Posts

विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विषयांचा आढावा

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक  यवतमाळ, दि. 23 : अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते. यावेळी पियुषसिंह म्हणाले, मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत ॲक्शन प्लॅन तयार झाला आहे. त्यामुळे काम त्वरीत सुरू करा. शेततळ्यांची संपूर्ण कामे मार्च 2018 अखेरपर्यंत करण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे. जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात प्रत्येक यंत्रणेला दिलेली कामे त्वरीत सुरू करावी. धडक सिंचन योजनेचा लाभ देण्यात येणा-या लाभार्थ्यांना अग्रीम रक्कम अदा झाली असल्यास त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश द्यावे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सातत्य ठेवा. गुड मॉर्निंग आणि मॉनेटरींग पथकाचा आढावा नियमित घ्या. बोंडअळीच्या प्रादुर्भावासंदर्भात ज्या शेतक-यांच्या तक्रारी आल्या असतील, त्यांचे सर्व्हेक्षण त्वरीत करा. बेंबळा प्रकल्पांतर्गत पूनर्वसनासाठी निधी मंजूर झाला आहे. मार्च 2018 पर्यंत...

सव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे उत्पादन

Image
केमच्या मार्गदर्शनात लिझा तत्वाने केली लागवड यवतमाळ, दि. 23 : पारंपारिक शेतीला फाटा देत प्रायोगिक तत्वावर हळद लागवडीच्या प्रयोगातून ज्ञानेश्वर सुरोशे यांनी भरघोस उत्पादन घेतले आहे. कृषीसमृध्दी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या ( केम ) मार्गदर्शनात सव्वा एकरात त्यांनी लिझा तत्वाने हळदीची लागवड केली. हंगामाअखेर तब्बल 200 क्विंटल हळदीचे उत्पादन निघाले. यातून त्यांच्या हाती सव्वाचार लाख रुपये निव्वळ नफ्याच्या स्वरुपात आले. त्यामुळे यावर्षी 4 एकरात त्यांनी हळद लावली आहे. महागाव तालुक्यातील अंबोडा येथील रहिवासी असलेले सुरोशे यांचा मुळ पिंड शेती आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. रासायनिक खताच्या अति वापराने शेतीचे तंत्र बिघडले असून ते सुधारण्याची गरज आहे, अशी त्यांची धरणा आहे. त्यामुळे केवळ गोमुत्र, शेणखत व एस – 9 कल्चरच्या भरोश्यावर त्यांनी पाच पैकी सव्वा एकरात हळद लागवड केली. प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या अभिनव प्रयोगातून त्यांना एकूण 200 क्विंटल उत्पादन आले. हळदीच्या बेण्याची विक्री अडीचशे रुपये प्रति क्विंटल या दराने त्यांना एकूण 5 लक्ष रुपये मिळाले. यातील लागवड व इतर खर्च 72 ह...

दोन वर्षात राज्यात 1500 मेगावॅट सौरउर्जा निर्मितीचे उद्दिष्ट - पालकमंत्री मदन येरावार

Image
वेदधारिणी विद्यालयात सोलर रुफ टफचे उद्घाटन यवतमाळ, दि. 21 : सद्यस्थितीत जगाला ग्लोबल वॉर्मिंगची समस्या भेडसावत आहे. दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे. कोळशापासून होणा-या वीज निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. तसेच हवेच्या माध्यमातून हे कण आपल्या शरीरात जातात. परिणामी नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सरकार, सामाजिक संघटना आदींच्या माध्यमातून प्रदुषण निर्मुलनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. सौरउर्जा हा त्यावर एक चांगला उपाय आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात राज्यात 1500 मेगावॅट सौरउर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. पिंपळगाव येथील वेदधारिणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सौर उर्जेवर आधारीत वीज निर्मिती संचाचे (सोलर रुफ टफ) उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका ॲड. करुणा तेलंग होत्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नीरज डफळे, विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, उपाध्यक्ष विनोद संगीतराव,...

राळेगाव नगर पंचायतीमध्ये पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

Image
यवतमाळ, दि. 21 : राळेगाव नगर पंचायत अंतर्गत करण्यात येणा-या विविध विकास कामांसदंर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी नगर पंचायतीत आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, नगराध्यक्ष बबन भोंगरे, उपाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण, जि.प.सदस्य चित्तरंजन कोल्हे, पं.स. सदस्य प्रशांत तायडे आदी उपस्थित होते. नगर पंचायतीला विकासकामाकरीता वैशिष्टपूर्ण योजनेतून किती निधी मिळाला, असे विचारून पालकमंत्री येरावार म्हणाले, राळेगावच्या विकासाकरीता शासन कटिबध्द आहे. येथील तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव नगर पंचायतीने तातडीने पाठवावा. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांना द्यावी, असे ते म्हणाले. यावेळी नगर पंचायतीला विकास कामांसाठी 10 कोटी रुपये मिळाले असून 5 कोटी रुपयांमधून किरकोळ रस्ते, 3 कोटी गार्डन, स्मशानभुमी आदी कामांसाठी तर 2 कोटी रुपये व्यापारी संकुलासाठी असल्याचे उपाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी पालकमंत्री मदन येरावार यांनी कळंब- राळेगाव रस्त्याच्या काँक्रेटीकरण करणा-या डी.एल.जी. मशीनचे उद्घाटन केले. यावेळी आमदार डॉ...

पालकमंत्र्यांनी केली बोंडअळीग्रस्त पिकाची पाहणी

Image
Ø शेतक-यांनी तक्रारी करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी कृषी शास्त्रज्ञ तसेच कृषी विभागाच्या अधिका-यांसह कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील राजेंद्र पांडे यांच्या शेतातील बोंडअळीग्रस्त पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, गावचे सरपंच एच.एच. ठाकरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे, कृषी विद्यापीठाचे डॉ. राठोड, डॉ. कोल्हे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विस्तार अधिकारी कैलास वानखेडे आदी उपस्थित होते.  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाई करीता शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांनी याबाबत तक्रारी द्याव्यात. नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण कृषी सहाय्यक स्तरावर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाचे आदेश येताच त्वरीत सर्व्हे करू. बी.टी – 3 या बियाण्याला परवानगी नाही. तरीसुध्दा ते विकले गेले व शेतक-यांनी खरेदी केले. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले त्यांना त्वरीत मदत मिळ...

आरोग्य व विकासासाठी स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी - पालकमंत्री येरावार

Image
राळेगाव पं.स. येथे हागणदारीमुक्तीबाबत कार्यक्रम यवतमाळ, दि. 20 : स्वातंत्र्यपूर्व काळापासून महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचा मंत्र आपल्याला दिला आहे. “ स्वच्छता ही सेवा ” हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. स्वच्छतेचा संबंध हा आरोग्याशी निगडीत आहे. समाजव्यवस्था निरोगी, निकोप असली तरच देश प्रगतीपथावर पोहचेल. केवळ शौच्छालय बांधून उद्दिष्ट पूर्ण होणार नाही तर स्वच्छतेबाबत जनजागृती करणे ही खरी फलश्रृती आहे. त्यामुळे आरोग्य व विकासासाठी स्वच्छता ही लोकचळवळ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. राळेगाव पंचायत समिती येथे “ उत्सव हागणदारीमुक्तीचा ” याबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, आमदार डॉ. अशोक उईके, राळेगाव पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे, उपसभापती नीलेश रोठे, जि. प. सदस्य चित्तरंजन कोल्हे, उषा भोयर, प्रिती काकडे, पंचायत समिती सदस्या शिला सलामे, स्नेहा येणोरकर, प्रशांत तायडे, ज्योती खैरकार, राळेगावचे नगराध्यक्ष बबन भोंगारे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अ...

स्थानिक स्तरावरच नागरिकांच्या तक्रारी सोडवा - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

Image
Ø दिग्रस येथे उपविभागस्तरीय समाधान शिबिर   यवतमाळ, दि. 18 : सामान्य नागरिक शासकीय कार्यालयात आपल्या अडीअडचणी घेऊन येत असतात. अधिका-यांनी या तक्रारी गांभिर्याने घ्याव्यात. वारंवार त्यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवायला सांगू नये. नागरिकांच्या तक्रारी स्थानिक स्तरावरच सोडविण्यासाठी अधिका-यांनी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.             दिग्रस येथील तहसील कार्यालयात आयोजित पुसद उपविभागस्तरीय समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी मंचावर पंचायत समिती सभापती विनोद जाधव, जि.प.सदस्य लखन राठोड, हितेश राठोड, उपसभापती केशव राठोड, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी खरवडे आदी उपस्थित होते.             समाधान शिबिरामध्ये तक्रार घेऊन येणा-या नागरिकांच्या तक्रारींसंदर्भात अधिका-यांनी इत्यंभूत माहिती ठेवावी, असे सांगून राज्यमंत्री राठोड म्हणाले, तक्रारकर्त्यांच्या तक...