वनहक्क पट्टयांपासून एकही आदिवासी वंचित राहणार नाही
v बिरसा पर्वामध्ये पालकमंत्र्यांचे प्रतिपादन यवतमाळ, दि. 18 : जल, जंगल, जमीनचे खरे रक्षणकर्ते हे आदिवासी बांधव आहे. आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. वनहक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे देण्यात येईल. एकही आदिवासी यापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. पोस्टल ग्राऊंडवर आयोजित ‘बिरसा पर्व’ च्या दुस-या दिवशी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, माजी अध्यक्षा आरती फोफाटे, अनिल आडे, मिलिंद धुर्वे, विकास कुळसंगे, राजेंद्र मरसकोल्हे, पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, बिरसा पर्व आयोजन समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर, पवन आत्राम आदी उपस्थित होते. बिरसा मुंडा यांची जयंती शासनस्तरावर साजरी व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, 29 डिसेंबर 2017 रोजी शासनाने परिपत्रक काढून संत सेवालाल, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, बिरसा मुंडा आणि स्वातंत्र्यवीर सावर