Posts

मुलभूत कर्तव्ये या विषयावर कायदेविषयक शिबीर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी चिकित्सालय, अमोलकचंद विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुलभुत कर्तव्ये या विषयावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मुनोत होते तर मुख्य अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार होते. प्रमुख वक्ते म्हणुन अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक संदिप नगराळे उपस्थित होते. वक्ते संदीप नगराळे यांनी मुलभुत कर्तव्ये व बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कर्तव्ये हे ४२ व्या संशोधनामुळे अंतर्भुत केले. २१ (अ) मोफत व सक्तीच्या शिक्षणिचा अधिकार सदर कलमान्वये प्रदान करण्यात आला, असे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्य अतिथी व मार्गदर्शक कुणाल नहार यांनी शालेय जिवनापासून महाविद्यालय आणि त्यानंतर एक नागरीक म्हणुन कर्तव्यपरायण व्हावे व मुलभुत कर्तव्य पार पाडावित, असे आवाहन केले. मोफत व सक्तीच्या शिक्षणाबाबत बोलतांना मुलांना ज्

चना खरेदीसाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्रे

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी जामणी, पुसद, आर्णी, दिग्रस, बाभुळगांव या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रावर दि.28 मार्च ते 25 जून पर्यंत सुरु राहणार आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, दिग्रस तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस, बाभुळगांव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, बाभुळगांव या केंद्रांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चना खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दि.28 मार्च पासून करण्यात येत असून प्रत्यक्षात चना खरेदी दि. 28 मार्च ते 25 जूनपर्यंत करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, सातबारा उतारा, पिकपेरा व बँके पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर देवून

महाराष्ट्र विविध प्रथा, परंपरांनी नटलेले समृद्ध राज्य - संजय राठोड

Image
महाराष्ट्र विविध प्रथा, परंपरांनी नटलेले समृद्ध राज्य आहे. येथील साहित्य, संस्कृती, कला, संगीत, समृध्द गडकिल्ले महाराष्ट्राचे वैभव आहे. अशा राज्यात आपण वास्तव्य करतो, ही आपल्यासाठी देखील गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहन झाले. त्यावेळी शुभेच्छा देतांना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीस पालकमंत्र्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी अनेक मराठी बांधवांना सातत्याने संघर्ष करावा लागला. या संघर्षात 105 बांधवांना शहीद व्हावे लागले. या सर्व शहीदांना पालक

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 29 एप्रिल (जिमाका) : महाराष्ट्र दिनी विविध कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा. प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यावर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलिस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळून आल्यास संबंधित तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्

खरीपात बियाणे, खते, किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा -डॉ.पंकज आशिया

Image
Ø जिल्हाधिकाऱ्यांकडून खरीप हंगाम तयारीचा आढावा Ø जिल्ह्यात 8 लाख 97 हजार हेक्टरवर खरीप नियोजन Ø गेल्या हंगामात कमी कर्जवाटप करणाऱ्या बॅकांना नोटीस यवतमाळ, दि. 29 एप्रिल (जिमाका) : खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे. या हंगामात शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्धतेसह आवश्यक निविष्ठा जसे बियाणे, खते, किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, याची दक्षता घ्या. हंमागाचे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केल्या. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगाम नियोजन तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांच्यासह सर्व उपविभागीय कृषि अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात खरीप हंगामात 8 लाख 97 हजार 390 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. त्यात कापूस सर्वाधिक 4 लाख 57 हजार 510 हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यापाठोपाठ सोयाबीन 2 लाख 94 हजार 260 तर तूर 1 लाख 15 हजार 400 हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. खरीप ज्वार

आयआयएचटी प्रथम व द्वितीय सत्राकरीता प्रवेश सुरु

केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय सत्राकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ईच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. प्रथम वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता १३ जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा तसेच वेंकटगिरी करीता २ जागेच्या प्रवेशासाठी तसेच द्वितीय वर्षाकरीता ३ जागा (१ जागा आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता) पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि. 10 जून पर्यंत मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपुर्ण अर्ज दि. 10 जून पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अन

शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीचे अर्ज 30 एप्रिलपर्यंत स्विकारणार

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेचे नवीन व नूतनीकरणचे अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल ही आहे. या मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर मुदतवाढ ही अंतिम स्वरुपाची असल्याने दि. 30 एप्रिल पूर्वी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येईल. या कालावधीनंतर अर्ज प्रलंबित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील, तसेच अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांना शिक्षण शुल्क घेता येणार नाही, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक मंगला मुन यांनी कळविले आहे. 000