क्लेम केलेल्या शेतक-यांना पिक विम्याचा लाभ त्वरीत द्या - परिवहन मंत्री रावते
v सावरला आणि वणी येथे शेतकरी संवाद यवतमाळ, दि. 30 : शेतक-यांना मिळणा-या पीक विम्याची बहुतांश रक्कम शासनातर्फे भरली जाते. शेतक-यांना केवळ नाममात्र रकमेचा भरणा करावा लागतो. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे व ज्यांनी क्लेम केले आहे अशा शेतक-यांना पीक विम्याचा त्वरीत लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सुचना परिवहन व खारभुमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी केलया. वणी तालुक्यातील सावरला व वणी येथे शेतक-यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हा अधिक्षक व कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, अविनाश सोमलकर, तहसीलदार श्याम धनमने, सरपंच विनोद चोपणे आदी उपस्थित होते. विमा संदर्भात अनेक शेतक-यांच्या तक्रारी येतात, असे सांगून परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, शेतक-यांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठीच शेतकरी संवाद घेण्यात येत आहे. क्लेम मंजूर झाला असेल आणि बँकेच्या काही अडचणी असेल तर त्या त्वरीत सोडवाव्यात. विमा कंपनीने शेतक-यांना