लोककल्याणकारी योजनांमुळे सर्वसमावेशक विकासाला गती -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ø 881 कोटी रू. निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन ; Ø यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडणार ; Ø ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात 50 हजार नागरिकांची उपस्थिती ; Ø जिल्ह्यात 16 लाख नागरिकांना 601 कोटी रू. निधीतून लाभाचें वितरण ; जिल्ह्यात व्हितारा कंपनीसह नामांकित उद्योग सुमारे 5 हजार कोटींची गुंतवणूक ; गत दोन वर्षांत राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजना व निर्णयांमुळे युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला, वंचित, दिव्यांग आदी सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. यवतमाळ शहरानजिक किन्ही गावाजवळ ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. जिल्ह्यात 881 कोटी रू. निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार भरत गोगावले, प्रा. डॉ. अशोक उईके, किरण सरनाईक, इंद्रनील नाईक, डॉ.संदीप धुर्वे, संजीव रेड्डी बोदकुरवार, प्र. विभागीय आयुक्त संजय पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक