केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा दौरा
यवतमाळ, दि. 30 : केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे  आहे.
शनिवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9.20 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ कडे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता वनमहोत्सव फॉरेस्ट पार्क, जांब जनकनगरी जवळ कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता राजराजेश्वर सभागृह मुकूटबन, झरी जामणी येथे नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीर. दुपारी 12 वाजता गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता मुकूटबन येथून वणी करीता प्रस्थान. दुपारी 4 वाजता एस.बी.लॉन, वणी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता ईद मिलन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9 वाजता वणी येथून चंद्रपुरकडे प्रयाण.
0000000
वृत्त क्र.593
वनमहोत्सवाला 4 कोटी वृक्ष लागवडीचे वेध
यवतमाळ, दि. 30 : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परवा वृक्ष लागवडीमध्ये कोणी सहभागी व्हावे ? या प्रश्नाच्या उत्तरात... ज्याला जगण्यासाठी ऑक्सीजन हवा, त्या प्रत्येकाने एक झाड लावावे, असे आवाहन केले आहे. उदया 1 जुलैपासून 7 जुलैपर्यंत राज्य शासनाच्या वनविभागामार्फत वनमहोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवसांमध्ये वन विभागाने 4 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. वसुंधरेच्या या आराधनेत महाराष्ट्रातील 11 कोटी 24 लाख जनतेनेही सहभागी व्हावे, असे आवाहन शासनाने केले आहे.
शासन जनतेसाठी काय करते, हा प्रश्न अनेक योजनांच्या संदर्भात विचारला जातो. तो कदाचित लोकशाही व्यवस्थेमध्ये योग्यही असेल, मात्र उदयापासून सुरु होणा-या वनमहोत्सवाला आता शासकीय यंत्रणेसोबत सर्व सामान्यांच्या सहभागाची अपेक्षा आहे. 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टय घेताना वन मंत्र्यांनी वन विभाग व सक्षम यंत्रणांमार्फत हे उद्दिष्टय पूर्ण कसे होईल याची काळजी घेतली आहे. त्यामुळे 4 कोटी वृक्ष लागतील व त्याचे संवर्धनही केले जाईल. मात्र वसुंधरेच्या हिरवाईच्या या महोत्सवात सर्वसमावेशकतेची अपेक्षा आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2016 मध्ये जेव्हा 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला. तेव्हा अनेकांना ही घोषणा दरवर्षी येणा-या पावसाळयाप्रमाणे वाटली. मात्र 2 कोटीचे उद्दिष्टय घेऊन 2 कोटी 82 लक्ष वृक्ष लागवड झाली आणि त्यातील 91 टक्के वृक्ष जिवंत असल्याची आकडेवारी पुढे आली. तेव्हा अवघ्या महाराष्ट्राने मुनगंटीवार यांच्या नियोजनाला सलाम केला. त्यामुळेच आता त्यांच्या नियोजनात संपूर्ण महाराष्ट्राला 1 जुलैपासून सुरु होणा-या वनमहोत्सवाचे वेध लागले आहे. सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर उदया 1 ते 7 जुलैच्या वनमहोत्सवाची तयारी सुरु आहे. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, वन व वन्यजीव प्रेमी या वनमहोत्सव मोहिमेत स्वत:ला झोकून देत असून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. वनमहोत्सवाच्या शुभारंभाचा  कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 1 जुलै 2017 रोजी ऐरोली, नवी मुंबई  येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र येथे सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्रात वृक्षक्रांतीला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारताच्या एकूण भूभागावर केवळ 11 टक्के जंगल आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण एकूण भूभागाच्या केवळ 20 टक्केआहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र हे वनक्षेत्र असणे आवश्यक आहे.  त्यामुळे सद्या  २० टक्के असणारे वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत वाढवायचे असेल तर वन जमिनीबरोबर वनेतर जमिनीवरही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे.महाराष्ट्रात सर्वाधि वनाच्छादित प्रदेश विदर्भात आहे. याठिकाणी 46 टक्के वन सुरक्षित आहे. मात्र मराठवाडा सारख्याप्रदेशात एक टक्काही वन नाही. त्यामुळे कोरडवाहू शेतीच्या परंपरेतील हमीयुक्त पावसाचे चक्र राज्यात पूर्णत: कोलमडलेआहे.सद्या राज्यात पावसाची हमी पूर्व विदर्भातील वनाच्‍छादित गडचिरोली जिल्हयात केवळ देता येते. कदाचित हीच हमी कोकणातील काही जिल्हयातील वनसंपदा देवू शकते. मात्र अन्य जिल्हयाचे काय ?  झाडेच नसतील तर दुष्काळ, नापिकी, अवेळी पाऊस, जमीनीची प्रचंड धुप,ऋतुचक्राला छेद, वाढते तापमान, अशा अघटीताला सहन करावेच लागेल.
त्यामुळे केवळ विदर्भ व कोकणातील हिरवाईने भागणार नाही. पर्यावरणाचा समतोल सर्वच विभागाला साधावा लागणार आहे. त्यामुळे वनमहोत्सव हा महाराष्ट्रव्यापी हरीत महोत्सव झाला आहे. त्यासाठीच प्रत्येक जिल्हयाला वनमंत्र्यांनी उद्दिष्ट दिले आहे. राज्याच्या मंत्री मंडळातील सर्व मंत्र्यांनी देखील या मोहिमेत स्वत:ला झोकून दिले असून त्यांच्या अधिपत्याखालील येणा-या प्रत्येक विभागाने यामध्ये आपले दायित्व पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. शासन स्तरावर एकीकडे हा उत्सवी नियोजनाचा आराखडा तयार झाला असतांना स्वयंसेवी संस्थांनी आणि तरुणाईने ग्रिन आर्मीच्या माध्यमातून वनविभागाचा उत्साह वाढविला असून सुधीर मुनगंटीवार यांच्या 4 कोटी या मॅजिक फिगरच्या पुढे वृक्ष लागवडीची संख्या जाणार असे चित्र आहे. खरे तर ही मोहिम जलयुक्त शिवार मोहिमेसारखी आता प्रत्येक शिवारात प्रत्येक शेतात आणि प्रत्येक कार्यालयाच्या आवारात साजरी होत आहे. त्यामुळेच ज्यालाशुध्द पाणी हवे असेल, सृष्टीतील जीव, जंतू, प्राणी यांचे संवर्धन हवे असेल, जगण्यासाठी शुध्द ऑक्सीजन हवा असेल, पुढच्या पिढीसाठी डेरेदार वृक्ष व संतुलीत पर्यावरण हवे असेल, अशा प्रत्येकाने एक झाड लावावे  त्याच्या संरक्षणाची हमी घ्यावी, असेआवाहन वनमंत्री सद्या सर्व व्यासपीठावरुन करीत आहे.  त्यासाठी 27 हजार ग्रामपंचायती, 111 नगरपंचायती, 230 नगरपरिषदा, 26 महानगरपालिका यांना त्यांनी आवाहन केले आहे. दुसरीकडे या कामात शेकडो स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी, वन्यजीवप्रेमीत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. वृक्षलागवडीच्या माध्यमातून मुनगंटीवार अवघ्या देशाच्या पर्यावरण संतुलनाला हातघालत आहेत. गेल्या वर्षी 2 कोटी, यावर्षी 4 कोटी, पुढच्या वर्षी 13 कोटी, त्यानंतर 33 कोटी असे 50 कोटीचे उदिष्ठयत्यांनी घेतले आहे. या प्रत्येक वर्षाच्या नियोजनाची तयारी त्यांनी केली आहे. झाडे तोडणाऱ्या हातांपेक्षा झाडे लावणाऱ्या हातांची संख्या वाढवायची आहे, असे साधे गणित मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडी संदर्भात आवाहन करतांना मांडले आहे.
 शासकीय वृक्ष लागवडीशिवाय वैयक्तिक,  संस्थात्मक आणि संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होत आहे. या वृक्ष लागवडीची माहिती शासनाकडे नोंदवली जावी म्हणून वन विभागाने ‘My Plant’ नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत सर्व संबंधितांनी केलेली वृक्ष लागवड या मोबाईल ॲपद्वारे वन विभागाकडे नोंदवावी,असे आवाहन वनविभागाने केले आहे.
राज्यात जरी यावर्षी 4 कोटीचे उद्दिष्टय आहे. तरी वृक्ष लागवडीसाठी १६ कोटी ६० लाख १० हजार रोपे विविध रोपवाटिकांमधून उपलब्ध आहेत. रेल्वे जमिनी, संरक्षण मंत्रालयाच्या मालकीच्या जमिनी, राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यासाठी संबंधित मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. मराठवाड्यात इको बटालियन मार्फत वृक्षाच्छादन वाढवण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम विभागाने हाती घेतला आहे. सामान्य जनतेने शेताच्या बांधावर, रस्त्यांच्या कडेवर, पाणीसाठलेल्या बंधाराच्या बाजुला, गावा-शहरारातील मोकळया जागेवर, जंगलात कुठेही एक झाड लावावे, असे आवाहन वनविभागाचेआहे.
वन विभागामार्फत रोपे आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. 25 जून ते 5 जुलैपर्यंत ही मोहीम सुरु असून प्रत्येक जिल्हयातील उपवनसंरक्षक वनविभाग कींवा विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण यांच्याकडे रोपासंदर्भात चौकशी करता येणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकास्तरीय समित्यांची स्थापना, समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कोणते वृक्ष कुठे आणि कसे लावायचे याचे वन विभागाकडून प्रशिक्षण दिले जात आहेत. प्रत्येक जिल्हयातील सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षलागवडीसाठी रोपे तयार केली असून  5 जुलैपर्यंत रोपे आपल्या दारी हा उपक्रम सुरु राहणार आहे. नागरिकांन वनीकरण विभागाच्या केंद्रावरुन सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे. उदयापासून सामान्य नागरिकांचे दायित्व म्हणून महाराष्ट्राची जनता मोठया प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी घराबाहेर पडेल. एक कुटूंब.. एक झाड याप्रमाणेच वृक्ष लागवड करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी