डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ण करा > समाज कल्याण विभागाने विद्यार्थ्यांना आवाहन

यवतमाळ दि.24 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी तत्काळ पूर्ण कराव्यात, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन त्रुटींची पूर्तता करुन त्याची प्रत कार्यालयात सादर करण्याची मुदत देण्यात येत आहे. स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रासह अर्ज ऑनलाईन अपलोड करुन दि. 30 एप्रिलपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे परंतू त्याची प्रत अद्याप कार्यालयात सादर केलेली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज सादर न केल्यास किंवा योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहणार आहे. तसेच निर्धारित मुदतीत त्रुटी पूर्ततता न केल्यास अर्ज अपात्र ठरणार याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे. ००० --

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान