शेतक-यांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करा -पालकसचिव व्ही. गिरीराज
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक यवतमाळ , दि. 29 : शेतक-यांसाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभही शेतक-यांना मिळत आहे. अनेक छोट्या आणि परवडणा-या उपक्रमातून शेतक-यांना चांगले उत्पादन मिळू शकते. मात्र ही माहिती शेतक-यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. तरच त्यांचे जीवनमान उंचावेल. याबाबत अधिका-यांनी गांभिर्याने लक्ष देऊन शेतीतील उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन अपर मुख्य सचिव (व्यय) तथा जिल्ह्याचे पालक सचिव व्ही. गिरीराज यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, सहायक जिल्हाधिकारी पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन उपस्थित होते. पालकसचिव व्ही. गिरीराज म्हणाले, कृषी विभागाने प्रत्येक गावातील शेतक-यांच्या उत्पादनाबाबत माहिती ठेवावी. शेततळे, नाला खोलीकरण, जलयुक्त शिवार आदी माध्यमातून त्या शेतक-यांच्या उत्पादनात किती वाढ झाली. कृषी सेवकांच्या माध्य