Posts

Showing posts from 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक बळ मिळाल्याची भावना

Image
भर पावसात हजारोंच्या उपस्थितीसह उदंड प्रतिसाद बहिणींच्या चेहऱ्यावर दिसून आला आनंद व उत्साह यवतमाळ, दि.२४ (जिमाका) : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य विषयक बाबींसह आपल्या स्वप्नपूर्तीसाठी योजनेतून मिळालेल्या रकमेचा विनियोग करता येईल, अशी भावना आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत वचनपूर्ती सोहळ्यात आलेल्या बहिणींनी व्यक्त केली. वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्णी रोड स्थित किन्ही परिसरातील मैदानावर हजारोंच्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावागावातून महिलांनी या कार्यक्रमाला भर पावसात हजेरी लावली होती. बंजारा व आदिवासी समाजाच्या भगिनी पारंपारिक वेषभुषेत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तसेच यावेळी आदिवासी व बंजारा समाजबांधवांनी पारंपारिक नृत्य सादर करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वागत...

यवतमाळ येथे वचनपूर्ती मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
 एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात लाभाचे वितरण  बहिणींना वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलोय  असंख्य बहिणींनी आपल्या मुख्यमंत्री भावाला बांधली राखी  राज्यातील बहिणींना लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : गेल्या दोन महिन्यात महिलांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. महिलांची समाजात, कुटुंबात भागिदारीसह त्यांचा ‘सन्मान’ वाढविण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी 40 लाख महिलांनी नोंदणी केली. त्यापैकी एक कोटी 7 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात आपण रक्कम देखील जमा केली आहे. राज्यातील शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी सुरुच राहील, असे यवतमाळ येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. जिल्हाभरातून 50 हजारावर लाडक्या बहिणी मेळाव्यास उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी ...

यवतमाळ जिल्ह्यातील 150 लाडक्या बहिणींशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

Ø मुख्यमंत्री भावाशी संवादाने महिला भारावल्या Ø जिल्ह्यात अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा यवतमाळ, दि.16 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे या भावाने दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यभर आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधला. जिल्ह्यातील 150 बहिणी या संवादात सहभागी झाल्या होत्या. या संवादाने बहिणी अगदी भारावून गेल्या होत्या. काल जिल्हाभर ठिकठिकाणी या संवादाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. यवतमाळ येथे महिला बालकल्याण भवन येथील सभागृहात संवादाचे थेट प्रसारण झाले. याठिकाणी 150 बहिणी उपस्थित होत्या. जिल्ह्यात ठिकठिकाणी देखील महिला सहभागी झाल्या. मंत्रालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील वेगवेळ्या ठिकाणच्या महिलांशी संवाद साधला. योजनेची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांनी मुख्यमंत्री देखील भारावून गेले. मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन… घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही... स...

लाडक्या बहिणींना निधी वितरणाचा आज शुभारंभ

Ø जिल्हा परिषद सभागृहात कार्यक्रम Ø 400 महिला उपस्थित राहणार Ø पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रातिनिधीक वितरण यवतमाळ, 16 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात अर्थसहाय्य वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या दि.17 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 12.30 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात काही महिलांना पालकमंत्र्यांच्याहस्ते धनादेश वितरीत करण्यात येतील. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात निधी वितरण यापुर्वीच सुरु झाले आहे. उद्या वितरणाचा अधिकृत शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पुणे येथून होत आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या जिल्हाभरातील 400 महिला या कार्यक्रमा...

लाडकी बहीण योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करा - आयुक्त डॉ.निधी पाण्डेय

Image
Ø उमरखेड येथे विविध बाबींचा आढावा Ø दिव्यांगांना लाभ मंजुरीपत्रांचे वितरण Ø रेशीम शेतीला भेट व शेतकऱ्यांशी संवाद यवतमाळ, दि.६ (जिमाका) : शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी केल्या. विश्रामगृह उमरखेड येथे आयुक्तांनी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी अनील खंडागळे, उपायुक्त शामकांत म्हस्के, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, नगरपालिका प्रशासनचे सहाय्यक आयुक्त निलेश जाधव, तहसीलदार आर.यु.सुरडकर, मुख्याधिकारी महेश जामनोर आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, सैनिक हो तुमच्यासाठी, एक हात मदतीचा-दिव्यांगाच्या कल्याणाचा आदी योजना, उपक्रमांचा देखील आढावा घेतला. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्य...

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 10 हजार 649 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली

Image
Ø तडजोड मुल्य 32 कोटी 47 लाख रुपये Ø लोकअदालतीने सावरला 21 जोडप्यांचा संसार Ø जुनी 145 हून अधिक प्रकरणे सामंजस्याने निकाली यवतमाळ, दि.29 (जिमाका) : राष्ट्रीय व राज्य विधीसेवा प्राधिकरणच्या निर्देशान्वये जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अदालतीत 10 हजार 649 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांचे तडजोड मुल्य तब्बल 32 कोटी 47 लाख ईतके आहे. जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतचे उद्घाटन न्यायाधीश श्री.न्हावकर यांच्याहस्ते झाडाला पाणी देवुन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए.नहार, जिल्हा न्यायाधीश-1 एस.आर. शर्मा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार व ईतर मंडळी उपस्थित होती. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित व वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्या...

दुध उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Ø शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान Ø दुध भुकटी निर्यातीसाठी 30 रुपये राज्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान व दुध भुकटी निर्यातीस 30 रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर योजना 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 फॅट, 8.5 एसएनएफ या गुणप्रतीच्या गाय दुधाला किमान 30 रुपये प्रतीलिटर इतका दर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अदा करणे बंधनकारक राहील. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये 5 प्रतीलिटर देण्यात येईल. योजनेत सहभागासाठी जिल्ह्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दुध प्रकल्प यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांकडे अर्ज करणे आवश्यक आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डशी व पशुधनाच्या इयर टँगशी लिंक असणे आवश्यक असेल. ही योजना केवळ महाराष्ट्र राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी दुध संघ व खाजगी प...

शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि.29 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसदच्यावतीने प्रकल्प क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शहरी शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. घरकुलाच्या लाभासाठी दि.20 ऑगस्ट पर्यंत संबंधित नगर पंचायत, नगरपरिषद कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुसद प्रकल्पात जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, महागांव, उमरखेड व नेर या सात तालुक्यांचा समावेश आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या नागरिकांना घरे उपलब्ध व्हावे याकरीता सन २०२४-२५ या वर्षात शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भागात राबवण्यात येत आहे. घरकुलाचे बांधकाम २६९ चौरस फूट ईतके आहे. योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी २ लाख ५० हजार इतके अनुदान दिले जाणार आहे. अनुदान रक्कम ४ टप्प्यात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेचे अर्ज नगरपरिषद व नगरपंचायत येथे उपलब्ध आहेत. परिपुर्ण अर्ज दि.29 जुलै ते 20 ऑगस्ट या कालावधीत संबंधित तालुक्यातील नगरपरिषद व नगरपंचायत येथे सादर करावे. अर्जासोबत अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, अनुसूचित...

आर्णी येथील आदिवासी वसतीगृहांसाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि.१९ (जिमाका) : आर्णी येथील आदिवासी मुलींचे व मुलांच्या शासकीय वसतीगृहात या शैक्षणिक वर्षाची वसतीगृह ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. मुलांच्या वसतीगृहाची प्रवेश क्षमता ७५ व मुलींच्या वसतीगृहाची क्षमता १२५ अशी आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी अनुसूचीत जमातीची असावी. वसतीगृहात विद्यार्थ्यांना निःशुल्क उत्तम राहण्याची व भोजनाची व्यवस्था, निर्वाह भत्ता व ईतर सुविधा पुरविण्यात येते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते, असे आर्णीच्या आदिवासी मुले व मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या गृहपालांनी कळविले आहे. 000

सदोबा येथील आदिवासी वसतीगृहासाठी प्रवेश प्रक्रिया

यवतमाळ, दि.19 (जिमाका) : आर्णी तालुक्यातील सदोबा सावळी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी या शैक्षणिक वर्षाकरीता वसतीगृह ऑनलाईन प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे. ईच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वसतीगृहाची प्रवेश क्षमता ७५ इतकी आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी हा अनुसूचीत जमातीचा असावा. वसतीगृहात विद्यार्थ्याला निःशुल्क उत्तम राहण्याची व भोजनाची व्यवस्था, निर्वाह भत्ता व ईतर सुविधा पुरविण्यात येते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते, असे सदोबा सावळीच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या गृहपालांनी कळविले आहे. 000

नँनो खतांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि.20 (जिमाका) : कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी तीन वर्षाकरीता विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना नँनो खतांचा पुरवठा केला जाणार असून त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी ही योजना राबविली जात आहे. योजनेंतर्गत चालू खरिप हंगाम मध्ये नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस या निविष्ठा पुरविण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा कालावधी दि. १२ ते ३० जून आहे. मेटाल्डीहाइड सोयाबीनचा अर्ज करण्याचा कालावधी दि.१२ ते २३ जून आहे. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि.१२ जून पासून सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टा...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि.20 (जिमाका) : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेतंर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेले 150 विद्यार्थी, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेले 150 विद्यार्थी व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेले 150 विद्यार्थी याप्रमाणे प्रती जिल्हा 450 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. प्रथम वर्षाची शैक्षणिक प्रवेश प्रकिया अद्याप सुरु नाही. त्यामुळे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया त्यांची महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये अनुज्ञेय राहील व तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ३८ हजार रुपये अनुज्ञेय राहणार आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेकरीता उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्...

दारव्हा शहरातील पाणी पुरवठा 15 दिवसात सुरळीत करा - पालकमंत्री संजय राठोड

Image
Ø दारव्हा शहर पाणीपुरवठा योजनेचा आढावा Ø अतिरिक्त कामांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : दारव्हा शहर पाणी पुरवठा योजनेचा पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आढावा घेतला. येत्या 15 दिवसात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. योजना पुर्ण होण्यासाठी होत असलेल्या विलंबाबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीला पालकमंत्र्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता श्री.गव्हाणकर, कार्यकारी अभियंता श्री.व्यवहारे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री.शिंदे कार्यकारी अभियंता श्री.खंगार, दारव्हाचे उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्यासह पाणी पुरवठा योजनेचे काम करणारे सल्लागार, कंत्राटदार उपस्थित होते. दारव्हा शहरातील ही योजना 2016 मध्ये मंजूर झाली. जास्तीत जास्त दोन वर्षात काम पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतू कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अद्याप योजना सुरु झाली नाही. संबंधित कंत्राटदारावर कारवाई क...

जिल्हास्तरीय तक्रार समितीच्या अध्यक्ष व सदस्यासाठी अर्ज आमंत्रित

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगीक छळवणूकीस प्रतिबंध घालण्यासाठी अधिनियम अमलात आला आहे. या अधिनियमानुसार जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करावयाची आहे. त्यानुसार या समितीचे अध्यक्ष व सदस्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. अधिनियमांतर्गत दिलेली कार्ये पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये निवासी उपजिल्हाधिकारी यांना जिल्हा अधिकारी म्हणून घोषित केलेले आहे. ज्या कार्यालयामध्ये 10 पेक्षा कमी अधिकारी, कर्मचारी असतील किंवा जेथे विभाग प्रमुखाविरूध्द तक्रारी आहेत, अशा कार्यालयातील लैंगीक छळाच्या तक्रारी जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीकडे करावयाच्या असतात. यापुर्वीच्या स्थानिक तक्रार समितीची कालमर्यादा संपुष्टात आली असल्याने सदर समितीचे पुर्नगठन केले जात आहे. या स्थानिक तक्रार समितीमध्ये अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती करावयाची आहे. अध्यक्ष या पदाकरीता संबंधित महिलेचा सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असावा आणि सदर महिला महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेली असावी. महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशासकीय संघटना, संघ किंवा लैंगीक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती...

महिलांचा लैंगिक छळ व बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई याबाबत मार्गदर्शन शिबिर

Image
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ, प्रतिबंध, निवारण कायदा तसेच महाराष्ट्रात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले व मार्गदर्शक म्हणून पॅनल वकील निलिमा जोशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणाल नहार यांनी शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरीकांना शासनाच्या प्रत्येक योजनेबाबत माहिती असणे गरजेचे आहे, असे सांगितले. जिल्हा विधीसेवेचे कार्य काय आहे व मोफत विधी सेवा कोणाला पुरविली जाते याबाहत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या माध्यमातून विधी सेवेच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हा यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्रात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजनेबाबत सुध्दा विस्तृत माहिती श्री.नहार य...

रोजगार मेळाव्यात 150 उमेदवारांची प्राथमिक निवड

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ विधानसभा क्षेत्रात आयटीआय येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात एकून 150 उमेदवारांची विविध नामांकित कंपन्यामध्ये प्राथमिक निवड करण्यात आली. मेळावा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी जी. यु. राजुरकर होते तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे, प्रबंधक ए. पी. भुते उपस्थित होते. रोजगार मेळाव्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एनआरबी बेअरिंग्ज ही नामांकित कंपनी सहभागी झाली होती. कंपनीने त्यांच्याकडील 116 रिक्त पदे अधिसूचित केली होती. या पदांसाठी मुलाखती घेण्याकरीता कंपनीचे एचआर राजु शहा हे उपस्थित होते. यावेळी श्री.राजुरकर यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. उमेदवारांनी मुलाखती देऊन रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्याकरीता शुभेच्छा दिल्या. सहाय्यक आय...

जागतिक बाल कामगार विरोधी दिवस साजरा

Image
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बाल कामगार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे दुकाने निरीक्षक विजय गुल्हाणे व रविंद्र जतकर हे उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित दुकाने निरीक्षक रविंद्र जतकर यांनी उपस्थित पॅरा विधी स्वंयसेवक यांना बाल कामगार विरोधी दिवसाबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच 1 ते 14 वर्षाच्या मुलांना व मुलींना कामावर ठेवता येत नाही तसेच त्यांना ठेवल्यास आस्थापना मालकास 20 ते 50 हजार रूपयाचा दंड व 2 ते 3 वर्षांची शिक्षा किंवा यापैकी दोन्ही होवू शकते याबाबत माहिती दिली. वय 14 वर्षाच्या वरील मुलांना कामावर ठेवता येते, परंतू त्याला सर्व सोईसुविधा पुरविणे हे आस्थापना मालकाचे काम आहे. जसे शाळेच्या वेळेवर त्याला सुट्टी देणे, दोन ते तिन तासांनी त्याला ब्रेक देणे इत्यादी अनेक उदाहरणे दिली. 14 वर्षावरील मुलांना कामावर ठेवतांना धोकादायक जागी कामावर ठेवता येत नाही. अधोकादायक जागी कामावर ठे...

जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कार्यशाळा

Image
प्रकल्प संचालक आत्मा व राष्ट्रीय बियाणे निगमच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र येथे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कंपन्यांच्या संचालकांना तज्ञांद्वारे विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे उ‌द्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचे तनवीर मिर्झा यांनी शेतकरी उत्पादक कंपनी कशी चालवावी यासंदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले. सनदी लेखापाल दीपक झंवर यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे ऑडिट, आर्थिक विश्लेषण, आराखडा व इतर अनुषंगिक बाबींवर मार्गदर्शन केले. सचिन मालकर यांनी शेतकरी उत्पादक कंपनीसाठी व्यवसाय आराखडा सोबतच कंत्राटी शेती जसे संत्रा, भाजीपाला, शेवगा या संदर्भामध्ये माहिती दिली. आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी शेतकरी उत्पादक कंपनीसाठी कृषी विभागाच्या विविध योजना जसे नैसर्गिक शेती, स्मार्ट, कृषी पायाभूत निधी इत्यादी योजनांबाबत माहिती दिली. योजनेचे महत्व व योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.लहाळे यांनी पीएमए...

तलाव, जलाशयाकरीता नोंदणीकृत संस्थांची यादी जाहीर

जिल्ह्यातील तलाव, जलाशय मासेमारी करीता ठेक्याने देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र असलेल्या संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर आक्षेप असल्यास नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन परिपत्रकान्वये जिल्ह्यातील तलाव, जलाशय विनामुल्य, जाहिर लिलाव, निविदा पध्दतीने मारेमारीकरीता ठेक्याने देण्यात येणार आहे. या तलाव, जलाशयावर नोंदणीकृत व सन 2024-25 ते 2028-29 या कालावधीमधील तलाव ठेका घेण्यास पात्र असणाऱ्या संस्थांचा तपशिल प्राप्त झालेला आहे. या जलाशयावर तलाव ठेका घेण्यास पात्र असणाऱ्या संस्थांची नावे जाहीर करण्यात आली आहे. नोंदणीकृत संस्थांबाबत कोणास काही आक्षेप, हरकत असल्यास त्यांनी आपल्या संस्थांचे आक्षेप, हरकती सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) यांच्याकडे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, एमआयडीसी लोहारा येथे दि.24 जून पर्यत आवश्यक कागदपत्रासह सादर करावे. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही आक्षेप अर्जावर विचार करण्यात येणार नाही, असे सहाय्यक निबंधक डी.व्ही.पाटील यांनी कळविले आहे. 000 ...

प्रथम वर्ष पॉलिटेक्निक डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावी नंतर प्रथम वर्ष इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 25 जून आहे. ईच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र, महत्त्वाच्या तारखा तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने https://poly२४.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. जिल्ह्यात एक शासकीय व दोन खासगी तंत्रनिकेतन असून डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या एकूण 810 जागा उपलब्ध आहेत. एकूण प्रवेश क्षमतेच्या 70 टक्के जागा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता व 30 टक्के जागा इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता राखीव आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. नोंदणी शुल्क अराखीव करीता 400 व राखीव करीता 300 रुपये आहे. ऑनलाइन पद्धतीमध्ये ई-स्क्रूटिनी, फिजीकल स्क्रूटिनी असे दोन पर्याय आहेत. फार्म भरण्यासाठी मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील. त्यानंतर ई-स्क्रूटिनी पद्धत...

आंतरराष्ट्रीय बाल मजूरी विरोधी दिनानिमित्त जनजागृती अभियान

दिनांक 12 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल मजूरी विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगात पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्यावतीने बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान व सप्ताह जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध व्यापारी संघटना, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांमध्ये जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल, व्यापारी संस्था व ईतर सर्व आस्थापनांच्या व्यापाऱ्यांमध्ये बालकामगार या अनिष्ट प्रथेविरुध्द जागृती करण्यात येणार आहे तसेच त्यांना बाल मजुरी निर्मुलनाचे महत्व समजावून सांगून जनजागृती करण्यात येईल. आमच्याकडे बालकामगार काम करीत नाहीत व यापुढेही बालकामगार ठेवणार नाही, असे हमीपत्र व्यापारी वर्गाकडून भरुन घेण्यात येईल. लहान वयात काम केल्यामुळे बालकांची त्वचा, श्वसनमार्ग संस्था, मेंदु, जठर यावर विपरीत परीणाम होतो. त्यांची मानसिक, शारीरीक व बौद्धीक वाढ खुंटते. चांगले जीवन जगण्याचा त्यांना अधिकार आहे, तो आपण सर्वांच्या प्रयत्नाने व मदतीने त्यांना मिळाला पाहिजे. या निमित्ताने बालमजुरी मुक्त महाराष्ट्र या मोहिमेमध्ये सुध्दा...

यवतमाळ शासकीय तंत्रनिकेतनच्या ५६ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

Image
विविध नामांकित कंपन्यांमधील नियुक्तीसाठी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये शासकीय तंत्रनिकेतनच्या विविध अभियांत्रिकी शाखेतील ५६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर निवड प्रक्रियेत सिमेन्स लिमिटेड औरंगाबाद, बजाज ऑटो लिमिटेड पुणे आणि भारत गियर्स लिमिटेड सातारा या कंपन्यांचा समावेश आहे. या निवड प्रक्रियेत सर्व प्रथम योग्यता चाचणी व मुलाखत घेण्यात आली. या शिबीरामध्ये सिमेन्स लिमिटेडला विद्युत अभियांत्रिकीचे ८ विद्यार्थी, यंत्र अभियांत्रिकीचा १ विद्यार्थी निवडले गेले. बजाज ऑटो लिमिटेडमध्ये अणूवि‌द्युत अभियांत्रिकी विभागाने १५ विद्यार्थी, विद्युत अभियांत्रिकीचे ९८ विद्यार्थी व यंत्र अभियांत्रिकीचे ९ विद्यार्थी निवडले गेले. तसेच भारत गियर्स लिमिटेडमध्ये यंत्र अभियांत्रिकीच्यि ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या शिबीराच्या आयोजनाकरिता संस्थेचे प्राचार्य डॉ.आर.पी. मोगरे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण व शिबीराचे अधिकारी पी.एम.जाधव, एस.ये.शिरभाते अधिव्याख्याता विद्युत, जी. आर. भह अधिव्याख्याता यंत्र,...

होतकरू युवकांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करीता शिष्यवृत्ती योजना

Image
Ø पालकमंत्री संजय राठोड यांची संकल्पना Ø नामांकित संस्थेत स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण Ø निवास व अन्य खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती यवतमाळ, दि.11 (जिमाका) : ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत कमी पडू नये यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दारव्हा, दिग्रस नेर तालुक्यातील युवकांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या युवकांना नामांकित संस्थेत प्रशिक्षण दिले जाणार असून मासिक खर्च भागविण्यासाठी रोख शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे. या तिनही तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी दि.16 जून पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची शंभर गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा दि.23 जून रोजी दिग्रस, दारव्हा व नेर येथे घेतली जाणार आहे. नाव नोंदणी 8668920552, 9067580048, 9527930517 किंवा क्युआर कोड स्कॅन करून गुगल फॅार्मद्वारे करू शकतात. नोंदणीसाठी विद्यार्थी पदवीधारक असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या वर नसावे. युवकाचे वय किमान 21 वर्ष असणे आवश्यक आहे. परिक्षेद्वारे शि...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने दि.12 जून रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धामणगाव रोड, यवतमाळ येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्याकरीता एनआरबी बीअरींग, छत्रपती संभाजीनगर या आस्थापनेमार्फत एकुण 116 रिक्तपदांकरीता मुलाखती घेण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये आयटीआय फिटर, टर्नर, ईलेक्ट्रिशिएन, मशिनिस्ट, वेल्डर, मेकॅनिक मशिन टुल मेंटेनन्स, टुल ॲन्ड डाय मेकर, मशिनिस्ट ग्रँडर, या आयटीआय ट्रेडच्या उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील उपरोक्त आयटीआय ट्रेडधारक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून रोजगाराची संधी प्राप्त करून घ्यावी व आपला रोजगार निश्चित करावा. येतांना मुळ कागदपत्र सोबत आणावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त वि. सा. शितोळे व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांनी केले आहे. 000

डॉ.भालचंद्र स्मृती दृष्टीदिन 10 जूनला

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी 10 जुन हा दिवस डॉ.भालचंद्र स्मृती दृष्टीदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी देखील हा दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवसानिमित्त नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दृष्टीदिन दिवशी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करुन त्याद्वारे सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. डॉ.भालचंद्र यांचे संपूर्ण नाव डॉ.रामचंद्र लक्ष्मणराव भालचंद्र असे होते. त्यांचा जन्म दि.10 जुन 1926 ला झाला आणि त्यांचा मृत्यु दि.10 जून 1971 रोजी झाला. योगायोगाने त्यांचा जन्म आणि मुत्युदिन एकच आहे. भालचंद्र हे प्रख्यात नेत्रशल्य चिकित्सक होते. त्यांच्या जीवन कालावधीत कुठलीही आधुनिक सोयीसुविधा नसतांना अंधत्व निर्मुलन कार्य करुन हजारो यशस्वी मोतिबिंदु शस्त्रक्रिया केल्या. त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 10 जून ते 16 जुन हा डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताह साजरा केला जातो. शासकीय सेवेतील नेत्र शल्यचिकित्सक डॉ.रामचंद्र लक्ष्मणराव भालचंद्र यांनी अ...

अन्न व औषध प्रशासन कार्यालय नवीन इमारतीत

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त हे कार्यालय दि. ८ जून पासून पळसवाडी पोलिस वसाहती मागे, समाज कल्याण कार्यालयाजवळ यवतमाळ येथे स्वतःच्या ईमारतीत स्थलांतरीत होत आहे. या कार्यालयाचा नवीन पत्ता सहायक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, नझुल शिट नंबर २५ डी, १/१ अ, पळसवाडी पोलिस वसाहतीमागे, समाजकल्याण कार्यालयाजवळ, यवतमाळ असा आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच अन्न विक्री, उत्पादक व्यावसाईक व औषध विक्रेते यांनी कार्यालयीन कामासाठी वरील नमूद ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. 000

सर्वोत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट निर्यात पुरस्कार दिले जातात. सन 2022-2023 व सन 2023-2024 या वर्षांच्या निर्यात पुरस्कारासाठी निर्यातभिमूक उद्योग घटक, व्यापारी निर्यातदार अशा विविध क्षेत्रातील निर्यातदारांकडून सर्वोत्कृष्ट निर्यात पुरस्कार व गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. निर्यात घटकांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रीकल्स उत्पादने, बेसिक केमीकल्स, फार्मास्युटिकल्स आणि कॉस्मेटिक उत्पादने, प्लॉस्टीक आणि लिनोलियम उत्पादने, चामड्याच्या वस्तू, ताज्या भाज्या व फळे, प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ तथा इतर कृषि उत्पादने, सागरी उत्पादने, तयार कपडे, हस्तकला, रत्ने व दागिणे आदींचा समावेश आहे. विविध प्रकारचे 36 राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार दिले जाणार आहे. त्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या घटकांसाठी 11 पुरस्कार, लघु उद्योग घटक 14 पुरस्कार, व्यापारी निर्यातदार 1 पुरस्कार, निर्यातगृह 1 पुरस्कार, ट्रेड हाऊस 1 पुरस्कार, एसएसआय युनिटसाठी प्रादेशिक 6 पुरस्कार, राज्य सरकार महामंडळ 1 पुरस्कार, सेवा निर्यातदार 1 पुरस्कार असे एकुण 36 निर्यात पुरस्कारांच...

शेतकऱ्यांना रास्त दराने बियाणे उपलब्ध होतील याची दक्षता घ्या - डॉ.पंकज आशिया

खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात शेतकऱ्यांना आवश्यक कृषि निविष्ठा उपलब्ध होण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आढावा घेतला. बि-बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके शेतकऱ्यांना रास्त भावात उपलब्ध होतील याची दक्षता घ्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. यवतमाळ हा कापूस उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्याची हद्द तेलंगणा राज्याला लागून असल्यामुळे केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेले बियाणे जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी व पोलिस विभागाने समन्वयाने काम करावे. शेतकऱ्यांना रास्त दराने बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी खबरदारी घेण्यात यावी. जादा दराने निविष्ठा विक्री होत असल्यास कारवाई करण्यासाठी पोलिस विभागाने कृषी विभागाला सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या. जिल्ह्यात कोठे बोगस बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके आढळून आल्यास त्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा संबंधित पंचायत समिती येथे कृषि अधिकारी यांना द्यावी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाच्या 940322999...

तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

तंबाखू व तंबाखूजन्यपदार्थ्यांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती करण्यासाठी जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी दि.31 मे रोजी साजरा केला जातो. त्यानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांपासून सामान्य नागरिक व देश सुरक्षित राहायला हवा. यावर्षी या दिवसाकरीता जागतिक आरोग्य संघटना यांनी तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्ष हे घोषवाक्य निवडले आहे. तंबाखू नियंत्रण समुदायाच्या प्रयत्नांमुळे सिगारेटचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले असले तरी असुरक्षित गटांचे रक्षण करण्यासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस. चव्हाण आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगलपल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक तंबाखू नकार दिनानिमीत्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या चमुने महिनाभर विविध उपक्रमांमार्फत जनजागृती कार्यक्रम राबविले. दि.1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व आरोग्य संस्थांमध्ये...

जागतिक सायकल दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

जागतिक सायकल दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व क्रीडा भारती सायकलिंग ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी केले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार, क्रिडा भारती सायकलिंग ग्रुपचे अध्यक्ष दिलीप राखे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून अभ्यंकर कन्या शाळेचे उपमुख्याध्यापक अविनाश जोशी होते. सदर रॅली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय येथून एसबीआय चौक, अप्सरा टॉकीज चौक, हनुमान आखाडा, पाच कंदील चौक, पोलिस स्टेशन अवधुतवाडी, सारस्वत चौक, दवा बाजार, दत्त चौक, संविधान चौक, एलआयसी चौक, तिरंगा चौक, करवा मेडीकल असे मार्गक्रमण करीत जिल्हा व सत्र न्यायालय यवतमाळ येथे विसर्जीत झाली. रॅलीनंतर सायकल रॅली संदर्भात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये उपमुख्याध्यापक अविनाश जोशी यांनी सायकलचे महत्व याबाबत विस्तृत माहिती दिली. वातावरणामध्ये होणारे प्रदुषण सायकल चालविल्यामुळे कमी होते, असे ते म्हणाले. कार्यकमाचे उद्घाटक व अध्यक्...

बँकांनी खरीप पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट 15 जूनपर्यंत पूर्ण करावे - डॉ.पंकज आशिया

खरीप हंगामात शेतीसाठी शेतकऱ्यांना पिककर्जाची आवश्यक्ता असते. जिल्ह्यातील सर्व बॅकांना व त्यांच्या शाखांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. बॅंकांनी आपले वाटपाचे उद्दिष्ट दि.15 जूपपर्यंत पुर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांकडून खरीप पिककर्ज वाटपाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. सुरुवातीस जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये यांनी बॅंकांना या वर्षाच्या पिककर्जाचे दि.31 मे पर्यंत प्राप्त उद्दिष्ट व साध्य याची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकनिहाय पिककर्ज वाटपाचा आढावा घेतला. त्यात विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने 132 कोटीचे पिक कर्ज वाटप केले असून ते दिलेल्या खरीप लक्षांकाच्या 82 टक्के आहे. या उत्कृष्ट वाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या बॅंकेचे कौतूक केले. काही खाजगी बँकाच्या कर्ज वाटपाच्या कामगिरीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच त्यांना दिलेले लक्षांक पूर्ण करण्यासाठी कृती आढावा तयार करण्याचा सूचना केल्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या कामगिरीचा आढावा ...

खरेदी-विक्रीसाठी पशुधनाची ईअर टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी आवश्यक

जनावरांची खरेदी विक्री करतांना शेतकऱ्यांची फसवणुक टाळणे तसेच राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक आहे. ईअर टॅगिंग व नोंदणीमुळे विशिष्ठ भागातून जनावरांची खरेदी-विक्री वाढणे, चाऱ्याची टंचाई, दुधाचे भाव पडणे, दुष्काळ या अनुषंगाने पुरावाजन्य निर्णय घेणे प्रशासनाला शक्य होणार आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या जनावरांची खरेदी- विक्री टॅगिंग करून झाल्यास त्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करता येईल व बाहेरच्या राज्यातून आजारी जनावरे राज्यात दाखल झाल्याने होणारे साथ रोग प्रादूर्भाव यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. रेगुलेशन ऑफ लाईव्हस्टॉक मार्केट नियम 2017 मधील सेक्शन 22 (फ) व सेक्शन 26 अन्वये पशुधनाच्या बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी करण्यात आलेल्या पशुधनाची माहिती विक्री करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागास सादर करणे तसेच खरेदी-विक्री करण्यात आलेल्या पशुधनाची ईअर टॅगिंग करुन नोंदी अद्यावत करण्याबाबत निर्देशित केलेले आहे. तसेच बाजारामध्ये पशुधना...

जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केले. ०००

बोगस कृषि निविष्ठा निदर्शनास आल्यास तक्रार नोंदवा

Ø तक्रारींसाठी कृषी विभागाकडून क्रमांक जाहीर Ø अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन यवतमाळ, दि 30 (जिमाका) : खरीप हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये बि-बियाणे, रासायनीक खते व किटकनाशकाची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. सदर कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या उपलब्ध होणे आवश्यक आहे. दर्जाबाबत किंवा बोगस निविष्ठांबाबत शेतकऱ्यांना तक्रार असल्यास त्यांनी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्तम दर्जाच्या उपलब्धता व्हाव्यात तसेच जिल्ह्यात कोठेही बोगस बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके विक्री होऊ नये, यासाठी कृषि विभागाच्यावतीने हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे. बोगस व गुणवत्ता नसलेल्या या निविष्ठा आढळून आल्यास शेतकऱ्यांनी त्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषि अधिकारी यांना द्यावी. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना बि-बियाणे, रासायनीक खते किंवा किटकनाशके याबाबत तक्रार नोंदविता यावी यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष स्थापण करण्यात आला आहे. या कक्...

अतिक्रमण बंद पांदनरस्ते मोकळे करण्याची मोहिम

जिल्ह्यामध्ये गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण बंद झालेले पांदन, पाणंद, शेतरस्ते शिवार, शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहिम दि.30 जून पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी असे अतिक्रमण बंद रस्ते असल्यास ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पांदन रस्ते, शेत रस्ते मोकळे करावयाचे असल्यास आपल्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून दि.30 जून पर्यंत अतिक्रमण मोकळे करण्याबाबतची कार्यवाही करून घावी. याबाबत काही तक्रार किंवा अभिकथने, गाऱ्हाणी असल्यास तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, ह्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी केले आहे. 000

शालेय दाखल्यांसाठी शिबिरांचे आयोजन

शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना सदर दाखले वेळेत मिळावेत यासाठी महसूल प्रशासनाच्यावतीने शिबिर घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना दाखले देण्याकरीता शिबिर दि.30 जूनपर्यंत घेण्यात येणार आहे. शिबिराबाबतचे सविस्तर वेळापत्रक मंडळनिहाय तहसिल कार्यालयात उपलब्ध आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय कामाकरीता आवश्यक असलेले कागदपत्र उपलब्ध ठेवून शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा, असे उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी केळविले आहे. 000

मतमोजणी निमित्त मद्यविक्रीस बंदी

यवतमाळ, दि.30 (जिमाका) : यवतमाळ- वाशिम व हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दि.4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानिमित्त मतमोजणीच्या दिवशी निकाल घोषित होईपर्यंत संपुर्ण जिल्हाभर मद्यविक्रीस बंदी राहणार आहे. यवतमाळ वाशिम व हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दि.4 जून रोजी मतमोजणी आहे. त्यानिमित्त निकाल घोषीत होईपर्यंत सर्व किरकोळ व घाऊक मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-2, सीएल-3, सीएल, एफएल, टिओडी-3 अनुज्ञप्ती, एफएल-1, एफएल-2, एफएल-3 (परवानाकक्ष) एफएल-4 व एफएल/ बीआर-2 प्रकारच्या मद्यविक्रीस बंदी राहणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे. 000 --

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

Image
यवतमाळ, दि.२८ (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांच्यासह कार्यालय अधीक्षक तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केले. ०००

आदिवासी गावातील 400 सरपंचांना पोस्टकार्डद्वारे योजनांची माहिती

Image
Ø पांढरकवडा आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम Ø कार्डवरील क्युआरद्वारे मिळतो योजनांची माहिती Ø प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रयत्न Ø वंचितांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी सरपंचांना आवाहन शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतेच असे नाही. आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यावतीने लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी अतिशय नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. लाभापासून वंचित 400 आदिवासी गावातील सरपंचांना पोस्टकार्ड पाठविण्यात आले असून या कार्डवरील क्युआर कोडवर विभागाच्या योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. क्युआर स्कॅन केल्यानंतर चुटकीसरशी योजना समजून घेता येणार असून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेतांना मदत होणार आहे. पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकुण 9 तालुके असून त्यात यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, केळापुर, घाटंजी, झरी जामणीचा समावेश आहे. प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा 18, अनुदानित आश्रमशाळा 28 व शासकीय वसतीगृह 19 कार्यरत आहे. डोंगराळ व दुर्ग...