जिल्ह्यात आठ ठिकाणी तुर खरेदी केंद्र सुरु
v शेतकऱ्यांना दिलासा
यवतमाळ दि.9 : तुर खरेदी संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा
देण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या आदेशाने आठ ठिकाणी तुर खरेदी केंद्र
सुरु करण्यात आले आहे. सदर केंद्रातुन तुर खरेदी संदर्भात शेतकऱ्यांना मोबाईलवर
मॅसेज देण्यात येत असून शेतकऱ्यांनी तुर खरेदी करीता संबंधीत केंद्रावर तुर घेवून
यावे, असे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पांढरकवडा, बाभुळगाव, मारेगाव, पुसद, नेर,
दारव्हा, महागाव आणि आर्णी या ठिकाणी तुर
खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात तुर साठवण क्षमता कमी असल्यामुळे
शेतकऱ्यांना तूर खरेदीची वाट पाहावी लागत होती. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी
जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने बाजार समित्यांचे व खाजगी गोदाम तुर खरेदीकरीता
अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. शेतकऱ्यांचा माल लवकरात
लवकर उचल करून त्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील
आहे. तुरीचा हमीभाव 5 हजार 800 रुपये असून हा हमीभाव मिळणे शेतकऱ्यांचा अधिकार
आहे. हमीभावापासून कोणीही वंचित राहू नये, शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, याचा
विचार करूनच संबंधीत यंत्रणेला खाजगी व बाजार समित्यांचे गोदाम भाडेतत्वावर
घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
0000000
Comments
Post a Comment