माहे एप्रिल मध्ये शेतकऱ्यांना 110 केंद्रावर मार्गदर्शन



बळीराजा चेतना अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
यवतमाळ दि.5 : बळीराजा चेतना अभियान अंतर्गत माहे एप्रिलमध्ये जिल्ह्यातील 110 केंद्रांवर शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबत करावयाच्या कार्यवाहीचा आढावा आज जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी घेतला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी, अपर जिल्हाधिकारी सुनिल महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्री, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, सहाय्यक निबंधक अर्चना माळवे प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, खरिप कर्ज वाटप योजना, ग्रामीण रोजगार हमी योजना, रेशीम उद्योग योजना, गट शेती योजना, रमाई आवास योजना, आरोग्य व कृषी विषयाशी संबंधीत योजनांची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेटेशनद्वारे तसेच व्हीडीओद्वारे देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती