जिल्ह्यात चार महिने चालणार आयुष्मान भव: मोहीम
आरोग्य विभागांतर्गत सर्व वयोगटांतील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून उपचार करण्यासाठी जिल्ह्यात आयुष्यमान भव: मोहिमेचा १ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. ही मोहीम चार महिने चालणार आहे. या मोहिमेची माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांची बैठक घेण्यात आली. सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी.एस.चव्हाण, डॉ प्रेमकुमार ठोंबरे, डॉ.रमा बाजोरिया, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, आयुष्मान समनव्यक डॉ.दर्शन चांडक, सुरेंद्र इरपनवार उपस्थित होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या आयुष्यमान भव: मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व वयोगटांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विषयक तपासण्या करण्यात येणार आहे. आयुष्यमान आपल्या दारी ३.० या उपक्रमामध्ये जिल्ह्यांतील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्यमान कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे. आयुष्यमान सभा उपक्रमामध्ये आरोग्यविषयक सेवा-सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने