केळी पिकासाठी 31 ऑक्टोबर व संत्रासाठी 30 नोव्हेंबर अंतीम दिनांक · बँकेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर देखील विमा अर्ज भरण्याची सोय उपलब्ध
यवतमाळ, दि 19 ऑक्टोबर (जिमाका) :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचीत हवामान आधारीत फळपिक विमा योजना 2022-23 अंबिया बहारामध्ये केळी व संत्रा या पिकांकरीता सहभाग नोंदविण्याचा अंतिम दिनाक अनुक्रमांक 30 ऑक्टोबर व 30 नोव्हेंबर असा असून शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. संत्रा पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 80 हजार असून शेतकऱ्यांना विमा हप्ता प्रत्येकी रुपये 12 हजार प्रति हेक्टर रक्कम भरावयाची आहे. व केळी पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 1 लाख 40 हजार असून शेतकऱ्यांना विमा हप्ता प्रत्येकी रुपये 7 हजार प्रति हेक्टर भरावयाचा आहे. सदर योजनेत शेतकरी सहभागाकरीता केळी पिकाची अंतीम दिनांक 31 ऑक्टोबर 2022 तर संत्रा पिकाची अंतीम दिनांक 30 नोव्हेंबर 2022 आहे. यासाठी विमा कंपनी रिलायंस जनरल इन्शुरन्स कं.ली., वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, 5 वा मजला, चिंतामणी अव्हेन्यु, विरानी औद्योगिक वसाहत जवळ, गोरेगाव (इ), मुंबई- 400063. ग्राहक सेवा क्र.:18001024088 दुरध्वनी क्र. 02268623005, ई–मेल : rgicl.maharashtraagri@relianceada.com या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. यवतमाळ जि