
आश्रम शाळेतील प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षित व्हावा - जिल्हाधिकारी अमोल येडगे उच्च शिक्षण आणि करियर यावर आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन* यवतमाळ,दि १४, जिमाका :- उच्च शिक्षणात आदिवासी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गळती असून केंद्रीय विद्यापीठे आणि देशातील टॉप विद्यापीठांमध्ये आदिवासींच्या जागा रिक्त राहतात. आश्रम शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी एकलव्य सोबतचा हा उपक्रम खूप महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा प्रशासन आणि एकलव्य संस्था यवतमाळ यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील शासकीय आणि अनुदानित अशा एकूण २६ आश्रम शाळांमध्ये ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसोबत उच्च शिक्षण आणि करियर मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन चिचघाट उच्च माध्यमिक आश्रम शाळेत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी श्री येडगे बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडाच्या प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, प्रशांत चव्हाण उपस्थित होते. आ...