महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी - पालकमंत्री मदन येरावार
v कळंब येथे स्वयं सहायता समुह व ग्राम संघांना 6 कोटींचे धनादेश वाटप v बचत गटांच्या उत्पादनांसाठी विक्री केंद्राची इमारत यवतमाळ , दि. 30 : देशातील लोकसंख्येच्या 50 टक्के वाटा महिलांचा आहे. आजची महिला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आदी क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांच्या हाती पैसा असला की मुलांचे शिक्षण, कुटुंबाची गरज आदींचे चांगल्या प्रकारे नियोजन होते. कुटुंबाच्या बाहेर महिलांनी पाऊल टाकले आहे. बचत गटाच्या माध्यमातून गावाचे आर्थिक नियोजन त्या करीत आहेत. एकप्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम बचत गटांच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. कळंब येथील मोरया सभागृहात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आयोजित उमेद, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयं सहायता समुह व ग्रामसंघांना निधीचे वाटप करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. अशोक उईके, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, कळंबच्या पं.स. सभपती संजीवनी कासार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचाल