Posts

Showing posts from May, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केले. ०००

बोगस कृषि निविष्ठा निदर्शनास आल्यास तक्रार नोंदवा

Ø तक्रारींसाठी कृषी विभागाकडून क्रमांक जाहीर Ø अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन यवतमाळ, दि 30 (जिमाका) : खरीप हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये बि-बियाणे, रासायनीक खते व किटकनाशकाची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. सदर कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या उपलब्ध होणे आवश्यक आहे. दर्जाबाबत किंवा बोगस निविष्ठांबाबत शेतकऱ्यांना तक्रार असल्यास त्यांनी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्तम दर्जाच्या उपलब्धता व्हाव्यात तसेच जिल्ह्यात कोठेही बोगस बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके विक्री होऊ नये, यासाठी कृषि विभागाच्यावतीने हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे. बोगस व गुणवत्ता नसलेल्या या निविष्ठा आढळून आल्यास शेतकऱ्यांनी त्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषि अधिकारी यांना द्यावी. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना बि-बियाणे, रासायनीक खते किंवा किटकनाशके याबाबत तक्रार नोंदविता यावी यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष स्थापण करण्यात आला आहे. या कक्...

अतिक्रमण बंद पांदनरस्ते मोकळे करण्याची मोहिम

जिल्ह्यामध्ये गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण बंद झालेले पांदन, पाणंद, शेतरस्ते शिवार, शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहिम दि.30 जून पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी असे अतिक्रमण बंद रस्ते असल्यास ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पांदन रस्ते, शेत रस्ते मोकळे करावयाचे असल्यास आपल्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून दि.30 जून पर्यंत अतिक्रमण मोकळे करण्याबाबतची कार्यवाही करून घावी. याबाबत काही तक्रार किंवा अभिकथने, गाऱ्हाणी असल्यास तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, ह्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी केले आहे. 000

शालेय दाखल्यांसाठी शिबिरांचे आयोजन

शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना सदर दाखले वेळेत मिळावेत यासाठी महसूल प्रशासनाच्यावतीने शिबिर घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना दाखले देण्याकरीता शिबिर दि.30 जूनपर्यंत घेण्यात येणार आहे. शिबिराबाबतचे सविस्तर वेळापत्रक मंडळनिहाय तहसिल कार्यालयात उपलब्ध आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय कामाकरीता आवश्यक असलेले कागदपत्र उपलब्ध ठेवून शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा, असे उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी केळविले आहे. 000

मतमोजणी निमित्त मद्यविक्रीस बंदी

यवतमाळ, दि.30 (जिमाका) : यवतमाळ- वाशिम व हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दि.4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानिमित्त मतमोजणीच्या दिवशी निकाल घोषित होईपर्यंत संपुर्ण जिल्हाभर मद्यविक्रीस बंदी राहणार आहे. यवतमाळ वाशिम व हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दि.4 जून रोजी मतमोजणी आहे. त्यानिमित्त निकाल घोषीत होईपर्यंत सर्व किरकोळ व घाऊक मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-2, सीएल-3, सीएल, एफएल, टिओडी-3 अनुज्ञप्ती, एफएल-1, एफएल-2, एफएल-3 (परवानाकक्ष) एफएल-4 व एफएल/ बीआर-2 प्रकारच्या मद्यविक्रीस बंदी राहणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे. 000 --

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

Image
यवतमाळ, दि.२८ (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांच्यासह कार्यालय अधीक्षक तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केले. ०००

आदिवासी गावातील 400 सरपंचांना पोस्टकार्डद्वारे योजनांची माहिती

Image
Ø पांढरकवडा आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम Ø कार्डवरील क्युआरद्वारे मिळतो योजनांची माहिती Ø प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रयत्न Ø वंचितांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी सरपंचांना आवाहन शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतेच असे नाही. आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यावतीने लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी अतिशय नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. लाभापासून वंचित 400 आदिवासी गावातील सरपंचांना पोस्टकार्ड पाठविण्यात आले असून या कार्डवरील क्युआर कोडवर विभागाच्या योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. क्युआर स्कॅन केल्यानंतर चुटकीसरशी योजना समजून घेता येणार असून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेतांना मदत होणार आहे. पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकुण 9 तालुके असून त्यात यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, केळापुर, घाटंजी, झरी जामणीचा समावेश आहे. प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा 18, अनुदानित आश्रमशाळा 28 व शासकीय वसतीगृह 19 कार्यरत आहे. डोंगराळ व दुर्ग...

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी

ज्या विद्यार्थ्यांनी कंबाईन्ड डिफेन्स सर्विसेस या परीक्षेकरीता अर्ज सादर केलेला आहे. अशा विद्यार्थ्यांकडून सीडीएस या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथे विनामुल्य निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील स्थायी नवयुवक व नवयुवतींसाठी दि.१० जून ते दि.२३ ऑगस्ट या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६३ चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे दि. ५ जून रोजी सकाळी ११.३० वाजता मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी फेसबुक, वेब पेज डिपाट्मेंन्ट ऑफ सैनिक वेलफेअर, पुणे यावर सर्च करुन सीडीएस कोर्स क्रमांक 63 कोर्ससाठी दिलेले किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेले प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची ...

भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्र सुरु शेतकरी नोंदणीसाठी मोबाईल ॲप

खरीप पणन हंगामांतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका व रागी या भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी जामणी, पुसद व आर्णी हे खरेदी केंद्र असून नव्याने राळेगांव व कळंब या 2 खरेदी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे. या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दि.31 मे पर्यंत सुरु राहणार आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, राळेगांव तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती राळेगांव, कळंब तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती कळंब या केंद्रांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना या हंगामापासून ज्यांचा सातबारा आहे, त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. शेतकरी नोंदणी मोबाईल ॲपद्वारे होत असून लाईव्ह फ...

नामांकित निवासी शाळेसाठी 30 जून पर्यंत अर्ज आमंत्रित

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा कार्यक्षेत्रातील सन 2024-25 या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी दि.30 जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव झरी, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, यवतमाळ हे तालुके येत असुन या तालुक्यातील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. इयत्ता 1 ली 2 री मध्ये प्रवेश देण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीच्या दाखला, आधारकार्डची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाच्या कुटूंबातील वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रुपये 1 लाख आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येतील. तसे प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत जोडावे लागेल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसाव...

३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस तंबाखू नियंत्रण काळाची गरज

यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या जनजागृतीसाठी दि. ३१ मे हा दिवस दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. यावर्षी या दिवसाकरीता जागतिक आरोग्य संघटनेने "तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण" हे घोषवाक्य निवडले आहे. तंबाखू नियंत्रण समुदायाच्या प्रयत्नांमुळे सिगारेटचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले असले तरी २०२२ च्या आकडेवारीनुसार जगभरात १३-१५ वर्षे वयोगटातील सरासरी ३० टक्के मुले तंबाखूचे काही प्रकार वापरतात. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा केंद्रशासनाचा कार्यक्रम असून जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये एनएचएमच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जात आहे. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा उद्देश या कार्यक्रमाचा उद्देश तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण टाळण्यासाठी सामान्य जनतेमध्ये जनजागृती करणे, संशयीत रुग्णांना वेळेत उपचार करुन कर्करोगापासून वाचविणे, जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये तंबाखूमुक्त करणे, कोटपा कायद्याचे उल्लंघन न...

तंबाखू सेवनामुळे दातांचे आरोग्य बिघडले ! अनेक आजारात वाढ

तंबाखूच्या सेवनामुळे दातांचे आरोग्य बिघडत असून, पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंड कमी उघडणे, हिरड्यावर सुज येणे, दातांमध्ये इन्फेक्शन वाढणे आदी समस्यांमुळे अनेकजण त्रस्त आहेत. राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ कालावधीत १४ हजार ७१२ जणांची तपासणी केली असता, यात अनेकांच्या दातांना कीड लागल्याचे निदर्शनास आले आहे. काहींना पांढरा चट्टा, लाल चट्टा आणि तोंड न उघडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तंबाखू, खर्रा, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तपासणी केलेल्यांपैकी बरेच जणांच्या तोंडात पांढरा चट्टा आला आहे. तर काही व्यक्तींचे तोंड उघडत नाही. काही वयस्क व्यक्तींच्या हिरड्यावर सुज आली असल्याचे दिसून आले आहे. १२५१ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालय, आरोग्य संस्था येथे पान, सुपारी, गुटखा खाणारे व थुंकणाऱ्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आली. १ हजार २५१ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम अधिक कडक केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक ...

मुलांचे शासकीय वसतीगृह नेर येथे मोफत प्रवेश प्रक्रीया सुरु

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या मुलांचे शासकीय वसतीगृह नेर नबाबपूर येथे रिक्त जागेवर प्रवेश देण्यासाठी वर्ग 8 वी, 11 वी व बिए, बिकॉम, बिएस्सी प्रथम वर्षाकरिता प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत आहे. अनुसुचीत जातीसाठी 80 टक्के, अनुसूचीत जमाती 3 टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी 5 टक्के, इतर मागासवर्ग 5 टक्के, विशेष मागासप्रवर्गासाठी 3 टक्के, अनाथ 2 टक्के व अपंगासाठी 3 टक्के जागा राखीव आहे. प्रवेश घेण्यासाठी मागील शैक्षणिक सत्रातील गुण पत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी वसतीगृहाचे गृहपाल दिपक धावडे यांच्याशी 9823723802 या क्रमांकावर संपर्क साधावा असे वसतीगृहाच्या गृहपालांनी कळविले आहे. 000

29 मे रोजी शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दि.29 मे रोजी सकाळी 9.30 वाजता शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या भरती मेळाव्याकरीता महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लि. ईगतपूरी या आस्थापनेला जोडारी, कातारी, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, विजतंत्री, संधाता, मशिनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायाचे उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षाला प्रशिक्षण घेणारे उमेदवार पात्र आहेत. या संधीचा जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मुळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतिसह सदर मेळाव्यास उपस्थित राहावे.असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांनी केले आहे. 000

मुलभूत कर्तव्ये या विषयावर कायदेविषयक शिबीर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी चिकित्सालय, अमोलकचंद विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुलभुत कर्तव्ये या विषयावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मुनोत होते तर मुख्य अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार होते. प्रमुख वक्ते म्हणुन अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक संदिप नगराळे उपस्थित होते. वक्ते संदीप नगराळे यांनी मुलभुत कर्तव्ये व बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कर्तव्ये हे ४२ व्या संशोधनामुळे अंतर्भुत केले. २१ (अ) मोफत व सक्तीच्या शिक्षणिचा अधिकार सदर कलमान्वये प्रदान करण्यात आला, असे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्य अतिथी व मार्गदर्शक कुणाल नहार यांनी शालेय जिवनापासून महाविद्यालय आणि त्यानंतर एक नागरीक म्हणुन कर्तव्यपरायण व्हावे व मुलभुत कर्तव्य पार पाडावित, असे आवाहन केले. मोफत व सक्तीच्या शिक्षणाबाबत बोलतांना मुलांना ज्...

चना खरेदीसाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्रे

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी जामणी, पुसद, आर्णी, दिग्रस, बाभुळगांव या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रावर दि.28 मार्च ते 25 जून पर्यंत सुरु राहणार आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, दिग्रस तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस, बाभुळगांव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, बाभुळगांव या केंद्रांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चना खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दि.28 मार्च पासून करण्यात येत असून प्रत्यक्षात चना खरेदी दि. 28 मार्च ते 25 जूनपर्यंत करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, सातबारा उतारा, पिकपेरा व बँके पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर देवून...

महाराष्ट्र विविध प्रथा, परंपरांनी नटलेले समृद्ध राज्य - संजय राठोड

Image
महाराष्ट्र विविध प्रथा, परंपरांनी नटलेले समृद्ध राज्य आहे. येथील साहित्य, संस्कृती, कला, संगीत, समृध्द गडकिल्ले महाराष्ट्राचे वैभव आहे. अशा राज्यात आपण वास्तव्य करतो, ही आपल्यासाठी देखील गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहन झाले. त्यावेळी शुभेच्छा देतांना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीस पालकमंत्र्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी अनेक मराठी बांधवांना सातत्याने संघर्ष करावा लागला. या संघर्षात 105 बांधवांना शहीद व्हावे लागले. या सर्व शहीदांना पालक...