अतिक्रमण बंद पांदनरस्ते मोकळे करण्याची मोहिम

जिल्ह्यामध्ये गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण बंद झालेले पांदन, पाणंद, शेतरस्ते शिवार, शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहिम दि.30 जून पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी असे अतिक्रमण बंद रस्ते असल्यास ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पांदन रस्ते, शेत रस्ते मोकळे करावयाचे असल्यास आपल्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून दि.30 जून पर्यंत अतिक्रमण मोकळे करण्याबाबतची कार्यवाही करून घावी. याबाबत काही तक्रार किंवा अभिकथने, गाऱ्हाणी असल्यास तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, ह्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल