मुख्य जलवाहिनी क्षतीग्रस्त झाल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत
यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : पाणी पुरवठा योजनेतंर्गत निळोणा धरणावरुन यवतमाळ शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी निर्माधीन रेल्वे पुलाखाली दि. 24 जुलै रोजी क्षतीग्रस्त झाल्यामुळे ऑफिसझोन अंतर्गत येणाऱ्या 9.00 लाख लिटर्स, 14.00 लाख लिटर्स व नव्याने बांधकाम करण्यात आलेली 14.00 लाख लिटर्स पाण्याचे टाकीमधून पाणी पुरवठा होणाऱ्या सर्व भागांमधील दि. 24 जुलै पासून पाणी पुरवठा पुर्णपणे बंद आहे. तरी या संदर्भात निर्माणधीन रेल्वे विभागांकडे पत्र व्यवहार करण्यात आला असून पाईप गळती दुरुस्ती करण्याचे काम जलदगतीने करण्यात येत आहे.
पाईपलाईन वरील गळती दुरुस्ती होईपर्यंत संबंधीत भागातील पाणी पुरवठा बंद राहील याची कृपया नोंद घेण्यात यावी. असे उपविभागीय अधिकारी एस. आर. उमाळे यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.
000
Comments
Post a Comment