विषबाधित शेतकरी, शेतमजूरांना आर्थिक मदत द्या - गृहराज्यमंत्री हंसराज अहीर
यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात किटकनाशकाच्या फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर बाधित झाले आहेत. हा अतिशय गंभीर विषय आहे. यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच शासकीय यंत्रणेकडून विषबाधित शेतकरी आणि शेतमजुरांना आर्थिक मदत देण्याचे प्रयोजन करून तसा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, अशा सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केल्या. येथील विश्रामगृहात जलयुक्त शिवार, कृषी विभाग, सिंचनाची स्थिती, कायदा आणि सुव्यवस्था आदी विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार, आमदार राजू तोडसाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. विषबाधीत शेतकरी आणि शेतमजूरांचा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत समावेश करता येईल का, अशी विचारणा करून गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, शेतक-यांसोबतच बाधित शेतमजूरांनासुध्दा आर्थिक मदत मिळाली पाहिजे. फवारणी करतांना विषबाधा होऊ नये म्हणून कृ