पुढील हंगामाच्या कर्ज वाटपासाठी बँकांनी आतापासून नियोजन करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
v 2018-19 साठी 2 हजार 710 कोटींचे कृषी पतपुरवठा धोरण यवतमाळ , दि. 28 : यावर्षी झालेल्या अपु-या पावसामुळे तसेच दुष्काळ, गारपीट आणि बोंडअळीमुळे कृषीक्षेत्र प्रभावीत झाले. आता पुढील हंगाम येत आहे. या हंगामात शेतक-यांना पीककर्ज वाटपासाठी बँकांनी आतापासून नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी पतपुरवठा धोरणासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रवीण मेश्राम, सहकारी संस्थेचे उपनिबंधक गौतम वर्धन, अग्रणी बँक व्यवस्थापक कैलास कुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते. पुढील हंगामातील बँकांची काय तयारी आहे, अशी विचारणा करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, यावर्षी कर्जमाफीमुळे शेतक-यांचे कर्ज माफ झाले आहे. पुढील हंगामात पात्र शेतक-यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच नवीन शेतकरी सभासद करण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसोबतच इतर राष्ट्रीयकृत बँकांनीसुध्दा कर