जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे नियोजन
v पालकमंत्र्यांनी घेतली रेशीम विकास आढावा बैठक यवतमाळ, दि. 28 : रेशीम शेती उद्योगासाठी यवतमाळ जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व हवामान अतिशय अनुकूल आहे. कृषीवर आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला तसेच शेतक-यांचे उत्पन्न वाढविणारा हा उद्योग आहे. जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळत असलयाने सन 2018-19 या वर्षात जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात रेशीम विकास आढावाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे संचालक संजय कदम, अमरावती येथील सहसंचालक एम.बी. ढवळे, शास्त्रज्ञ डॉ. कुशवाह, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, जिल्हा रेशीम अधिकारी पी.एम. चौगुले उपस्थित होते. जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चांगली मागणी आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, तुतीच्या लागवडीकरीता शेतकरी पुढकार घेत आहे. जिल्ह्यातील बेंब