अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाईचा निधी दिवाळीपुर्वी मिळणार 205 कोटीची देयके कोषागारत सादर
यवतमाळ दि. 13 ऑक्टोबर (जिमाका) :- माहे जुन, जुलै, ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकाच्या नुकसान भरपाई म्हणून यवतमाळ जिल्हयाकरीता 643 कोटी 81 हजार अनुदान प्राप्त झाले असुन सदर निधी अर्थ संकल्पीय पध्दतीव्दारे वितरीत करण्यात आलेला आहे. दिनांक 13 ऑक्टोबर रोजीच्या तहसिलदार यांचे कडील प्राप्त अहवालानुसार 205 कोटी 22 लाख 87 हजार रूपये ची देयके काढून तहसिलदार यांनी कोषागारात सादर केलेली आहे. सदर रकम तसेच उर्वरित रकम देखील लवकरच दिवाळीपुर्वी सबंधित शेतक-यांचे खात्यात जमा करण्यासाठी शासनस्तरावरून पुर्ण प्रयत्न करण्यात येतील असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.
तसेच जुन ते ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता शासनाच्या वाढीव दराने 51 कोटी 13 लाख 31 हाजर रूपये इतका निधी पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाला असुन सदर निधी सुध्दा बाधीत शेतक-यांना दिवाळीपूर्वी वितरीत करण्यात येईल.
Comments
Post a Comment