प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नका


v जिल्हाधिकारी यांचे आवाहन
यवतमाळ, दि. 30 : स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक व महाराष्ट्र दिन राज्यभर साजरा करण्यात येतो. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा, हे प्रत्येक सुजान नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिनी प्लास्टिक ध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यांवर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजान व जागरूक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशाप्रकारे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. तसेच विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करू नये. प्लास्टिकचे ध्वज आढळून आल्यास संबंधीत तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावेत. 1 मे या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी