नागरिक मदत कक्षाच्या माध्यमातून प्रशासनाच्या विविध उपाययोजना
v बाहेरून आलेल्यांना स्वत:हून माहिती देण्याचा मॅसेज v अडकलेल्यांसाठी भोजन व राहण्याची व्यवस्था यवतमाळ, दि. 30 : संपूर्ण राज्यात तसेच जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे अनेक जण अडकून पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक इतर ठिकाणी तर इतर ठिकाणचे नागरिक यवतमाळ जिल्ह्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या राहण्या व खाण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अशा लोकांसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच बाहेर देशातून किंवा इतर राज्यातून किंवा दुस-या जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना येथील यंत्रणेस स्वत:हून माहिती देण्याचा मॅसेज राष्ट्रीय सुचना व माहिती केंद्राच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे. जेणेकरून अशा लोकांमुळे इतरांना संसर्ग होणार नाही व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्यावर निगराणी ठेवता येईल. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या सुचनेवरून जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर नागरिक मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. 50 लोकांची चमू यासाठी कार्यरत असून सरासरी दिवसाला 300 कॉल या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेला येतात. त्यातूनच सर्