
भूसंपादन मोबदल्यातून उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन निर्माण करा - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह * रेल्वे भूसंपादनाचा मोबदला वितरण * घोटी, पार्डीतील शेतकऱ्यांना गावातच धनादेश * 48 शेतकऱ्यांना 5 कोटी 89 लाखाचा मोबदला यवतमाळ, दि. 6 : वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी थेट खरेदी पध्दतीने जमीन संपादनाची विशेष मुभा शासनाने दिली आहे. त्यामुळे जमीन संपादनाच्या कामास गती आली असून शेतकऱ्यांना खरेदी विक्री दराच्या चारपटीपेक्षा जास्त रक्कम दिली जात आहे. भूसंपादनाची सदर रक्कम उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन निर्माण करण्यासाठी उपयोगी आणा , असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. रेल्वे मार्गासाठी जमीन संपादीत केलेल्या चापर्डा व घोटी या दोन गावातील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या गावात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मोबदल्याचे वितरण केले. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी विशेष भुसंपादन अधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसिलदार श्री. भोसले, चापर्डाच्या सरपंच सरला बंडाते यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधि...