निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7827 शाईच्या बाटल्या
v प्र त्येक विधानसभा मतदार संघनिहाय वाटप यवतमाळ, दि. 30 : निवडणूक प्रक्रियेमध्ये शाईचे अनन्यसाधारण महत्व आहे. बोटावर लावलेली मतदानाची शाई, ही लोकशाही प्रक्रियेत सामान्य मतदारांचा सहभाग दर्शविते. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 21 लक्ष 28 हजार 163 आहे. मतदान करणा-या नागरिकांच्या बोटावर लावण्यासाठी जिल्ह्यात 7827 शाईच्या बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. यापैकी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय त्याचे वाटप करण्यात आले आहे. सुरवातीच्या काळात मतपत्रिकेवर मारण्यात येणा-या ‘फुली’ साठी इंकपॅड व त्याची शाई लागत होती. आता मतपत्रिकेची जागा ईव्हीएमने घेतल्यामुळे इंकपॅड व शाईची बचत झाली आहे. मात्र बोटावर लावण्यात येणा-या शाईचे महत्व अबाधित आहे. मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारा हा काळा ठिपका निवडणुकांचा अविभाज्य घटक बनला आहे. येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे 3 लाख शाईच्या बाटल्या लागणार