Posts

Showing posts from March, 2024

अमरावती येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय व विद्यार्थी विकास विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस या नामांकित कंपनी करीता रोजगार मेळाव्याचे आयोजन दि.१९ मार्च रोजी विद्यापिठाच्या डॉ.ङी.के.देशमुख सभागृह येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याकरीता अमरावती विभागातील किमान २०० पदवीधर, पदवी परिक्षेच्या अंतीम वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यामधे सहभाग घेण्याकरिता इच्छुक पदवीधर उमेदवारांनी https://forms.gle/३zvnHwm८ TRU९uB१N९ या लिंक वर क्लिक करून आपली नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपआयुक्त द.ल. ठाकरे आणि सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे. शैक्षणिक पात्रता, निवड पध्दती, सोबत आणावयाचे दस्तऐवज याबाबतची माहिती वरील गुगल लिंकमध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी गुगल फार्म भरून प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 000

तणावातही पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात - पालकमंत्री संजय राठोड

Image
पोलिस विभाग अत्यंत महत्वाचा विभाग आहे. समाजात शांतता, अलोखा राखण्याचे काम या विभागातील अधिकारी, कर्मचारी करत असतात. अलिकडे पोलिस विभागाचे काम प्रचंड वाढले आहे. कर्मचाऱ्यांची देखील कमतरता आहे, असे असतांना देखील प्रामाणितपणे कर्तव्य बजावले जातात, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने येथील कवायत मैदान येथे बांधण्यात आलेल्या आरोग्यम् पोलिस हेल्थ क्लबचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकडे आदी उपस्थित होते. अलिकडे मोबाईल, इंटरनेटमुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. अशा गुन्हेगारीवर आळा घालने फार मोठे आवाहन आहे. आमचा पोलिस विभाग समर्थपणे या आवाहनाचा सामना करत आहे. पुर्वी पोलिसांकडे ठराविक कामे होती. अलिकडे पोलिस विभागाचे कार्यक्षेत्र देखील वाढले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच सामाजिक पोलिसिंग करावी लागते.

जिल्ह्यातील तीन महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

राज्यामधील महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक-युवतींना व्हावा या दृष्टीकोनातून महाविद्यालयामध्ये महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील तीन केंद्राचा समावेश असून या केंद्राचे उद्गाटन नुकतेच झाले. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, रामदास आठवले आर्ट सायन्स ज्युनिअर महाविद्यालय चिकणी (डो) ता.नेर, श्री. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मारेगाव या महाविद्यालयामध्ये महाविद्यालय कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमास कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनप्रसंगी या योजनेचे नाव चाणक्य कौशल्य विकास केंद्र असे घोषित केले. देशाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन आर्थिक प्रगती मध्ये देश हा उच्च स्तरावर पोहचवण्याचे कार्य या विभागामार्फत होत आहे. युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. ज

कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन

वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शिल्पा पोलमेल्लीवार, उपशिक्षणाधिकारी प्रा.अंजली गहरवाल, प्रा.धिरज वसुले व डॉ. प्रशांत शिंगोटे उपस्थित होते. डॉ.शिल्पा पोलपेल्लीवार यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी समाजात जगत असतांना स्वत:ची क्षमता ओळखून जागरूक व सक्षम असले पाहिजे. स्वत:मधील चांगल्या विचारांचा विकास करून व वाईट विचार काढून स्त्रीयांचे तेज उसळत असते. जीवनात पुढे जात असतांना चिकित्सक व संशोधनात्मक दृष्टीकोन बाळगल्यास स्वत:चे कौशल्य विकसित करून कुटुंबासाठी व समाजात जगता येते, असे सांगितले. डॉ. पार्लावार म्हणाले की, न्यूयार्क येथे महिलांनी कामाच्या जागी सुरक्षितता, दहा तासांचे काम व मतदानाचा हक्क या मागण्या केल्या होत्या. स्त्रीयांचा सन्मान, कर्तृत्व, सशक्तीकरण आत्मनिर्भर व सामाजिक समानतेचे महत्व पटवून देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना अमानवी पद्धतीने वागविणाऱ्या समाज व्

देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शुरविरांचे स्मरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य - पालकमंत्री संजय राठोड

Image
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या शुरविरांमुळे हा महोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. अजूनही आपले शुर सैनिक देशाच्या सिमेवर देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्रपणे काम करत असतात. प्रसंगी आपले प्राण देखील गमावतात. अशा सर्व विरांचे स्मरण करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार व कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, प्रकाश देशपांडे, रुपाली बेहरे, तहसिलदार निकेता जावरकर उपस्थित होते. स्वातंत्र्य लढ्यात अनेक शुर विर सहभागी झाले होते. आपल्या प्राणांची पर्वा न करता मातृभूमिच्या रक्षणासाठी या विरांनी शेवटच्या श्वासापर्यंत परकीय सत्तेशी लढा दिला. अजूनही देशाच्या सिमा सुरक्षित ठेवण्यासाठी देशाचा प्रत्येक सैनिक आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत असल्या

आज जागतिक ग्राहक दिन व प्रदर्शनीचे आयोजन

दरवर्षी दि.१५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त ग्राहकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीकोनातून उद्या दि.१५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्राहक दिन व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम अन्न व औषध प्रशासन विभाग, वैधमापन शास्त्र विभाग, एस.टी. महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत संचार निगम लिमिटेड, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त गोपाल मोहोरे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष डॉ.नारायणराव मेहरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदीया, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ आडे हे उपस्थित राहणार आहेत. पोलिस विभागाकडून सायबर क्राईम अंतर्ग

राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली अँपचे प्रशिक्षण

भारत सरकारच्या कृषि आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या क्षेत्रीय केंद्रीय एकात्मिक किड व्यवस्थापन केंद्र नागपुरच्यावतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली या अँपचे प्रशिक्षण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी अनिल राठी आणि कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचे वैज्ञानिक डॉ.प्रमोद मगर यांनी कार्यक्रमात सहभागी राहुन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील 20 प्रगतिशील शेतकऱ्यांनी भाग घेतला. भारत सरकारच्या कीटकशास्त्र सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी छाया पासी, वनस्पती रोग विज्ञानचे सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी स्वाती भुंबर तथा वैज्ञानिक सहाय्यक आश्मिना धाडसे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना या अँपबद्दल माहिती दिली. या अँपमुळे शेतकऱ्यांना सहज पध्दतीने किडीची ओळख कसे करायची आणि अँपमध्ये डेटा फिडिंग करून तेव्हाच्या तेव्हा विभागाच्या सल्ल्याचा फायदा कसा घ्यायचा हे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. त्याच बरोबर एकात्मिक किड व्यवस्थापन, मित्र

अन्न सुरक्षा अनुपालन प्रणाली प्रशिक्षण

राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागांतर्गत अनुदानित वसतिगृहातील अधीक्षक व स्वयंपाकी यांच्यासाठी फुड सेफ्टी कॉम्पलिअन्स सिस्टीम याविषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रम समाज कल्याण विभाग व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांचे सहाय्य लाभले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गो.वि.माहोरे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश अन्न पदार्थ बनवताना व हाताळताना कशी काळजी घ्यावी व स्वच्छता कशी ठेवावी हा होता. सामाजिक न्याय भवन येथे आयोजित प्रशिक्षणात ८५ प्रशिक्षणार्थीना व दिनबाई मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह दिग्रस येथे आयोजित प्रशिक्षणात २०६ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही ठिकाणी प्रशिक्षक अस्मीता ठवकार यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थीना अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील तरतुदी, स्वच्छतेचे महत्त्व, विषबाधेसारख्या अप्रिय घटना टाळण्याच्या उपाययोजना, पौष्टिक घटकाची माहिती व

पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पंचसूत्री

सद्यस्थितीत हवामान बदलामुळे शेतीव्यवसायात काहिशी अनिश्चितता निर्माण झाली आहे. शेतीला पूरक किंबहुना मुख्य व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनाशी संबंधित व्यवसायाची वाट निवडणे गरजेचे बनले आहे. त्यामुळेच यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासोबतच दुध व पशुधनात वाढ करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पंचसूची आणली आहे. यामुळे पशुधानाचे क्षेत्र विस्तारले जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा शेतकरी बांधवांना लाभ देत त्यांच्यामध्ये पुन्हा नवी उमेद जागविण्याचा व नवीन पशुउद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभाग या पंचसूचीच्या माध्यमातून करीत आहे. आगामी काळात राज्यात केवळ संख्यात्मक नाही, तर गुणात्मक पशुधनाची पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रगत तंत्रज्ञानाच्या पथावर सर्जनशीलतेला गवसणी घालत आधुनिकतेकडे मार्गस्थ आहे. सुंदर, संपन्न व प्रगत महाराष्ट्राच्या या आश्वासक स्थित्यंतरात पशुसंवर्धन खात्यानेही ग्रामीण व पर्यायाने शहरी अर्थचक्र गतिमान करण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. शाश्वत, आश्वासक व निर्णायक विकसित महाराष्ट्रा

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती नोंदणी वाढविण्यासाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करावेत

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी नोंदणी वाढवावी. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी मंजूर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना राबविण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षातील या योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 8 हजार 188 अर्जाची नोंदणी केली आहे, त्यापैकी महाविद्यालयांनी केवळ 4 हजार 529 अर्ज मंजूर केले आहे. महाविद्यालयस्तरावर 2 हजार 713 अर्ज प्रलंबित आहे. महाविद्यालयांनी विद्यापीठ व शिक्षण शुल्क सम

लोकअदालतमध्ये ग्रामपंचायतींकडील 1 कोटी 56 लाख थकीत रक्कमेची सामंजस्याने वसूली

जिल्ह्यातील 19 हजार 833 ग्रामपंचायतींची थकीत गृहकर व पाणीकराची प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. या थकीत रक्कमेबाबत आपसी समझोता झाल्याने तब्बल 1 कोटी 56 लाख रुपयांची वसूली लोकअदालतमध्ये झाली आहे. या लोकअदालतमध्ये यवतमाळ पंचायत समितीमध्ये 2963 प्रकरणे ठेवण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये 19 लाख 89 हजार इतकी गृहकर व पाणीकर वसूली झाले. कळंब मध्ये 1064 प्रकरणांमध्ये 18 लाख 35 हजार इतकी वसूली झाली आहे. राळेगावमध्ये 322 प्रकरणे तर 4 लाख 74 हजार वसूली, बाभूळगाव 1255 प्रकरणे तर 6 लाख 10 वसूली, नेरमध्ये 1256 प्रकरणे, 6 लाख 54 हजार वसूली, दारव्हा 632 प्रकरणे, 2 लाख 70 हजार वसूली, दिग्रस 2063 प्रकरणे, 11 लाख 60 हजार वसूली, पुसद 1124 प्रकरणे, 13 लाख 48 हजार वसूली, उमरखेडमध्ये 345 प्रकरणे 3 लाख 13 हजार वसूली, महागांव 581 प्रकरणे 1 लाख 40 हजार वसूली, आर्णी 2730 प्रकरणे 6 लाख 11 हजार इतकी वसूली झाली आहे. घाटंजीमध्ये 285 प्रकरणे 1 लाख 87 हजार वसूली, पांढरकवडा 3418 प्रकरणे 42 लाख 43 वसूली, वणी 485 प्रकरणे 7 लाख वसूली, मारेगाव मध्ये 772 प्रकरणे 6 लाख

नेर येथे १ कोटी ९५ लाखाच्या विकासकामांचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन

Image
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते नेर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. या विकासकामांची एकून किंमत १ कोटी ९५ लक्ष इतकी आहे. भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांसह नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, गटविकास अधिकारी निलेश जाधव, भाऊराव ढवळे, सुभाष भोयर, रितेश चिरडे आदी उपस्थित होते. विकास कामांमध्ये नगर परिषदक्षेत्रांतर्गत वार्ड क्रमांक एक महादेव नगर मधील खुल्या जागेवर जेष्ठ नागरिक मंडळ योगा भवन बांधकाम करणे; खर्च ४० लाख. वार्ड क्रमांक एक संदीप नगर येथील विशाल राठोड ते नामदेव राठोड ते युवराज गजभिये ते बन्सोड ते हजारे ते घावडे ते गिरी व श्री.गादिया ते फिरके यांच्या घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे; खर्च १३ लाख ९१ हजार. वार्ड क्रमांक एक छत्रपती नगर येथील प्रदीप ठाकरे ते राजे संभाजी पार्क ते कापसीकर ते अवधुत परटक्के ते उघडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व कॉंक्रीट नाली; खर्च १८ लाख ९५ हजार. वार्ड क्रमांक तीन चिंतामणी चौक ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत कॉक्रिट रस्ता व नाली; खर्च १८ लाख ९८ हजार. वार्ड क्रमांक चार

शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दि.11 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकरीता रेमण्ड इको डेनिम प्रा.लि. यवतमाळ या आस्थापनेला जोडारी व आरएसी या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी व जय अँग्रो एजन्सी, यवतमाळ या आस्थापनेला यांत्रिक कर्षित्र या व्यवसायातील उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षाला प्रशिक्षण घेणारे उमेदवार पात्र आहेत. प्रशिक्षणार्थ्यांनी मुळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतिसह सदर मेळाव्यास उपस्थित राहावे व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही.जे.नागोरे यांनी केले आहे. 000

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबत प्रबोधनपर कार्यशाळा

Image
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व सुधारीत अधिनियम या विषयावर एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रबोधनपर कार्यशाळा सामाजिक न्याय भवन येथे घेण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, यशदाचे मास्टर ट्रेनर सुभाष केकान, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन नांदेडकर, सचिन गिरमे, रोहीत अवचरे तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री.कऱ्हाळे तसेच 300 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारीत अधिनियम 2016 या विषयावर मागदर्शन केले. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत तालुकास्तरावर समिती गठीत करावी व कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कारवाई करावी, असे निर्देश दिले. प्रास्ताविकात भाऊराव चव्हाण यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व सुधारीत अधिनियम या विषयाबाबत मार्गदर्शन

गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फुर्ती देण्याचे काम करेल - डॅा.नीलम गोऱ्हे

Image
Ø धामनगाव देव येथे गारमेंट क्लस्टरचे उद्घाटन Ø 500 महिलांना मिळणार हक्काचा रोजगार Ø महिलांसाठी राज्यातील पहिलेच क्लस्टर महिलांना आर्थिकदृष्ट्या समृध्द करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. परंतू पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून धामनगाव देव येथे केवळ महिलांसाठी सुरु करण्यात आलेले गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फुर्ती देण्याचे काम करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांनी केले. दारव्हा तालुक्यातील धामनगाव देव येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे जिल्हा वार्षिक योजना, महिला व बालविकास विभागाच्यावतीने 3 टक्के निधीमधून महिलांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आधारीत गारमेंट क्लस्टर सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी

यवतमाळात आजपासून महासंस्कृती महोत्सव

Image
Ø महोत्सवाचा लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन Ø गायक कैलास खेर, नंदेश उमप यांचे गायन Ø स्थानिक लोककला, संस्कृतीचे सादरीकरण Ø कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत कवी संमेलन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'महासंस्कृती महोत्सवाचे' उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते उद्या दि.७ मार्च रोजी समता मैदान येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांचा गीत संगीताचा कार्यक्रम होईल. उद्घाटन कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा, खा.भावना गवळी, खा.हेमंत पाटील, आ.अँड.निलय नाईक, आ.किरण सरनाईक, आ.धीरज लिंगाडे, आ.प्रा डॉ.अशोक उईके, आ.मदन येरावार, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.डॉ.संदीप धुर्वे, आ.नामदेव ससाने, आ.इंद्रनिल नाईक, विभागीय आयुक्त डॉ.निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड उपस्थित राहणार आहे. सदर महोत्सव सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने आयोजित करण्यात आला आह

विभागीय रोजगार मेळाव्यात 309 उमेदवारांची प्राथमिक निवड

Image
* 20 नामांकित कंपन्यांची उपस्थिती * मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 309 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळावा उद्घाटन कार्यक्रमास एज्युकेशन सोसायटीचे सचिव धनंजय पांडे, विद्यापिठाच्या विद्यार्थी विभागाचे संचालक डॉ.राजीव बोरकर, लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दुर्गेश कुंटे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे, कौशल्य विकास अधिकारी पी.बी.जाधव, वैशाली पवार उपस्थित होते. मेळाव्यात रतन असोसिएट्स, युनिमॅक्स इंडिया हेल्थ केअर सेंटर, अलाईट रिसोर्स मॅनेजमेंट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पीपीएस एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, संसूर सृष्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, धूत ट्रान्समिशन, विनय ऑटोमोबाईल, हिंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर, व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेड, उत्क

रिझर्व्ह बँकेच्यावतीने क्षेत्रस्तरीय आर्थिक साक्षरता कार्यक्रम

Image
आर्थिक साक्षरता सप्ताहानिमित्त विद्यार्थी आणि युवकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर कार्यालयाच्यावतीने यवतमाळ येथे क्षेत्रस्तरीय आर्थिक साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बँकेच्या तज्ञांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक शशांक हरदेनिया, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक जी.एल.नरवाल, भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक कौस्तव चक्रवर्ती, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दीपक पेंदाम, अग्रणी जिल्हा प्रबंधक अमर गजभिये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील एकूण 200 जण सहभागी झाले होते. त्यात परिसरातील विद्यार्थी, बचत गट, शेतकरी, लघु उद्योजक, व्यवसाय प्रतिनिधी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी आणि बँक अधिकारी यांचा समावेश होता. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या पदवीधरांनी त्यांची उत्पादने प्रदर्शित करणारे स्टॉलही या ठिकाणी लावले होते. चलनी नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये, डिजिटल बँकींग करताना काय करावे आणि काय करू नये, बँकांमधील तक्रार निवारण यंत्रणा आणि एकात्मिक

यवतमाळात उद्यापासून पाच दिवस महासंस्कृती महोत्सव

Image
Ø दिनांक 7 ते 11 मार्च दरम्यान आयोजन Ø गायक कैलास खेर, नंदेश उमप यांचे गायन Ø महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी Ø कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत कवी संमेलन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यवतमाळ येथे 'महासंस्कृती महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि.7 ते 11 मार्च दरम्यान समता मैदानात होणार आहे. सुप्रसिद्ध गायक कैलास खेर, नंदेश उमप यांच्या गीत गायनासह विविध कार्यक्रमांचे सादरीकरण महोत्सवात होईल. महोत्सव तयारीचा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आज महसूल भवन येथे आढावा घेतला. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महोत्सवात पहिल्या दिवशी दि.7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता समई नृत्य व मंगळागौर तसेच सायंकाळी 7 वा ‘सुर नवा ध्यास नवा’ व सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम होईल. दि.8 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ढेमसा

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक समाज प्रबोधनकार आणि समाज सेवकांना तसेच सदर समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्यात येतात. यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक व्यक्ती व एक संस्था यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्याचा निर्णय इतर बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या स्तरावर दिला जातो. पुरस्कारासाठी छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर पुरस्कार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच मे 2024 मध्ये देण्याचे प्रस्तावित आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याकरीता वीरशैव लिंगायत समाजाच्या इच्छुक असलेल्या व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून दि.१५ मार्च पूर्वी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक मंगला मुन यांनी केले आहे. 000

कलावंतांनी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील राज्य शासनाच्या वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेच्या मानधनधारक कलावंतांना डीबीटी पध्दतीने थेट त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात मानधन जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कलावंतांनी यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य संचालकांच्या पत्रान्वये कलावंताचे मानधन हे दि.१ एप्रिल पासून डीबीटी पध्दतीने थेट त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व मानधनधारक कलावंतांची आधारसलंग्न बँक खात्याची माहिती, आधारकार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांकाची माहिती दि.१० मार्च पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. सर्व मानधनधारक कलावंतानी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, आधारकार्डची झेरॉक्स, लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक तसेच जे कलावंत मय्यत झाले असतील त्यांच्या मृत्यु प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत इत्यादी माहिती समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ व संबधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती या कार्यालयास सादर करावी,असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी कळविले आहे. 000

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना लाभार्थी निवड

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसदच्यावतीने आदिवासी लाभार्थ्यांना केंद्रवती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभा देण्यात येणार आहे. त्यासाठी दि.7मार्च रोजी लाभार्थी निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना छोटा व्यवसायासाठी अर्थसहाय्य, काटेरी तारकुंपनसाठी अर्थसहाय, सोलार झटका मशिनसाठी अर्थसहाय, ताडपत्रीसाठी अर्थसहाय, कोलाम लाभार्थ्यांकरीता छोटा व्यवसाय करीता अर्थसहाय्य या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड संगणकीय लॉटरी पध्दतीने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद उप येथे दि.7 मार्च रोजी दुपारी 2 वाजता करण्यात येणार आहे. वरील योजनेच्या लाभासाठई अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांनी निवड प्रक्रिये करीता उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 000

यवतमाळ येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

जिल्ह्यात उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दि.७ मार्च रोजी हॉटेल हिरा पॅलेस दारव्हा रोड यवतमाळ येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या गुंतवणूक परिषदेमध्ये राज्यशासनासोबत सामंजस्य करार होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे जिल्ह्यांना विकासाचा केंद्र मानून व राज्याच्या विकासाला चालना देणे तसेच गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यय संधींबाबत चर्चा, सामंजंस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम, उद्योजकांचे अनुभव कथन आदींचा समावेश असणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्याच्या उत्पादनाचे प्रदर्शन, निर्यातक्षम उत्पादने, भौगोलिक नामांकन असलेली उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन, विविध योजनांचे लाभार्थ्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणा

उद्या आदिवासी लाभार्थी निवड प्रक्रिया

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यवतीने आदिवासी लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याद्वारे लाभार्थी निवड प्रक्रिया दि.६ मार्च रोजी दुपारी २ वाजता प्रकल्प कार्यालयात ठेवण्यात आली आहे. न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये ८५ टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते व किटकनाशके यासाठी अर्थसहाय्य, शंभरटक्के अनुदानावर आदिम (कोलाम) जमातीच्या शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते व किटकनाशके यासाठी अर्थसहाय्य, शंभरटक्के अनुदानावर आदिम (कोलाम) जमातीच्या शेतकऱ्यांना वन्यजीवापासून शेताचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपनासाठी अर्थसहाय्य, ८५ टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य, शंभरटक्के अनुदानावर आदिम (कोलाम) जमातीच्या लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य तसेच ८५ टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी लाभार्थ्यांना शेळीगटासाठी अर्थसहाय्य करणे या योजनांचा समावेश आहे. या लाभासाठी लाभार्थ्यांची निवड प्रक

नैसर्गिक व सेंद्रीय शेती याविषयावर दोन दिवशीय प्रशिक्षण

कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक, सेंद्रिय शेती या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात शेतकऱ्यांना नैसर्गिक व सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ.मुळे यांनी आधुनिक शेतीमध्ये जास्त उत्पादन मिळविण्याकरिता शेतकरी रसायनांचा अवाजवी वापर करत आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील त्याच प्रमाणात दिसून येत आहेत. रसायनांच्या अतीवापरावर आळा घालण्यासाठी नैसर्गिक शेती शिवायपर्याय नाही, असे सांगत शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा आधार घेऊन आपल्या व आपल्या जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रकल्पाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि सेंद्रिय निविष्टा तयार करून वापरण्

ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी सहाय्य करण्याकरीता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातीस ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात प्रदान करणे हे या योजनेचे ध्येय व उदिष्ट आहे. या योजनेंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. त्यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर इत्यादीचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्या

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारे कायदेविषयक शिबीर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा लोहाराच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच मुलींवरील सर्व प्रकारचा हिंसाचार दुर करण्यासाठी पावले उचलणे’ या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव कुणाल नहार हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणाल नहार यांनी समाजात वावरत असतांना चांगल्या गोष्टी आत्मसात करावे, वाईट गोष्ट सोडून द्यावे, असे सांगितले, बाल लैगिंक अत्याचार कायदा २०१२ या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मिना तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार, पॅनल वकील निलिमा जोशी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या निलिमा जोशी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ याविषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कसा ओळखावा या

खेळाडू सवलत गुणाचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

खेळाडू, क्रीडा स्पर्धक यांना माध्यमिक १० वी व उच्च माध्यमिक १२ वी प्रमाणपत्र परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मिळणाऱ्या सवलत गुणाकरीता आवश्यक कागदपत्रांसह शाळा, महाविद्यालयांनी दि.३० मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सवलत गुणांसाठी प्रती विद्यार्थी २५ रुपये तपासनी शुल्क जमा करावयाचे आहे. तपासणी शुल्क जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सवलत गुणांचा प्रस्ताव शिफारस करतेवेळी अमरावती विभागीय शिक्षण मंडळ यांच्या नावे चलनाद्वारे किंवा रोखीने भरावयाचे आहे. शालेय स्पर्धेकरीता गुणांच्या सवलतीकरीता प्रस्ताव सादर करतांना प्राचार्य, मुख्यध्यापकाच्या पत्रासह परिशिष्ट-ई सोबत जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तरचे स्वतंत्रपणे प्रस्ताव जोडावे. विविध नमुन्यातील अर्ज १९ अंकी परिपूर्ण भरलेला असावा. खेळाडूचे प्रमाणपत्र व हॉल तिकीट, खेळाडू इयत्ता १२ वीत असल्यास १० वीचे बोर्ड सर्टीफिकेट, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रांसह प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावे. प्रत्येक पेजवर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. एकविध खेळ संघटनेच्या स्पर्धेकरीता प्राचार्य, मुख्यध्यापक यांचे पत्र, परिशिष्ट १० सोबत

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळच्यावतीने सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिर तालुक्यातील चिचबर्डी येथे पार पडले. शिबिरात विद्यार्थ्यांना विविध विषयांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.वि.पी.माने व उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एन.डी.पार्लावर तसेच सरपंच नंदकिशोर कुमरे, पोलिस पाटील विजेंद्र टेकाम, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता चानेकर, महाविद्यालयाच्या रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.जयश्री उघाडे उपस्थित होत्या. शिबिरामध्ये महिला बालसंगोपन, मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. उद्योजकता मार्गदर्शन, कौशल्य विकास, अन्न प्रक्रिया आधारित शासकीय योजना, अन्नप्रक्रिया रोजगार योजना, मूल्यवर्धित विविध पदार्थ निर्मिती, अन्न व औषध प्रशासन विभागातील रोजगाराची संधी, नवउद्योजक निर्मिती व इतर विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्वच्छता, योगा

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती नोंदणी वाढविण्याचे आवाहन

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी नोंदणी वाढवावी. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी मंजूर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षातील या योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 7 हजार 656 अर्जाची नोंदणी केली आहे, त्यापैकी महाविद्यालयांनी केवळ 3 हजार 598 अर्ज मंजुर केले आहे. महाविद्यालयस्तरावर 3 हजार 258 अर्ज प्रलंबित आहे. जे महाविद्यालय अनुसूचित जाती