
बँकांनी 31 मे पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या - किशोर तिवारी * पीककर्ज व विविध विषयांचा आढावा * पीककर्ज नाकारल्यास कार्यवाही करु यवतमाळ, दि. 31 : येत्या हंगामात जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. जे शेतकरी बँकांच्या नेटवर्कमधून सुटले आहे अशांना परत बँकांना जोडण्यासोबतच येत्या 31 मे पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणे आवश्यक आहे, असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांनी पीककर्जासोबतच आरोग्य सुविधा, जोड व्यवसाय, शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे क्लस्टर, शैक्षणिक सुविधा येत्या खरीप हंगामात पेरणीखालील क्षेत्रात वाढ करण्यासोबतच उत्पादकतेत वाढ करण्याबाबत संबंधीत विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिं...