Posts

Showing posts from April, 2024

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 29 एप्रिल (जिमाका) : महाराष्ट्र दिनी विविध कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा. प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यावर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलिस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळून आल्यास संबंधित तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्

खरीपात बियाणे, खते, किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा -डॉ.पंकज आशिया

Image
Ø जिल्हाधिकाऱ्यांकडून खरीप हंगाम तयारीचा आढावा Ø जिल्ह्यात 8 लाख 97 हजार हेक्टरवर खरीप नियोजन Ø गेल्या हंगामात कमी कर्जवाटप करणाऱ्या बॅकांना नोटीस यवतमाळ, दि. 29 एप्रिल (जिमाका) : खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे. या हंगामात शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्धतेसह आवश्यक निविष्ठा जसे बियाणे, खते, किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, याची दक्षता घ्या. हंमागाचे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केल्या. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगाम नियोजन तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांच्यासह सर्व उपविभागीय कृषि अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात खरीप हंगामात 8 लाख 97 हजार 390 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. त्यात कापूस सर्वाधिक 4 लाख 57 हजार 510 हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यापाठोपाठ सोयाबीन 2 लाख 94 हजार 260 तर तूर 1 लाख 15 हजार 400 हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. खरीप ज्वार

आयआयएचटी प्रथम व द्वितीय सत्राकरीता प्रवेश सुरु

केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय सत्राकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ईच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. प्रथम वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता १३ जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा तसेच वेंकटगिरी करीता २ जागेच्या प्रवेशासाठी तसेच द्वितीय वर्षाकरीता ३ जागा (१ जागा आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता) पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि. 10 जून पर्यंत मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपुर्ण अर्ज दि. 10 जून पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अन

शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीचे अर्ज 30 एप्रिलपर्यंत स्विकारणार

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेचे नवीन व नूतनीकरणचे अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल ही आहे. या मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर मुदतवाढ ही अंतिम स्वरुपाची असल्याने दि. 30 एप्रिल पूर्वी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येईल. या कालावधीनंतर अर्ज प्रलंबित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील, तसेच अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांना शिक्षण शुल्क घेता येणार नाही, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक मंगला मुन यांनी कळविले आहे. 000

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे मध्यस्थी जागृती कार्यक्रम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर होते. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश अ. अ. लऊळकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश आर. एस. साळगांवकर व बी. एस. संकपाल, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव के. ए. नहार उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हा मुख्यालयातील सर्व न्यायाधीश, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, पिएलव्ही, वकील मंडळी, पक्षकार तसेच न्यायालयील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. व्ही न्हावकर यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत माहिती दिली. ठराविक प्रकरणात मध्यस्थी प्रक्रिया राबविता येतात. कौटुंबिक वाद, विवाह संबंधातील वाद, शेतीचे वाद असतील तर ते वाद मध्यस्थीने मिटविता येते. वकील लोकांनी मध्यस्थी प्रक्रियेमध्ये व लोकअदालतमध्ये भाग घ्यावा तसेच दोन्ही पक्षकाराच्या संवादाने वाद मिटतो, असे यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सांगितले. या कार्यक्रमात बी. एस. संकपाल यांनी वैकल्पीक वा़द निवारण केंद्