वृक्ष लागवड मोहिमेकरीता सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक - पालकमंत्री मदन येरावार
यवतमाळ, दि. 27 : दिवसेंदिवस कमी होणा-या वनांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यवतमाळकरांना तर याची चांगलीच जाणीव आहे. आजची भीषण पाणी टंचाई ही त्याचीच परिणीती आहे. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. मात्र हे केवळ एकट्या वनविभागाचे काम नाही. तर या मोहिमेच्या यशस्वीकरीता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. 13 कोटी वृक्षलागवडीसंदर्भात नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सर्व यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, मुख्य वनसंरक्षक पी.जी. राहूरकर, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, अरविंद मुंढे, के.एम. अभर्णा उपस्थित होते. राष्ट्रीय वन नितीनुसार पर्यावरणाचे संतूलन साधण्यासाठी 33 टक्के भुभागावर जंगल असणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, मानवाने नैसर्गिक संपत्ती नष्ट केली आहे. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. वृक्षांना सगे-सोयरे म्हणायची