Posts

आयआयएचटी प्रथम व द्वितीय सत्राकरीता प्रवेश सुरु

केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय सत्राकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ईच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. प्रथम वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता १३ जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा तसेच वेंकटगिरी करीता २ जागेच्या प्रवेशासाठी तसेच द्वितीय वर्षाकरीता ३ जागा (१ जागा आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता) पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि. 10 जून पर्यंत मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपुर्ण अर्ज दि. 10 जून पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अन

शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीचे अर्ज 30 एप्रिलपर्यंत स्विकारणार

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेचे नवीन व नूतनीकरणचे अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल ही आहे. या मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर मुदतवाढ ही अंतिम स्वरुपाची असल्याने दि. 30 एप्रिल पूर्वी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येईल. या कालावधीनंतर अर्ज प्रलंबित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील, तसेच अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांना शिक्षण शुल्क घेता येणार नाही, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक मंगला मुन यांनी कळविले आहे. 000

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे मध्यस्थी जागृती कार्यक्रम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर होते. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश अ. अ. लऊळकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश आर. एस. साळगांवकर व बी. एस. संकपाल, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव के. ए. नहार उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हा मुख्यालयातील सर्व न्यायाधीश, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, पिएलव्ही, वकील मंडळी, पक्षकार तसेच न्यायालयील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. व्ही न्हावकर यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत माहिती दिली. ठराविक प्रकरणात मध्यस्थी प्रक्रिया राबविता येतात. कौटुंबिक वाद, विवाह संबंधातील वाद, शेतीचे वाद असतील तर ते वाद मध्यस्थीने मिटविता येते. वकील लोकांनी मध्यस्थी प्रक्रियेमध्ये व लोकअदालतमध्ये भाग घ्यावा तसेच दोन्ही पक्षकाराच्या संवादाने वाद मिटतो, असे यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सांगितले. या कार्यक्रमात बी. एस. संकपाल यांनी वैकल्पीक वा़द निवारण केंद्

अमरावती येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय व विद्यार्थी विकास विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस या नामांकित कंपनी करीता रोजगार मेळाव्याचे आयोजन दि.१९ मार्च रोजी विद्यापिठाच्या डॉ.ङी.के.देशमुख सभागृह येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याकरीता अमरावती विभागातील किमान २०० पदवीधर, पदवी परिक्षेच्या अंतीम वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यामधे सहभाग घेण्याकरिता इच्छुक पदवीधर उमेदवारांनी https://forms.gle/३zvnHwm८ TRU९uB१N९ या लिंक वर क्लिक करून आपली नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपआयुक्त द.ल. ठाकरे आणि सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे. शैक्षणिक पात्रता, निवड पध्दती, सोबत आणावयाचे दस्तऐवज याबाबतची माहिती वरील गुगल लिंकमध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी गुगल फार्म भरून प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 000

तणावातही पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात - पालकमंत्री संजय राठोड

Image
पोलिस विभाग अत्यंत महत्वाचा विभाग आहे. समाजात शांतता, अलोखा राखण्याचे काम या विभागातील अधिकारी, कर्मचारी करत असतात. अलिकडे पोलिस विभागाचे काम प्रचंड वाढले आहे. कर्मचाऱ्यांची देखील कमतरता आहे, असे असतांना देखील प्रामाणितपणे कर्तव्य बजावले जातात, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने येथील कवायत मैदान येथे बांधण्यात आलेल्या आरोग्यम् पोलिस हेल्थ क्लबचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकडे आदी उपस्थित होते. अलिकडे मोबाईल, इंटरनेटमुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. अशा गुन्हेगारीवर आळा घालने फार मोठे आवाहन आहे. आमचा पोलिस विभाग समर्थपणे या आवाहनाचा सामना करत आहे. पुर्वी पोलिसांकडे ठराविक कामे होती. अलिकडे पोलिस विभागाचे कार्यक्षेत्र देखील वाढले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच सामाजिक पोलिसिंग करावी लागते.

जिल्ह्यातील तीन महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

राज्यामधील महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक-युवतींना व्हावा या दृष्टीकोनातून महाविद्यालयामध्ये महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील तीन केंद्राचा समावेश असून या केंद्राचे उद्गाटन नुकतेच झाले. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, रामदास आठवले आर्ट सायन्स ज्युनिअर महाविद्यालय चिकणी (डो) ता.नेर, श्री. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मारेगाव या महाविद्यालयामध्ये महाविद्यालय कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमास कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनप्रसंगी या योजनेचे नाव चाणक्य कौशल्य विकास केंद्र असे घोषित केले. देशाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन आर्थिक प्रगती मध्ये देश हा उच्च स्तरावर पोहचवण्याचे कार्य या विभागामार्फत होत आहे. युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. ज

कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन

वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शिल्पा पोलमेल्लीवार, उपशिक्षणाधिकारी प्रा.अंजली गहरवाल, प्रा.धिरज वसुले व डॉ. प्रशांत शिंगोटे उपस्थित होते. डॉ.शिल्पा पोलपेल्लीवार यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी समाजात जगत असतांना स्वत:ची क्षमता ओळखून जागरूक व सक्षम असले पाहिजे. स्वत:मधील चांगल्या विचारांचा विकास करून व वाईट विचार काढून स्त्रीयांचे तेज उसळत असते. जीवनात पुढे जात असतांना चिकित्सक व संशोधनात्मक दृष्टीकोन बाळगल्यास स्वत:चे कौशल्य विकसित करून कुटुंबासाठी व समाजात जगता येते, असे सांगितले. डॉ. पार्लावार म्हणाले की, न्यूयार्क येथे महिलांनी कामाच्या जागी सुरक्षितता, दहा तासांचे काम व मतदानाचा हक्क या मागण्या केल्या होत्या. स्त्रीयांचा सन्मान, कर्तृत्व, सशक्तीकरण आत्मनिर्भर व सामाजिक समानतेचे महत्व पटवून देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना अमानवी पद्धतीने वागविणाऱ्या समाज व्