रखडलेल्या पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करा - पालकमंत्री
v जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळासंदर्भात आढावा बैठक यवतमाळ, दि. 31 : भविष्यात जिल्ह्याला टँकरमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल, राष्ट्रीय पेयजल तसेच विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे गावागावातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिका-यांनी गांभिर्याने कामे करावीत, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते. नागरिकांना पाणी मिळावे म्हणून गावांमधील पाणी पुरवठा योजनांसाठी दोन वर्षात जवळपास 13 कोटी रुपये देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यातील सर्व पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी स्त्रोतासाठी प्रस्तावित करा. विहीर अधिग्रहण आणि टँकरबाबतच्या प्रस्तावांचे अधिकार आता उपविभागीय स्तरावर देण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी दिल्या अशा पुनर्वसित गावांमध