शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
यवतमाळ, दि. 11 : जिल्ह्यातील शेतकरी
आत्महत्या प्रकरणे निकाली काढून अशा कुटुंबांना मदत देण्याच्या उद्देशाने
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन एकूण 9
प्रकरणे निकाली काढली.
यात बाभुळगाव तालुक्यातील कृष्णापूर
येथील विजय विठ्ठल दहिफळे, आर्णि तालुक्यातील जांब येथील अतिष नरसिंह पवार, आर्णि
तालुक्यातील बोरगाव येथील केशव मधुकर पवार, वणी तालुक्यातील उमरी येथील सुनील
भावानी देवाळकर, दारव्हा तालुक्यातील ब्रम्हगाव येथील राजेश परशराम चव्हाण, नेर तालुक्यातील
घेई येथील भिमराव नामदेव राठोड, नेर
तालुक्यातील लोहतवाडी येथील विनोद सुखदेव राठोड, दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील
नारायण भासू राठोड आणि कळंब तालुक्यातील मेटीखेडा येथील महादेव वसंतराव जगताप
यांच्या प्रकरणांचा समावेश होता.
शेतकरी आत्महत्या प्रकरणातील
कुटुंबियांना शेतामध्ये नरेगा अंतर्गत विहिरी, तसेच काही कुटुंबांना शेतात पंप,
जोडधंदा म्हणून गाई-म्हशी वाटप, शेटीवाटप आदींचा लाभ द्यावा. संजय गांधी निराधार
योजनेंतर्गत सुध्दा सदर कुटुंबाना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
एका आठवड्याच्या आत संबंधित नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक
यांनी सदर कुटुंबियांकडून सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावीत. यात कोणतीही चालढकल
करू नये, अशा सुचना त्यांनी केल्या.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी
ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
(पंचायत) अरविंद गुडधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, पशुसवंर्धन विभागाचे
उपायुक्त डॉ. बी. आर. रामटेके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, प्रकल्प
अधिकारी आत्माराम धाबे यांच्यासह संबंधित गावांचे तलाठी, पोलिस पाटील, नायब
तहसीलदार आदी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment