कामगारांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री येरावार
v विविध कल्याणकारी योजनेचा लाभ वाटप सोहळा यवतमाळ दि.26 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाच्यावतीने कामगारांना 29 प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. यात कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय, विवाहासाठी अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती, सुरक्षा किट, मृत्यु पश्चात कामगारांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य, पुस्तकांचे वितरण आदींचा समावेश आहे. कामगारांसाठी असलेल्या या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. दारव्हा रोडवरील गंगाकाशी लॉन येथे आयोजित विविध कल्याणकारी योजनेच्या लाभ वाटप सोहळयात ते बोलत होते. यावेळी जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा कामगार अधिकारी राजदीप धुर्वे, महिला विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे, नितीन भुतडा, विजय खडसे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात आतापर्यंत 73 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, कामगार कल्याण महामंडळाच्या योजनांसाठी 20 हजार कोटींची तरतूद आहे. सुईपासून ते विमान बनविण्यापर्यंत कामगारांचे योगदान आहे. देशाच्या पंतप्रधानांनी