका) : शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे वसतिगृह सुरक्षा समितीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जी. ई. काळूसे यांनी भूषविले. बैठकीच्या प्रारंभी संस्थेचे प्राचार्य ए. पी. मटाले यांनी अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच उज्वला शिरभाते यांनी समिती स्थापन करण्यामागील उद्देश व गरज याबाबत सविस्तर माहिती दिली. या सभेस विद्यार्थी वसतिगृह कुलमंत्री पी. पी. पवार, विद्यार्थिनी वसतिगृह कुलमंत्री एस. एस. कांबळे, समिती सदस्य सी. के. काळे, ज्येष्ठ नागरिक जी. के. पत्रकार, पालक प्रतिनिधी एस. आर. खंगार व एस. एस. गोरे उपस्थित होते. 000000

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

Image
यवतमाळ,दि.२३ (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. नायब तहसीलदार विजय गावंडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 000000

पुसद येथे नेत्ररोग तपासणी शिबीर संपन्न Ø आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व पुसद रोटरी क्लबद्वारे आयोजन Ø 114 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

Image
यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व रोटरी क्लब, पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दि. 19 फेब्रुवारी रोजी डॉ. उमेश रेवणवार हॉस्पिटल, पुसद येथे नेत्ररोग तपासणी शिबीर संपन्न झाले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत कार्यरत असलेल्या 8 शासकीय आश्रमशाळांमध्ये एकूण 2766 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये 1159 मुले व 1607 मुलींचा समावेश आहे. आरबीएसके पथकाच्या प्राथमिक नेत्र तपासणीत आठही शाळांतील 114 विद्यार्थ्यांना नेत्रदोषाच्या तक्रारी आढळून आल्या होत्या. या शिबिरात नेत्रदोष आढळलेल्या 114 विद्यार्थ्यांची अद्ययावत यंत्रणांच्या सहाय्याने नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. नेत्रतज्ज्ञ डॉ. उमेश रेवणवार यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांची काळजी, स्वच्छता व नियमित तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी दंतरोगतज्ज्ञ डॉ. विशाल गोटे यांनीही विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता व निगा राखण्याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूम...

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक आदित्य शेंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 000000

अमरावती विभागस्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धेत यवतमाळ आरसेटीच्या प्रशिक्षणार्थींचे यश Ø प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : दरवर्षी आरसेटी अंतर्गत प्रशिक्षित झालेल्या लाभार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य तपासण्यासोबतच आरसेटी योजनेचा व्यापक प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने उमेद अभियानाच्या माध्यमातून कौशल्य व ज्ञान स्पर्धेसारखा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतो. त्याच अनुषंगाने दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्य कक्षामार्फत अमरावती विभाग स्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धेचे आयोजन यवतमाळ आरसेटी येथे करण्यात आले. या स्पर्धेत यवतमाळ आरसेटीच्या सोनाली वाईकर यांनी फास्ट फूड या विषयात प्रथम क्रमांक पटकाविला, तर द्वितीय क्रमांक अमरावती आरसेटीला मिळाला. या स्पर्धेत अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ येथील आरसेटी केंद्रांमधील प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मागील दोन वर्षांत प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांमधून प्रत्येक आरसेटीमधून चार उत्कृष्ट उमेदवारांची निवड करण्यात आली होती. डेअरी फॉर्मिंग, सर्वसाधारण उद्योजकता विकास, ज्वेलरी बनविणे आणि फास्ट फूड या विषयांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद...

शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी गावपातळीवर विशेष मोहीम; थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी आधार कार्ड उपलब्ध करावे Ø जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : राज्यातील शेती क्षेत्रात व शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनाने अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या असून, त्याअनुषंगाने प्रस्तावित शेतकरी कर्ज निवारण योजना 2026 संदर्भात गावपातळीवर विशेष मोहिमेद्वारे माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतू, अद्याप जिल्ह्यातील 9939 थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांची आधार कार्डची छायांकित प्रत सादर केली नसून त्यांनी ती तात्काळ कार्यकारी सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे. थकीत कर्जदार सभासदांची माहिती विहित परिशिष्ट ‘अ’ मध्ये तयार करण्याचे काम संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या शाखा स्तरावर सुरू आहे. ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांचे आधार कार्ड संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेकडे उपलब्ध झालेले नाही, अशा शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर नोंदविताना ...

नेर येथे उद्या विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा Ø पालक न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार Ø विविध विभागांचे 60 स्टॉल Ø नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने नेर येथील तालुका क्रीडा संकुल येथे रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता ‘विधी सेवा महाशिबीर व शासकीय कल्याणकारी योजनांचा महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ, जिल्हा प्रशासन व तालुका विधी सेवा समिती, नेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा यवतमाळच्या पालक न्यायमूर्ती मुकुलिका श्री. जवळकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी पालक न्यायमूर्ती वृषाली वि. जोशी, न्यायमूर्ती निवेदिता प्र. मेहता, तसेच न्यायमूर्ती नंदेश शं. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर च. मुनघाटे राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार प...

प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी नेरमधील थकीत शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत Ø सहकार अधिकारी एम.एम भगत यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : राज्य शासनाच्या प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. नेर तालुक्यात एकूण ५ हजार ३९० थकीत सभासद असून त्यापैकी आतापर्यंत ४ हजार ८०५ थकीत शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. उर्वरित ५८५ शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित सोसायटीच्या सचिवांकडे किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा नेर येथे भेट देऊन आधार कार्ड, फार्मर आयडी व इतर आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन नेर येथील सहकार अधिकारी एम.एम भगत यांनी केले आहे. शेती क्षेत्रासह शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी विहीत नमुना प्रपत्र अ व ब मध्ये माहिती मागविण्यात आली आहे. सहाय्यक निबंधकांच्या मार्गदर्शनाखाली विहीत नमुन्यात प्रपत्र अ व ब मध्ये माहिती भरण्याचे काम सुरू आहे. ज्या सभासदांचे आधार तपशील अद्याप सेवा सोसायटीकडे प्राप्त झालेले नाहीत, ते प्राप्त करुन घेण्यासाठी सहकार अधिकारी व संबंधित कार्यालयीन कर्मचारी, तसेच संबंधि...