नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासंदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक
यवतमाळ, दि. 29 : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतक-यांना पुरक व्यवसायाची जोड मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यान्वित केली आहे. या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या अंमलबजावणीच्या कामाचा आढावा पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत (पोक्रा) जिल्ह्यात कृषी विभागाने त्वरीत कामे हाती घ्यावी, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले,या योजनेतील लाभार्थ्यांना कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न करून देण्यात येईल. येत्या आठ दिवसात कृषी सहाय्यकांमार्फत लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हा भुजल सर्वेक्षण विभागाकडे द्याव्यात. याअंतर्गत केवळ धडक सिंचन विहिरींचाच लाभ नाही तर शेतक-यांना इतरही योजनेचा लाभ द्यावा. शेतक-यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी ही योजना असल्यामुळे कृषी विभागाने या विषयाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. तसेच हा व