शेतक-यांचे आत्मबल वाढविणे हा कृषी महोत्सवाचा गाभा - पालकमंत्री मदन येरावार
v पोस्टल ग्राऊंड येथे पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन यवतमाळ, दि. 17 : शेती आणि शेतकरी हे सुरवातीपासूनच मानाचे बिंदू राहिले आहेत. उत्पादन निर्मितीचा आनंद देऊन जगाला पोसण्याचे शेती हे एक तंत्रज्ञान आहे. शेतक-यांना शेतीबाबत नवीन माहिती, नवीन तंत्रज्ञान, विविध पीक पध्दती याविषयी माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव घेण्याची संकल्पना समोर आली. त्यासाठी गतवर्षीपासून विशेष निधीची तरतूदसुध्दा करण्यात आली आहे. ख-या अर्थाने शेतक-यांचे मनोबल वाढविणे, हा कृषी महोत्सवाचा गाभा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, दारव्हाचे नगराध्यक्ष बबन इरवे, कृषी संशोधन केंद्राचे डॉ. प्रमोद यादगिरवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिका