Posts

Showing posts from 2026

उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन यवतमाळ, दि. ११ (जिमाका) : जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या काळात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी “काय करावे” आणि “काय करू नये” याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काय करावे : जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी तीव्र उन्हात, विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शक्यतो हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत तसेच बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे आणि शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे. शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत उष्ण वातावरणात कष्टाची कामे करू नयेत. चक्कर येणे किंवा आजारी वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपा...

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस

Image
हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ जार ी यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : राज्यात गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायदा तसेच वैद्यकीय गर्भपात कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्ह्यात या कायद्याचा भंग होत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कायद्यांच्या उल्लंघनाची माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यवतमाळ यांनी दिली आहे. मान्यताप्राप्त केंद्रामध्ये वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन होत असल्यास, गर्भलिंग चाचणी करून अवैधरित्या गर्भपात केले जात असल्यास किंवा अपात्र व्यक्तीकडून गर्भपात केला जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, यवतमाळ यांना कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर त्याची खातरजमा करून संबंधित सोनोग्राफी केंद्र, गर्भपात केंद्र किंवा संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर माहिती देणाऱ्या व्यक्तीस प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. माहिती देणारी व्यक्ती सामान्य नागरिक, आरोग्य विभागातील कर्मचारी-अधिकारी तसेच इतर शासकीय...

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना मिळणार शासनाचा ‘युवा पुरस्कार’!

Image
ज िल्हास्तरीय पुरस्कारासाठी 10 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नोंदणीकृत संस्थांही पात्र यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : राज्य शासनाच्या युवक धोरणाअंतर्गत युवक व युवतींनी विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, क्रीडा, आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान तसेच समाजविकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हास्तर व राज्यस्तर युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२४-२५ या वर्षासाठी जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता पात्र युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पुरस्काराचे स्वरुप : या पुरस्कारांतर्गत जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये युवक व युवतींना प्रत्येकी १० हजार रुपये तर संस्थेला ५० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. पात्रता काय ? अर्जदार युवक किंवा युवतीचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल २०२४ रोजी किमान १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्च २०२५ रोजी कमाल ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच जिल्हास्तर पुरस्कारासाठी अर्जदाराचे संबंधित जिल्ह्यात किमान प...

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार

Image
अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : जिल्हा परिषदच्या स्वउत्पन्नाचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे सुधारित तसेच सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक उद्या दि. 12 मार्च रोजी मंजूर व प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक पुस्तिका गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक सभागृहात आयोजित कार्यक्रमात मंजूर व प्रसिद्ध करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासक) मंदार पत्की हे भूषविणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मागील वर्षातील उत्पन्न तसेच सन 2026-27 या वर्षात विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या योजना व मंजूर तरतुदीच्या अनुषंगाने हे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दिली आहे.

आदिवासी शेतकऱ्यांनो ‘ड्रोन’ घ्या, शासन देणार 100 टक्के अनुदान!

Image
आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्या पात्र, 30 दिवसांचे प्रशिक्षण, 20 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्यामार्फत ड्रोन संच खरेदीसाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (एफपीओ) 20 मार्चपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत १०० टक्के आदिवासी शेतकरी सदस्य असलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ड्रोन संच खरेदीसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. संबंधित एफपीओमध्ये सर्व सदस्य आदिवासी शेतकरी असणे तसेच कंपनीची नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. तसेच कंपनीचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असणे आवश्यक असून, यापेक्षा अधिक वर्षांचे लेखापरीक्षण झाले असल्यास अशा कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. ही योजना जिल्ह्यातील यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, झरी, पांढरकवडा आणि घाटंजी या तालुक्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी लागू राहणार आहे. ड्रोनचा वापर शेतीसाठी तसेच विविध कृषी कामांसाठी करण्यात येणार ...

आयुर्वेद महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा कायदेविषयक जनजागृती शिबीरातून महिलांना मार्गदर्शन

Image
यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ आणि डॉ. मा. म. आयुर्वेद महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 9 मार्च रोजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच महिला हक्कांविषयी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये महिला हक्कांविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश दिपक एच. दाभाडे होते. प्रमुख वक्त्या म्हणून पॅनल वकील निलिमा जोशी उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाला डॉ. मा. म. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने यांनी प्रास्ताविक करत शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रमुख वक्त्या श्रीमती जोशी यांनी महिलांचे हक्क, कायदेशीर संरक्षण आणि समाजातील त्यांचे स्थान याविषयी मार्गदर्शन करुन 8 मार्च हा दिवस केवळ एक दिवस साजरा न करता प्रत्येक दिवस महिला दिन म्हणून साजरा झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी कौटुंबिक हिंसाचार प्...

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरा समाज कल्याण विभागाचे महाविद्यालयांना आवाहन महाविद्यालय स्तरावर 2,003 अर्ज प्रलंबित

Image
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. यात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन तसेच व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती या योजनांचा समावेश आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 30 जून 2025 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. मागील 2024-25 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 10 हजार 649 अर्ज नोंदणीकृत झाले होते. त्यापैकी चालू 2025-26 वर्षात आतापर्यंत 9 हजार 322 अर्ज नोंदणीकृत झाले असून हे प्रमाण 8...

दिव्यांग व्यक्तींसाठी आता ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ सेवा व योजनांची माहिती एकाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज व पाठपुराव्याचीही सुविधा दिव्यांग नागरिक, संस्थांनी नोंदणी करावी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

Image
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : दिव्यांग कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध कल्याणकारी सेवा व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी “महाराष्ट्र दिव्यांग सहाय्यक पोर्टल” हे स्वतंत्र नागरिक-केंद्रित डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या विविध शासकीय योजना व सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जाची स्थिती रिअल-टाईममध्ये पाहण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे दिव्यांग नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) व नागरी संस्थांना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 50 अन्वये नोंदणी व नूतनीकरण करणे आवश्यक असून ही सुविधा देखील या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व सुविधा https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग नागरिक तसेच दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, एनजीओ व नागरी संस्थांनी या संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी ...

जिल्हा परिषदेत पोक्सो कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा केंद्रप्रमुखांसाठी विशेष प्रशिक्षण

Image
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी जिल्हा परिषद सभागृहात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अर्थात पोक्सो अधिनियम २०१२ या कायद्यावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या संकल्पनेतून व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महिला व बाल विकास विभाग तसेच शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सभागृहात जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांसाठी या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कायद्याच्या तरतुदी, शिक्षकांची भूमिका तसेच बाल संरक्षण यंत्रणेची माहिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शिका ॲड. ज्योती खांडपासोळे यांनी कायद्यांतर्गत गुन्ह्यांचे स्वरुप, शिक्षेच्या तरतुदी, पोलीस प्रशासन, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाइन आणि इतर शासकीय यंत्रणांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपस्थितांनी बालविवाह प्रतिबंधासाठी शपथही घेतली. या कार्यशाळेस उपमुख्य ...

लाडकी बहिण योजनेतील अपात्र महिलांसाठी ई-केवायसी दुरुस्तीची संधी ३१ मार्चपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार

Image
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना झालेल्या त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या महिलांसाठी शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. अशा महिलांसाठी पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्तीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून ही प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेंतर्गत दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यामध्ये लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी स्वरूपात सरकारी विभाग, शासकीय उपक्रम, महामंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नसणे, तसेच सेवानिवृत्तीनंतर कोणताही सदस्य निवृत्तीवेतन घेत नसणे या अटींबाबत चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले होते. या कारणामुळे अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने अशा अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया चुकीच्या पर्यायामुळे अपूर्ण राहिली किंवा त्या अपात्र ठरल्या आहेत, त्यां...

पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश संभाव्य पाणीटंचाईचा घेतला आढावा

Image
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी प्रशासनाने तयार राहून नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, विविध विभागांचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच नगरपालिकांचे मुख्याधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ग्रामीण व शहरी भागातील सध्याची पाणीपुरवठा स्थिती, उपलब्ध जलसाठे, विहिरी व बोअरवेलची स्थिती, तसेच संभाव्य टंचाईग्रस्त भागांबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोठेही पाणीटंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी. जिल्ह्यातील धरण प्रकल्पांमध्ये पाणीसाठा चांगला आहे. पाणीपुरवठयाबाबत मागणीची नोंद घ्यावी. ज्या भागांमध्ये जलस्रोत कमी होत आहेत किंवा उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या ...

उन्हाळ्याची चाहुल ; आरोग्याची अशी घ्या काळजी Ø डॉ. उमेश जोगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : उन्हाळ्याला सुरुवात झाल्यामुळे कडक उन्हात विविध आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. वाढत्या उष्णतेमुळे घाम येणे, डोकेदुखी, अतिसार, पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात डीहायड्रेशन होणे तसेच बद्धकोष्ठता यांसारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्याच्या दिवसात स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. उमेश एस. जोगे यांनी केले आहे. उन्हाळ्यात चक्कर येणे, डोळ्यांची जळजळ, ऊन लागणे, डीहायड्रेशन तसेच उष्माघात यांसारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे केवळ पंखे किंवा एसीवर अवलंबून न राहता आहार आणि दिनचर्या योग्य ठेवणे गरजेचे आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड आणि चायनीज पदार्थांचे सेवन टाळावे. त्याऐवजी आहारात हिरव्या भाज्या, कोथिंबीर, फळे यांचा समावेश करावा. तसेच घरगुती गोड शरबत, लिंबूपाणी, काकडीचा रस, ताक व मठ्ठा यांसारख्य...

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांच्या मूल्यमापनाचा अंतिम निर्णय बाकी Ø कलावंतांनो आमीषाला बळी पडू नका ; पैशाची मागणी होत असल्यास तक्रार करा Ø फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा

यवतमाळ, दि. ९ (जिमाका) : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत तीन वर्षांसाठी प्रलंबित असलेल्या तपासण्या २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत पंचायत समिती स्तरावर घेण्यात आल्या आहेत. या तपासणीदरम्यान कलावंतांकडून त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करून प्रत्येक कलावंताचे ५० गुणांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. ही मूल्याकंन प्रक्रिया अद्याप सुरू असून अंतिम निर्णय होणे बाकी आहे. दरम्यान, काही तालुक्यांमध्ये चाचणी चमूमधील काही सदस्यांकडून कलावंतांना विविध आमीष दाखवून फसवणूक करण्याचे प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी अशा व्यक्तींविरुद्ध कठोर फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असून, यामध्ये कोणत्याही सदस्य किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व कलावंत व साहित्यिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमीषांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जर कुणीही पैशाची मागणी करत असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा परिषद यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपमु...

महिला शेतकरी गटांना गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापन करण्याची संधी ! Ø 24 लाखांपर्यंत अनुदान Ø 5 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे Ø जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा हा जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत असून यात यवतमाळ जिल्ह्यातील 559 गावे समाविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर कृषि यांत्रिकीकरणाला चालना देणे आवश्यक असून, सर्व शेतकऱ्यांना यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसल्याने गावस्तरावर नोंदणीकृत महिला बचत गटांमार्फत "गावस्तरावरील कृषि अवजारे बँक" स्थापन करण्यासाठी 5 एप्रिलपर्यत अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच ही बँक स्थापन करून अनुदानित यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत व अचूक शेतीकाम करून उत्पादकता व नफा वाढविता येणार आहे. त्याकरिता प्रकल्प गावांमध्ये "एक गाव, एक कृषी औजारे बँक" या तत्त्वानुसार कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश शेतीकामासाठी लागणारी यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे श्रम आणि खर्च कमी करणे हा आहे. या घटकाकरिता प्रकल्प गावातील उमेद व माविम पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघ या यो...

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या "अस्मिता महिला" लीग स्पर्धा Ø मेरा युवा भारत व्दारा आयोजन

यवतमाळ, दि. 6 :(जिमाका) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी दि. 8 मार्चला सकाळी 7 वाजता नेहरु स्टेडीअम, गोधणी रोड, यवतमाळ येथे अस्मिता महिला" लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम विभाग यवतमाळ, खेलो इंडिआ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काऊट व गाईड कार्यालय, एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. महिला दिनानिमित्त वयोगट 13 वर्ष, 13 ते 18 व 18 ते 29 या वयोगटातील युवती करीता 100 मिटर, 200 मिटर, 400 मिटर दौड स्पर्धा व मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन खास युवती करीता करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता अस्मिता पोर्टलवर आपले रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य असून ज्यांनी रजिष्ट्रेशन केले आहे त्यांना या स्पर्धे मध्ये सहभागी होवून पोर्टल व्दारे आपले प्रमाणपत्र सुध्दा डाऊनलोड करता येणार आहे. त्याकरिता https://nses.kheloindia.gov.in किंवा https://mybharat.gov.in या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये शाळा, महावि...

यवतमाळ तालुक्यात विशेष महसूल शिबिरांचे आयोजन; नागरिकांनी लाभ घ्यावा तहसीलदार योगेश देशमुख यांचे आवाहन

Image
यवतमाळ, दि. 5 (जिमाका) : यवतमाळ तालुक्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या टप्पा क्रमांक १ अंतर्गत यवतमाळ तालुक्यात मंडळनिहाय विशेष महसूल शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरांमुळे तालुक्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम यांची बचत होऊन प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख होईल. जिल्हाधिकारी विकास मीना तसेच उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. शिबिरांमध्ये शेतकऱ्यांची प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे,सातबारा व ८-अ उताऱ्यातील त्रुटी दुरुस्त करणे तसेच डिजिटल स्वाक्षरीयुक्त उतारे तात्काळ उपलब्ध करून देणे अशा सेवा प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांसाठी उत्पन्न, जात, रहिवासी व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी ...

उद्यापासून जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान Ø 16 तालुक्यात शिबिरांचे आयोजन Ø 15 पेक्षा अधिक महसुली सेवा

यवतमाळ, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण व जनतेच्या तक्रारी निकाली काढण्यासह विविध योजनांचे लाभ देण्यासाठी उद्या दि. 7 मार्चपासून जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-1’ राबविण्यात येणार आहे. हे अभियानाचा 22 मे 2026 पर्यंत चालणार असून प्रत्येक महसूल मंडळ व नगरपरिषद स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना शिबिरस्थळी 15 पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या शिबिरांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7/12 उताऱ्यातील चुकांची दुरुस्ती करणे तसेच डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व 8-अ उतारे वितरित करणे या सेवा दिल्या जाणार आहेत. याशिवाय उत्पन्न, रहिवासी आणि जात प्रमाणपत्र तसेच नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच अकृषक (एनए) परवानगीसंदर्भातील मार्गदर्शन व सुधारणा, नवी...

पुसद प्रकल्पस्तरीय कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहात

Image
यवतमाळ, दि. 5 (जिमाका) : पुसद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या यशवंत रंग मंदिर मैदानावर २८ फेब्रुवारी रोजी पुसद प्रकल्पस्तरीय कर्मचारी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात व थाटात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून पुसद शहर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वीर बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. क्रीडा ध्वजारोहण व ज्योत प्रज्वलनानंतर रवी घड्याळे व एस.पी. हजारे यांनी कर्मचारी खेळाडू व पंचांना क्रीडा शपथ दिली. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल यांनी प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे सांगितले. सध्या देशभरात शुगर व बीपीसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य टिकविण्यासाठी खेळ आणि व्यायाम अत्यंत आवश्यक असल्याचे मत पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी व्यक्त केले. तर व्यायाम किंवा खेळात सातत्य ठेवणे महत्वाचे अस...

लोकसहभागातून जिल्ह्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहीम नागरिकांनो सहभागी व्हा - आरोग्य विभागाचे आवाहन Ø १ एप्रिलपासून अभियानास सुरुवात Ø गावांचे मूल्यमापन होणार Ø ग्रामपंचायत स्तरावर समित्या

Image
यवतमाळ, दि. 5 (जिमाका) : राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या महत्वाकांक्षी अभियानास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. लोकसहभागावर आधारित ही राज्यव्यापी आरोग्य चळवळ मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आली असून १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातही “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच आरोग्य सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. गावपातळीवर नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना चालना देण्यासाठी तसेच आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही मोहीम प्रभावी ठरणार आहे. सार्वजनिक स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, सामाजिक प्रबोधन या सह ग्रामीण भागातील विविध घटकांच्या...

विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढा ; समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांचे महाविद्यालयांना आवाहन

यवतमाळ, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज 15 मार्चपर्यंत निकाली काढा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी महाविद्यालयांना केले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती आणि अनुदान योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदान योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती , व्यावसायिक पाठ्यक्रमांसोबत संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. महाडीबीटी तांत्रिक कक्षामार्फत विद्यार्थी स्तरावरील अर्ज महाविद्यालय लॉगिन मध्ये पडताळणी (स्कृटिनी) या पर्यायामध्ये उपलब्ध केलेले आहेत. यामध्ये 15 मार्चपर्यंत असे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता मंजूर किंवा नामंजूर असे दोनच पर्याय प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. महाविदयालय स्तरावर प्रलंबित असलेले शिष्य...

नाफेडचे पाच चना खरेदी केंद्र सुरु Ø 29 एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

यवतमाळ, दि. 5 :(जिमाका) : खरीप पणन हंगामांतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी नाफेडमार्फत जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, पाटण, पुसद व आर्णी या पाच ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागांव, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या.पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद व शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चना खरेदी ही 29 एप्रिलपर्यंत करण्यात येणार असून चना खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, 7/12 उतारा, पिकपेरा व बॅकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत ही आवश्यक कागदपत्रे संबंधित खरेदी केंद्रावर स्वत: हजर राहून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी प्र. विजय गाढवे यांनी केले आहे. 000000

जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा ; अफवांवर विश्वास ठेवू नये Ø जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 5 (जिमाका) : मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या तीनही कंपन्यांनी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. तसेच या कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा नियमित आणि सुरळीतपणे पुरवठा करण्यात येणार असल्याचेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि संबंधित ऑईल कंपन्या एकत्रितपणे जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा साठा कायम राखण्यासाठी कटिबद्ध आहेत. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून न जाता अनावश्यक गर्दी टाळावी व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. ...

भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अॅडव्हायझरी जारी ! हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या मार्गदशक सुचनेनुसार मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या 24X7 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय...

कौशल्य विकास धोरणाबाबत सुचना, हरकती कळविण्याचे आवाहन धोरण

Image
यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : राज्याचे कौशल्य विषयक धोरण तयार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने दि. 13 जुन 2024 च्या शासन निर्णयान्वये मा. आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. कौशल्य विकास धोरणाची एकंदरीत व्याप्ती विचारात घेता या कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात संबंधित विषयाचे विशेषज्ञ म्हणून एम/एस केपीएमजी ॲडव्हिसरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधितानी कौशल्य धोरणाचा सुधारित प्रारूप मसुदा सादर केला आहे. दि. 24 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या नियामक समितीच्या बैठकीत मा. अपर मुख्य सचिव यांनी दिलेल्या सूचना विचारात घेवून धोरणाचा प्रारूप मसुदा महास्वयम पोर्टलवर नोटीस सेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याच्या कौशल्य विषयक धोरणाबाबत आपल्या सूचना, अभिप्राय, हरकती, सुधारणा इ. दि.6 मार्च पर्यंत विहित नमुन्यात लेखी स्वरुपात mhskillpolicy@mssds.in या इमेल आयडीवर कळविण्यात याव्यात. त्याअनुषंगाने कौशल्य धोरणाचा प्रारूप मसुदा महास्वयम पोर्टलवर नोटीस सेक्शनमध्ये उपलब्ध करून द...
Image
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी’ यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील #खारघर येथे आयोजित भव्य कार्यक्रमाच्या तयारी व नियोजनाविषयी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची विशेष मुलाखत आज दुपारी ४ वाजता महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होणार आहे. #जयमहाराष्ट्र #हिंददीचादर #गुरुतेगबहादुर

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त 'दिलखुलास' व 'जय महाराष्ट्र' मध्ये कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांत “हिंद-दी-चादर” – श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमाच्या तयारी व नियोजनाविषयी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होईल. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. मुलाखत News On AIR या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका उन्नती जगदाळे यांनी केले आहे. X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR “हिंद दी चादर” हा राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असून विविध...

श्री गुरू तेग बहादुर साहिब जी' यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचे नवी मुंबईत आयोजन शहिदी समागम कार्यक्रमासाठी प्रशासन सोयी-सुविधांसह सज्ज - कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडणार - राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक मुंबई दि. २७ : ‘हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. नवी मुंबई येथे होणाऱ्या हिंद -दी- चादर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरद रावजी ढोले, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपालसिंग सिद्धू, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅपी सिंग उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, या दोन दिवसीय कार्यक्रमात देश विदेशातून १८ ते २० लाख भाविक येणे अपेक्षित आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले असून, मुख्य मंडपात एकावेळी ८० हजार...

गुरु तेगबहादूर जी : सहिष्णुता, करुणा आणि धर्मस्वातंत्र्याचे प्रतीक

Image
-प्रो. डॉ. दीपक मो. शिंदे परीक्षा नियंत्रक, केंद्रीय जन जाती विद्यापीठ, विजयानगरम (विशाखापट्टणम) माजी संचालक – श्री गुरु गोबिंद सिंघ जी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, भारतीय इतिहासात अशी काही महान व्यक्तिमत्त्वे उदयास आली आहेत की, ज्यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरते अशा महान विभूतींचे कार्य एखाद्या धर्माच्या चौकटीत न अडकता संपूर्ण मानवजातीसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठरले आहे. शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर जी, हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य, न्याय, करुणा, धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अर्पण केले. त्यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असताना, त्यांचे सामाजिक सुधारक म्हणून असलेले कार्य आणि विचार आजही तितकेच सुसंगत आणि मार्गदर्शक आहेत. प्रत्यक्षात शीख धर्म असा एक धर्म आहे की या धर्माच्या धर्म गुरुनी दिलेल्या बलिदाना मुळे हिंदू धर्माचे रक्षण झाले आहे. गुरु तेगबहादूर जी : थोडक्यात जीवनपरिचय १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे जन्मलेले गुरु तेगबहादू...

27 फेब्रुवारीपासून नवीन मोटार सायकलची सिरीज

यवतमाळ, दि. 26 :(जिमाका) : परिवहनेत्तर विभागातील नवीन मोटार सायकलची सध्याची एमएच 29 सीएन सिरीज संपुष्टात येत असल्यामुळे एमएच 29 सीक्यु ही नवीन सिरीज 27 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली आहे. ज्या ग्राहकांना नवीन आकर्षक नंबर घ्यायचा असेल त्यांनी कार्यालयात येऊन अर्ज सादर करावे. ही मुभा फक्त एका दिवसासाठी उपलब्ध राहील, त्यानंतर ऑनलाईन सुविधेचा उपयोग करता येईल, यांची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे अवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी केले आहे

गर्भपातास मान्यतेसाठी वैद्यकीय मंडळ Ø श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मंडळ स्थापन

यवतमाळ, दि. 26 :(जिमाका) : श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे वैद्यकीय गर्भपात अधिनियम १९७१ च्या सुधारित २०२१ अधिनियमानुसार २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपाताला मान्यता देण्यासाठी वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे अधिष्ठाता असून समितीत क्ष-किरण तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, अनुवंश, मानसोपचार तज्ञ आणि मेंदुविकार तज्ञ अशा नऊ तज्ज्ञांचा समावेश आहे. गर्भातील बाळाला काही व्यंग असल्यास गर्भवती महिलींना २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपातास मान्यता देण्यासाठी वैद्यकीय मंडळास पाचारण करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी केले आहे.

शासकीय वसतिगृहातील प्रवेश अर्जासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ

यवतमाळ, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय वसतीगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह, आधार व स्वयंम या योजना १२ च्या नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतात. या योजनेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यासाठी वसतीगृह प्रवेश प्रणाली कार्यन्वित करण्यात आलेली होती. राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाळ योजनेतंर्गत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकातील बदलाबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रवेश प्रक्रिया राबवुनही अद्यापही अनेक जिल्ह्यामध्ये रिक्त जागा दिसून येत आहेत. मुलांचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ येथील व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विजाभज प्रव...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

यवतमाळ, दि. 26 (जिमाका) : लोकांच्या तक्रारी निकाली काढण्याच्यादृष्टीने मार्च महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि. 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे असे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्त‍िक स्वरुपाची नसावी. महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये अर्जाचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. तसेच अर्ज दाखल करतेवेळी तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाही, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी केले आहे.

कृषी पुरस्कारांसाठी आता ऑनलाईन संगणक प्रणाली Ø पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करावे Ø जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 26 :(जिमाका) : कृषी विभागामार्फत दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांना विविध पुरस्कार दिले जातात. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी कृषी विभागामार्फत स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. सदर पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रद...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाची संधी ! Ø ४० गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार Ø विद्यार्थ्यांनो ऑनलाइन अर्ज करा Ø प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 26 :(जिमाका) जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत ‘परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती’ योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ४० गुणवंत आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमाती ४० विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भोजन), शैक्षणिक आकस्मिक खर्च, विमान प्रवास खर्च, व्हिसा शुल्क आणि आरोग्य विमा अशी सर्वसमावेशक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शैक्षणिक आकस्मिक खर्चासाठी युएएस व इतर देशांसाठी (यूके वगळून) दरवर्षी १ हजार ५०० यूएस डॉलर, तर यूकेसाठी १ हजार १०० जीबीपी इतकी रक्कम दरवर्षी देण्यात येईल. योजनेसाठी पात्रता या योजनेसाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे, तर पीएचडीसाठी...

येरद येथील शांताई ज्युनियर कॉलेज परीक्षा केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त घेण्याच्या सूचना

Image
यवतमाळ, दि. 25 (जिमाका): इयत्ता बारावी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज मौजा येरद (ता. यवतमाळ) येथील शांताई ज्युनियर कॉलेजला अचानक भेट देत परीक्षा केंद्राची पाहणी केली. यवतमाळ शहरापासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या या केंद्रात आज बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना ही तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष परीक्षा सुरू असलेल्या खोलीत जावून पाहणी केली तसेच नियुक्त पर्यवेक्षक शिक्षकांना कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याबाबत स्पष्ट व कडक सूचना दिल्या. परीक्षा वर्गात नेमण्यात आलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सतर्क राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले. तपासणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक वर्गातील सीसीटीव्ही व्यवस्था कार्यरत आहे का, याची प्रत्यक्ष पडताळणी केली. परीक्षा सुरु असताना कोणतेही कॉपीसारखा गैरप्रकार होत नाही ना, याची त्यांनी बारकाईने पाहणी केली. आज पार पडत असलेल्या जीवशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने सीसीटीव्...

राज्य शासनाकडून जिल्हा वार्षिक योजनेसाठी 570 कोटी मंजूर Ø 98 कोटींची अतिरिक्त वाढ Ø मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी Ø जिल्ह्याच्या विकासाला गती Ø आकांक्षित तालुका कार्यक्रमाला बळ

Image
यवतमाळ, दि. 25 (जिमाका): जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनाने सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 570 कोटी रुपयांची अंतिम तरतूद मंजूर केली आहे. ही मंजुरी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत देण्यात आली. कमाल आर्थिक मर्यादेपेक्षा 98 कोटी 42 लाख रुपयांची अतिरिक्त वाढ मान्य करण्यात आली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये जिल्ह्यास 471 कोटी 58 लाख रुपयांची कमाल आर्थिक मर्यादा प्राप्त झाली होती. त्यानुसार प्रारूप आराखडा तयार करून 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यासाठी 175 कोटींच्या अतिरिक्त निधीची प्रभावी मागणी केली होती. त्यापैकी 98 कोटी 42 लाख रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली. निधीचे क्षेत्रनिहाय वाटप या मंजूर तरतुदीनुसार गाभा क्षेत्रासाठी 373 कोटी 10 लाख रुपये, बिगरगाभा क्षेत्रासाठी 170 कोटी 4 लाख रुपये तर इतर क्षेत्रासाठी 5 टक्के म्हणजे 26 कोट...